पुणे-पदमश्री नामदेव ढसाळ हे क्रांतिकारी दलित साहित्यिक होते , खेड्यापाड्यातील अन्याय अत्याचार संपविण्याची त्यांनी युवकांची लढाउ संघटना निर्माण केली त्यांच्या शब्दाचा दरारा विलक्षण होता . त्यांनी जनतेला मोठा दिलासा दिला . असे उद्गार प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी काढले .
दलित पँथरचे संस्थापक पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या ४ व्या स्मृतीदिनानिमित्त झोपडपट्टी सुरक्षा दलाच्यावतीने अभिवादन सभा शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली .यावेळी पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या प्रतिमेस झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. रतनलाल सोनग्रा झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट ,लखनौचे माजी आमदार दादुजी गुप्ता, पुणे शहर अध्यक्ष मोहंमद शेख , काशिनाथ गायकवाड , सुनिता आडसुळे , प्रतिभा गायकवाड , प्रा. सुरेश धिवार , दत्ता कांबळे , सुरेखा भालेराव , वामन कदम , वैशाली अवघडे , गणेश लांडगे , संतोष जगताप , महादेव मोरे , संतोष सोनवणे , महेश जाधव , अर्चना वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी लखनौचे माजी आमदार दादुजी गुप्ता म्हणाले कि , पदमश्री नामदेव ढसाळ आमचे मित्र होते . त्यांनी आपल्या सामाजिक लढ्यातून मानवतावादी संदेश देउन तसे साहित्य त्यांनी निर्माण केले . पँथर नेते नामदेव ढसाळ यांनी झोपडपट्टी सुरक्षा दलाला नेहमीच प्रेरणा दिली . भगवान वैराट यांनीझोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून आपला लढा उभा केला .