पुणे-देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नजीकच्या स्थानिक महानगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा भारतीय लष्कराचा प्रस्ताव स्वागतार्थ असल्याचे पुणे कॅन्टोन्मेंट भागातील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ चव्हाण यांनी केले .
यामुळे कॅन्टोन्मेंट विभागातील हुशार व गरजू शालेय मुलांना फायदा होईल . या सर्व शालेय विद्यार्थ्यांना महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळेल . तसेच , महिला बचत गटांना महापालिकेकडून मिळणाऱ्या सर्व योजनेचा फायदा महिला बचत गटांना होईल . त्याच बरोबर आर्थिक दृष्टया कुमकुवत रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी अनुदान महापालिका दिले जाते . अशा अनेक सुख सुविधा कॅन्टोन्मेंट वासियांना मिळतील . ज्या आज कॅन्टोन्मेंटमध्ये मिळत नाही .
सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचा महापालिकेमध्ये मी,मान सन्मान दिला जातो त्यांना काम करण्याची संधी महापालिकेत मिळते . सध्या कॅन्टोन्मेंट विभागातील कार्यकर्त्यांना या सर्वापासून वंचित आहेत .
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या काही संकोचित सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला तर त्या ठिकाणी जनमत चाचणी प्रशासनाने द्यावी . कॅन्टोन्मेंट विलानीकरण नजीकच्या महापालिकेमध्ये व्हावे यामध्ये फक्त बिल्डरांचा फायदा नसून यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे . व प्रशासकीय कामकाजामध्ये सुलभता येईल .शहरच्या मुख्य प्रवाहामध्ये हा संपूर्ण परिसर येईल व संरक्षण खात्याच्या मोठ्या आर्थिक खर्चाची मोठ्या प्रमाणावर बचत होऊन संरक्षणाच्या दृष्टीने लष्कराला अधिक क्षमता मिळेल . आज देखील पाणी पुरवठा , सार्वजनिक वाहतूक व्यवस्था , वीज आदी सुविधा या इतर संस्था कडून मिळतात मग कॅन्टोन्मेंट विभागातील नागरी वस्तीचे विलानीकरण नजीकच्या महापालिकेत व्हावे हा प्रस्ताव निश्चितच स्वागतार्थ आहे .