विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतूत वैश्विक एकात्मतेची ताकद

Date:

डॉ. विजय भटकर यांचे मत ; रामेश्वर येथे विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतूच्या लोकार्पण सोहळा

लातूर : आपली संस्कृती एम वैश्विक  संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये सर्व धर्मांचा गाभा व तत्वे समाविष्ठ आहेत. रामेश्वर येथे विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू माझ्या दृष्टीने जगातील सर्वात सुंदर सेतू आहे. कारण या सेतूव्दारे विश्वशांती प्रस्थापीत केली जाईल. सनातन धर्माचे दर्शन आयोध्येत होते. मात्र त्याचा प्रत्येय मला रामेश्वर येथे उभारण्यात आलेल्या मानवता सेतूला पाहून येत आहे. या सेतूमध्ये विश्वाला एक करण्याची ताकद आहे असे मत जगविख्यात संगणक तज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी पुणे भारत तर्फे लातूर तालुक्यातील रामेश्वर (रुई) येथील सोनावळा नदीवर उभारण्यात आलेल्या विश्वशांती, मानवता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतूचे श्रीरामनवमीचे औचीत्य साधुन लोकार्पण केले गेले, या सोहळयाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी लातूरचे पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर, लातूरचे खासदार डॉ. सुनिल गायकवाड, माजी केंद्रीय मंत्री डॉ. आरीफ महम्मद खान, वरीष्ठ पत्रकार डॉ. वेदप्रताप वैदिक, फिरोज बख्त अहेमद, नोबेल पारीतोषीक विजेते डॉ. राजेंद्र शेंडे, माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील, डॉ. अशोक कुकडे, पं. वसंतराव गाडगीळ,  ॲङ सिराज कुरेशी हे सन्मानीय पाहूणे म्हरणून उपस्थित होते.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक आध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु एस. एन. पठाण, श्री तुळशीराम दा. कराड, श्री काशीराम दा. कराड, माईर्स एमआयटीचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटीचे सचिव प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक श्री रमेश्अप्पा कराड, डॉ. सुचीत्रा कराड-नागरे, सौ. ज्योती कराड-ढाकणे आदी उपस्थित होते. थोर तपस्वी व साधक परमपूज्य श्री श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांनी यावेळी शुभाशीर्वाद दिले.

डॉ. विजय भटकर म्हणाले, इंडोनेशीयासारख्या मुस्लीम बहुल देशातही रामाची विधीवत पूजा केली जोते. तसेच रामकथा सांगीतली जोते. रामाला मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जाते. कारण श्रीराम फक्त हिंदू धर्मातच तव्हे तर संपूर्ण विश्वात पूजनीय आहेत. या विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतूच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात शांती प्रस्थापीत करण्यात मदत होईल. हा सेतू सर्वधर्माचा सार व गाभा आहे. आयोध्या येथे सुध्दा अशाच प्रकारचा विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन उभारल्यास हिंदू-मुस्लीम एैक्य तर साधले जाईलच परंतू सर्व समाजामध्ये शांती प्रस्थापीत होईल.

पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू दोन्ही समाजाला जोडणारा हा सेतू एक आदर्श आहे. श्रीराम व रहीम हे दोघे वेगळे नसून दोघामधील तत्व सारखेच आहेत. या सेतूच्या माध्यमातून समाजामध्ये एकतेचा संदेश जात आहे. कराड कुटूंबीयांनी उचललेले हे पाऊल विश्वशांतीच्या मार्गाने जात आहे.

आरीफ महम्मद खान म्हणाले की, माझ्या देशाच्या सनातन परंपरेला माझा सलाम आहे. ज्या परंपरेने मला श्रीराम, हजरत जैन्नुदिन चिस्ती या दोघांच्याही पायावर डोक ठेवण्याची ताकद दिली. ही परंपराच तितकी प्रभावशाली आहे. गीतेत सांगीतले आहे की, ज्या ठिकाणी प्रतीभा दिसेल तेथे नतमस्तक व्हा आज या ठिकाणी मी पुर्णत: नतमस्तक आहे. ज्या सनातन परंपरेवर ज्याचा विश्वास आहे. तीच व्यक्ती असे असाधारण काम करु शकते. कारण या परंपरेमध्ये भावनांना स्थान दिले जाते.

वरीष्ठ पत्रकार डॉ. वेदप्रताप वैदिक म्हणाले की, राजा बनने, प्रधान व मंत्री बनने फारसे अवघड नाही मात्र विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू सारखे चिरंतन कार्य होणे फार कठीण असते. हे कठीण काम रामश्वर येथे साकारत आहे हे विशेष. आजच्या आधुनीक तंत्रज्ञानाच्या जगातही भक्तीचा मार्ग सगळयात चांगला आहे. आज आयोध्येमध्ये जी समस्या आहे, तीच समस्या इतरही ठिकाणी आहे. आज डॉ. विश्वनाथ कराड यांनी मांडलेली ही संकल्पना जरआयोध्येत लागु केली तर संपूर्ण जगातील समस्याही दूर होतील.

डॉ. एस. एन. श्रीराम म्हणजे कुणा एका धर्माचे नाही तर सबंध भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. रामेश्वर हे ठिकाण त्याच भारतीय संस्कृतीमधील सांप्रदायीत सद्भावनेसाठी आदर्श ठरेल असे आहे. वारकरी सांप्रदायातील समभावाच्या या वारशाचा विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतूच्या माध्यमातून पुन्हा प्रत्यय आला. रामेश्वर (रुई) चे महत्व पाहता शासनाने या गावास मानवतातिर्थ घोषीत करावे.

प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले की, विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू हा वैश्वीक एकात्मतेसाठी उचललेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे. हा सेतू म्हणजे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहे. रामेश्वर येथील सोनावळा नदीच्या एका बाजूस संत श्री गोपाळबुवा महाराज तर दुसऱ्या तिरावर हजरत जैन्नुदीन चिस्तीचा दर्गा आहे. या दोन संतांना जोडणारा सुतू हा महत्वाचा दुवा आहे.

या सोहळयात माजी केंद्रीय मंत्री डॉ. आरीफ महम्मद खान व वरीष्ठ पत्रकार डॉ. वेदप्रताप वैदिक यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ देवून सन्मानीत करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप होते. सोबतच केरळ येथील बेना फातीमा व रामेश्वर येथील फरजाना युसुफ पटेल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी बालयोगी ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगावकर यांचे रामजन्म सोहळयानिमीत्ता किर्तन झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. गौतम बापट यांनी केले. सांगता पसायदानाने झाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....