पुणे (अभिषेक लोणकर )
येत्या २४ एप्रिल ला होणाऱ्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीतील निर्माता विभागात ९पॅनलचे ९ आणि १ स्वतंत्र असे एकूण १० उमेदवार उभे असून यामध्ये सर्वांना निर्माती-अभिनेत्री समृद्धी पोरे यांचे मोठ्ठे आवाहन पेलावे लागेल काय ? असा प्रश्न विचारला जातो आहे. गेल्या निवडणुकीत विजयी होवून आलेले महामंडळात सत्ताधारी १२ संचालक यांचे एक पॅनल होते आणि विरोधी पॅनल मेघराज भोसले यांचे होते त्यांचे २ संचालक महामंडळात होते . आता या निवडणुकीत मतदार या तथा कथित ३ तुकडे झालेल्या सत्ताधारी पॅनल ला ,कि विरोधी पॅनल ला स्वीकारतील कि संपूर्णपणे नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देतील हे मतदानानंतरच स्पष्ट होईल
नेमकी पहा कशी असेल लढत
निर्माता विभाग
१) विजय कोंडके -कपबशी (विजय कोंडके पॅनल)
२)संजय पाटील -रिक्षा (प्रसाद सुर्वे पॅनल)
३)समृद्धी पोरे -समई(विजय पाटकर पॅनल)
४)मेघराज भोसले -पतंग (मेघराज भोसले पॅनल)
5)विजय शिंदे -विमान (बाळासाहेब गोरे पॅनल)
6)दीपक कदम- मशाल (दीपक कदम पॅनल)
७)लक्ष्मीकांत खाबिया -छत्री (खाबिया पॅनल)
८)विजय चौधरी -उगवता सूर्य (विजय चौधरी पॅनल)
९)दिलीप निकम- सायकल (मिनचेकर पॅनल)
१०)नारायण सूर्यवंशी -चंद्रकोर(स्वतंत्र उमेदवार -अपक्ष )
यातील कोंडके हे अनेक वर्षे महामंडळावर आहेत .त्यामुळे त्यांना ,’तुम्ही आजवर काय केले ‘ हे प्रश्न साहजिकपणे विचारले जात आहेत . त्यांच्या परीने ते उत्तरे देत आहेत . भोसले यांचा गेल्या निवडणुकीत ते पॅनलप्रमुख असले तरी अगदी थोड्या मतांनी पराभव झाला होता. त्यांच्या निवडून आलेल्या २ सदस्यांनी महामंडळात काय केले ? तुम्ही नेते म्हणून काय करवून घेतले ? असे प्रश्न त्यांना विचारले जावू शकतील . गेली 5 वर्षे माध्यमातून सातत्याने प्रसिद्धी मिळविण्याचे तंत्र त्यांनी लीलया अवगत केले आहे . हि प्रसिद्धी त्यांच्या पथ्यावर पडणार कि अंगावर येणार असा प्रश्न आहे . या शिवाय समृद्धी पोरे यांचे आवाहन असूनही त्यांना पुण्यातील विजयराव चौधरी आणि लक्ष्मीकांत खाबिया यांचे आवाहन पेलता येणार काय ? असा हि प्रश्न आहेच . यातील विजयराव चौधरी यांचा चेहरा अगदी नवा आहे . कोरी पाटी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल.
तसे मुंबईतील पाटकर यांच्या पॅनल मधून उभ्या राहिलेल्या समृद्धी पोरे यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेले आहे . आणि त्यंच्या शब्दाला सर्वाधिक किंमत राहील हि त्यांची जमेची बाजू असली तरी बाळासाहेब गोरे आणि दीपक कदम म्हणजे विमान आणि मशाल अशा दोघांशी त्यांना सामना करायचा आहे . कोल्हापूरचे रणजीत मिनचेकर पॅनल हि दुर्लक्षित करून चालणार नाही . या विभागात प्रसाद सुर्वे यांच्या उमेदवाराला कोल्हापूरकर स्वीकारतील असा कोणी दावा करणार नाही . पण मिनचेकर या विभागातील आपल्या उमेदवारासाठी किती जोर लावणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे . पुण्या मुंबईत ३/३ पॅनल मध्ये किती विभागणी होणार यावर मिनचेकर यांचे लक्ष आहे .