पुणे- मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतिने १०डिसेंबर जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त शनिवारवाडा ते बालगंधर्व चौक पर्यंत आयोजित जनजागृती पदयात्रेत समाजातील सर्व सामाजिक संघनाने व नागरिकांनी सामिल होण्याचे अवाहान संस्था अध्यक्ष विकास कुचेकर यांनी केले आहे.
समाजात मानवी हक्काचे सतत होणारे उल्लंघन शासनाच्या नजरेत आणून देण्यासाठी ब-याचवेळी अनेक सामाजसेवी संस्था किंवा समाजसुधारक पुढे येतात, पण त्यांच्या प्रयत्न ही मर्यादेपर्यंतच असतात.त्यामुळे मानवी हक्काच्या उल्लंघनाच्या बाबतीत तक्रार करण्यासाठी स्वतंत्र व परीपुर्ण यंत्रणा आवश्यक आसल्याचे लक्षात आल्याने शासनाने १९९३ साली मानवी हक्का संबधीचा आदेश जारी करुन केला व नंतर त्याला कायद्याचे स्वरुप देवून एक अतिशय मौलिक अशी सुविधा भारतीय नागरीकांना प्राप्त करुन दिली या कायद्यालाच मानवी हक्क संरक्षण कायदा असे संबोधण्यात आले.कायद्याने मानवी हक्क म्हणजे जीवनस्वातंत्र्य, समानता व प्रतिष्ठा यासंबंधीचे संविधानाने हमी दिलेले किंवा आतंराष्ट्रीय मानव अधिकार करारामध्ये सामाविष्ट असलेले आणि भारतातील न्यायालयांना अंमलबजावणी करता येतील.१९९३ मानवी हक्क संरक्षण कायद्यातील तरतुदी प्रमाणे मानवी हक्काच्या उल्लंघनामुळे निर्माण होणाऱ्या आपराधांची चौकशी वेगाने व्हावी या हेतुने राज्यशासन उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या संमतीने अधिसुचनेव्दारे प्रत्येक जिल्हासाठी उपरोक्त आपराधांची चौकशी करण्यासाठी मानवी हक्क न्यायालय निर्माण व्हावे म्हणुन सत्र न्यायालया विनिर्दिष्ट करील अशी तरतुद असताना त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातील कोणत्याच जिल्हात होत नसल्याचे दिसुन येते.मानवी हक्काच्या जनजागृतीसाठी शासनाचे दुर्लक्ष यामुळेच मानवी हक्क संरक्षण कायद्यातील तरतुदी प्रमाणे प्रत्येक जिल्हात मानवी हक्क न्यायालय असावे या मागणीकरीता १०डिसेंबर जागतिक मानव अधिकार दिनी जनजागृती पदयात्रेचे आयोजन शनीवारवाडा ते बालगंधर्व चौक पर्यंत केले आहे. संस्थेच्या वतीने जाहीर अवाहन करतो की समाजसेवी संस्था, महिला संघटना व नागरीकांनी सामिल व्हावे !
पदयात्रेत सामिल होण्यासाठी संपर्क ः 9890092833 /7276734190