मोदी सरकारवर टीकेची झोड- मोदींचे परराष्ट्र धोरण अपयशी
पुणे–वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी परराष्ट्र धोरणाच्या मुद्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे आज नेपाळ सारखा छोटा देशही भारताला आव्हान देत आहे, असे ते म्हणालेत.सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे नेपाळ सारखा देश आज भारताला आव्हान देत आहे. नेपाळने आपल्या 100 रुपयांच्या नोटांवर उत्तराखंडमधील काही भाग छापला आहे. यावर भारताने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, असे प्रकाश आंबेडकर सोमवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. मारवाडी, गुजराती समाजातील व्यापारी दैनंदिन गरजेच्या वस्तू चीन मधून मोठ्या प्रमाणात आयात करत आहे. चीन हा आपल्या देशाचा पैसा आपल्याच विरोधात वापरत असून संबधित समाजाला दुखव्याचे नाही असे भाजपचे धोरण आहे, असे आंबेडकर म्हणाले.
भारताचे नेपाळसोबतचे संबंध बिघडले आहेत. झेनोफेबियामुळे भारत वेगळा होत चाललेला आहे. सध्या तेल आपण केवळ रशियाकडूनच विकत घेतो. भारताचे आंतरराष्ट्रीय धोरण वेगळेपणाचे झाले आहे. दुबई, कुवैतमध्ये भारतीय सर्वात जास्त काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अमेरिकेने बंदी घातलेली आहे. ती बंदी उठली का याचा त्यांनी खुलासा करावा, असे आंबेडकर म्हणाले.
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, जे मणिपूरमध्ये घडले त्याबाबत देशातील लोक फार विचार करत नाहीत असे दिसत आहे. ईशान्य भारतामध्ये ब्रह्मपुत्रा नदी ग्रेट बंडच्या दुसऱ्या बाजूला यानकिंग नदीवर चीन 8 धरण बांधत आहे. त्यादृष्टीने ब्रह्मपुत्रा नदीतील सर्व पाणी तिबेट मार्गे इतर चीन भागात घेऊन जाण्याचे नियोजन आहे. ब्रह्मपुत्रा कोरडी नदी झाली तर ईशान्य भारतातील राज्य भारत सोबत का राहतील. नरेंद्र मोदी यांचे हे अपयश आहे. अनेक कंपन्यानी निवडणूक रोखे भाजपला देणगी स्वरुपात दिले आहे. याबाबत पुनर्विचार करणे गरजेचे आहे.
निवृत्त कर्नल, मेजर यांनी मोदी प्रेम मधून बाहेर पडून सीमावर्ती भागातील सत्य परिस्थिती मांडावी. नरेंद्र मोदी हे परदेशी धोरण बाबत अपयशी ठरले आहेत. सुरवातीला अनेक देशांनी मोदी यांचे स्वागत केले पण आता त्या त्या देशात भारतीय वाढत असल्याने त्याबाबत संबधित देशाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.