पुणे : रात्रीच्या त्या पाच तासात पोलिस ठाण्यात जे घडलं ? ते आक्रीतच म्हणावे लागेल, पुण्यासारख्या शहरात असं काही घडू शकेल असं जून जाणते पुणेकर यांना कधीही वाटले नसेल. पण पुणे आता बदललं आहे, पूर्वीचे शांत पुणे रात्रीच्या अंधारात ही मिळेनासे झाले आहे. पुण्यातील बाणेर पोलीस ठाण्यात 3 मार्चच्या मध्यरात्री तरुण तरुणीने दारूच्या नशेत गोंधळ घातला. फक्त गोंधळ घालून हे दोघे शांत झाले नाहीत तर रात्री थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांनाच धमक्या दिल्या. मोठी बाब म्हणजे, नशेत असलेल्या तरुणीने रागाच्याभरात महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताचा चावा देखील घेतला. या 24 वर्षीय तरुणीने आणि तिचा मित्र युवराज निलेश परतानी (वय 24) यांनी दारूच्या नशेत गोंधळ केला आणि पोलीसांना धमक्याही दिल्या. त्यामुळे दोघांवर दारूच्या नशेत गोंधळ, धमकी, आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्वरित गुन्हा दाखल केला. अद्याप दोघे पोलीस ठाण्यात आलेले नाहीत.
दोघे मित्र-मैत्रिण बालेवाडी येथील रेस्टॉरंटमध्ये पार्टीसाठी गेले होते. मद्यपानानंतर कारस्थान रचून त्यांना मारहाण झाली, असं सांगून त्यांनी रेस्टॉरंटमध्ये गोंधळ केला. हॉटेल मॅनेजरकडे सीसीटीव्ही पाहण्यासाठी विचारले असता, ‘फुटेज मुंबईत आहे, उद्या मिळेल,’ असं सांगितलं. यावरून दोघांनी थेट बाणेर पोलीस ठाण्यात जाऊन राग काढला. पोलीस ठाण्यात 3 मार्चच्या रात्री 11.45 वाजता सुरु झालेला गोंधळ 4 मार्चच्या पहाटे 5 वाजेपर्यंत सुरूच होता. बाणेर पोलीस ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षक समोर तरुणीने रागात बोलून पोलीस युनिफॉर्म ओढला आणि हातावर चावा घेतला. युवराजनेही धमकी दिली, ‘मी माझ्या पावरने तुमची नोकरी मिटवतो.’ दोघांनी असंही सांगितले की उद्या ठाण्यात परत येऊन पुन्हा गोंधळ करतील.युवराज निलेश परतानी मूळचा हरियाणाचा असून पुण्यात नोकरी करतो. या दोघांनी मद्यपान करून पोलीस ठाण्यात घातलेल्या गोंधळामुळे पोलीस देखील हैराण झाले होते. पोलिस दोघांचा शोध घेत आहेत आणि पुढील कारवाई लवकरच होणार आहे.

