मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला संप मिटवण्याचे निर्देश दिले आहेत. मंगळवारी दोन याचिकांवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने म्हटले, ‘संप तत्काळ मिटवा. सरकारने वाहतूक पूर्ववत करावी. यावर सरकारच्या वतीने अॅडव्होकेट जनरल म्हणाले, ‘या प्रकरणी आज सायंकाळपर्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला जात आहे.’ नागरिक ग्राहक मंच आणि अखिलेश त्रिपाठी यांच्या वतीने या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
हिट अँड रन प्रकरणी कायद्यातील नवीन तरतुदींच्या निषेधार्थ देशभरातील ट्रकचालकांनी वाहन चालविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अवजड वाहने रस्त्यावर उभी आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, भाजीपाला या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे.
मध्यप्रदेश, राजस्थानसह 10 राज्यांमधून पेट्रोल आणि डिझेल पंप कोरडे पडल्याची माहिती आहे. येथे नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. फळे, भाजीपाला, दूध आणि कृषी मालाच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी प्रशासन पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वाहतूकदारांशी संपर्क साधत आहे.
ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृतलाल मदान म्हणाले, ‘वाहतूकदारांनी अद्याप संपाची घोषणा केलेली नाही. मंगळवारी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणार आहे. सध्या वाहनचालकच वाहने सोडून खाली उतरत आहेत. इतरांनाही वाहन चालवू देत नाहीयेत.
जम्मू-काश्मीर : 1500 टँकर संपावर; 90% पंप रिकामे
जम्मू आणि काश्मीर पंप ओनर्स युनियनने सांगितले की, जम्मूमधील 90 टक्के पेट्रोल पंप रिकामे झाले आहेत आणि केंद्रशासित प्रदेश आणि लडाखमध्ये इंधन वाहून नेणारे 1,500 टँकर संपावर असल्याने पुढील काही तासांत संपूर्ण साठा संपेल. ऑल J&K पेट्रोल टँकर ओनर्स असोसिएशनने म्हटले आहे की, संप सुरूच राहील आणि नवीन कायदे रद्द होईपर्यंत चालक कामावर परतणार नाहीत.
राजस्थान : अजमेरमध्ये पोलिसांची गाडी जाळली; अनेक मार्गांवर रोडवेज-खासगी बसेस थांबल्या
जयपूरसह सर्वच मोठ्या शहरांमध्ये फळे, भाजीपाला, दूध आणि पेट्रोलचा तुटवडा सुरू झाला असून शहर बसची चाकेही ठप्प झाली आहेत. टॅक्सी चालकही संपात सहभागी झाले आहेत. अजमेरच्या भिनाय भागात संतप्त जमावाने सरकारी वाहन पेटवून दिले आणि एका खासगी हॉटेलची तोडफोड केली.
01 जानेवारी, : 900 बस धावल्या नाहीत, पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी
(1 जानेवारी) छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, यूपी आणि पंजाबमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. छत्तीसगडमधील रायपूर, बिलासपूर, दुर्ग, सुरगुजा, जगदलपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये बसेस स्टँड सोडल्या नाहीत. तर मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये 900 बस धावल्या नाहीत. भोपाळमध्ये जेव्हा लोक आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी आले तेव्हा पंपांवर मोठी गर्दी झाली होती. बालाघाटातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागला.
31 डिसेंबर, : गुजरातमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज
गुजरातमध्ये ट्रक चालकांनी राजकोट-अहमदाबाद महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला, परिणामी वाहतूक कोंडी झाली. यावेळी गर्दीतील काही लोकांनी बसच्या खिडकीच्या काचा फोडल्या. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला ज्यात काही लोक जखमी झाले. येथे काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
30 डिसेंबर, सरकारने हिट अँड रन कायद्याचा विचार करावा
ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने (एआयएमटीसी) हिट अँड रन कायदा अधिक कडक करण्यास विरोध केला आहे. संघटनेच्या आवाहनावरच चक्का जाम आणि संप सुरू झाला आहे. AIMTC ची पुढील बैठक 10 जानेवारीला होणार आहे. यामध्ये सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर त्यांची बाजू सरकारसमोर कशी मांडायची, असा निर्णय घेण्यात येणार आहे.