भैय्याजी जोशी चिल्लर माणूस म्हणून जाहीर करा:त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा- उद्धव ठाकरे

Date:

मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईची कोणतीही एक भाषा नसल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांचा चिल्लर माणूस म्हणून उल्लेख केला आहे. या प्रकरणी त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी भैय्याजी जोशी हा माणूस चिल्लर म्हणून जाहीर करावा किंवा तो बंदा रुपया असेल तर त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे ते म्हणालेत.उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना भैय्याजी जोशी यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, काल महायुतीच्या आमदारांसाठी छावा चित्रपटाचा खास खेळ आयोजित करण्यात आला होता. मी त्याचे कौतुक केले होते. पण गद्दारांनी त्याला दांडी मारली. पण ही सर्व लोक छावा चित्रपट पाहत असताना काही अनाजी पंत इकडे मुंबईत येऊन मराठी अमराठी अशा वादाचा विष पेरून गेलेत. दुर्दैवाने आता छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत. पण महाराष्ट्रात फूटी पाडणारे औरंगजेब व औरंगजेबाला मदत करणारे अनाजी पंत याही जमान्यात जन्माला आलेत. यासारखे दुर्दैव असू शकत नाही.

सध्या काही लोक ब्रह्मदेवाला आम्हीच जन्म दिला अशा अविर्भावात फिरत आहेत. ते जगभर ब्रह्मज्ञान सांगत फिरत असतात. त्यातलेच एक असणाऱ्या भैय्याजी जोशी यांनी मुंबईत येऊन इथे राहणाऱ्यांना मराठी येण्याची काहीच गरज नाही असे द्वेषाचे गोमूत्र शिंपडून गेले. याचा अर्थ असा की, हा संघाचा व भाजपचा छुपा अजेंडा आहे. यांचे दाखवायचे व खायचे दात वेगळे आहेत. गत काही दिवसांपासून या लोकांनी हिंदुस्तान – पाकिस्तान काढला नाही. आता त्यांनी बटेंगे तो कटेंगे हा विषय काढला आहे. बटेंगे तो कटेंगे म्हणजे केवळ हिंदू – मुस्लीम नाही तर मराठी व अमराठी, पुन्हा मराठीत मराठे व मराठेत्तर अशी सगळी वाटणी करायची आणि राज्य बळकावयाचे हा त्यांचा डाव आहे.उद्धव पुढे म्हणाले, आपल्या देशात भाषावर प्रांतरचना करण्यात आली आहे. आता हे मुंबईत गल्लीवार प्रांतरचना करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा तोडा, फोडा व राज्य कराचा प्रकार आहे. ही अत्यंत घाणेरडी व विकृत मानसिकता सर्वांपुढे आली आहे. काल ज्या प्रमाणे विधानपरिषदेत मुख्यमंत्री बोलले की, कोरटकर-कोरटकर काय बोलता? कोरटकर हा चिल्लर माणूस आहे. आता त्यांनी भैय्याजी जोशी हे सुद्धा चिल्लर माणूस आहे हे म्हणून दाखवावे. त्यांनी भैय्याजी जोशी हा चिल्लर माणूस आहे म्हणून जाहीर करावे किंवा हा चिल्लर किंवा बंदा रुपया काय आहे ते त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा.
अभिजात भाषेचा दर्जा देऊन उपकार केले नाही-मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे तुम्ही काही उपकार केले नाहीत. कारण, मराठी भाषेचे महत्त्व संघ किंवा भाजपला कळले नसले तरी इंग्रजांना कळले होते. कारण, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा जो अग्रलेख लोकमान्यांनी लिहिला होता तो मराठीत होता. तसेच आम्हीच आमच्या राज्य सरकारला विचारतो की, तुमचे डोके ठिकाणावर आहे का? कारण, मराठी माणसांनी आपले बलिदान देऊन मुंबई मिळवली आहे. मला संघ व भाजपला सांगायचे आहे की, जेव्हा केव्हा मुंबईवर संकट येते तेव्हा आम्ही सर्वजण महाराष्ट्राचे नागरीक म्हणून एकमेकांना वाचवण्यासाठी पुढे येतो. मग तो अतिरेकी हल्ला असो, नैसर्गिक संकट असो की अन्य एखादे संकट असो आम्ही एकजूट होतो.

मुंबई चांगले काम करून जिंका, विष कालवून नाही-हे लोक वात लावून पळतात. कोरोनाच्या काळातही आम्ही सर्वांना आपलेपणाने जपले होते. त्यामु्ळे तुम्हाला साखर टाकता येत नसेल तर मिठाचा किंवा विषाचा खडा टाकू नका. मुंबई एक चांगली महानगरी आहे ती जिंकायची असेल तर चांगले काम करून जिंका, विष कालवून जिंकू नका. तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर चांगल्या कामाची स्पर्धा करा. मुंबईत शिवसेनेने जागतिक रक्तदानाचा विक्रम केला होता. संघाने असे एखादे काम करून दाखवावे. आम्ही त्यांच्या विधानाचा निषेध करतो. अशी विषवल्ली या सरकारने वेळीच ठेचली पाहिजे. भाजप आता उत्तर विरुद्ध दक्षिण असा देश तोडत आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी भैय्याजी जोशींचा समाचार घेताना म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सियाने अगोदरही केतनला केला होता मारण्याचा प्रयत्न ?

: 🔴 १४ जूनचा प्रयत्न फसला... १८ जूनला झाला घात?⚠️...

पुण्याचा गुटकाकिंग कोण ?कुठवर चालणार छापे सत्र ??

२२.९१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोन आरोपी अटकेत पुणे |...

बाप- लेकीच्या नात्याची‘द्विधा’

बाप आणि लेक हे नातं शब्दांत व्यक्त करणं कठीण असतं. आईच्या कुशीत माया तर वडिलांच्या सावलीत सुरक्षिततेचा आधार असतो. आपल्या लेकीच्या आनंदासाठी झटणारा बाप आणि संकटात वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी लेक, हे नात्याचं सर्वात सुंदर रूप असतं. ‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटातही बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार व हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडण्यात आला आहे. ‘फादर्स डे’चं औचित्य साधत ‘द्विधा’ चित्रपटाचे भावस्पर्शी पोस्टर आणि टिझर प्रदर्शित करण्यात  आला असून येत्या २१ ऑगस्टला हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांचे आहे. निर्माती विदुला रमेश आजगावकर आहेत.  नात्यांमधली ‘द्विधा’ ही फक्त निर्णयांची नव्हे, तर भावनांचीही लढाई असते. विश्वास आणि अपेक्षा यांच्या मधोमध उभं राहिलेलं मन कधी स्वतःसाठी, तर कधी समोरच्यांसाठी झुकतं. ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांच्या प्रभावी भूमिकांतून ‘द्विधा’ बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या दोघांसोबत रेणूका दफ्तरदार, निमिष कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर, ओवी तानवडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘द्विधा’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यात येणाऱ्या भावनिक संघर्षाची कहाणी आहे. आयुष्यात एखादी वेळच अशी येते की, मन ‘द्विधा’ अवस्थेत अडकतं. ही भावना अत्यंत संवेदनशीलतेने पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. फादर्स डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेला हा टिझर प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल, असा विश्वास दिग्दर्शक निलेश नाईक यांनी व्यक्त केला. ‘द्विधा’ चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, संकलन निलेश नाईक यांनी केले आहे. चित्रपटातील गीते गीतकार मंगेश कांगणे, मंदार चोळकर यांची असून संगीताची जबाबदारी निलोत्पल बोरा आणि शैलेंद्र बर्वेयांनी सांभाळली आहे. निलोत्पल बोरा यांनी नेटफ्लिक्ससाठी अनेक लोकप्रिय वेब सिरीज आणि प्रकल्पांवर काम केले आहे. हंसिका परीक, मयुरी पटवर्धन यांचा स्वरसाज गाण्यांना लाभला आहे. छायांकन सिमरजीत सुमन, अश्विनी पाखरोट,श्रीधर अल्ले यांचे आहे  वेशभूषा विदुला आजगावकर यांची आहे. ध्वनीरचना इक्रामुद्दीन रुस्तम लोचूर तर ध्वनीमिश्रण योगेश कारभारी नेहे, आकाश स्वजन सेनगुप्ता यांनी केले आहे.

फुरसुंगीत स्टील व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; बिश्नोई गँगच्या कनेक्शनची चर्चा

पुणे-पुण्यात खंडणीसाठी एका व्यावसायिकाच्या कार्यालयासमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना...