मराठी हीच महाराष्ट्राची राजभाषा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन; भैय्याजी जोशी यांच्या विधानाचे विधानसभेत तीव्र पडसाद

Date:

मुंबई-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्य सरकारची भूमिका काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारच्या वतीने बाजू स्पष्ट करत मराठी हीच महाराष्ट्राची राजभाषा असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर इतर भाषेचा देखील येथे सन्मान असल्याचे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले आहे. मात्र या सर्व प्रकरणावर चर्चा सुरू असताना सभागृहात गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले होते.

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. अलीकडेच या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात देखील त्याचा उल्लेख असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधान सभेत म्हटले आहे. महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक परंपरा ही सर्वांना माहिती आहेच. आपण महाराष्ट्र राज्याचे नागरिक आहोत हे देखील आपण अभिमानाने बोलत असतो. त्याचा अभिमान हा प्रत्येकाला असायलाच पाहिजे. 106 हुतात्म्यातून आपल्याला हे राज्य मिळाले असल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे. अशा वेळी सुरेश ऊर्फ भैय्याजी जोशी यांनी घाटकोपर येथील सभागृहामध्ये निवेदन करताना महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मराठी बोलता आलीच पाहिजे, अशी आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय? – भास्कर जाधव

या मुंबईत वेगवेगळ्या भागाची वेगवेगळी भाषा असल्याचे असे देखील भैय्याजी जोशी यांनी म्हटले आहे. त्यामुळेच मराठी भाषा ही सर्वांनाच आली पाहिजे, सर्वांनी बोललीच पाहिजे, याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. घाटकोपरमध्ये ज्या ठिकाणी मी संबोधित करत आहे, त्या घाटकोपरमध्ये गुजराती सर्वात जास्त राहतात. त्यामुळे येथील भाषा ही मराठी नसली तरी काहीही हरकत नाही. अशा प्रकारचे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे एका बाजूला आपण महाराष्ट्रातील प्रत्येक कामकाज मराठीत चालवले पाहिजे म्हणून कायदा केला आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. तर दुसरीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असल्यामुळे उदो उदो करणारे कार्यक्रम करत आहोत. तर त्याच महाराष्ट्रात मराठी भाषेचा अपमान करणे व भाषेविषयी विधान करणे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय? असा प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.

मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच, इतर भाषेचाही इथे सन्मान – फडणवीस

भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही. त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्यावर माहिती घेऊन बोलणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र सरकारची भूमिका काय? हे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा ही मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकले पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आले पाहिजे. माझ्या या वक्तव्यासंदर्भात भैयाजी जोशी यांचे देखील दुमत असेल, असे मला वाटत नाही. मात्र तरी देखील शासनाच्या वतीने मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठी असल्याचे ते म्हणाले. इतर भाषांचाही इथे सन्मान आहे. कोणत्याही भाषेचा मी अपमान करणार नाही. कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो, तोच दुसऱ्यांच्या भाषेवर देखील प्रेम करू शकतो. त्यामुळे तो सन्मान आहेच. त्यामुळे शासनाची भूमिका पक्की असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांकरिता स्थगित-भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केलेल्या मतांवर चर्चा सुरु असताना सभागृहात गोंधळ सुरु झाला. देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सभागृहात बोलण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणार असल्याचे म्हटले. मात्र, त्याच वेळी सत्ताधारी पक्षातील मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना विरोध दर्शवला. त्यामुळे सभागृहात या प्रकरणावरून चांगलाच गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांकरिता स्थगित केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सियाने अगोदरही केतनला केला होता मारण्याचा प्रयत्न ?

: 🔴 १४ जूनचा प्रयत्न फसला... १८ जूनला झाला घात?⚠️...

पुण्याचा गुटकाकिंग कोण ?कुठवर चालणार छापे सत्र ??

२२.९१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोन आरोपी अटकेत पुणे |...

बाप- लेकीच्या नात्याची‘द्विधा’

बाप आणि लेक हे नातं शब्दांत व्यक्त करणं कठीण असतं. आईच्या कुशीत माया तर वडिलांच्या सावलीत सुरक्षिततेचा आधार असतो. आपल्या लेकीच्या आनंदासाठी झटणारा बाप आणि संकटात वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी लेक, हे नात्याचं सर्वात सुंदर रूप असतं. ‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटातही बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार व हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडण्यात आला आहे. ‘फादर्स डे’चं औचित्य साधत ‘द्विधा’ चित्रपटाचे भावस्पर्शी पोस्टर आणि टिझर प्रदर्शित करण्यात  आला असून येत्या २१ ऑगस्टला हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांचे आहे. निर्माती विदुला रमेश आजगावकर आहेत.  नात्यांमधली ‘द्विधा’ ही फक्त निर्णयांची नव्हे, तर भावनांचीही लढाई असते. विश्वास आणि अपेक्षा यांच्या मधोमध उभं राहिलेलं मन कधी स्वतःसाठी, तर कधी समोरच्यांसाठी झुकतं. ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांच्या प्रभावी भूमिकांतून ‘द्विधा’ बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या दोघांसोबत रेणूका दफ्तरदार, निमिष कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर, ओवी तानवडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘द्विधा’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यात येणाऱ्या भावनिक संघर्षाची कहाणी आहे. आयुष्यात एखादी वेळच अशी येते की, मन ‘द्विधा’ अवस्थेत अडकतं. ही भावना अत्यंत संवेदनशीलतेने पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. फादर्स डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेला हा टिझर प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल, असा विश्वास दिग्दर्शक निलेश नाईक यांनी व्यक्त केला. ‘द्विधा’ चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, संकलन निलेश नाईक यांनी केले आहे. चित्रपटातील गीते गीतकार मंगेश कांगणे, मंदार चोळकर यांची असून संगीताची जबाबदारी निलोत्पल बोरा आणि शैलेंद्र बर्वेयांनी सांभाळली आहे. निलोत्पल बोरा यांनी नेटफ्लिक्ससाठी अनेक लोकप्रिय वेब सिरीज आणि प्रकल्पांवर काम केले आहे. हंसिका परीक, मयुरी पटवर्धन यांचा स्वरसाज गाण्यांना लाभला आहे. छायांकन सिमरजीत सुमन, अश्विनी पाखरोट,श्रीधर अल्ले यांचे आहे  वेशभूषा विदुला आजगावकर यांची आहे. ध्वनीरचना इक्रामुद्दीन रुस्तम लोचूर तर ध्वनीमिश्रण योगेश कारभारी नेहे, आकाश स्वजन सेनगुप्ता यांनी केले आहे.

फुरसुंगीत स्टील व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; बिश्नोई गँगच्या कनेक्शनची चर्चा

पुणे-पुण्यात खंडणीसाठी एका व्यावसायिकाच्या कार्यालयासमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना...