शिवाजी महाराज मोगलांना लाच देऊन आग्र्याहून सुटले:अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा वादग्रस्त दावा

Date:

ठाकरे गटाच्या किरणे मानेंनी सुनावले खडेबोल
पुणे -छत्रपती शिवाजी महाराज हे मोगलांना लाच देऊन आग्र्याहून सुटले होते. तेव्हा मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते, असा दावा छत्रपती शाहू महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते राहुल सोलापूर यांनी केला. या दाव्यावरून ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेता किरण माने यांनी राहुल सोलापूरकरांचा खरपूस समाचार घेत सुनावले. असल्या टुकारांना शाहु महाराजांच्या भूमिका दिल्या गेल्या, तरी यांच्या मेंदूतले शेण तसेच आहे. अशा शब्दांत किरण माने यांनी ताशेरे ओढले.

अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेबाबत बरेच वादग्रस्त दावे केलेत. औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिल्याचे ते म्हणालेत. सोलापूरकरांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटल्याचे पाहायला मिळाले. अभिनेते किरण माने यांनीही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सोलापूरकर यांच्यावर सडेतोड टीका केली.

अशाप्रकारच्या लोकांनी आपली मराठी इंडस्ट्री खच्चून भरलेली आहे! असल्या टुकारांना शाहु महाराजांच्या भूमिका दिल्या गेल्या, तरी यांच्या मेंदूतले शेण तसेच आहे. विनोद म्हणजे शिवरायांची बदनामी करण्याच्या नादात स्वत:ला शिवशाहीर म्हणवून घेणाऱ्या एका इतिहासद्रोह्यालाही याने खोटे ठरवले, असा घणाघातच किरण माने यांनी केला.
अरे, ‘लाच’ दिली होती का नव्हती हे दूरच… पण लाच दिल्याचे कधी पुरावे असतात का? असा सवालही त्यांनी केला. कडेकोट बंदोबस्तात तुरुंगात असताना महाराज पैसे चारतात आणि त्यांना ‘लाच दिली’ असे अधिकृत शिक्क्याचे परवाने मिळतात, असा अनागोंदी कारभार चालायला ते ईव्हिएम घोटाळ्याने सत्तेत आलेले सरकार होते की काय? असाही प्रश्न किरण माने यांनी विचारला.

अभिनेता राहुल सोलापूर यांनी नुकतीच ‘मु.पो. मनोरंजन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी ‘महाराज आग्र्याहून सुटले, तेव्हा मिठाईचे पेटारे वगेरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आले महाराज… आणि त्यासाठी किती हुंडा वठवला, त्याचेही पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली. त्याचे मोहसीन की मोईम खान नाव आहे. त्याच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन महाराज बाहेर पडले. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले, त्याच्या परवान्याची अजुनही खूण सुद्धा आहे.’ असा वादग्रस्त दावा केला.
राहुल सोलापूरकर यांनी पुढे बोलताना ‘गोष्टीरुपात सांगताना लोकांना रंजक करुन सांगावे लागते, मग ती रंजकता आली की, इतिहासाला कुठेतरी छेद मिळतो किंवा इतिहास बाजूला ठेवला जातो.’ असाही दावा केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गडचिरोलीतील वाघांचे मानवी हल्ले रोखण्यासाठी ३ महिन्यात आराखडा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली...

‘गुलाबी कर’ नष्ट करण्यासाठी संवेदनशीलता, जागरूकता आवश्यक !

भारतासह जगभरात दि. 8 मार्च रोजी 'आंतरराष्ट्रीय महिला दिन'...

क्षय रोग निर्मूलनासाठी नव्या आशेचा किरण

२४ मार्च २०२५ जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विशेष लेख…. संपूर्ण जगातील...

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी मूल्यमापन चाचणी

पुणे : केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत...