वारकऱ्यांसाठी अनोखी सेवा
राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडताना आम्हाला विश्वासात घेतलेले नाही, काँग्रेसचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली- भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत धडधडीतपणे एन डीए ने राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवताना कॉंग्रेस शी चर्चा करून निर्णय घेतल्याचे म्हटले असताना , या नंतर लगेचच एनडीएचा हा निर्णय एकतर्फी असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. भाजपने आम्हाला हा निर्णय घेताना विश्वासात घेतले नाही, अशी टीकाही आझाद यांनी केली आहे. आजच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेऊन, रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर केले.
भाजपने राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी, कोअर कमिटी स्थापन केली होती. या कमिटीच्या तिन्ही सदस्यांनी, माझ्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. आमच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणतेही नाव कोअर कमिटीने आम्हाला सांगितले नाही. मग राष्ट्रपतीपद उमेदवाराबाबत चर्चा झाली असे कसे म्हणता येईल. त्यामुळे या सगळ्याला राष्ट्रपतीपद निवडणुकीच्या नावाची चर्चा कसे काय म्हणायचे? असाही प्रश्न, आझाद यांनी विचारला आहे. सरकारने सर्वसहमतीने निर्णय घेतलेला नाही, असेही आझाद यांनी म्हटले आहे.
काँग्रेसतर्फे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. मात्र आम्ही आमच्यासोबत असलेल्या पक्षांना सोबत घेऊन सर्वसहमतीने निर्णय करू, तसेच विरोधी पक्षातर्फे कोण उमेदवार असेल याचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी २२ जून रोजी जाहीर करतील अशी माहितीही गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांना दिली . मीरा कुमार या पाचवेळा खासदार झाल्या आहेत. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबू जगजीव राम यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला काँग्रेस पसंती मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारीच भाजपने रामनाथ विंद यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी निश्चित केले आहे. मात्र हा निर्णय घेताना आम्हाला सरकारने गृहीत धरले अशीही टीका, गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.
पालखी सोहळयात गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम
पुणे :- गोयल गंगा फाऊंडेशनतर्फे पंढरपूरला जाणाऱ्या पालखी सोहळ्यात गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल मधील १००हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांशी बोलून स्वच्छता आणि आरोग्याचे महत्व समजून सांगितले. शिवाय विद्यार्थ्यांनी पोस्टर्स आणि पथनाट्यातून स्वच्छता कशी ठेवावी ,कचरा कुंडीत टाकला जावा,पाण्याचे संवर्धन कसे करावे याची देखील माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांच्या दुकानाजवळ उभे राहून कचरा गोळा करत वारकऱ्यांना स्वच्छतेविषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांना गुलमोहर,नीम,आंबा,चिंच अशा वेगवेगळ्या प्रकारचे बीजगोळे दिले. वारकरी पालखी मार्गावर ‘ज्ञानोबा, तुकोबांच्या’ जयघोषात बीजगोळे टाकतील. बीजगोळ्यावर जेव्हा पावसाचा शिडकावा होईल आणि ते जमिनीत रुजून वृक्षसंवर्धनाचा हेतू साध्य होईल.
मोठया उत्साहाने भक्तीमय वातावरणात विद्यार्थ्यांनी जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळयात सहभागी झाले यावेळी शाळेच्या विश्वस्त सोनू गुप्ता ,मुख्याध्यापिका भारती भागवानी, तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
रामनाथ कोविंद ‘एनडीए’चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार.. अमित शहांची घोषणा
नवी दिल्ली: बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे भाजप प्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधीकृत घोषणा केली .सध्या बिहारचे राज्यपाल असलेले रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवाशी आहेत.
रामनाथ कोविंद हे दलित नेते म्हणून परिचीत आहेत. त्यांनी सामाजिक कार्य मोठं आहे. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर एनडीएचं एकमात झाल्याचं अमित शाह यांनी यावेळी सांगितले ..कोविंद यांच्या उमेदवारीबाबत आम्ही सर्वपक्षीयांशी संपर्क साधून कळवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: सोनिया गांधी यांना फोन करुन याबाबतची माहिती दिली आहे. तसंच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनाही याबाबत सांगितल्याचं अमित शाह म्हणाले.मूळचे कानपूरचे असलेले कोविंद हे १९९४ ते २००६ दरम्यान राज्यसभेतील खासदार होते. याशिवाय ते भाजपच्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या मोर्च्याचे अध्यक्षही होते. ते व्यवसायाने वकील आहेत. त्यांना उत्तर प्रदेशातील भाजपचा दलित चेहरा म्हणून ओळखले जाते.
वैष्णवांचा मेळा पुण्यात दाखल..(photo)
पुणे- विठुरायाचा अखंड जयघोष करीत लाखोच्या संख्येने वैष्णवांचा मेळा शहरात दाखलझाला . यावेळी संपूर्ण वातावरण भक्तीमय बनले. फुलांच्या वर्षावात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, यांनी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. पाटील इस्टेट येथील उड्डाणपुलाखालच्या चौकात पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिकेकडून विशेष कक्ष उभारण्यात आला होता. याचबरोबर इतर राजकीय पक्ष, संस्था, बँका यांनीही स्वागतासाठी कक्ष उभारले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास संत तुकारामम हाराजांच्या पालखीचे तर पावणेसातच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पाटील इस्टेट इथे आगमन झाले.
पालख्यांच्या आगमनानंतर नंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली. चौकात दोरीने फुलांच्या करंड्या बांधण्यात आल्या होत्या, पालख्या चौकात येताच या करंड्यांमधील फुलांचा वर्षाव करण्यात आला. ‘बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव-तुकाराम, ज्ञानोबा माऊली.. माऊली’ असा एकच जयघोष यावेळी झाला. स्वागताचे अत्यंत मनोहारी दृश्य यावेळी पाहायला मिळाले.
पालख्यांचे स्वागत करताना मुक्ता टिळक म्हणाल्या की, पुणेकर कित्येक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या पालख्यांचे आज आगमन झाले आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणेकर आसुसलेले आहेत. दोन दिवस त्यांचा मुक्काम पुण्यात असेल. या काळात पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेत कुठेही कमी पडणार नाहीत. त्यांच्या आगमनाने पावसाचा वर्षाव व्हावा, असे पांडुरंगाला साकडे आहे.
पाटील इस्टेट येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कक्षामध्ये वीणाधारी वारकऱ्यांना श्रीफल देऊन त्यांचे स्वागत केले जात होते. कक्षातील स्पीकरवर भक्तीगीते लावण्यात आली होती.
दगडूशेठ गणपती मंदिरासमोर पुष्पवृष्टी
माउली…माउलीच्या जयघोषात पुण्यामध्ये लाखो वारक-यांसोबत आलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी रथावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी माउली…माउली, तुकोबा… तुकोबाच्या जयघोषासोबतच गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दोन्ही संस्थानच्या विश्वस्तांनी गणरायाचरणी नतमस्तक होत आरोग्यदायी, निर्मल आणि हरित महाराष्ट्रासाठी साकडे घातले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचे स्वागत मोठया उत्साहात करण्यात आले. यावेळी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुनील रासने यांसह वारकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पालखीचे उत्साहात स्वागत केले जाते. यंदा ट्रस्टच्या 125 व्या वर्षानिमित्त वारी सोहळ्यातील राबविण्यात येणा-या उपक्रमांची सुरुवात झाली असून हरित वारी, स्वच्छता आणि वारक-यांकरिता अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नुकतेच जय गणेश हरित वारी या 50 लक्ष वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. वारक-यांनी यामध्ये सहभाग घेत वृक्षलागवड व संवर्धन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
संभाजी भिडे गुरुजी संघटना मध्येच घुसल्याने संत ज्ञानेश्वरांची पालखी अर्धा तास खोळंबली
पुणे-विठुरायाच्या जयघोषात ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांच्या आगमनानंतर पालख्या क्रमाने मुक्कामी स्थळावर मार्गस्त होताना, शिस्तबद्ध जाणा-या ज्ञानोबांच्या पालखीला गुडलक चौकात मध्येच थांबवे लागले. यामुळे मोठा गोंधळ निर्माण होऊन ज्ञानोबांच्या पालखीला अर्ध्यातासाचा विलंब झाला .दरम्यान संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी पोलीस व वारकरी यांच्यात वाद निर्माण व्हायला कारीभूत ठरलेल्या ,आणि नंग्या तलवारी घेवून पालखीत घुसलेल्या व्यक्तींवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे .
याबाबतची हकीकत अशी की, संगमपुल येथून फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर पालख्या क्रमाने मुक्कामी स्थळावर मार्गस्थ होतात. प्रथम संत तुकाराम, त्यानंतर संत गब्बर शेख, संताजी महाराज जागणारे आणि संत ज्ञानेश्वर पालखी असतात. मात्र, हिंदुत्ववादी संभाजी भिडे गुरुजी संघटना मोठ-मोठ्याने घोषणा देत मध्येच घुसते. त्यामुळे ज्ञानेश्वर पालखी प्रमुखांनी पालखी गुडलक चौकातच थांबवली. यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ येथे येऊन मध्यस्थी केली. दरम्यान, भिडे गुरुजी संघटनामधील काही व्यक्तींच्या हातामध्ये तलवारी व डोक्याला फेटे घातलेले असतात. तीन ते चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे भालदार चोपदार यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर पालखी प्रमुखांकडून यापूर्वी पोलिसांना याबाबत सांगण्यात आले होते. तसेच, तुम्हाला हे बंद करता येत नसेल, तर आम्ही आमचा मार्ग बदलू असेही सांगण्यात आले होते. मात्र, पोलिसांकडून याबाबत काहीच निर्णय घेण्यात न आल्याने यंदाही गुडलक चौकात पालखी आल्यानंतर भिडे गुरुजी संघटचे लोक पालखी त सहभागी झाले . त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रमुखांनी पालखी जागेवरच थांबवत पुढे न जाण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर याठिकाणी मोठा गोंधळ उडाला. वरिष्ठ अधिकार्यांनी तात्काळ धाव घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे वातारवण शांत झाले. तसेच ज्ञानेश्वर पालखी प्रमुखांना यापुढे असे होऊ न देण्याची हमी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिली. त्यानंतर पालखी येथून मार्गस्थ झाली. या गोंधळात तब्बल अर्धातास पालखी गुडलक चौकात थांबवण्यात आली.
राधाकृष्ण विखे पाटलांची मोठ्या भावाशी दबंगगिरी ?
पुणे- राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात त्यांचेच सख्खे मोठे भाऊ अशोक विखे पाटील यांनी आरोप केल्याने ..विखे पाटलांच्या घरात भावा भाव मध्ये दबंगगीरी सुरु असल्याचे वृत्त पसरते आहे . मात्र राधाकृष्ण यांनी याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे .
पुण्यातील विखे पाटील फौन्डेशन ची लोणी (जिल्हा अहमदनगर ) येथे लिटील फ्लावर स्कूल म्हणू ज्युनिअर केजी पासून १० वी पर्यंत ची सीबीएसई पॅटर्ण ची शाळा आहे . या शाळेला जाणारा आणि येणारा रस्ता रात्रीतून नांगर लावून उखडून टाकल्याची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापिकेने लोणी पोलिसांकडे केली होती मात्र पोलिसांनी ती तक्रार घेतली नाही म्हणून आता हि तक्रार घेवून आता आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठवीत आहे अशी माहिती विखे पाटील फौन्डेशनचे अशोक विखे पाटील यांनी दुरध्वनीवरून मायमराठी शी बोलताना दिली .
यावेळी त्यांनी आपले बंधू राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर या प्रकरणी आरोप केले आहेत . याविषयी माय मराठी ने राधाकृष्ण विखे पाटील यांना हि संपर्क साधला .. त्यांनी हे सारे आरोप फेटाळून लावत आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले … या दोघांनी दूरध्वनीवरून नेमके काय सांगितले हे त्यांच्याच शब्दात ऐका…
जैकलीन, वरुण और तापसी “जुड़वा 2” के गाने के अभ्यास में जुटे!
जूडावा 2 टीम फिलहाल फिल्म के लिए एक गाने की शूटिंग कर रही है और अभिनेता वरुण धवन, जैकलिन फर्नांडीज और तापसी पनू को इसी का अभ्यास करते हुए देखा गया।
वरुण, जैकलिन और तापसी जाहिरा तौर पर 1997 के ब्लॉकबस्टर जूडावा से निर्मित एक डांस नंबर टन टना टन के लिए तैयारी कर रहे है।
टन टना टन सबसे प्रसिद्ध पार्टी गीतों में से एक है। बॉलीवुड के पसंदीदा डांस नंबरों में से एक बहुत ही प्रिय पार्टी गीत है ये।
वरुण धवन जो स्वयं एक बेहतरीन डांसर है, वह असाधारण शानदार नर्तक जैकलिन के साथ ताल मिलाते हुए नज़र आएंगे। जैकलिन उन चुनिंदा अभिनेत्रियों में से एक है जिन्होंने प्रमुख चार्ट बस्टर पार्टी संगीत दिए हैं। इस गीत में सरप्राइज़ पैकेज तापसी पन्नू होगी, जो इन दोनों के साथ कदम से कदम मिलाते हुए नज़र आएगी।
जुड़वा 2 के गीत टन टना टन के साथ कलाकार तहलका मचाने के लिए तैयार है। इस गीत को गणेश आचार्य द्वारा कोरियोग्राफ किया गया है।
तीनों ने पहले से ही फिल्म के लिए “ऊंची है बिल्डिंग” गाने की शूटिंग कर ली है, जो उनके लिए एक बहुत मज़ेदार अनुभव था।
कलाकार इस गीत के लिए एक साथ आये थे जिसे देख कर यह तो साफ हो गया था शूटिंग के दौरान सभी ने इसका भरपूर लुत्फ उठाया था।
जैकलीन ने इंस्टाग्राम पर अभिनेताओं की एक तस्वीर साझा की जहाँ सभी गीत के रिहर्सल के बाद पोज़ करते हुए नज़र आये। साथ ही कैप्शन दिया कि,”क्या आप अनुमान लगा सकते हैं कि हम किस गीत का अभ्यास कर रहे हैं?
ऊंची है बिल्डिंग और टन टना टन, जूडावा से दो क्लासिस नंबर, जिन्हें जुड़वा 2 के लिए एक फिर से दोहराया जा रहा है।
फिलहाल कलाकार मुम्बई में है और गीत की शूटिंग के बाद सभी पुर्तगाल कार्यक्रम के लिए रवाना होंगे।
साजिद नाडियादवाला द्वारा निर्मित, डेविड धवन द्वारा निर्देशित, फ़िल्म जुड़वा 2 को फॉक्स स्टार स्टूडियोज और नडियादवाला ग्रैंडसन एंटरटेनमेंट द्वारा प्रस्तुत किया जाएगा। फ़िल्म 29 सिंतबर को नज़दीकी सिनेमाघरों में दस्तक देगी।
‘किप मूव्हिंग मुव्हमेंट ‘ ची ८५ शाळांत प्रेरणात्मक व्याख्यान सत्रे
पुणे :
विद्यार्थ्यांना त्यांचे भवितव्य घडवून समाजाला योगदान देण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या ‘किप मूव्हिंग मुव्हमेंट ‘ या संस्थेच्या वतीने २५ जून पासून पुणे जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रेरणादायक व्याख्यानांची सत्रे होणार आहेत .
‘ ‘किप मूव्हिंग मुव्हमेंट ‘ या संस्थेच्या ‘लाईफ स्कुल ‘च्या संचालक ज्योती गोसावी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .
पुणे ,औरंगाबाद ,उदयपूर येथे ८५ शाळांत ४०० तुकड्यांमध्ये ,५६० स्वयंसेवकाच्या मदतीने हा उपक्रम चालणार आहे .
‘किप मूव्हिंग मुव्हमेंट ‘ हा उपक्रम २०१० पासून भारत ,श्रीलंका ,नेपाळ या देशातील ३० हजार शिक्षक ,लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोचला आहे .
विद्यार्थ्यांमधील नकारात्मक भावना काढून त्यांना सकारात्मक जीवनाची प्रेरणा देणे ,हा या उपक्रमाचा उद्देश आहे . व्याख्याने ,रोल प्ले ,चर्चासत्रे ,यशकथा यातून विद्यार्थ्यांना ,पालकांनाही मार्गदर्शन केले जाते . नरेंद्र गोयदानी हे या चळवळीचे संस्थापक आहेत
“रेरा व जीएसटीनंतर बांधकाम उद्योगाला उज्ज्वल भवितव्य”
लोणावळ्यात क्रेडाईच्या राज्यस्तरीय ‘महाकॉन’ परिषदेचे समापन
पुणे– क्रेडाई सदस्यांनी रेरा आणि जीएसटीच्या नियमांचा अभ्यास करावा. बांधकाम उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल आहे, विशेषतः परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात अशा प्रकारचा विश्वास ‘महाकॉन’ या दोन दिवसीय परिषदेत व्यक्त करण्यात आला. क्रेडाई महाराष्ट्रने या परिषदेचे आयोजन केले होते आणि १६ व १७ जून रोजी ती लोणावळा येथे पार पडली. ही पाचवी वार्षिक परिषद असून या कार्यक्रमाला ३७ शहरांतील ३६५ पेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.
या दोन दिवसीय परिषदेत विविध विषयांवर चर्चा झाली. यात रेरानंतरच्या काळातील व्यवसायाचा दृष्टिकोन, व्यापक परवडणाऱ्या गृहनिर्माणाची अंमलबजावणी, जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर बांधकाम उद्योगातील आव्हानांचा सामना इत्यादी विषयांचा समावेश होता.
महाकॉनचे उद्घाटन १६ जून रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्ज विभागाचे राष्ट्रीय प्रमुख वैजनाथ एम. जी. यांच्या हस्ते झाले. क्रेडाई –नॅशनलचे निर्वाचित अध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई – महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. क्रेडाई नॅशनलचे सचिव रोहीत राज मोदी, क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राजीव पारेख, महाकॉनचे निमंत्रक गिरीश रायबागे यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये समावेश होता.
या प्रसंगी बोलताना वैजनाथ यांनी ग्वाही दिली, की एसबीआय खासकरून दुसऱ्या व तिसऱ्या स्तरातील शहरांतील बांधकाम उद्योगासोबत काम करत असून परवडणाऱ्या घरांच्या बांधणीसाठी मदत पुरवत आहे. कमीत कमी व्याजदरांवर आकर्षक कर्ज पुरवून विकसकांना तसेच वैयक्तिक ग्राहकांनाही ही मदत देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
आपल्या उद्घाटनाच्या भाषणात सतीश मगर म्हणाले, की सदस्यांनी सक्रिय होऊन स्वतःमध्ये बदल घडवून आणावा आणि रेरामुळे येत असलेल्या सुधारणा घडवून आणाव्यात.
या परिषदेचा हेतू स्पष्ट करताना क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शंतिलाल कटारिया म्हणाले, “उद्योगातील नवीनतम ज्ञान इतरांना देण्यासाठी आणि बांधकाम उद्योगात येत असलेल्या नियम व नियमनांची माहिती देण्यासाठी ही परिषद आयोजित केली आहे. जेणेकरून सर्व प्रकारच्या शंका दूर व्हाव्यात. रेरा आणि जीएसटीमुळे आलेल्या या संक्रमणाच्या काळात सदस्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, याचे स्पष्टीकरण त्यांनी केले. रेरा व जीएसटीच्या नियमांचे पालन करण्याचे त्यांनी सदस्यांना आवाहन केले आणि शिस्तबद्ध व संघटीत विकसकांसाठी भविष्य उज्ज्वल असल्याची ग्वाही दिली.
समारोप समारंभात महाराष्ट्राच्या नगर नियोजन विभागाचे संचालक विजय शेंडे यांनी समान विकास व बांधकाम नियमावलीवर भाष्य केले तसेच महाराष्ट्रातील नगर नियोजनातील येऊ घातलेल्या सुधारणांची माहितीही दिली. महारेराचे अध्यक्ष गौतम चटर्जी यांच्याशी सदस्यांच्या थेट संवादाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. यात चटर्जी यांनी रेरा कायद्याचे विवेचन करून उपस्थितांच्या शंकांना उत्तरे दिली. चटर्जी म्हणाले, की ३१ जुलै २०१७ पर्यंत ताबा प्रमाणपत्र मिळणाऱ्या प्रकल्पांसाठी नोंदणी करण्याची गरज नाही. त्यांनी सदस्यांना नोंदणीचे फायदेही स्पष्ट करून सांगितले.
भारतातील आघाडीच्या शोभा ग्रुपचे उपाध्यक्ष जी. सी. शर्मा यांनी भारतात बांधकाम उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे स्पष्ट केले आणि या क्षेत्रातील वित्तीय शिस्तीच्या टीप्स दिल्या. प्रसिद्ध आर्किटेक्ट हाफीस काँट्रॅक्टर यांनी परवडणाऱ्या घरांबाबत दृष्टिकोन मांडला.
या दोन दिवसांच्या कार्यक्रमात परवडणारी घरे, कागदपत्रे बनवतानाची (ग्राहक/सोसायटी/अपार्टमेंट) मुख्य कलमे, व्यवसायवाढीची रणनीती, व्यापक परवडणाऱ्या घरांची बांधणी, बांधकाम व्यवसायातील आव्हाने, जीएसटीची अंमलबजावणी, गृहकर्ज आणि पंतप्रधान आवास योजना इ. विषयांवर सादरीकरणे झाली. रेरावरील एक खुली चर्चाही यावेळी झाली.
या परिषदेच्या निमित्ताने जीएसटीची सांगोपांग माहिती देणारे पुस्तक श्री. कटारिया यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. पुढील महाकॉन डिसेंबरमध्ये नाशिकमध्ये घेण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांचा आळंदीकरांनी केला भव्य नागरी सत्कार
पुणे: श्री क्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या तीरावर घाटाची निर्मिती केली व १४५ फूटाच्या गरूड स्तंभ आणि भागवत धर्माची पताका उभारल्यामुळे आळंदीच्या वैभवात भर पाडल्याबद्दल विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमायटी चे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा .कराड व त्यांच्या पत्नी सौ.उर्मिला विश्वनाथ कराड यांचा आळंदी नगरपालिका आणि आळंदीकरांच्या वतीने नगराध्यक्षा सौ.वैजंताताई अशोक उमरगेकर व नगरपालिकेचे सर्व सदस्य यांच्या हस्ते विश्वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्यावेळी पुणेरी पगडी परिधान करून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री श्री.बबनराव पाचपुते, ह.भ.प.श्री.डॉ. तुकारामबुवा गरूड (ठाकुरबुवा) दैठणेकर, श्री. बाळासाहेब रावडे, डॉ. सुदाम महाराज पानेगावकर, पं.उद्धवबापू आपेगावकर , अशोक उमरगेकर, आळंदी नगरपालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले की,“महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूर येथील पांडूरंगाची मूर्ति सोन्याची करण्याचा माझा संकल्प आहे. सुवर्ण मंदिर व कोलार येथील ५५० किलोची सोन्याच्या मंदिराप्रमाणेच आता सर्व वारकर्यांना मिळून पंढरपूरच्या विठूरायाला सोन्याचे करायचे आहे. पांडूरंगाला सजवल तर त्यात वाईट काय आहे? असा प्रश्न त्यांनी आळंदीकरांबरोबरच वारकर्यांना विचारला. तसेच, तीर्थक्षेत्र आळंदी बरोबरच पंढरपूर येथे १८ घाटाची निर्मिती करावयाचा संकल्प आहेे. भविष्यात आळंदी- देहू हे विश्वशांतीचे केंद्र बनेल. कालानुरूप वारकरी संप्रदायाचे कार्य हे जगभर पसरेल. भविष्यात वारकरी संप्रदाय हा जगाला सुख, समाधान व शांतीचा संदेश देईल. २१वें शतक हे भारताचे असेल.”
श्री.मा. बबनराव पाचपुते म्हणाले,“आळंदी येथील स्वच्छतेची सुरूवात डॉ. विश्वनाथ कराड यांनी केली. त्या वेळेस झालेली टीका टिप्पणी याकडे त्यांनी लक्ष दिले नाही म्हणून आज या तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी वारकर्यांना सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.”
श्री. संजय देशमुख यांनी वारकरी सांप्रदायाच्या वतीने डॉ.विश्वनाथ कराड यांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष बनवावे, अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. याकरिता समस्त वारकर्यांनी संमती दर्शविली आहेे.
ह.भ.प.श्री.डॉ. तुकारामबुवा गरूड (ठाकुरबुवा) दैठणेकर म्हणाले,“मानवी जीवनाचा हेतू संत संगतीचा असेल तरच जीवनाला खरी दिशा मिळते. मानवी जीवनातील सर्वात मोठी संधी म्हणजे ईश्वर दर्शन होय. म्हणून वारीच्या प्रस्थानाला विशेष महत्व आहे. संसाराची आसक्ती सोडून भगवंताकडे जावे त्यातच संपूर्ण जीवनाचा सार आहे.”
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळ्यानिमित्त युनेस्को अध्यासना अंतर्गत तीन दिवसीय लोकशिक्षणपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या समारोपात ह.भ.प.श्री.किसन महाराज साखरे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. श्रीमती गोदावरीताई मुंडे, श्री. रमेशबुवा शेनगावकर, श्री. काशीरामबुवा इडोळीकर व श्री. दिगंबरबुवा कुटे यांच्या सांप्रदायिक संगीत भजानाच्या कार्यक्रमाने या तीन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप झाला.
अन्न व औषध प्रशासन तर्फे वारीमार्गात अन्नसुरक्षेसाठी फिरता प्रशिक्षण वर्ग
नित्या आणि नायशाचा बाबांसोबत ‘फादर्स डे’
विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. ह्या ट्रेलरमधून चित्रपटातली मुख्य व्यक्तिरेखा शेखर जोशी ह्यांच्याकडे कामाच्या व्यापामूळे आपल्या नित्या आणि नायशा ह्या दोन मुलींसाठी वेळच नसतो, हे समोर आलंय.
‘हृदयांतर’ सिनेमातून मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहणा-या, आणि आपल्या करीयरच्या मागे धावताना कामाच्या व्यस्ततेमूळे आपल्या मुलांना व्यवस्थित वेळ न देऊ शकणा-या अनेक ‘शेखर जोशीं’ची ही कथा म्हणायला हवी.
ही भूमिका साकारणा-या अभिनेता सुबोध भावेशी ह्यासंदर्भात चर्चा केल्यावर त्याने सांगितले, “काहीही म्हणा, पण ह्या सिनेमाच्या निमीत्ताने दोन गोड मुलींचा बाप बनण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. कोणीही पून्हा पून्हा त्यांच्या प्रेमात पडाव्यात अशा ह्या मुली आहेत. ह्या दोन्ही मुली जेवढ्या लाघवी आहेत, तेवढ्याच समंजसही आहेत. त्यामूळे ह्यांच्यासोबत काम करणं नक्कीच सुखावह होतं.”
‘फादर्स डे’ निमीत्ताने सुबोधने नुकतीच त्याच्या दोन्ही ऑनस्क्रिन मुलींना ट्रीट दिली. त्यावेळीही दोन्ही मुलींची सुबोधशी असलेली बॉन्डिग दिसत होती.
यंगबेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि टोएब एन्टरटेन्मेट निर्मित ‘हृदयांतर’ चित्रपट ७ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित होणाऱ आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, आणि सोनाली खरे मुख्य भूमिका आहेत.














