Home Blog Page 12

महापालिका शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

0

सेवा मित्र मंडळातर्फे शाळेचा पहिला दिवस ; पारंपरिक पद्धतीने गुलाबपुष्प व रेवडी देऊन स्वागत
पुणे : छत्रपती शिवरायांचा, त्रिवार जयजयकार… त्रिवार जयजयकार… अशा शब्दांत पोवाड्याच्या माध्यमातून शाळेच्या पहिल्याच दिवशी शाहिरांनी राष्ट्रप्रेमाची जागृती विद्यार्थ्यांमध्ये केली. शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्यावतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्रमांक १ तसेच पद्मश्री डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन या प्रशालेत शाळेच्या पहिल्या दिवशी पारंपरिक पद्धतीने गुलाबपुष्प व रेवडी देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आमदार हेमंत रासने, नगरसेविका स्वरदा बापट,नगरसेवक राघवेंद्र उर्फ बापू मानकर, स्वप्नाली पंडित, सामाजिक  कार्यकर्ते आनंद सराफ, निखिल मोरे, वसुंधरा बारवे, सुनंदा वाखारे, शुभांगी चव्हाण, माणिक देवकर, सुभाष सातव, विनायक तुम्मा, मीना जाधव, रुबीना शेख, विठ्ठल भरेकर, विष्णू सुर्वे, मुख्याध्यापिका वीणा नाईक, उज्वला चव्हाण आदी उपस्थित होते. मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष नितीन होले, उमेश कांबळे, अमर लांडे, विक्रांत मोहिते, दिनेश गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, शाळेमध्ये मुले पहिल्या दिवशी येताना दडपणाखाली येतात. त्यामुळे मुलांशी पाहुण्यांनी गप्पा माराव्या, याकरिता पहिला दिवस शाळेत दरवर्षी साजरा केला जातो. आम्ही पोवाडे स्पर्धा घेतो, मात्र त्याला महापालिका शाळेतील संघ नसतो. त्यामुळे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हायला हवे.

स्वरदा बापट म्हणाल्या, महापालिका शाळेत केवळ अभ्यास नाही, तर अनेक कलागुण शिकायला मिळणार आहेत. शाळेसोबत त्याचे वेगळे प्रशिक्षण देखील घेण्यात येणार आहे. याशिवाय समुपदेशनाच्या माध्यमातून मुलींशी वेगळ्या प्रकारे संवाद साधणार आहोत. मुलांसाठी विविध खेळांच्या सहभागाच्या दृष्टीने उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महापालिका शाळा इतर शाळांच्या पुढे जाव्या, हे सगळ्यांचे स्वप्न आहे.

स्पर्धेच्या काळात टिकून राहण्यासाठी मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालण्याचा पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळेत विद्यार्थी संख्येची उदासिनता दिसून येत आहे. इंग्रजी भाषा गरजेची असली तरी देखील मराठी भाषा ही तितकीच महत्वाची आहे, याचे महत्व सांगण्यासाठी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याकरिता सेवा मित्र मंडळ दरवर्षी पुढाकार घेते.

ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

पुणे , दि. १५ : स्पर्धा, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नयेत, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्हे येथे आयोजित ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६-२७’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य दिपाली हुलावळे, सुनीता येवले, शिक्षण विभागाचे उपसंचालक गणपतराव मोरे, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, गणेश ढोरे, विठ्ठल शिंदे, गणेश खांडगे, साहेबराव कारके यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे तसेच प्रत्येक शाळेत आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांनाही शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे समान संधी मिळणे आवश्यक आहे. यासाठी डिजिटल क्लासरूम, आधुनिक शैक्षणिक साधने आणि गुणवत्तापूर्ण पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अभ्यासाबरोबरच क्रीडा, कला आणि कौशल्यविकासालाही प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यात शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि संशोधन क्षेत्रातही प्रगती साधून मोठी स्वप्ने पूर्ण करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. जिल्हा परिषद शाळांचे रूपांतर आधुनिक, डिजिटल आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षण संस्थांमध्ये करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षक, पालक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली ती याच शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी कु. रुद्रा गणेश राजगुरे. चाचणी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून ‘नासा’सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट देण्याची संधी मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील ३०३ केंद्रप्रमुखांना देण्यात येणाऱ्या टॅबपैकी प्रातिनिधिक स्वरूपात चार केंद्रप्रमुखांना मान्यवरांच्या हस्ते टॅब प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शाळेत प्रथमच प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून, फुलांचा वर्षाव करत आणि गुलाबजाम भरवत उत्साहात स्वागत केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करणे, शाळेविषयी आपुलकी वाढविणे आणि आनंददायी वातावरणात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करणे हा शाळा प्रवेशोत्सवाचा उद्देश असून उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

BIS-ER प्रमाणित स्मार्ट सिक्युरिटी कॅमेरे आणि नियमांचे पालन करणाऱ्या सुरक्षा प्रणालींच्या माध्यमातून गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने ग्राहक-केंद्रित सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट केली

मुंबई, 15 जून, 2026: भारतातील सुरक्षा उपायांमधील प्रमुख, वाय-फाय आणि 4G-सक्षम सीसीटीव्ही कॅमेरे यांचा नवीन पोर्टफोलिओ लॉन्च करून गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या (GEG) सिक्युरिटी सोल्युशन्स बिझनेसने ग्राहक-केंद्रित, कनेक्टेड सुरक्षा अनुभव प्रदान करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. गोदरेजच्या भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या पाळत ठेवण्याच्या संघटित बाजारपेठेतील वाढीचा पुढचा टप्पा हा धोरणात्मक विस्तार दर्शवितो, ज्यामध्ये नावीन्य, डिझाइन आणि एकात्मिक सुरक्षा अनुभवांवर भर दिला जातो.

उत्पादन-नेतृत्व स्वीकारण्यापासून ते अनुभवावर आधारित निर्णय घेण्यापर्यंत भारताच्या निगराणी मार्केटमध्ये मूलभूत बदल होत आहेत. निवासी, व्यावसायिक आणि संस्थात्मक विभागातील ग्राहक वाढत्या प्रमाणात उपाय शोधत आहेत ज्यात वापर सुलभता, विश्वासार्हता, डेटा सुरक्षितता आणि नियामक अनुपालनासह, अखंड कनेक्टिव्हिटी आणि नियंत्रण यांचा समावेश आहे. विश्वसनीय, संघटित खेळाडूंच्या मागणीला हे संक्रमण गती देत​​आहे जे एकात्मिक, भविष्यासाठी तयार सुरक्षा उपाय देऊ शकतात.

लाँचबद्दल भाष्य करताना, श्री. पुष्कर गोखले, बिझनेस हेड – सिक्युरिटी सोल्युशन्स, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप, म्हणाले:

“भारतातील cctv निगराणी श्रेणी सध्या अत्यंत महत्त्वपूर्ण वळणावर आहे, ज्याचे मार्केट येत्या काही वर्षात INR 1000 कोटींहून अधिक होण्याचा अंदाज आहे. ग्राहकांच्या अपेक्षा विश्वासार्ह आणि सुरक्षित अशा उपायांकडे वेगाने विकसित होत आहेत. आम्ही सुरक्षिततेकडे एक स्वतंत्र उत्पादन म्हणून पाहात नाही, तर एकात्मिक अनुभव म्हणून पाहातो, ज्यामुळे मनावर नियंत्रण, शांतता आणि सहजतेने वाढ होते. विश्वासार्ह, भारतीय उत्पादित सोल्यूशन्सला प्राधान्य जे गुणवत्ता, डेटा सुरक्षा आणि नियामक अनुपालनाची अधिक खात्री देतात, आमचा “भारतात उत्पादित” पोर्टफोलिओ या बदलाला प्रतिबिंबित करतो, नावीन्य, मजबूत अभियांत्रिकी आणि जागतिक मानकांचे पालन करणे, हे आमच्या ग्राहकांसाठी सुरक्षित परिसंस्था निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे आहे.”

नव्याने लाँच केलेल्या पोर्टफोलिओमध्ये वायफाय आणि 4G सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची विस्तृत श्रेणी आहे ज्यामध्ये इनडोअर सिक्युरिटी कॅमेरा आणि आउटडोअर पॅन-टिल्ट, डोम आणि बुलेट कॅमेरे यांचा समावेश आहे.

विविध ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन डिझाइन केलेली, श्रेणी शहरी आणि दुर्गम अशा दोन्ही वातावरणात लवचिक आणि सातत्यपूर्ण देखरेखीची सोय करते. घरे आणि व्यवसायांना वाय-फाय व्हेरिएंट कनेक्टेड पुरवतात, तर स्मार्ट कॅमेरे आणि सोलर कॅमेरासह 4G-सक्षम कॅमेरे ज्या ठिकाणी ब्रॉडबँड पायाभूत सुविधा मर्यादित किंवा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी त्या सातत्याने लक्ष ठेवतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना कधीही, कुठेही कनेक्ट राहता येते.

भारतात उत्पादित आणि BIS-ER मानकांनुसार प्रमाणित हा पोर्टफोलिओ गुणवत्ता, डेटा सुरक्षा, अनुपालन तसेच ग्राहकांच्या विश्वासासाठी गोदरेजची वचनबद्धता अधोरेखित करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लॉन्च कंपनीच्या स्टँडअलोन उत्पादनांपासून सर्वांगीण कनेक्टेड सुरक्षा इकोसिस्टममध्ये झालेल्या उत्क्रांती प्रतिबिंबित करते, जेथे कौशल्याने पाळत ठेवणे हे उपयोगिता, प्रवेशयोग्यता आणि एकूण ग्राहक अनुभव वाढवते.

विश्वासार्ह तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी, स्थानिक उत्पादन आणि ग्राहक-प्रथम डिझाइन दृष्टिकोन एकत्र आणून, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचे उद्दिष्ट आहे की, सुरक्षितता अधिक अंतर्ज्ञानी, विश्वासार्ह आणि कनेक्टेड जगाच्या गरजांशी जोडली जाते. सुरक्षित, सुसंगत आणि वापरण्यास सोप्या पाळत ठेवण्याच्या उपायांची मागणी वाढत असताना, GEG भारताच्या संघटित आणि स्वावलंबी सुरक्षा इकोसिस्टमला भक्कम करताना दैनंदिन सुरक्षा अनुभव वाढवणाऱ्या नावीन्यपूर्णतेवर लक्ष केंद्रित करते.

लंका प्रीमियर लीगचे प्रमोटर’आयपीजीग्रुप’ ची मोठी घोषणा; नॅसडॅकलिस्टेड भागीदाराकडून मिळाला कोट्यवधी डॉलर्सचा धोरणात्मक निधी

या निधी आणि भागीदारीमुळे लंका प्रीमियर लीगला जगभरात प्रसिद्धी वाढवण्याची संधी मिळेललीगचे उत्पन्न अनेक पटींनी वाढेल आणि क्रिकेटप्रेमींसाठी मॅचेस पाहण्याचा अनुभव डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक आधुनिक  रंजक बनवला जाईल.

कोलंबोश्रीलंका – १५ जून२०२६:  लंका प्रीमियर लीगच्या (एलपीएल) सहाव्या हंगामाची सुरुवात १० जुलैपासून होणार आहे. या स्पर्धेच्या अगदी काही दिवस आधीच लीगला कोट्यवधी डॉलर्सचे मोठे आर्थिक बळ मिळाले आहे.

लंका प्रीमियर लीगचे प्रमोटर ‘इनोवेटिव प्रॉडक्शन ग्रुप’ (Innovative Production Group FZ, LLC – IPG) या कंपनीला अमेरिकेतील, शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपनीकडून हा मोठा आर्थिक निधी मिळाला आहे.

आयपीजी कंपनीने अमेरिकेच्या ‘फ्लॅश स्पोर्ट्स अँड मीडिया’ (Flash Sports & Media, Inc.) या कंपनीसोबत आपल्या सर्व शेअर्सचे धोरणात्मक विलीनीकरण पूर्ण केले आहे. या व्यावसायिक करारामुळे, लंका प्रीमियर लीगच्या व्यावसायिक हक्कांसह आयपीजीकडे असलेले सर्व ‘टी-२० क्रिकेट लीगचे’ हक्क आता नॅसडॅक या अमेरिकन शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या ‘युग्रो’ (UGRO) या प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत आले आहेत.

हा निर्णय ‘आयपीजी’ आणि त्यांच्याद्वारे व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या सर्व क्रिकेट लीगसाठी एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. यामुळे या सर्व लीग आता एका सरकारी नियमांनुसार चालणाऱ्या मोठ्या कंपनीच्या रचनेत समाविष्ट झाल्या आहेत, जी भविष्यात त्यांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यासाठी सक्षम आहे. या नव्या संस्थात्मक रचनेच्या पाठबळामुळे, आयपीजी कंपनी पुढील दोन वर्षांत लंका प्रीमियर लीगला पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि उत्तम बनवण्यासाठी २० दशलक्ष यूएस डॉलर्स गुंतवणार आहे.

लंका प्रीमियर लीगसाठी हा बदल एका अत्यंत शिस्तबद्ध आणि विकासाकडे नेणाऱ्या नव्या युगाची सुरुवात आहे. ‘एलपीएल’ ही मूळची ‘श्रीलंका क्रिकेट’ चीच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राहील; परंतु, आयपीजी ग्रुपकडे तिचे सर्व विशेष व्यावसायिक आणि मीडिया प्रक्षेपण हक्क कायम राहतील. महत्त्वाचे म्हणजे, आता या हक्कांना मोठ्या संस्थात्मक भांडवलाचे भक्कम पाठबळ, काटेकोर कॉर्पोरेट नियम आणि दीर्घकालीन जागतिक विस्ताराचे नियोजन लाभणार आहे.

आयपीजी ग्लोबलचे संस्थापक आणि अध्यक्ष अनिल मोहन म्हणाले: या नवीन घडामोडीचा सर्वात मोठा फायदा लंका प्रीमियर लीगला होईलसार्वजनिक आणि नियमांचे पालन करणाऱ्या एका रचनेमध्ये सामील झाल्यामुळेलीगचा अत्यंत जबाबदारीने विस्तार करण्याची आमची क्षमता आता अधिक मजबूत झाली आहेवाढलेली पारदर्शकताभांडवलाची उपलब्धता आणि काटेकोर प्रशासकीय नियम यांमुळे आम्ही दीर्घकालीन व्यावसायिक शिस्त राखत सर्व फ्रेंचायझींचे मूल्य वाढवण्यास सज्ज झालो आहोत.

लंका प्रीमियर लीगव्यतिरिक्त, ‘आयपीजी ग्रुप’ने मलेशिया आणि झिम्बाब्वेमधील टी-२० क्रिकेट लीग विकसित करण्यासाठी दीर्घकालीन विशेष करार केले आहेत. आयपीजी आणि त्यांच्या गुंतवणूकदारांनी या नवीन लीग्जमध्ये व्यवसाय वाढवण्याच्या योजना आखल्या आहेत, ज्याद्वारे झपाट्याने प्रगती करणाऱ्या या दोन्ही क्रिकेट बाजारपेठांमध्ये त्यांना आपला विस्तार करता येईल.

या सर्व प्रयत्नांचा मुख्य उद्देश वेगवेगळ्या देशांत होणाऱ्या स्वतंत्र स्पर्धांचे रूपांतर एका मोठ्या, एकमेकांशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट उद्योगात करणे हा आहे; ज्याचा विस्तार दक्षिण आशियासह जगातील इतर नव्या व प्रगतीपथावर असलेल्या देशांमध्ये असेल.

फ्लॅश स्पोर्ट्स अँड मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रॅडली नॅट्रास म्हणाले: आमचा असा विश्वास आहे की या दोन्ही कंपन्या एकत्र आल्यामुळे एकाच वेळी अनेक देशांच्या क्रिकेट बाजारपेठांमध्ये काम करण्याची आमची क्षमता कमालीची वाढणार आहेसर्व व्यावसायिक हक्क एकाच ठिकाणी केंद्रित असल्यामुळे आणि सर्व फ्रेंचायझींचे आर्थिक हितसंबंध आणि उद्दिष्ट्ये एकमेकांशी सुसंगत असल्यामुळेविविध बाजारपेठांमध्ये प्रायोजकांना अधिक चांगल्या प्रकारे जोडणेमजबूत प्रक्षेपण भागीदारी तयार करणे आणि चाहत्यांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करणे हे आमचे उद्दिष्ट आहेआमचे संपूर्ण लक्ष आता या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवरहा प्लॅटफॉर्म वेगाने  अचूकतेने वाढवण्यावर आणि दीर्घकाळात भागधारकांसाठी उत्तम मूल्य निर्माण करण्यावर केंद्रित आहे.”

फ्लॅश स्पोर्ट्स अँड मीडियाचे मुख्य वित्तीय अधिकारी एरिक शेर्ब पुढे म्हणाले: “सार्वजनिक बाजारपेठेच्या रचनेमुळे गुंतवणुकीवरील परताव्याचे कडक नियम पाळूनलीगच्या पायाभूत सुविधांमध्ये टप्प्याटप्प्याने भांडवल गुंतवणे आम्हाला शक्य होईलआमचे मुख्य लक्ष हे दीर्घकालीन व्यावसायिक विकासाला बळकट करण्यावर आणि आमच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये सातत्याने मिळणारे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यावर असेल.”

व्यावसायिक कमाई वाढवण्यासाठी एक एकत्रित प्लॅटफॉर्म तयार करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. ‘आयपीजी’ने जाहीर केले आहे की, त्यांचे संपूर्ण लक्ष दीर्घकालीन मालमत्तेचे मूल्य वाढवण्यावर, सर्व लीग्जमधील प्रायोजकत्वाचे उत्पन्न एकाच ठिकाणी केंद्रित करण्यावर, मॅचेसच्या थेट प्रक्षेपणाचा दर्जा थेट ‘4K’ मानकांपर्यंत सुधारण्यावर आणि सातत्यपूर्ण उत्पन्नाचे निश्चित स्त्रोत निर्माण करण्यावर असेल.

इंदापूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे, दि. 15 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, इंदापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन पद्धतीने सुरुवात झाली आहे.

दुधगंगा दुध डेअरी समोर, जुना अकलूज पुणे बायपास, इंदापूर येथे असलेल्या या वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आणि शासनाने निर्धारित केलेल्या आरक्षणानुसार प्रवेश दिला जाणार आहे. इयत्ता आठवीपासून पुढील शिक्षण घेणारे तसेच कनिष्ठ महाविद्यालय, बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत.प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास व भोजन, क्रमिक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश, शैक्षणिक सहलीसाठी आर्थिक सहाय्य तसेच दरमहा एक हजार रुपये निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.

शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी : ३० जून ते ७ जुलै २०२६ तर इयत्ता ११ वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी : १५ जुलै ते ३१ जुलै २०२६ पर्यंत प्रवेश घेता येईल.
इच्छुक विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र/प्रवेश पावती, आधार कार्ड व रहिवासी प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसह https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन वसतिगृह गृहपाल यांच्याकडून करण्यात आले आहे.

मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा मेघराज राजेभोसले,खजिनदारपदावर सुनील महाजन

  • नूतन कार्यकारी संचालक मंडळाचीही घोषणा

पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील ‘समर्थ पॅनेल’ने दणदणीत विजय मिळवत सर्व जागांवर वर्चस्व मिळवले होते. त्यानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी रागिणी खडके,निवडणूक अधिकारी तथा निरीक्षक, धर्मादाय आयुक्त कार्यालय, कोल्हापूर यांच्या उपस्थितीत व देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली.

याच बैठकीत महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या कार्यकाळासाठी नूतन कार्यकारी संचालक मंडळाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार उपाध्यक्ष (कोल्हापूर) धनाजी यमकर, उपाध्यक्ष (मुंबई) आनंद शिंदे, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, खजिनदार सुनील महाजन, सहकार्यवाह दीपक कदम, सहकार्यवाह प्रवीण पाटील ऊर्फ वासू पाटील आणि सहखजिनदार शरद चव्हाण यांची निवड करण्यात आली.

बैठकीस राज काझी, अजित शिरोळे, सुभाष नकाशे, प्रवीण पाटील, चैत्राली डोंगरे, विजय खोचीकर ,रवींद्र गावडे, गणेश गारगोटे, विकास तोरणे आदी संचालक व मान्यवर उपस्थित होते. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत समर्थ पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवला होता. या निकालानंतर अध्यक्षपदासाठी मेघराज राजेभोसले यांचे नाव पुढे आले आणि संचालक मंडळातील सदस्यांनी त्यांच्यावर एकमताने विश्वास व्यक्त केला.

निवडीनंतर बोलताना मेघराज राजेभोसले यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि विविध घटकांना एकत्र घेऊन महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. मराठी चित्रपटसृष्टीसमोरील विविध प्रश्न सोडविणे, उद्योगाला चालना देणे, नवोदित कलाकार व तंत्रज्ञांना संधी उपलब्ध करून देणे तसेच चित्रपट, दूरदर्शन, नाट्य आणि ओटीटी क्षेत्रातील विविध घटकांमध्ये समन्वय निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

मराठी मनोरंजन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळाची भूमिका अधिक प्रभावी करण्याचा संकल्प व्यक्त करताना त्यांनी सदस्यांच्या विश्वासाबद्दल आभार मानले. आगामी काळात मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व घटकांना सोबत घेऊन उद्योगाच्या प्रगतीसाठी, कलाकार-तंत्रज्ञांच्या हितासाठी आणि मराठी चित्रपटांच्या व्यापक प्रसारासाठी ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यांच्या निवडीबद्दल चित्रपटसृष्टीतील विविध मान्यवरांनी अभिनंदन व्यक्त केले असून, आगामी काळात महामंडळाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी सकारात्मक आणि प्रभावी काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

…अन् उलगडला पुण्यातील प्राचीन मंदिरांचा समृद्ध वारसा

संजीव सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘पुण्यातील मंदिरांचा इतिहास’ व्याख्यानाचे आयोजन
पुणे : चौथ्या शतकातील पाताळेश्वर मंदिरापासून ते हजार वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या कसबा गणपती, नागेश्वर, सोमेश्वर, केदारेश्वर आणि भव्य ओंकारेश्वर मंदिरापर्यंतचा पुण्याचा धार्मिक वारसा अनेक अनोख्या इतिहासकथा सांगतो. जुन्या पेठांमध्ये विखुरलेली शेकडो मंदिरे, त्यामागील आख्यायिका, पेशवेकाळातील त्यांचा विकास आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या अनेक ऐतिहासिक नोंदींचा वेध घेत इतिहास संशोधक मंदार लवाटे यांनी पुण्यातील प्राचीन मंदिरांच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडविले. चार इंचांपासून ते दहा फूट उंचीपर्यंतच्या मूर्तींचा समावेश असलेल्या जुन्या पुण्यातील मंदिरांचा समृद्ध वारसा त्यांनी उलगडून दाखविला.

संजीव सोशल फाउंडेशनच्या वतीने इतिहास अभ्यासक तथा श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग-पर्वती-कोथरूडचे विश्वस्त जगन्नाथ लडकत यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त या व्याख्यानाचे आयोजन टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे करण्यात आले होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे ,सुधीर पंडित , रमेश भागवत, विजय पानवलकर, संग्रामबापू भंडारे, संकेत गदादे आणि छाया गदादे उपस्थित होते. कार्यक्रमात विजय पानवलकर लिखित ‘बाजीराव द ग्रेट’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.

मंदार लवाटे म्हणाले, पुण्यातील नागेश्वर मंदिर हे शहरातील अतिप्राचीन शिवमंदिरांपैकी एक असून त्याचा पेशवेकाळात जीर्णोद्धार करण्यात आला. हे मंदिर सुमारे ८०० वर्षे जुने मानले जाते. पूर्वी या परिसरातून वाहणाऱ्या ‘नाग’ प्रवाहावरून या मंदिराला नागेश्वर हे नाव पडल्याचे मानले जाते.

पुण्यातील सर्वांत प्राचीन मंदिरांमध्ये पाताळेश्वर मंदिराचे स्थान विशेष आहे. दगडात कोरलेले हे मंदिर चौथ्या शतकातील असल्याचे मानले जाते. तसेच धारेश्वर मंदिराचा नेमका कालखंड निश्चित करणे कठीण असले, तरी तेही प्राचीन वारसा जपणारे महत्त्वाचे मंदिर आहे. पाषाण येथील सोमेश्वर मंदिर सुमारे हजार वर्षे जुने असल्याचे मानले जाते.

पुणे आणि परिसरात सर्वाधिक मंदिरे भगवान शंकराची असून त्यानंतर मारुती मंदिरांची संख्या मोठी आहे. विविध देवदेवतांच्या मंदिरांमुळे पुण्याची धार्मिक ओळख अधिक समृद्ध झाली आहे. पेशव्यांच्या काळात अनेक मंदिरांना आश्रय, दक्षिणा आणि आर्थिक मदत देण्यात आली. त्यामध्ये केदारेश्वर मंदिर, कसबा गणपती आणि सोमेश्वर मंदिर यांचा समावेश होता.

कसबा गणपती मंदिर हे सुमारे हजार वर्षांचा इतिहास लाभलेले मंदिर मानले जाते. कसबा पेठ परिसरात विविध देवतांची मंदिरे असून एका परिसरात अनेक देवतांचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळते.

पुण्यात खंडोबाची सुमारे दहा मंदिरे असून त्यामध्ये धायरी येथील खंडोबा मंदिर सर्वांत प्राचीन मानले जाते. याशिवाय पुण्यात नारद मुनी आणि व्यास मुनी यांची मंदिरेही आहेत. बारा ज्योतिर्लिंगांमध्येही सहज पाहायला मिळणार नाही अशी भव्यता लाभलेले ओंकारेश्वर मंदिर हे पुण्याच्या धार्मिक वैभवाचे प्रतीक आहे. तसेच रणछोडदास मंदिर हेही शहरातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे.

 पुण्यातील बहुतांश मंदिरे ही लोकांच्या श्रद्धेतून उभी राहिली आहेत. केवळ जुन्या पेठांमध्येच सुमारे ३०० ते ४०० मंदिरे आढळतात. चार इंचांपासून ते दहा फूट उंचीपर्यंतच्या विविध आकारांच्या मूर्ती या मंदिरांमध्ये पाहायला मिळतात. मात्र, सुमारे ८० टक्के मंदिरे नेमकी कोणी उभारली, याची ठोस माहिती आज उपलब्ध नाही.

ते पुढे म्हणाले, मंदिरे ही केवळ पूजा-अर्चनेची स्थळे नाहीत, तर ती आपल्या संस्कृतीची जिवंत स्मारके आहेत. आपल्या धर्माचा आणि परंपरेचा महत्त्वाचा वारसा त्यांच्यात जतन झालेला आहे. जसे शरीराला ऊर्जेसाठी चार्जिंगची गरज असते, तसेच मन आणि आत्म्याला सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी मंदिरात जाणे आवश्यक आहे. समाजाला अध्यात्मिक बळ आणि संस्कार देण्यासाठीच मंदिरांची निर्मिती झाली आहे.

जगन्नाथ लडकत म्हणाले, पुण्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी आम्ही नियमितपणे ऐतिहासिक व्याख्यानांचे आयोजन करतो. पुण्याचे महत्त्व आणि वैभव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे, तसेच ही सांस्कृतिक चळवळ अखंडपणे सुरू राहावी, यासाठी हा प्रयत्न आहे. इतिहास, संस्कृती आणि परंपरांविषयी जनजागृती निर्माण करणे हे या उपक्रमामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

‘मर्सिडीज-बेंझ’कडून भारतात नव्या ‘एस-क्लास’ मधील पहिली ‘प्लग-इन हायब्रिड कार’ सादर

‘एस ४५० ई पीएचईव्ही’ ही भारतातील प्रीमियम लक्झरी विभागात नवे मापदंड प्रस्थापित करणारी सर्वांत प्रगत एस-क्लास कार

‘एस-क्लास’मधील २,७०० हून अधिक घटकांपैकी ५० टक्क्यांहून अधिक घटक नव्याने विकसित, अद्ययावत किंवा सुधारित करण्यात आले आहेत. ‘एस-क्लास’च्या एका पिढीत करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वांत व्यापक बदल आहे.

‘एस ४५० ई पीएचईव्ही’मध्ये ३२० किलोवॅटची (४३५ एचपी) एकत्रित शक्ती आणि ६८० एनएमचा टॉर्क मिळतो. तसेच ही कार सुमारे ११५ किलोमीटरची इलेक्ट्रिक रेंज देते.

“एस-क्लास ही मर्सिडीज-बेंझच्या कालातीत लक्झरी परंपरेचे प्रतीक आहे आणि वाहन क्षेत्रात उत्कृष्टतेचा जागतिक मापदंड मानली जाते. भारतातही ती प्रीमियम लक्झरी विभागात आघाडीवर असून ग्राहकांच्या अपेक्षांना नवे स्वरूप देत आहे. प्रत्येक सीटवर आरामदायी अनुभव, ड्रायव्हिंगचा उत्कृष्ट अनुभव, शांतपणे जाणवणारी ताकद, सुरक्षितता, वैयक्तिक आवडीनुसार बदल करण्याच्या सुविधा आणि ‘एमबी.ओएस’ या प्रणालीवर आधारित डिजिटल अनुभव यांमुळे ‘एस-क्लास’ची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. २,७०० हून अधिक नवे आणि सुधारित घटक असलेली ही नवी एस-क्लास कार आराम, सुरक्षितता, डिजिटल अनुभव आणि दर्जाच्या बाबतीत आणखी प्रगत झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वांत आधुनिक एस-क्लास असून ती ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षा अधिक चांगला अनुभव देईल आणि भारतात ‘एस-क्लास’चा वारसा पुढे नेईल, असा आम्हाला विश्वास आहे. ‘मर्सिडीज-बेंझ’मध्ये विविध प्रकारच्या पॉवरट्रेन तंत्रज्ञानावर आधारित बहुपर्यायी धोरण अवलंबले जाते. भारतात प्रथमच ‘एस-क्लास’मध्ये प्लग-इन हायब्रिड सादर करणे हा याच धोरणाचा भाग आहे. आमच्या प्रीमियम ग्राहकांकडून प्लग-इन हायब्रिड वाहनांची मागणी वाढत आहे आणि ‘एस ४५० ई पीएचईव्ही’ ही त्याला दिलेली थेट प्रतिक्रिया आहे. आमच्या उत्पादन श्रेणीत आता आयसीई, बीईव्ही आणि पीएचईव्ही हे तिन्ही प्रकार उपलब्ध असल्याने ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते.”

‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक व
मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर

‘एस ४५० ई’ ही भारतातील फ्लॅगशिप एस-क्लास मालिकेतील ‘मर्सिडीज-बेंझ’ची पहिली प्लग-इन हायब्रिड (पीएचईव्ही) कार आहे.

नव्या ‘एस-क्लास’मध्ये २,७०० हून अधिक घटक नव्याने किंवा सुधारित स्वरुपात समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये ‘एमबी.ओएस ऑपरेटिंग सिस्टिम’, मायक्रो-एलईडी तंत्रज्ञानासह नवीन ‘ट्विन-स्टार डिजिटल लाइट’ हेडलॅम्प्स, सुमारे ४० टक्के अधिक हाय-बीम प्रकाशक्षमता (६०० मीटरपर्यंत) आणि २० टक्के मोठी प्रकाशयुक्त ग्रिल यांचा समावेश आहे.

‘एस ४५० ई’मध्ये ३२० किलोवॅटची (४३५ एचपी) एकत्रित शक्ती आणि ६८० एनएम इतका टॉर्क मिळतो. तसेच ही कार सुमारे ११५ किलोमीटरची इलेक्ट्रिक रेंज (डब्ल्यूएलटीपी) देते.

ही कार ० ते १०० किमी प्रतितास इतका वेग ५.७ सेकंदांत गाठू शकते. तिचा कमाल वेग २५० किमी प्रतितास इतका असून तो इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मर्यादित ठेवण्यात आला आहे.

‘एस ४५० ई’मध्ये एअरमॅटिक एअर सस्पेन्शन आणि रिअर-अॅक्सल स्टीअरिंग स्टँडर्ड स्वरूपात देण्यात आले आहे. रिअर-अॅक्सल स्टीअरिंगची क्षमता ४.५ अंश असून ती १० अंशांपर्यंत वाढवता येते.

भारतात प्रथमच ‘एस ४५० ई’मध्ये १५ एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत.

नव्या ‘एस ४५० ई’साठी बुकिंग आजपासून सुरू झाले असून, वाहनाची डिलिव्हरी २०२६च्या चौथ्या तिमाहीपासून सुरू होणार आहे.

नव्या ‘एस ४५० ई’च्या ‘लॉन्च एडिशन’ची किंमत २.२० कोटी रुपये असून ‘एस ४५० ई मॅन्युफाक्टूर एडिशन’ची सुरुवातीची किंमत २.३८ कोटी रुपये आहे. (दोन्ही किंमती एक्स-शोरूम, संपूर्ण भारतासाठी लागू.)

मुंबई : मर्सिडीज-बेंझ इंडिया या भारतातील आघाडीच्या लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज आपल्या फ्लॅगशिप एस-क्लास मालिकेतील पहिली प्लग-इन हायब्रिड कार, ‘एस ४५० ई’ ‘लॉन्च एडिशन’ सादर केली. या मॉडेलच्या माध्यमातून ‘मर्सिडीज-बेंझ’ने आपल्या विविध पॉवरट्रेन तंत्रज्ञानांवर आधारित धोरणात नवा टप्पा गाठला आहे. या जागतिक दर्जाच्या ‘प्लग-इन हायब्रिड’ इलेक्ट्रिक वाहनामुळे भारतातील प्रीमियम लक्झरी लिमोझिन विभागात इलेक्ट्रिक ड्राइव्हचा शांत आणि आरामदायी अनुभव उपलब्ध होणार आहे. ‘एस ४५० ई’च्या प्रत्येक बाबीत बारकाईने सुधारणा करण्यात आली आहे. या नव्या ‘एस-क्लास’मध्ये २,७०० हून अधिक घटक नव्याने विकसित किंवा सुधारित करण्यात आले आहेत. एका पिढीतील एस-क्लास मॉडेलमध्ये यापूर्वी इतके व्यापक बदल कधीही करण्यात आले नव्हते.

इलेक्ट्रिफाइड लक्झरीचा नवा मापदंड

‘एस ४५० ई’च्या केंद्रस्थानी अद्ययावत ३.० लिटर ‘एम२५६ इव्हो इनलाइन-सिक्स टर्बो-पेट्रोल’ इंजिन आहे. हे इंजिन आता युरो ७ उत्सर्जन मानकांनुसार तयार करण्यात आले असून ते स्वतंत्रपणे ३२६ एचपीची शक्ती आणि ५४० एनएमचा टॉर्क निर्माण करते. या इंजिनसोबतच या कारमध्ये, इंजिन आणि ‘९-स्पीड ९जी-ट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन’ यांच्या दरम्यान १२० किलोवॅट (१६३ एचपी) क्षमतेची सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. या दोन्हींच्या एकत्रित कार्यामुळे हे वाहन ३२० किलोवॅटची (४३५ एचपी) शक्ती आणि ६८० एनएमचा टॉर्क निर्माण करते. त्यामुळे ‘एस ४५० ई’ ही पेट्रोलवर चालणाऱ्या एस ४५० फोर-मॅटिकपेक्षा अधिक शक्तिशाली ठरते. ‘एस ४५० फोर-मॅटिक’मध्ये २८० किलोवॅटची (३८१ एचपी) शक्ती आणि ५०० एनएमची टॉर्क मिळतो.

११५ किलोमीटरपर्यंतची इलेक्ट्रिक रेंज

‘एस ४५० ई’मध्ये २२ किलोवॅट-तास क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी डब्ल्यूएलटीपी मानकांनुसार सुमारे ११५ किलोमीटरपर्यंतची फक्त इलेक्ट्रिक मोटरवर मिळणारी रेंज देते. त्यामुळे भारतातील प्रमुख शहरांमध्ये दैनंदिन प्रवासासाठी अनेकदा पेट्रोल इंजिनची गरज भासत नाही. दैनंदिन वापरादरम्यान वाहनाची प्रणाली इलेक्ट्रिक आणि पेट्रोल शक्तीदरम्यान आपोआप बदल करत राहते. हा बदल वाहनातील प्रवाशांना जवळपास जाणवतही नाही. लांब प्रवासासाठी गरज पडल्यास पेट्रोल इंजिन उपलब्ध असल्याने रेंजची चिंता राहत नाही.

‘एस ४५० ई’ ही कार ० ते १०० किलोमीटर प्रतितास इतका वेग फक्त ५.७ सेकंदांत गाठू शकते. तिचा कमाल वेग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने २५० किलोमीटर प्रतितास इतका मर्यादित ठेवण्यात आला आहे. एस-क्लास मालिकेतील बहुतांश मॉडेल्सपेक्षा हिचे वेगळेपण म्हणजे ‘एस ४५० ई’ ही केवळ रिअर-व्हील ड्राइव्ह प्रणालीसह उपलब्ध आहे. यामुळे मागील आसनांवरील प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होतो आणि या मॉडेलला एस-क्लास परिवारात वेगळी ओळख मिळते.

‘एस-क्लास’च्या इतिहासातील सर्वांत व्यापक बदल

२०२६मधील या ‘एस-क्लास’मध्ये केवळ पॉवरट्रेनमध्येच नव्हे, तर वाहनाच्या डिझाइनमध्ये आणि तंत्रज्ञानातही अनेक बदल करण्यात आले आहेत. समोरील भागात नवीन ट्विन-स्टार डिजिटल लाइट हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. मायक्रो-एलईडी तंत्रज्ञानावर आधारित या हेडलॅम्प्समुळे हाय-बीम प्रकाशाचा आवाका मागील पिढीच्या तुलनेत सुमारे ४० टक्क्यांनी जास्त झाला आहे. तसेच अल्ट्रा रेंज हाय-बीम प्रणालीमुळे प्रकाश ६०० मीटरपर्यंत पोहोचू शकतो. वाहनाची रेडिएटर ग्रिल सुमारे २० टक्क्यांनी मोठी करण्यात आली असून ती आता प्रकाशयुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. यावर नव्याने डिझाइन केलेले त्रिमितीय क्रोम स्टार्स देण्यात आले आहेत. मागील बाजूस नव्या डिझाइनचे टेल-लॅम्प्स देण्यात आले आहेत. त्यामध्ये क्रोम फ्रेममध्ये बसवलेले तीन खास स्टार्स असून ते एस-क्लासची वेगळी ओळख अधिक ठळक करतात.

नव्या ‘एस-क्लास’मध्ये ‘एमबी.ओएस’

‘मर्सिडीज-बेंझ ऑपरेटिंग सिस्टिम’ (एमबी.ओएस) ही नव्या एस-क्लासमधील अत्याधुनिक आणि वापरण्यास सुलभ प्रणाली आहे. ही प्रणाली वाहनातील विविध तांत्रिक सुविधा नियंत्रित करणाऱ्या सुपरकॉम्प्युटरसारखी काम करते. वाहनातील सर्व प्रणाली एकमेकांशी जोडून त्यांना एका बुद्धिमान आणि एकात्मिक प्रणालीच्या स्वरूपात कार्य करण्यास मदत करते.

एमबीयूएक्स सुपरस्क्रीन आणि नवीन एमबीयूएक्स प्रणाली

स्टँडर्ड एमबीयूएक्स सुपरस्क्रीन आणि नव्या पिढीतील एमबीयूएक्स प्रणालीमुळे एस-क्लासमध्ये अनेक प्रगत डिजिटल सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘हे मर्सिडीज’ हा एमबीयूएक्स व्हर्च्युअल असिस्टंट देण्यात आला आहे. ही प्रणाली नैसर्गिक संवाद समजून प्रतिसाद देऊ शकते. तसेच सुधारित झिरो लेयर इंटरफेस आणि गूगल मॅप्सवर आधारित ‘एमबीयूएक्स सराउंड नेव्हिगेशन’ सुविधाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहनाशी संवाद अधिक सहज, नैसर्गिक आणि वापरण्यास सुलभ बनतो.

चॅसिस आणि प्रवासाचा अनुभव

‘एस ४५० ई’मध्ये एअरमॅटिक एअर सस्पेन्शन ही सुविधा स्टँडर्ड स्वरूपात देण्यात आली आहे. तसेच ४.५ अंशांपर्यंत रिअर-अॅक्सल स्टीअरिंगही उपलब्ध आहे. ही स्टीअरिंग क्षमता १० अंशांपर्यंत वाढवण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे वाहनाचा टर्निंग सर्कल जवळपास दोन मीटरने कमी होतो. यामुळे पार्किंगची अरुंद जागा, हॉटेलचे अरुंद प्रवेशमार्ग आणि शहरांमधील गर्दी येथे हे वाहन नेणे अधिक सोपे होते. इतर मर्सिडीज-बेंझ वाहनांकडून मर्सिडीज-बेंझ इंटेलिजंट क्लाउडमार्फत मिळणाऱ्या कार-टू-एक्स माहितीच्या आधारे ही कार पुढील रस्त्यावरील स्पीड ब्रेकर किंवा खडबडीत भागांची आगाऊ माहिती घेते. त्यानुसार तिची सस्पेन्शन प्रणाली आधीच स्वतःला बदलून घेते. त्यामुळे प्रवास अधिक आरामदायी होतो.

सुरक्षिततेवर विशेष भर

नव्या ‘एस-क्लास’मध्ये सुरक्षिततेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. वाहनातील प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी अनेक प्रगत सुविधा देण्यात आल्या आहेत. सुधारित अॅडॅप्टिव्ह रेस्ट्रेंट सिस्टिममुळे अपघाताच्या वेळी अधिक चांगले संरक्षण मिळते. यामध्ये ‘प्री-सेफ® इम्पल्स बेल्ट प्रीटेन्शनर्स’सारखी तंत्रज्ञाने देण्यात आली आहेत. याशिवाय या कारमध्ये १५ पर्यंत एअरबॅग्स उपलब्ध असून, सुरक्षिततेच्या बाबतीत ‘मर्सिडीज-बेंझ’ची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

एस ४५० ची तांत्रिक वैशिष्ट्ये :

वैशिष्ट्यएस ४५० 
इंजिन३.०-लिटर एम२५६ इव्हो इनलाइन-६ टर्बो-पेट्रोल
पेट्रोल इंजिनची क्षमता३२६ एचपी / ५४० एनएम
इलेक्ट्रिक मोटरची क्षमता१२० किलोवॅट (१६३ एचपी) / ४४० एनएम
एकूण क्षमता (संयुक्त)३२० किलोवॅट (४३५ एचपी) / ६८० एनएम
ट्रान्समिशन९-स्पीड ९जी-ट्रॉनिक ऑटोमॅटिक
बॅटरीची क्षमता२२ किलोवॅट-तास (केडब्ल्यूएच)
केवळ इलेक्ट्रिकची रेंज (डब्ल्यूएलटीपी)सुमारे ११५ किलोमीटर
ड्राइव्ह प्रणालीरिअर-व्हील ड्राइव्ह
० ते १०० किमी/तास वेग५.७ सेकंद
कमाल वेग२५० किमी/तास (इलेक्ट्रॉनिक मर्यादेसह)
सस्पेन्शनएअरमॅटिक एअर सस्पेन्शन (स्टँडर्ड)
रिअर-अॅक्सल स्टीअरिंग४.५° स्टँडर्ड / १०° पर्यायी

इलेक्ट्रिक रेंज ही डब्ल्यूएलटीपी (डब्ल्यूएलटीपीमानकांवर आधारित आहेप्रत्यक्षातील रेंज वाहन चालवण्याची पद्धततपमान आणि वापराच्या परिस्थितीनुसार बदलू शकते.

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितता आणि सक्षमीकरणासाठी एआयएससीएच्या मोबाईल अॅपचे लोकार्पण

पुणे :  ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितता, आरोग्य, सामाजिक सहभाग आणि स्वावलंबनासाठी कार्यरत असलेल्या ऑल आयकॉनिक सिनिअर सिटिझन्स असोसिएशन (एआयएससीए) या संस्थेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या एआयएससीए मोबाईल अॅपचे लोकार्पण शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी होणार आहे.

ॲपचा लोकार्पण सोहळा सायंकाळी ४.३० वाजता घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश प्रभुणे, मूर्तीशास्त्राचे अभ्यास गो. बं. देगलूरकर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, उद्योजक अरविंद बुधाणी, आपलं घरचे विजय पळणीकर, डीसीपी कृष्णकांत रावले, जैन सोशल ग्रुपचे युवराज शहा, दिलीप पवार, उद्योजक एम. ए. तेजाणी, दिलीप बोरावके, लोकमान्य हास्ययोगचे डॉ. प्रसाद आंबीकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती असोसिएशनच्या संस्थापक व संचालिका शकीला शेख यांनी आज (दि. १५) पत्रकार परिषदेत दिली. डॉ. किशोर सरपोतदार, सुनीला कविटकर, सुहास घोडके, रवींद्र शाळू, अजित कुमठेकर, दिलीप पवार या वेळी उपस्थित होते.

गेल्या तीन वर्षापासून ऑल आयकॉनिक सिनिअर सिटिझन्स असोसिएशन ही संस्था ज्येष्ठ नागरिकांमधील वाढता एकाकीपणा, सामाजिक अलिप्तता, मानसिक आरोग्याच्या समस्या, डिजिटल अज्ञान आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. आज ही चळवळ दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये कार्यरत असून देशभरातील ज्येष्ठांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय घेऊन पुढे जात आहे.

शकीला शेख यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेले हे मोबाईल अॅप ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासार्ह साथीदार ठरणार आहे. या अॅपमध्ये आपत्कालीन मदत, सुरक्षितता सूचना, सामाजिक सहभाग, डिजिटल सहाय्य, आरोग्यविषयक माहिती, संपर्क व्यवस्था आणि एका क्लिकवर मदत मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विशेषतः एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले हे अॅप त्यांच्या दैनंदिन जीवनात अधिक आत्मविश्वास, सुरक्षितता आणि मानसिक आधार निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन शकीला शेख यांनी केले आहे.

‘सदरा कफल्लकाचा’ गझलसंग्रहाचे प्रकाशन; ‘गझलरंग’ मुशायरा उत्साहात संपन्न

पुणे : माई पब्लिकेशन्स आयोजित आणि सुरेश भट गझलमंच, पुणे प्रस्तुत ‘गझलरंग’ या दर्जेदार मराठी गझल मुशायऱ्याच्या निमित्ताने गझलकार सुधीर मुळीक यांच्या पहिल्या गझलसंग्रह ‘सदरा कफल्लकाचा’ चे प्रकाशन एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ,पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. साहित्यप्रेमी, गझलकार, कवी आणि रसिकांच्या मोठ्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने मराठी गझलविश्वात विशेष उत्सुकता निर्माण केली.

पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी किशोर कदम (सौमित्र) यांच्या हस्ते झाले. यावेळी उर्दू गझलकार, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि सह आयुक्त मोनिका सिंग ,दगडूदादा लोमटे (अंबेजोगाई) तसेच सप्तसिंधू महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधुताई सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोनिका सिंह यांनी मनोगत व्यक्त करताना सुधीर मुळीक यांच्या गझललेखनातील सातत्य, आशयघनता आणि संवेदनशील अभिव्यक्तीचे कौतुक केले. त्यांच्या गझलांमध्ये मानवी अनुभव, सामाजिक वास्तव आणि भावनिक जाणिवांचे प्रभावी चित्रण आढळते, असे त्या म्हणाल्या. किशोर कदम यांनी कविता आणि गझल या केवळ साहित्यप्रकार नसून माणसाच्या जगण्याचा आणि भावविश्वाचा दस्तऐवज असल्याचे सांगत सुधीर मुळीक यांच्या लेखनातील प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

प्रास्ताविक करताना संपादक पूजा भडांगे म्हणाल्या, “जेव्हा भावना शब्दांना स्पर्श करतात तेव्हा कविता जन्म घेते आणि जेव्हा त्या भावना वृत्त, रदीफ आणि काफियाच्या शिस्तीतून व्यक्त होतात तेव्हा गझल आकार घेते.” सुधीर मुळीक यांच्या गझलांमध्ये मानवी भावविश्वाचे विविध पैलू प्रभावीपणे प्रतिबिंबित झाल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी माई पब्लिकेशन्स नवोदित आणि गुणवंत लेखक, कवी तसेच साहित्यिकांना प्रकाशनाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्था कार्यरत असून विविध साहित्यप्रकारांतील पुस्तकांचे प्रकाशन सातत्याने केले जात असल्याचे सांगण्यात आले. ममता सपकाळ यांनी साहित्य अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुस्तक प्रकाशनाचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रकाशन सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या गझल मुशायऱ्यात सदानंद बेन्द्रे, सुशांत खुरसाळे, ममता सपकाळ, इंद्रजीत उगले, अज्ञातवासी आणि सुधीर मुळीक यांनी आपल्या निवडक गझला सादर केल्या. त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. मराठी गझल साहित्याची समृद्ध परंपरा आणि समकालीन भावविश्वाचा सुरेख संगम या मुशायऱ्यात अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी केले, तर पूजा भडांगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी सुधीर मुळीक यांचे अभिनंदन करत त्यांच्या गझलसंग्रहाला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

दुसऱ्यांची मुले चोरण्यापेक्षा स्वतःची वाढवा…:शर्मिला ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांच्या ‘पक्षफोडी’वर जोरदार हल्ला

“तुम्ही मरा इकडे सगळे…”; पर्यावरण आणि पाण्याच्या प्रश्नावर संताप……….राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या वृक्षवाटपाच्या उपक्रमाबाबत बोलताना शर्मिला ठाकरे यांनी पर्यावरणाच्या गंभीर प्रश्नावरही सरकारला धारेवर धरले. “ही नवीन झाडं वाढायला १०० वर्षे लागतात. आम्ही झाडे लावू, पण तुम्ही जी झाडे तोडत आहात, ती १००-२०० वर्षे जुनी आहेत. आपल्याला लागणारा ऑक्सिजन याच झाडांकडून मिळतो. आज पावसाला उशीर झालाय, जमिनीतील पाण्याची पातळी पार तळाला पोहोचली आहे, पण कोणाला काहीही पडलेली नाही. ‘आम्हाला आमचे पैसे कमवायचे आहेत, आमची मुले परदेशात जाऊन सेटल झाली आहेत, तुम्ही मरा इकडे सगळे’ अशीच या लोकांची वृत्ती झाली आहे,” अशी टीका त्यांनी केली.

मुंबई-भाजपच्या पक्षफोडीच्या राजकारणावर जोरदार हल्कला करताना रताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “त्यांना आता तेवढंच करायचं राहिलं आहे—दुसरे पक्ष फोडायचे! दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना. भारतीय जनता पक्ष, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेत काम करणारी खूप चांगली मुलं होती, कुठे गेली ती आता? त्यांनी आता फक्त दुसऱ्यांच्या सतरंज्याच उचलायच्या का?” असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित केला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर, आज राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिलांना घरगुती पिठाच्या चक्की (गिरणी) वाटप केल्या. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप), त्यांची ‘पक्षफोडीची’ राजनीती आणि सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’ च्या प्रश्नावर बोलताना त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले.

“तिथे बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष फोडला, इथे उद्धव ठाकरेंचा फोडला, शरद पवार साहेबांचा फोडला. त्यापेक्षा आम्ही जसं आमचा पक्ष फुटल्यानंतर आमची नवीन मुलं उभी करतो, तसं तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवा ना. तुमच्या पक्षात जी चांगली मुलं काम करतायत, त्यांना मोठं करा,” असा खोचक सल्ला शर्मिला ठाकरे यांनी भाजपला दिला.
केवळ राजकीय टीका न करता, शर्मिला ठाकरे यांनी कोकणातील ‘चिपी विमानतळाच्या’ सद्यस्थितीकडे आणि महागाईकडेही लक्ष वेधले. “पेट्रोल शंभर रुपयांच्या पुढे गेलं आहे. ज्या समस्यांसाठी भाजप १२ वर्षांपूर्वी रस्त्यावर उतरून आंदोलने करत होता, त्याबद्दल आज कुणी चकार शब्दही बोलायला तयार नाही,” असे त्यांनी म्हटले.

चिपी विमानतळाबाबत बोलताना शर्मिला ठाकरे यांनी म्हटले की, “माझ्याकडे काल कोकणातील एक मराठी ज्वेलर्स आले होते, त्यांनी सांगितले की सिंधुदुर्गचे चिपी एअरपोर्ट बंद झाले आहे. चीपीची सगळी विमाने फुल जात होती, तरीही ते बंद का केले? गोव्याचे टुरिझम कमी झाले म्हणून? मग हे एअरपोर्ट बांधता कशाला? नवी मुंबई, पुणे, पुरंदर… एका एअरपोर्टसाठी ५० हजार कोटी खर्च येतो. हे पैसे आपल्या टॅक्सचे आहेत. मोदी साहेब आल्यापासून किती नवीन एअरपोर्ट झाले आणि त्यातील किती बंद पडले, याची माहिती पत्रकारांनी काढून आवाज उठवला पाहिजे.”

राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार,तीन आठवडे चालणार

0

मुंबई-महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी आज मुंबईत पार पडलेली ‘कामकाज सल्लागार समितीची’ महत्त्वाची बैठक आता संपली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, आगामी पावसाळी अधिवेशनाचे कामकाज एकूण तीन आठवडे चालणार आहे. या तीन आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्त्वाची विधेयके, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी, आगामी निवडणुका आणि राजकीय घडामोडी पाहता हे तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली असून, सत्ताधारी पक्ष देखील विरोधकांना चोख उत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे २२ जूनपासून मुंबईत हायव्होल्टेज राजकीय रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.

भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी सुरु;दर्शनाकरिता पास अनिवार्य-जिल्हा प्रशासनाची माहिती

पुणे, दि. १५: भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी सुरु झाले असून मंदिरात प्रतिदिन एक हजार भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. भाविकांनी दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या https://shreebhimashankar.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पास उपलब्ध होणार आहे. नोंदणीकृत भाविकांची यादी संकेतस्थळावर होणार असून दर्शनाकरिता पास अनिवार्य करण्यात आल्याचे माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

भाविकांना ३० जून २०२६ पर्यंत दररोज सकाळी ७ ते ११ वा. दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनी दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य करण्यात आले आहे. भाविक तसेच स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे.

सन 2027 मधील नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रयागराज महाकुंभ 2025 च्या अनुभवाच्या आधारे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. संभाव्य वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारणीची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे नवीन सभामंडप व पायरी मागचि काम सुरु असल्याने, देवस्थान ट्रस्टने ९ जानेवारी २०२६ पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सदर बंद कालावधीस ३१ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मुख्य मंदिरासमोरील सभामंडपाचे काम पूर्ण करण्यासाठी सामान्य परिस्थितीत सुमारे एक वर्षाचा कालावधी अपेक्षित होता. तथापि, भिमाशंकर संस्थान, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविक यांच्या सहकार्यामुळे तसेच रात्रंदिवस अखंड काम सुरु ठेवण्यात आल्याने हे काम केवळ पाच महिन्यांत पूर्णत्वास येत आहे.

मुख्य सभामंडपाचे काम पूर्ण करण्यात आले असून दर्शनबारी उभारणी, परिसर स्वच्छता, भाविकांसाठी सुविधा व गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत कामे पूर्ण झाली आहे. सर्व कामे अंतिम टप्प्यात असून उर्वरित किरकोळ कामे जलदगतीने पूर्ण करुन बांधकाम साहित्य, दगड व यंत्रसामग्री हटवून परिसर भाविकांसाठी मोकळा करण्याच्यादृष्टीने श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट यांनी आजपासून दर्शनाकरिता खुले करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

सॅटेलाइट फोटोत मान्सूनचे ढग देशावरून गायब:महाराष्ट्रासह 17 राज्यांत पावसाची प्रतीक्षा

भारतातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सूनची) गती सध्या मंदावली आहे. १५ जून, सोमवारच्या उपग्रह फोटोंवरून असे दिसून आले की, देशाच्या मोठ्या भागावर मान्सूनचे ढग अनुपस्थित होते.भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, ४ जून ते १५ जून या कालावधीत देशात ५३.७ मिमी पाऊस पडायला हवा होता, परंतु प्रत्यक्षात केवळ १९.२ मिमी पावसाची नोंद झाली; म्हणजेच पावसाच्या प्रमाणात ६४ टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे.मान्सूनची सक्रियता मंदावल्यामुळे राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह १६ राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा लांबली आहे.

दक्षिण भारतातून पुढे सरकल्यानंतर मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या आसपासच्या भागात स्थिरावला आहे. त्याचप्रमाणे, ईशान्येकडील राज्यांचा टप्पा ओलांडल्यानंतर तो बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या जवळ थांबला आहे; या तीन राज्यांमध्येही मान्सूनचे पूर्णपणे आगमन झालेले नाही.
पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज

१६ जून:

बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाची शक्यता आहे. बिहारच्या काही भागांत ताशी ५०-७० किमी वेगाने जोरदार वारे वाहू शकतात.
आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी व कर्नाटकच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अनेक भागांत ताशी ४०-६० किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
१७ जून:

सिक्कीम, उत्तर बंगाल, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जोरदार वाऱ्यांसह (ताशी ४०-६० किमी) पाऊस पडू शकतो.
झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागांत पाऊस सुरू राहू शकतो.
महाराष्ट्राच्या काही भागांत १७ जूनपर्यंत उष्णतेची लाट

महाराष्ट्राच्या काही भागांत १७ जूनपर्यंत उष्णतेची लाट (हीटवेव्ह) कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मराठवाड्यात १७ जूनपर्यंत आणि विदर्भात १६ जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोकण आणि गोव्यामध्ये १७ जूनपर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. तसेच, कोकण आणि गोव्याच्या काही भागांत १६ जूनपर्यंत रात्रीच्या वेळीही उष्ण हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.

19 जूनपर्यंत या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे 19 जूनपर्यंत उत्तर-पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये पाऊस सुरू राहील.

जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्ये 14 ते 19 जूनपर्यंत पावसाची शक्यता.

हिमाचल प्रदेशात 14 ते 19 जून दरम्यान पावसाचा जोर.

हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशात 19 जूनपर्यंत थांबून थांबून पाऊस.

पूर्व उत्तर प्रदेशात 14 जून आणि 18-19 जून रोजी पावसाची शक्यता.

पश्चिम राजस्थानमध्ये 14 ते 17 जून आणि 19 जून रोजी पावसाची शक्यता.

हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये 14 जून रोजी वादळी वारे वाहू शकतात.

उत्तराखंडमध्ये 15 जूनपर्यंत पावसाची शक्यता कायम राहील.

हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 14 जून रोजी वादळ आणि विजा चमकण्याची शक्यता आहे.

घाऊक महागाई 43 महिन्यांत सर्वाधिक:मे महिन्यात 9.68% वर पोहोचली; इंधन महागले, अन्नधान्य आणि तेलाच्या किमतीही वाढल्या

पुणे-मे महिन्यात घाऊक महागाई (WPI) वाढून 9.68% वर पोहोचली आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये ती 8.26% होती. मे महिन्यात महागाई 43 महिन्यांत सर्वाधिक आहे. सप्टेंबर 2022 मध्ये ती 10.70% वर पोहोचली होती. वाणिज्य मंत्रालयाने आज म्हणजेच 15 जून रोजी घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे.

महागाई वाढण्याचे कारण म्हणजे दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि इंधनाच्या किमती वाढणे हे आहे. याशिवाय, धान्य आणि तेलही महाग झाले आहे. खरं तर, अमेरिका आणि इराण यांच्यात साडेतीन महिन्यांपासून तणाव आहे. परिस्थिती सामान्य न झाल्यास महागाई आणखी वाढू शकते.

दैनंदिन गरजेच्या वस्तू, इंधन आणि विजेचे दर वाढले

दैनंदिन गरजेच्या वस्तूंची (प्रायमरी आर्टिकल्स) महागाई 3.78% वरून वाढून 4.99% झाली.
खाद्यपदार्थांची (फूड इंडेक्स) महागाई 3.11% वरून वाढून 4.49% वर पोहोचली आहे.
इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील घाऊक महागाई दर 24.89% वरून वाढून 30.33% झाला आहे.
उत्पादित वस्तूंचा घाऊक महागाई दर 6.68% वरून वाढून 7.48% राहिला.
प्रायमरी आर्टिकल्स, ज्याचे वेटेज २२.६२% आहे. फ्यूल अँड पॉवरचे वेटेज १३.१५% आणि मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्ट्सचे वेटेज सर्वाधिक ६४.२३% आहे. प्रायमरी आर्टिकल्सचे देखील चार भाग आहेत.

फूड आर्टिकल्स जसे की धान्य, गहू, भाज्या
नॉन-फूड आर्टिकल्समध्ये तेलबिया येतात
खनिजे
क्रूड पेट्रोलियम
मे महिन्यात किरकोळ महागाई ३.९३% राहिली

मे महिन्यात किरकोळ महागाई वाढून ३.९३% वर पोहोचली, जी एप्रिलमध्ये ३.४८% होती. गेल्या ५ महिन्यांत, किरकोळ महागाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ४% च्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे.

घाऊक किंमत निर्देशांक (WPI) चा सामान्य माणसावर परिणाम

घाऊक महागाई दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास त्याचा बहुतेक उत्पादन क्षेत्रांवर वाईट परिणाम होतो. जर घाऊक किंमत खूप जास्त काळ उच्च पातळीवर राहिली, तर उत्पादक त्याचा भार ग्राहकांवर टाकतात. सरकार केवळ करांद्वारे WPI नियंत्रित करू शकते.

उदाहरणार्थ, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. तथापि, सरकार कर कपात एका मर्यादेतच कमी करू शकते. WPI मध्ये धातू, रसायने, प्लास्टिक, रबर यांसारख्या कारखान्यांशी संबंधित वस्तूंना जास्त महत्त्व दिले जाते.

महागाई कशी मोजली जाते?

भारतात दोन प्रकारची महागाई असते. एक किरकोळ आणि दुसरी घाऊक महागाई असते. किरकोळ महागाई दर सामान्य ग्राहकांकडून दिल्या जाणाऱ्या किमतींवर आधारित असतो. याला ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) असेही म्हणतात. तर, घाऊक किंमत निर्देशांक (WPI) म्हणजे घाऊक बाजारात एक व्यावसायिक दुसऱ्या व्यावसायिकाकडून वसूल करतो त्या किमती.

महागाई मोजण्यासाठी विविध वस्तूंचा समावेश केला जातो. उदा. घाऊक महागाईमध्ये उत्पादित वस्तूंचा वाटा 63.75%, अन्नधान्यासारख्या प्राथमिक वस्तूंचा 22.62% आणि इंधन व ऊर्जा यांचा 13.15% असतो. तर, किरकोळ महागाईमध्ये अन्न आणि उत्पादनांचा सहभाग 45.86%, घरांचा 10.07% आणि इंधनासह इतर वस्तूंचाही सहभाग असतो.