Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नवाज शरीफ यांच्या भेटीनंतर पाकच्या शेतकऱ्यांचे हित मोदी सरकारला अधिक महत्वाचे वाटते काय ?

Date:

पुणे-नवाज शरीफ यांच्या भेटीनंतर सरकारचे परिवर्तन झाले काय ? भारतीय शेतकऱ्यांऐवजी पाकच्या शेतकऱ्यांची काळजी घेणारे हे सरकार आहे काय ? असे सवाल उभे करत  करून केंद्र सरकारने राज्यातील साखर उद्योगासाठी ८ हजार ५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, हे केवळ ४ हजार ७० कोटीच असल्याची बाब शासन निर्णयातून समोर आली आहे. त्यामुळे केंद्राचे हे पॅकेज फसवे असल्याचे स्पष्ट होते, अशा शब्दांत काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारच्या अशा धोरणांमुळे आणि फसव्या पॅकेजमुळे साखर कारखाने आणि शेतकरी अडचणीमध्ये सापडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाटील म्हणाले, केंद्र सरकारकडून साखरेचे २७० लाख टन उत्पादन होईल असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात ३२१ लाख टन साखरेचे उत्पादन झाल्याने त्यांचा अंदाज चुकला. त्यांच्याकडे सर्व यंत्रणा असताना देखील हा अंदाज कसा काय चुकला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच पुढील वर्षी देखील उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी आद्याप काही उपाययोजना केल्याचे दिसत नाही. साखर उत्पादनातून अधिक पैसे मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला शेतीमालाचे भाव उतरले आहेत. त्यामुळे शेतकरी ऊस उत्पादनाकडे वळत आहे. या पिकाचे अधिक उत्पादन घेतल्यास भविष्यात हे पिक नष्ट होईल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे राज्यातील साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारने आपली भुमिका जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली

८० लाख टन साखर सरकारने निर्यात करावी. इथेनॉलचा दर ४० वरून ५३ करावा आणि साखर उद्योगाच्या पॅकेजबाबत योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा यंदाच्या चालू वर्षांचा गळीत हंगाम अडचणीमध्ये सापडणार हे निश्चित आहे. या मागण्यांची दखल सरकारने लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पाकिस्तानमधून ३ लाख टन साखर का? : हर्षवर्धन पाटील
परदेशातून २१ लाख टन साखर आयात करण्यात आली. त्यामध्ये पाकिस्तानमधून आलेल्या ३ लाख टन साखरेचा समावेश आहे. यातून या सरकारची मानसिकता दिसून येते. पाकिस्तानची साखर आपल्याकडे आणणे म्हणजे दुर्देवी बाब असल्याचे पाटील म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तुकडेबंदी कायदा रद्द अधिसूचना जारी … बावनकुळे

मुंबई- सरकारने याच अधिवेशनात केलेल्या घोषणेप्रमाणे तुक्देबंदी कायदा रद्द...

मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : मेट्रो लाईन समवेत असणारे काशिगाव मेट्रो...

आम आदमी पार्टी जिल्ह्यात सर्व स्थानिक निवडणुका लढवणार

पुणे-राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गण,...