मुंबई-कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे आहे.त्याच बरोबर खोके ..असे म्हणणे देखील चुकीचे आहे महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खूप खाली चालली आहे, असे म्हणत अखेर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तारांचे तर कान टोचले पण त्याच बरोबर पवारांचे वा अन्य विरोधी नेत्यांचे नाव न घेता मोठ्या नेते आपापल्या कार्यकर्त्यांना आवर घालण्याचे काम सुरु केले पाहिजे दोन्ही बाजूनी आचारसंहिता पाळली गेली पाहिजे असे म्हटले आहे. मात्र, अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेणार की नाही, यावर बोलणे फडणवीसांनी टाळले आहे.
फडणवीस यांना चित्रपटासंदर्भात विचारलं असता त्यांनी, “मी चित्रपट पाहिला नाही. त्यात काय वाद आहे मला माहिती नाही. कुणाला त्याबद्दल आक्षेप असतील तर ते सनदशील मार्गाने मांडावेत. मात्र मल्टीप्लेक्समध्ये शिरुन तिथल्या लोकांना मारहाण करणं, त्यांच्याशी दादागिरी करणं हे सहन केलं जाणार नाही,” असं फडणवीस म्हणाले आहेत.
फडणवीस यांना हर हर महादेव चित्रपटासंदर्भात विचारलं असता त्यांनी, “मी चित्रपट पाहिला नाही. त्यात काय वाद आहे मला माहिती नाही. कुणाला त्याबद्दल आक्षेप असतील तर ते सनदशील मार्गाने मांडावेत. मात्र मल्टीप्लेक्समध्ये शिरुन तिथल्या लोकांना मारहाण करणं, त्यांच्याशी दादागिरी करणं हे सहन केलं जाणार नाही,” असं फडणवीस म्हणाले आहेत.
राजकारणात आचारसंहिता हवी
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये. सत्तारांनी केलेले वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. आम्ही या वक्तव्याचा विरोधच करु. राजकारणात आचारसंहिता पाळायलाच हवी. ही आचारसंहिता ज्याप्रमाणे आम्हाला लागू आहे, त्याप्रमामे ही आचारसंहिता विरोधकांनाही लागू आहे.
मोठ्या नेत्यांनी आवर घालावा
फडणवीस म्हणाले, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचे समर्थन कुणीही करणार नाही. मात्र, विरोधकही ज्याप्रमाणे खोके-बोके अशी टीका करतात, तीदेखील चुकीची आहे. दोन्ही बाजुंनी आचारसंहिता पाळणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी येवढ्या खाली जाऊ नये, असे मला वाटते. तसेच, त्या-त्या पक्षातील मोठे नेते आपल्या नेत्यांना याबद्दल काही सांगत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही, असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोन करत अब्दुल सत्तार यांना सुनावले. त्यानंतर जाहीर सभेत सत्तारांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
राजीनाम्यावर फडणवीसांचे मौन
राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, अशी शिवराळ भाषा वापरणाऱ्या व्यक्तीला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान द्यायचे की नाही, याचा विचार राज्यपालांनी करावा. फडणवीसांनीदेखील त्यांना हे वक्तव्य मान्य आहे की नाही? हे स्पष्ट करावे. अखेर यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सत्तारांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे.