Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘मतदानयंत्रात घोटाळे करून भाजपने निवडणुका जिंकल्या’ -मायावती

Date:

लखनौ: केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने मतदानयंत्रात घोटाळा करून उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक जिंकल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केला आहे. मुस्लीम समाजाचे प्राबल्य असलेल्या भागात भाजपला इतरांपेक्षा अधिक मते मिळालीच कशी; असा सवालही त्यांनी केला आहे. भाजपच्या या कृत्याने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोपही त्यांनी केला.

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात मतदारांनी समाजवादी पक्ष किंवा बसपला मत देण्यासाठी त्यांच्या चिन्हावर बटन दाबले; तरी ती मते देखील भाजपच्या पारड्यात पडल्याचे दाखले आपल्याकडे असल्याचा दावाही मायावती यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांना पात्र लिहून पुन्हा जुन्या मतपत्रिका-मतपेटीच्या माध्यमातून निवडणुका घेण्यात याव्या; अशी मागणीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे.

भाजपने लोकशाहीची हत्या केली असून हेचसुरु राहिले तर सन २०१९ मध्ये पुन्हा भाजप सत्तेवर येईल. मतदारांचा ‘इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन’वरचा विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे या प्रकाराला वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी बसप पुढाकार घेणार असून इतर पक्षांनीही त्याला साथ द्यावी; असे आवाहनही त्यांनी केले. उत्तरप्रदेशप्रमाणेच उत्तराखंड निवडणुकांचे निकाल संशयास्पद आहेत. मात्र छोट्या राज्यांमध्ये निष्पक्ष निवडणूक झाल्या असून त्या ठिकाणी भाजपाचीअवस्था बिकट असल्याचा आरोप माया वती यांनी केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘टीव्हीएस अपाचे’ची दोन दशकांची गौरवगाथा : ‘नेक्स्ट-जेन टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही’च्या नव्या युगाचा प्रारंभ

भविष्यासाठी घडवलेली ही मोटरसायकल ‘ओबीडी२बी’ मानकांनुसार सुसज्ज; प्रगत तंत्रज्ञान,...

अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले आहे....

विमान अपघात:उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्राकडे केला तातडीने संपर्क

मुंबई, १२ जून २०२५ : अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी...