नेतृत्व चिंतन परिषदेच्या उद्घाटनाला ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, कार्यवाह सुभाष देशपांडे,प्रा . विवेक पोंक्षे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोळेकर, ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ज्ञान प्रबोधिनीच्या नेतृत्व चिंतन परिषदेचे उदघाटन
पुणे :
सत्तेचे केंद्रीकरण होऊन कार्पोरेटशाही येत असताना परिवर्तन आणि आंदोलनाच्या संदर्भात महात्मा गांधींचे उदाहरण पुढे ठेवत विकेंद्रीकरणाच्या प्रक्रिया पुढे नेणे हेच सामाजिक नेतृत्वापुढील आव्हान आहेत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु. र. यांनी केले.
ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. वि. वि. पेंडसे जन्मशताब्दी वर्षाची सांगते निमित्त ज्ञान प्रबोधिनी येथे आयोजित नेतृत्व चिंतन परिषदेचे आयोजन 20-21 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. त्यातील “सामाजिक प्रशासकीय क्षेत्रातील नेतृत्व घडणीची प्रक्रिया आणि आव्हाने’ या विषयावरील सत्रात सुनीती सु. र., ‘वयम ‘ संस्थेचे मिलिंद थत्ते यांनी मांडणी केली.
यावेळी सुनीती सु. र. म्हणाल्या, “निर्माणाशिवाय संघर्ष वांझ असतो. त्यामुळे नेतृत्वाने दोन्हीकडे लक्ष दिले पाहिजे. नेतृत्वाला नवे कृती कार्यक्रम देता येणे, पर्यायातून निवड करता येणे . दूरदृष्टी-सर्वसमावेशकता असणे , अनुयायांचाही अनुययटाळणे या गोष्टी करता आल्या पाहिजेत .
सध्या समाजाची निष्क्रियता वाढत आहे त्यामुळे आंदोलनाचे यश-अपयश हे समाजाचे यश-अपयश आहे. इथून पुढे विकेंद्रीकरणाच्या प्रक्रिया पुढे नेणे, शत्रू केंद्रीत विचार न करता व्यवस्था केंद्रीत आघात करणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
आदिवासी भागातील यशस्वी आंदोलनांचे अनुभव मिलिंद थत्ते यांनी मांडले. शहरी भागात आंदोलनाचे फायदे सर्वांना हवे आहेत. मात्र, संघर्षाची तयारी नसते, असा अनुभव विवेक वेलणकर यांनी मांडला.
शनिवारी सायंकाळी डॉ. भीमराव गस्ती यांचे अनुभव कथन आयोजित करण्यात आले होते तर, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.00 वाजता खुल्या सत्रात स प महाविद्यालयात अविनाश धर्माधिकारी यांचे अनुभव कथन आयोजित करण्यात आले आहे.