पुणे-विद्यार्थ्यांना शैक्षणिक मॉलमध्ये मुक्तपणे खरेदी करण्याची परवानगी दिली पाहिजे. कला, विज्ञान आणि मानवशास्त्र यांच्या मध्ये समाविष्ठ असलेल्या विविधतेचे शिक्षणात विकासासाठी संपूर्णपणे एकत्रित केले पाहिजे, असे मत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी व्यक्त केले.
सिंबायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड कॉमर्सच्या (एससीएसी) तिसऱ्या पदवीप्रदान समारंभात तावडे बोलतहोते. यावेळी त्यांनी ‘श्रम आणि निष्ठा’ या महत्त्वाच्या विषयावर भर दिला आणि शिक्षणाबाबतची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. त्यांनी सोनम वांगचुक यांचे उदाहरण दिले आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शिक्षण पद्धतींचे महत्त्व स्पष्ट केले. “भारतातील विद्यार्थ्यांना आघाडीवर येण्यासाठी त्यांनी स्थानिक विचार करणे आणि जागतिक स्तरावर पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ वापरण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी नमूद केले. पदवीप्रदानातून खरोखरच बाहेरील शिक्षकांच्या मार्गदर्शन निष्कर्ष दर्शविले जातात आणि विद्यार्थी स्वतःच्या मतेच शिकू लागतो, असेही ते म्हणाले.
या समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, हे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी सांगितले की, “शिक्षणाने आम्हाला सन्मान दिला आहे. ज्यायोगे आपण देशाच्या आर्थिक विकासात भाग घेऊ शकतो आणि राष्ट्राची उंची वाढविण्यासाठी हातभार लावू शकतो. नोकरीच्या संधींबाबत १.३ अब्ज लोकसंख्या असलेल्या भारतापुढे एक आव्हान आहे. याउलट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीस स्टॅण्ड अप इंडिया, स्टार्टअप इंडिया, कौशल्य विकास विविध योजनांची सुरूवात केली आहे.”
सिंबायोसिस विश्वविदयालयाचे (अभिमत विद्यापीठ) संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. एस. बी. मुजूमदार म्हणाले, “माणुसकी, अभियांत्रिकी आणि विज्ञान यासारख्या विविध विषयांचे, शास्त्रांचे एकत्रित करणे गरजेचे आहे. आम्हाला तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याने विज्ञान आणि मानवशास्त्र यांच्यात सहजीवन संबंध असणे आवश्यक आहे, परंतु आम्हाला कवी, लेखक, इतिहासकार आणि अर्थतज्ज्ञांचीही गरज आहे.”
ते पुढे म्हणाले, “एससीएसीने विविध प्रकारचे नवीन अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. ज्यात प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि लिबरल आर्ट्समधील डिप्लोमाचा समावेश आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ हे आमचे ध्येय असून ‘एससीएसी ’ त्यानुसारच कार्यरत आहे. केवळ मोठ्या अंतःकरणाचे लोक ओळखू शकतात की संपूर्ण जग एक जागतिक गाव आहे आणि आपण सर्व एक आहोत.” तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण, करुणामय आणि सहानुभूती देण्याचा सल्ला दिला.
उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी ‘एससीएसी’चे अभिनंदन केले. “सिंबायोसिस सातत्याने दर्जेदार शिक्षणाच्या दृष्टीनेच नव्हे, तर मूल्यांवर आधारित शिक्षण वर्गातील चार भिंतींमध्ये दिले जात आहे. हे ‘ एससीएसी ’, ‘ऑनर्स प्रोग्राम’, ‘लिबरल आर्ट्स’, ‘सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेन्ट’, शिक्षक हे विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनण्यासाठी मूल्य शिक्षण आणि सामाजिक जबाबदारीची भावना वाढीसाठी लागावी, यादृष्टीने ‘एसीसीए’ देतआहे.”
या पदवीदान समारंभात ४७६ पदवीपूर्व विद्यार्थ्यांना कला आणि वाणिज्य शाखेच्या पदवी प्रदान करण्यात आल्या. बी.ए. आणि बी.कॉम विद्यार्थ्यांना सन्मानाने पदवी प्रदान करण्यात आली. आर्ट्स शाखेतील विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र, इंग्रजी आणि मानसशास्त्र आदी विशेष विषयांचा अभ्यास केला, तर वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी बँकिंग, कॉस्टिंग, उद्योजकता आणि मार्केटिंग हे विशेष विषय अभ्यासले. कला शाखेत अनन्या दत्ता आणि वाणिज्य शाखेतून सिमरन छाबरा यांनी अग्रस्थान पटकाविले.