पुणे- कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांच्या वर खोटा गुन्हा दाखल करून वर फसवाफसवी केली असे सांगत भाजपच्या नेत्यांच्या प्रभावाखाली पोलीस अशी दुष्कृत्ये करीत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी आज पत्रकार परिषदेतून केला .
भाजपच्या नगरसेविकेच्या पतीने आपले गणेश मंडळ मार्ग सोडून अविनाश बागवेंच्या इमारती पुढे नेले आणि तिथे डीजे डॉल्बी लावून धिंगाणा घालून बागवेंच्या कार्यकर्त्यांना उचकावण्याचा प्रयत्न केला .हे बाहेर चालू असताना या वेळी बागवे स्वतः 3 पोलिसांसमवेत ऑफिसमध्येच होते. केवळ सत्तेच्या मस्तीपायी अविनाश बागवेंना त्रास देवून त्याद्वारे कॉंग्रेस पक्षाची बदनामी करण्याचे हे भाजपचे षड्यंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे .
पोलिसांनी सकाळी बागवेंना बोलवून नेले आणि आम्हाला सांगितले ,’ त्यांना आम्ही कोर्टात नेतो , आणि थेट लॉकअप मध्ये ठेवले. सकाळी अटक केल्यानंतर संध्याकाळी कोर्टात न्यायला हवे .पण तो नियम तोडून त्यांनी काल कोर्टात नेले नाही . आज नेले .आणि तिथे जामीन झाला . पोलिसांची हि कृती लोकशाहीला अत्यंत घातक अशी असून याबाबत कॉंग्रेस पक्ष गंभीर दखल घेईल असे ते म्हणाले …..
नेमके मोहन जोशी काय म्हणाले हे त्यांच्याच शब्दात ऐका …पहा …