पुणे-आज बाणेर-बालेवाडी-पाषाण-औंध परिसरातील (प्र.क्र.०९ )विविध नविन जुण्या उद्योजकांना स्टार्टअप इडियाच्या माध्यमातुन आपल्या उद्योगांचा विकासित करण्याची संधी मिळाली. यापरिसरातील नागरीकांमध्ये उद्योजक वृत्तीचा वाढ व्हावी यासाठी १०० दिवसांचा मोफत उद्योजकता विकाय कार्यक्रम औंध-बाणेर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक अमोल बालवडकर व राष्ट्रिय युवा पुरस्कार विजेते रविजी घाटे यांच्या संकल्पनेतुन आयोजित केला गेला .
” स्मार्ट सिटी स्मार्ट स्टार्टअप या उपक्रमाच्या माध्यमातुन निश्चीतच या परिसरातील नागरीकांमध्ये प्रामुख्याने युवा पिढी उद्योजकतेकडे वाटचाल करेल व या उपक्रमाच्या माध्यमातुन उद्योजकांना उद्योगजगताकडे वळण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली असल्याचे” यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले.
तसेच “अशा उपक्रमांमधुन नविन उद्योजकांना प्रेरणा मिळणार असुन त्यांच्या नवनविन कल्पनांमधुन उभारीस येणारे उद्योग हे सामाजिक दृष्ट्या व देशाच्या विकासात नक्किच हातभार लावतील असा विश्वास वाटतो व तसेच स्मार्ट सिटी संक्लपनेत यांच्या कल्पनांचा व उद्योजकांचा निश्चितच समावेश करुन घेवु” असे आश्वासन स्मार्ट सिटी पर्कल्पाचे सी.ई.ओ.श्री.राजेंन्द्र जगताप यांनी दिले.
भाजपा प्रवक्त्या श्वेताजी शालिनी यांनी या उपक्रमाचे उदघाटन करत स्टार्टअप चे स्वप्न मनी बाळगणाऱ्या नवं उद्योजकांचे मार्गदर्शन केले. सर्व आयोजकांचे कौतुक करतानाच त्या सर्वांना उद्देशून म्हणाल्या, “मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मा. मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी स्टार्टअप साठी तयार केलेले पोषक वातावरण समाज्यातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपा नगरसेवक अमोलजी बालवडकर यांनी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. अमोल बालवाडकरांसारखे तरुण व उत्साही व्यक्तिमत्वच अशा उपक्रमांना पुढे आणून स्मार्ट सिटी ची कल्पना खऱ्या अर्थाने सामाज्यापुढे आणि देशापुढे मांडत आहेत. त्यांच्या सारखेच अनेक तरुण जर आज पुढे आले तर देश खऱ्या अर्थाने व वेगाने सर्व समाजघटकांना सामावून पुढे घेऊन जाऊ शकतो व सरकारच्या अशा लोककल्याणकारी उमक्रमांचा फायदा घेऊ शकतो. माझ्या मते महाराष्ट्रातील १० शहरेच स्मार्ट सिटी होण्या पेक्षा सर्व महानगरपालिका, सर्व गावे स्मार्ट झाली पाहिजेत व असे उपक्रम सर्वत्र राबवले गेले पाहिजेत.”
या शिबिरास याभागातील १२८ उद्योजकांना पहिल्या टप्प्यात संधी दिली गेली असुन यामार्फत त्यांना उद्योग वाढीसाठी लागणारे मार्गदर्शन, जाहिरात यांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.
यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा प्रवक्या श्वेता शालिनी, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सी.ई.ओ.राजेंद्र जगताप, सह संयोजक रवि घाटे, मंदार राराविकर, शिशिर तरळ, अभय बागल, श्री अय्यर व परिसरातील विविध उद्योजक व नागरीक उपस्थित होते.