पुणे: आज सकाळी पुण्यातील आंबील ओढा येथे घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी तीव्र विरोध केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होत.
सकाळी कारवाई सुरु झाल्यावर पोलिस आणि स्थानिकांमध्ये झटापटही पाहायला मिळाली.पुणे महापालिकेत सत्ताधारी म्हणून भाजप नेत्यांच्या निर्णयाशिवाय कारवाई होत नाही. एवढी मोठं प्रकरण घडत असताना एकही भाजप राजकीय नेता फिरकला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.यावेळी काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला गेला. अशा वेळी पक्षाचे नगरसेवक कुठे गेले होते असं प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.पुण्याच्या आंबिल ओढा परिसरातील झोपडपट्ट्यांवर आज सकाळपासून अतिक्रमण कारवाईला सुरुवात झाली आहे. यावरून नागरिक प्रचंड आक्रमक झाले असून काही जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिस्थिती चिघळली आहे. नागरिक आणि पोलिसांमध्ये कारवाईच्या ठिकाणी धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. नागरिकांचा प्रचंड विरोध होत असूनही पालिका मात्र कारवाईवर ठाम आहे.पुण्याचा दांडेकर पुलालगत असलेल्या वस्तीतल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरत असल्याने गेल्यावर्षी नंतर महापालिकेने मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेत नागरिकांना इथून हटवायची तयारी केली होती. आज सकाळी ७ वाजताच अतिक्रमण कारवाईसाठी पथक या वस्तीत दाखल झाले . कारवाई पूर्वी पुनर्वसन का करण्यात आलं नाही असा सवाल विचारत नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
आंबील ओढ्याजवळचा कारवाईला विरोध करणाऱ्या १०० नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात झाली आहे.पुणे शहरातील दांडेकर पुलाजवळील आंबील ओढ्याजवळ असणाऱ्या वस्तीत महापालिकेचा वतीने अतिक्रमण कारवाई करण्यात येते आहे. या परिसरात पूर येऊ नये म्हणून आंबील ओढ्याची लांबी रुंदी वाढण्याचे काम केले जात आहे. तसेच या लागत भिंत देखील बांधली जात आहे. तसेच या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना देखील राबवली जात आहे. या सगळ्यासाठी इथल्या रहिवाशांची घरे पाडण्यात येत आहेत.
मात्र आज सकाळपासून या कारवाईला नागरिक मोठ्या प्रमाणावर विरोध करत आहेत. या कारवाईला विरोध करण्यासाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी विरोध करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे.जे नागरिक विरोध करत आहेत अशा १०० लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापुढे देखील जे विरोध करतील त्यांचावर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले जाईल असे दत्तवाडी पोलिसांनी सांगितले.यानंतर आता कारवाईला सुरुवात करत इथली घरे पडायला सुरुवात झाली आहे.दरम्यान या सर्व लोकांची राहण्याची सोय ट्रान्झिट कॅम्प मध्ये सोय केली असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.