दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थसाह्यासंदर्भात अलीकडेच ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी, दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतानं रोखठोक भूमिका मांडली. जमात-उद-दावा आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांवर कुठलीही कारवाई न करणाऱ्या पाकला बड्या देशांकडून चपराक बसावी, या उद्देशानं भारतानं निंदाप्रस्ताव सादर केला होता. त्याला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियानं विरोध केलाच; पण भारताशी चांगले संबंध असलेल्या रशियानंही त्या विरोधात भूमिका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना धक्का दिला आहे. वास्तविक, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काश्मीर मुद्द्यावर रशियानं कायमच भारताला साथ दिली आहे. त्यामुळे आता अचानक तसे का झाले यावर राजकीय समीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवार) रशिया आणि मध्य आशियातील पाच देशांच्या सात दिवशीय दौ-यावर आहेत. यामध्ये कजाकिस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उज्बेकिस्तान या देशांचा समावेश आहे. उज्बेकिस्तानपासून त्यांचा दौ-याची सुरुवात होणार आहे. दरम्यान, ब्रिक्स आणि शंघाई शिखर संमेलनामध्ये भाग घेणार आहेत. या ठिकाणी त्यांची पाक चे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबत भेटहोणार असल्याचे वृत्त आहे .
ब्रिक्स राष्ट्रांच्या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करणार आहेत. आयसिसचा धोका आणि दहशतवादाविरोधातील रणनीती, हाच या परिषदेचा अंजेडा असल्यानं तिथे रशियाची नेमकी भूमिका कळू शकेल