मराठीतला ..दर्दभरा संगीतकार …..

Date:

धग ” या चित्रपटाला ऑस्करच्या  पाश्चिमात्य प्रादेशिक भाषा चित्रपटाच्या नामावलीत  समाविष्ट करण्यात आले आणि , महाराष्ट्राच्या शिरपेचात वैश्विक सन्मानाचा तुरा खोवला गेला,  राष्ट्रीय पुरस्कार ते ऑस्कर चा प्रवास…. धग ने केला आणि मराठीतला  एक दर्दभरा गीतकार रसिकांपुढे आला !!!जग जळतं,जळतं … राख होतं …. या गाण्याने आणि ‘ उधळले तुझ्यावर गाव , जिव्हारी … या वाडकरांच्या आवाजातील गाण्याने हा दर्द रसिकांच्या मनामनात जागविला . फ.मुं. शिंदे यांच्या गझलांवर आधारित ” फकिराची मुशाफिरी “आणि आता येणाऱ्या “खैन्दुऴ” ने या संगीतकाराचे अष्टपैलू गुण रसिकांसमोर येणार आहेत
मराठी चित्रपटाच्या ह्या भरारीत आणि काफिल्यात , संगीत दिग्दर्शक म्हणून शामिल होणे हे  माझ्यासारख्या सामान्य पार्श्वभूमी असलेल्या   व्यक्तीसाठी एक  वेगळे वळण होते  असे नम्रपणे नमूद करणारा एक साधा आणि व्रतस्थ प्रतिभावान संगीतकार म्हणजे आदि रामचंद्र,  पूर्ण नाव “आदित्य रामचंद्र पटाईत”, जन्म गाव : धर्माबाद , जिल्हा : नांदेड
वडील कै .रामचंद्र विनायकराव पटाईत, धर्माबाद येथील लाल बहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते.पण उत्कृष्ठ गायक आणि सर्व संगीत प्रकारांची उत्तम जाण असलेल्या पटाईत सरांनी आपल्या मुलाला सांगीतिक वारसा देण्यात कुठलीही कसर सोडली नाही याचाच परिणाम आणि जवाबदारी म्हणून कि काय “आदि रामचंद्र” हे नाव आज राष्ट्रीय पुरस्कारांच्या  यादित जावून पोचले आहे.
असे संगीतकार आदि रामचंद्र याचे हे मनोगत :
संगीताचा वारसा वडिलांकडून मिळाला , लहान असतांनापासून सतत वडिलांनी सवाई गंधर्व महोत्सवास न्यायला सुरुवात केली ज्या योगे पं  वसंतराव देशपांडे, पं. जितेंद्र अभिषेकी, पं भीमसेन जोशी , वडाळी बंधू , या  सारख्या दिग्गज कलावंतांचे श्रवण संस्कार घडवून आणले ,
१ ९ ९ ४ या वर्षी वडिलांच्या अकाली निधना नंतर आम्ही धर्माबाद सोडले,आई श्रीमती सुधा रामचंद्र पटाईत यांचा कठीण परिस्थितीत भक्कम आधार,  त्याला अनुकंपा धर्तीवर वडिलांच्या जागी नोकरी मिळत असतांना पण आईच्या आग्रहास्तव औरंगाबाद गाठले, सरस्वती भुवन कला महाविद्यालयात संगीत विभागात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला, तेथे पहिले  गुरु पं शिवराम गोसावी गवसले. हळू हळू रियाझ वाढू लागला, पं शिवरामजींनी   पं. नाथ नेरळकर यांचेकडे गायकी आणि नायकी च्या अभ्यासासाठी पाठवले, तेथे गुरुजी ८ तास रियाझ करून घ्यायचे , भरपूर मेहेनत घेतली, दरम्यान नाट्यशास्त्र विभागात अनेक नाटकांना त्याने संगीत दिले, शिव कदम या घनिष्ठ मित्राने दिग्दर्शित केलेल्या मोहन राकेश लिखित ” आषाढ का एक दिन”, महानिर्वाण, इडीयट, सये तुझे डोळे, चि.त्र्य. खानोलकरांच्या गूढ गर्भ कवितांवर आधारित “मी म्हणावे” अश्या अनेक नाटकांना संगीत देण्या -पाठोपाठ, नाट्यदर्पण या मुंबईतील गाजलेल्या एकांकिका स्पर्धेतील ” अरविंद जगताप” लीखित “शुक्राणू” या विजेत्या नाटकास पण संगीत दिले.
औरंगाबाद येथे स्वतंत्र गाण्याच्या मैफिलीना  सुरुवात केली, १९९८ या वर्षी मुंबई गाठले, कुणाच्या हि शिफारशी विना सरळ सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना माझ्या चाली ऐकविल्या, त्यातून ” बेजुबान” या हिंदी अल्बम ची निर्मिती केली, आणि सुरेश वाडकरांच्या आवाजात १९९९ साली या अल्बमची रेकॉर्डिंग केली, तिथपासून सुरेश वाडकरांचा आशीर्वाद आणि सानिद्ध्य सतत लाभले, आदित्य च्या प्रतिभेवर  फिदा असणारी अनेक दिग्गज व्यक्तीनी मला साथ दिली, घरच्या जीम्मेदारीमुळे १२ वर्षे नौकरीत वरिष्ठ विभागीय व्यवस्थापकापर्यंतचा प्रवास लीलया पेलवला, या नोकरीच्या प्रवासात नांदेडला २००५ ते २००८ या काळाtे कधी नांदेड कधी औरंगाबाद परिक्षेत्रात नौकरी सुरूच होती , महाराष्ट्र केबल न्यूज नेटवर्क चा संपादक सचिन अनर्थे  या मित्राने अनेक जिंगल्स संगीतबद्ध करण्यास दिल्या, कठीण परिस्थितीशी दोन हात करत असतांना व नातेवाईकांची कुठली हि मदत नसतांना केवळ अशा वरिष्ठ मित्रांच्या भरघोस प्रतिसादाच्या जोरावर आज मार्गक्रमण सुरु आहे.
चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी घनिष्ट मित्र समीर रावसाहेब याने सतत प्रोत्साहन दिले, नौकरी सुरु असतांना माझा सृजनशीलतेचा दिवा तेवत ठेवला , त्याचा हा आग्रह होता कि माझे क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात माझी उर्जा खर्च होऊ नये , आणि इतरही मित्रांचे असेच मत बनत गेले, मग एके दिवशी निर्णय घेतला ,   विभागीय व्यवस्थापक पदाची नौकरी सोडून  २०१० या वर्षी पुण्यात स्थायिक झालो  आणि मला  “धग” या चित्रपटासाठी संगीतकार म्हणून बोलावणे आले, गाणे संगीतबद्ध झाल्यानंतर निर्माते विशाल गवारे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी ते सुखविंदर सिंग या सुप्रसिद्ध हिंदी गायकाच्या आवाजात रेकॉर्ड  करावे  असा सल्ला दिला, मी स्वतःच्या आवाजात जेंव्हा रेफरन्स रेकॉर्डिंग केले तेंव्हा अभिनेता उपेंद्र लिमये याच्या डोळ्यात पाणी तरळून आले, आणि असे ठरले कि माझाच आवाज हा योग्य आहे, आणि त्याचे डॉल्बी मिक्स माझ्याच  आवाजात झाले, अशारितीने मराठी चित्रपट सृष्टीत पहिले पदार्पण आणि त्यात राष्ट्रीय पुरस्कार.

धग नंतर समीर रावसाहेब दिग्दर्शित ” जागरण” या मराठी चित्रपटाला मी  संगीत दिले ज्यात ” हरिहरन” ” सुरेश वाडकर ” ” वैशाली सामंत” यांनी गाणी गायिली ,शिव कदम , प्रसन्ना देशमुख या  गीतकारांना घेऊन त्याचा हा प्रवास सुरु आहे एवढेच नव्हे तर जागरण मधील एक गाणे गायिले आहे, www.dhingana.com वर ही गाणी डिजिटलि लॉंच केली गेली, आजवर या गाण्यांचे लाखांमध्ये डाउनलोडस आहेत.

यानंतर पुण्यात आर्चिस साउंडप्रो प्रा.लि. हा   स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडीओ थाटला, २०१३- २०१४ या कालखंडात
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी फ.मुं. शिंदे यांच्या गझलांवर आधारित ” फकिराची मुशाफिरी ” या ध्वनिमुद्रीकेस संगीतबद्ध केले व या ध्वनिमुद्रीकेची निर्मिती सुद्धा केली.

तानाजी घाटगे दिग्दर्शित , अरविंद जगताप लिखित ” विनाकारण राजकारण” ,  आशिष पुजारी दिग्दर्शित ” अतिथी ”   व “खैन्दुऴ” या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले,

“भगवा” या विवेक आपटे लिखित ऐतिहासिक नृत्य नाट्य अविष्कारात तब्बल १२ गाणी संगीतबद्ध केली

आज गुगल सर्च वर आदि रामचंद्र असे टाईप केले कि त्याची कारकीर्द आपल्याला दिसून येते.
त्यात ऑस्कर साठी नामांकन म्हणजे उत्तुंग भरारीच आहे
त्याला त्याच्या ह्या यशाबद्दल विचारले असता तो ” अजून खूप काम  करायचे आहे, ज्यासाठी जन्म झालाय त्या भूमिकेस न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न सुरु आहेत ” अशी प्रांजळ प्रतिक्रिया द्यायला विसरत नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...