नवी दिल्ली – पंतप्रधानांच्या अखत्यारीत असलेले दिल्ली पोलिस आणि आप पार्टी यांच्यात आता संघर्ष रंगतो आहे . पोलिस कायदा सुव्यवस्था राखण्याऐवजी राजकारण जास्त करीत आहेत असा आरोप करीत दिल्ली पोलिस आमच्या अखत्यारीत द्या अशी मागणी आप्चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे दिल्लीतील ढासळत असलेली कायदा व सुव्यवस्था प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारच्या अक्त्यारीत असलेल्या पोलिस आयुक्तांना एकीकडे समन्स पाठवले आहे तर दुसरीकडे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दिल्ली पोलिसांच्या विरोधात आंदोलन केले. आंदोलकांवर ताबा मिळवण्यासाठी पोलिसानी पाण्याचे फवारे चा वापर केला. या प्रकरणामुळे दिल्ली पोलिस आणि केजरीवाल सरकार यांच्यात नव्याने संघर्ष निर्माण झाला आहे. त्यापूर्वी शुक्रवारी केजरीवाल यांनी पोलिसांसाठी अपशब्दांचा वापर केला होता. पोलिस आयुक्तांनी त्यावर आक्षेप घेतला होता.
दिल्लीच्या आनंदपर्वत परिसरात 19 वर्षांच्या मिनाक्षी नावाच्या तरुणीची हत्या आणि दिल्लीतील ढासळत असलेली कायदा व सुव्यवस्था या प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पोलिसांना समन्स पाठवण्यात आले आहेत. यात पोलिस आयुक्त बी.एस. बस्सी यांना सोमवारी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान आपच्या यूथ विंगच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयासमोर आंदोलन केले. त्यांच्यावर ताबा मिळवण्यासाठी पोलिसानी वॉटर कॅनन चा वापर केला.
दिल्लीचे गृहमंत्री सत्येन्द्र जैन यांनीही पोलिस आयुक्त बीएस बस्सी यांना पत्र लिहून 48 तासांत याबाबत स्पष्टीकरण मागवले आहे. पीडितेने अनेकवेळा तक्रार करूनही आनंद पर्वत मर्डर केसमध्ये आरोपींच्या विरोधात एफआयआर का दाखल करण्यात आला नाही? अशी विचारणा आयुक्तांकडे करण्यात आली आहे. तसेच आधी दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतही उत्तर मागवण्यात आले आहे. शनिवारी हत्या करण्यात आलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पोहोचलेल्या केजरीवाल यांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले. तसेच मीनाक्षी यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे. दिल्ली पोलिस पंतप्रधानांच्या अख्त्यारित येतात. त्यामुळे त्यांनी याबाबत काहीतरी करावे अन्यथा दिल्ली पोलिस आमच्या ताब्यात द्यावे, असे केजरीवाल म्हणाले.गुरुवारी दोन आरोपी जयप्रकाश आणि त्याच्या भावाने 11 वीची विद्यार्थीनी असलेल्या मिनाक्षीच्या चेहरा, छाती आणि पोटावर चाकूने 35 वेळा वार केले होते. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तिची आईही चांगलीच जखमी झाली होती. त्या दोघांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण मिनाक्षीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली होती. मिनाक्षीने 2013 मध्ये या दोघांच्या विरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केली होती.