पुणे ‘ऐलमा पैलमा गणेश देवा….’, ‘कारल्याचा वेल लावं गं सुने….आता तरी जाऊ का माहेरा’ आणि ‘असं कसं झाल माझ्या नशिबी आलं….’ अशा पारंपरिक गीतांवर ‘निवारा’ वृध्दाश्रमातील महिलांनी चतुःशृंगीच्या यात्रेत फेर धरला आणि त्या बालपणीच्या आठवणीत रमून गेल्या. गोखलेनगरमधील सुयोग मित्र मंडळ आणि चतुःशृंगी देवस्थान ट्रस्टने हा ‘आजीबाईंच्या भोंडला’ आयोजित केला होता. उपक‘माचे हे पाचवे वर्ष होते. नंतर सर्व महिलांसाठी देवीच्या दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
स्मरणरंजन आणि आनंदाने आजीबाईंच्या चेहर्यावर कृतार्थाची भावना होती. ‘निवारा’च्या व्यवस्थापिका निर्मला सोवनी म्हणाल्या, ‘नवरात्रीची चाहूल लागली की सगळ्याच महिलांना भोंडल्याच्या दिवसाची चाहूल लागते. देवीच्या दर्शनाला येण्यासाठी त्या उत्सुक असतात. भोंडल्याचा आनंद घेतात. बालपणीच्या आठवणी दाटून आल्याची भावना आणि आनंद त्यांच्या चेहर्यावर तरळत असतो. ’
सारीका धुमाळ, नंदा माने, दीपा सुपेकर, नंदा मोहीते, सुवर्णा कानिटकर, माया वाईकर, सरला नांगरे, रंजना पवार यांनी कार्यक‘माचे संयोजन केले.