पुणे
-पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री फिल्म ऐंड टेलिविजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)च्या कॅम्पसमध्ये प्रवेश करून १७ विद्यार्थ्यांपैकी पाच जणांना अटक केलीत्यानंतर आज न्यायालालाय्ने पाच विद्यार्थ्यांना जामीन मंजूर केला . पोलिसांनी मध्यरात्री १.१५ वाजता कॅम्पस प्रवेश करत ही कारवाई केली. मोदीजी!! एफटीआयआयमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत, गुन्हेगार नाहीत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी याबाबत ट्विट केलं आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्र सरकारच्या या कारभाराचा निषेध नोंदवत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. महत्वाचं म्हणजे जोवर केंद्र सरकार आपला हट्ट सोडत नाही, तोपर्यंत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत येऊन आपल्या अभ्यासाशी निगडीत काम चालू ठेवावं. दिल्ली सरकार त्यांना आवश्यक त्या गोष्टी उपलब्ध करुन देईल, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठराबे यांना त्यांच्या कार्यालयात घेराव घातल्याप्रकरणी आणि सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पाठराबे यांनी दिलेल्या तक्रारीत आपल्याला रोखून धरल्याची व सरकारी मालमत्तेच नुकसान केल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून डेक्कन पोलिसांनी विकास अर्च, अजयन अडाट, रणजीत नायर, राजू बिश्वास, अश्विन शर्मा, ग्यान गौरव, अमय गोरे, कृतिका पांडे, गोविंद राजू, लेफाथ सुब्बा, शिनी जे. के., विनिता नेगी, यशस्वी शर्मा, अजय यादव, हिमांशू प्रजापती, हरिशंकर नचीमुथ्थू, सचेत चौधरी यांसह इतर पंचवीस विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या मूल्यांकन पद्धतीवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. त्याच्या विचारणेसाठी विद्यार्थ्यांनी संचालकांना घेराव घातला होता. ज्या विद्यार्थ्यांविरोधात पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आले आहे यामध्ये तीन मुलींचा देखील समावेश आहे. मात्र मुलींना अटक करण्यात आलेली नाही.