पुणे- आधुनिक युगातील श्रावण बाळ अशी ओळख निर्माण करणाऱ्या पुण्याच्या उपमहापौर आबा बागुल यांची यंदाची काशीयात्रा आज पूर्ण झाली त्यांनी पुण्यातून यात्रेला नेलेले शेकडो भाविक आज पुण्यात परतले . आबा बागुल , बागुल परिवार,तसेच त्यांचे सहकारी नंदकुमार बानगुडे , रमेश भंडारी या यात्रंचे आयोजन कित्येक वर्षांपासून सातत्याने करत आहे . त्यांच्या या उपक्रमांपासूनच अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी अशा यात्रा काढण्याची प्रेरणा घेतली , पण सातत्य आणि सर्वप्रथम कल्पना या दोन्हीबाबत आबा बागुल क्रमांक एक वर आहेत. त्याची हि १५वी काशीयात्रा होती यावेळी त्यांनी १५०० नागरिकांना या यात्रेत नेले होते , सर्वांनी या यात्रे दरम्यान वाराणसीतील राजेन्द्रप्रसाद घाटावर स्वच्छता अभियान राबविले