मुंबई-सत्तेत सोबत असलो म्हणून ‘शेपटी घातलेली’ नाही, असा इशाराही उद्धव यांनी दिला. आम्ही कुणाच्या लाटेवर तरंगणारे ओंडके नाही तर जे काही आहोत ते आम्ही आमच्या जीवावर आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी येथे ठणकावून सांगितले.महाराष्ट्रात शिवसेना असेल तर तो स्थिर असतो अन्यथा अस्थिर. महाराष्ट्राला स्थिर करण्यासाठी म्हणून या सरकारला साथ दिली आहे. जर दिलेली आश्वासनं राज्यातील सरकारने पाळली नाहीत तर त्यांच्यावरही वार करू, असा सणसणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. त्यामुळे भाजप-शिवसेनेत सोबत असूनही दुरावा पुन्हा समोर आला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मुंबईतील षण्मुखानंद येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्रातील जनतेला स्थिर सरकार हवे होते. गेली १५ वर्ष सत्तेवर बसलेले सरकार त्यांना नकोस झाले होते. ते ओळखून केवळ महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याच्या हेतूने शिवसेनेने राज्यातील सरकारसोबत जाण्याचे ठरवले, असे म्हणत भाजपचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. पण सत्तेत सोबत असलो म्हणून ‘शेपटी घातलेली’ नाही, असा इशाराही उद्धव यांनी दिला. आम्ही कुणाच्या लाटेवर तरंगणारे ओंडके नाही तर जे काही आहोत ते आम्ही आमच्या जीवावर आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
विधानसभा निवडणुकांपूर्वी मी स्वत: दाखवलं होतं की राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यास आम्ही मुलांच्या पाठीवरचा बोझा कसा कमी करणार ते. पण आता राज्यात गवगवा चालू आहे की दप्तरांचं ओझं आम्ही कमी केलं. ही तर आमची कॉपी झाली. आम्ही स्वत: उत्तर पत्रिका सोडवली कुणाची कॉपी नाही केली, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिक्षण मंत्र्यांना लगावला.
ज्या वीर सावरकरांनी या राष्ट्रातील जनतेसाठी, हिंदूंसाठी मोलाचं कार्य केलं, अंदमानात तुरुंगवास भोगला त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
या देशातील हिंदू जनतेने केंद्रात स्थिर सरकार दिले आहे. काश्मीरमध्ये देखील हिंदूमुळे भाजपल्या अनेक जागांवर विजय मिळवता आला आहे. तेव्हा काश्मिरी पंडितांची खरी ‘घर वापसी’ झाली पाहिजे, तसेच समान नागरी कायदा हा आणलाच पाहिजे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच काश्मीरचे ३७० कलम रद्द कधी होणार अस सवालही त्यांनी यावेळी केला.वृत्तपत्रांत छापून आल्यानुसार मुस्लिमांची संख्या वाढत चालली आहे. पण मग त्यांच्याकडे कोणी मुल्ला किंवा शंकराचार्य असे वक्तव्य करताना आढळतात की इतकी मुलं पाहिजे. आपल्याचकडे हा सारा गोंधळ आहे. भविष्याची चिंता ती फक्त आम्हालाच, असे म्हणत उद्धव ठाकरे बोलले की, लोकसंख्येवर अस्तित्व नसतं, एक मुलं असलं तरी चालेल पण वाघासारखं असलं पाहिजे.
सत्तेत सोबत असलो म्हणून ‘शेपटी घातलेली’ नाही,—उद्धव ठाकरे
Date: