सत्तेत सोबत असलो म्हणून ‘शेपटी घातलेली’ नाही,—उद्धव ठाकरे

Date:

मुंबई-सत्तेत सोबत असलो म्हणून ‘शेपटी घातलेली’ नाही, असा इशाराही उद्धव यांनी दिला. आम्ही कुणाच्या लाटेवर तरंगणारे ओंडके नाही तर जे काही आहोत ते आम्ही आमच्या जीवावर आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी येथे  ठणकावून सांगितले.महाराष्ट्रात शिवसेना असेल तर तो स्थिर असतो अन्यथा अस्थिर. महाराष्ट्राला स्थिर करण्यासाठी म्हणून या सरकारला साथ दिली आहे. जर दिलेली आश्वासनं राज्यातील सरकारने पाळली नाहीत तर त्यांच्यावरही वार करू, असा सणसणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. त्यामुळे भाजप-शिवसेनेत सोबत असूनही दुरावा पुन्हा समोर आला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मुंबईतील षण्मुखानंद येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्रातील जनतेला स्थिर सरकार हवे होते. गेली १५ वर्ष सत्तेवर बसलेले सरकार त्यांना नकोस झाले होते. ते ओळखून केवळ महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याच्या हेतूने शिवसेनेने राज्यातील सरकारसोबत जाण्याचे ठरवले, असे म्हणत भाजपचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. पण सत्तेत सोबत असलो म्हणून ‘शेपटी घातलेली’ नाही, असा इशाराही उद्धव यांनी दिला. आम्ही कुणाच्या लाटेवर तरंगणारे ओंडके नाही तर जे काही आहोत ते आम्ही आमच्या जीवावर आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
विधानसभा निवडणुकांपूर्वी मी स्वत: दाखवलं होतं की राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यास आम्ही मुलांच्या पाठीवरचा बोझा कसा कमी करणार ते. पण आता राज्यात गवगवा चालू आहे की दप्तरांचं ओझं आम्ही कमी केलं. ही तर आमची कॉपी झाली. आम्ही स्वत: उत्तर पत्रिका सोडवली कुणाची कॉपी नाही केली, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिक्षण मंत्र्यांना लगावला.
ज्या वीर सावरकरांनी या राष्ट्रातील जनतेसाठी, हिंदूंसाठी मोलाचं कार्य केलं, अंदमानात तुरुंगवास भोगला त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
या देशातील हिंदू जनतेने केंद्रात स्थिर सरकार दिले आहे. काश्मीरमध्ये देखील हिंदूमुळे भाजपल्या अनेक जागांवर विजय मिळवता आला आहे. तेव्हा काश्मिरी पंडितांची खरी ‘घर वापसी’ झाली पाहिजे, तसेच समान नागरी कायदा हा आणलाच पाहिजे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच काश्मीरचे ३७० कलम रद्द कधी होणार अस सवालही त्यांनी यावेळी केला.वृत्तपत्रांत छापून आल्यानुसार मुस्लिमांची संख्या वाढत चालली आहे. पण मग त्यांच्याकडे कोणी मुल्ला किंवा शंकराचार्य असे वक्तव्य करताना आढळतात की इतकी मुलं पाहिजे. आपल्याचकडे हा सारा गोंधळ आहे. भविष्याची चिंता ती फक्त आम्हालाच, असे म्हणत उद्धव ठाकरे बोलले की, लोकसंख्येवर अस्तित्व नसतं, एक मुलं असलं तरी चालेल पण वाघासारखं असलं पाहिजे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे...

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...