पुणे- ‘ धर्मनिरपेक्षता ही संकल्पना भारतासारखा देश एकसंध ठेऊ शकते. त्याच संकल्पनेला छेद देण्याचा आज प्रयत्न होत आहे. तो यशस्वी होऊ देता कामा नये. धर्मनिरपेक्षतेला विरोध असणारेच आज सत्तेवर आहेत . हिंदू – मुस्लीम, इतर समाजात अंतर निर्माण केले जात आहे.कटुतेला शासकीय आधार दिला जात आहे. राज्य सत्तेचा वापर केला जात आहे. म्हणून आपण धर्मनिरपेक्ष विचारांचा प्रसार केला पाहिजे. या कामी जाणकारांनी पुढाकार घेतला पाहिजे. ‘
असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते , माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले.
‘आंतरभारती” दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते त्यांच्या मोदी बाग या निवासस्थानी मंगळवारी सकाळी अनौपचारिकरित्या झाले. तेव्हा ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘भाषा, जात, धर्म या समाज दुभंगता कामा नये.आंतरभारती या दिशेने काम करेल, अशी आशा आहे. या कार्याला मी शुभेच्छा देतो.