पुणे- कुठलेही काम करताना ते उत्कृष्ट करुन भागत नाही, तर जिद्द आणि चिकाटीची जोड देऊन ते सर्वोत्कृष्ट करावे लागते. तेव्हाच आपले ध्येय साध्य होते. असे मत भारत विकास ग‘ुपचे संस्थापक हनुमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) माजी विद्यार्थी संघटनेच्या ३४ व्या मेळाव्यात गायकवाड बोलत होते. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, माजी विद्यार्थी संघनेचे कार्याध्यक्ष अरुण निम्हण व्यासपीठावर उपस्थित होते.
उद्योजिका सुलज्जा फिरोदिया -मोटवानी, अरुणा कटारा यांना ‘प्राइड ऑफ बीएमसीसी’ पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. एस. जी. बापट आणि प्रा. एन. डी. आपटे यांचा गुरुवर्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
युवा बिरमले, सिद्धार्थ कांबळे यांना कांता मगर क‘ीडा पुरस्कार, भरत पाठक यांना वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार, सतीश जकातदार यांना बाळासाहेब सरपोतदार पुरस्कार, नारायणदास राठी यांना उद्योजकता पुरस्कार, तनिष्का देशपांडे यांना फ ळणीकर पुरस्कार आणि ओम भुतकर यांना सुहास कुलकर्णी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
फिरोदिया म्हणाल्या, ‘बीएमसीसी हे दुसरे घर होते. येथे चांगले शिक्षण, संस्कार आणि प्रोत्साहन मिळाले. साधेपणा, प्रामाणिकपणा, सचोटी आणि झोकून देण्याची वृत्ती याठिकाणी विकसित झाली. प्रदूषण आणि हवामान बदल यांचा सामना करण्यासाठी हरित तंत्रज्ञान आवश्यक आहे. त्यासाठी इ वाहाने ही काळाची गरज होणार आहे.’
कटारा म्हणाल्या, ‘बीएमसीसीने आत्मविश्वास दिला. वर्तमानकाळात कसे जगायचे ते बीएमसीसीत शिकवले. जीवनात आवश्यक असणारी समतोल भावना येथे विकसित झाली. शिक्षणाने जीवन बदलू शकते याची प्रचिती बीएमसीसीमुळे आली.’
बापट म्हणाले, ‘शिक्षकांनी केवळ वर्गात शिकविणे पुरेसे नाही. वर्गाच्या बाहेर विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे. सतत शिकण्याची तयारी ठेवावी, सामाजिक भान राखणे आवश्यक आहे.’