पुणे- गुलटेकडी एकता प्रतिष्ठाण च्या वतीने सर्व सदस्य एकत्र येऊन अन्नाची नासाडी व अंध श्रद्धा निर्मुलन साठी दरवर्षी प्रमाणे घेण्यात येणारा होळी मध्ये नका टाकु पोळी हा कार्यक्रम घेण्यात आला.हि पोळी गरीबामुखी घालण्यासाठी सुमारे १० मंडळांनी एकत्र येवून हा कार्यक्रम राबविला .
पुरण पोळी गोरगरीबांना वाटप करण्याचा कार्यक्रम एकता प्रतिष्ठाणच्या माध्यमातुन महर्षिनगर गुलटेकडी परीसरात सर्व मंडळाना एकत्र घेऊन करण्यात आला या कार्यक्रमास गुलटेकडी भागातील मंडळानी चांगला प्रतिसाद दिला शिव राजमुद्रा ट्रस्ट, एकता तरूण मित्र मंडळ, दिग्विजय मित्र मंडळजय शिवराज मित्र मंडळ ,अखिल महर्षिनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ,व कार्यक्रमाचे मुख्य संयोजक गुलटेकडी एकता प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष गणेश शेरला यांनी होळी ट नका टाकू पूर्ण पोळी असे आवाहन केले होते.
गेल्या वर्षी पासुन आम्ही गुलटेकडी, महर्षिनगर, मुकुंदनगर, सॅलिसबरी पाँर्क, व मीनाताई ठाकरे वसाहत येथे हा उपक्रम राबवित आहे होळी मध्ये नैवेद्य जरूर अर्पण करावा परंतु त्यातील पुरणपोळी काढून ती अन्नदान करून गरजवंताला द्यावी अशी संकल्पना आम्ही मांडली .ही दान केलेली पुराणपोळी बॉक्स मध्ये पॅक करून आम्ही स्वतः जाऊन गोर गरीबांच्या मुलांना व त्यांना देत असतो दरवर्षी 400 च्या वर पोळ्या येतात आणि त्या कोणाच्या तरी गरजू च्या मुखी जावी हीच भावना आमची आहे असे कार्यक्रमाचे संजयोजक गणेश शेरला यांनी सांगितले
माजी नगरसेवक भरत वैरागे, अंध संस्थेचे संतोष डिमळे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शेलार,राहुल गुंड, गुलटेकडी भागातील महीला मंडळाच्या आशा भालशंकर, सुलोचना कांबळे, बाबु कांबळे, रोहीत कोंडाळ, नजीर शेख, जावेद शेख, महेश सांळुके,विशाल लांडगे, सागर कांबळे, सागर नराल,अनिल पवार ,गणेश येरला,सचिन खंडागळे, विशाल शिंदे, पपु चिचवाडेकर आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.