जलोत्सवाच्या पाचव्या दिवशी पाणी वाचविणाऱ्या उद्योगांचा सत्कार ,’रोटरी वॉटर अवॉर्ड ‘चे वितरण
पुणे :
रोटरी क्लब ३१३१ च्या जलोत्सवाचा पाचवा दिवस उस्मानाबाद सारख्या दुष्काळी भागात शेतकऱ्यांच्या खासगी मालकीच्या साखर कारखान्याने केलेल्या परिवर्तनाच्या ,महाड एमआय डीसी मध्ये उद्योगांच्या दूषित पाण्याचा यशस्वी पुनर्वापर करणाऱ्या एस . बी ठोंबरे यांच्या यशकथेने आणि पाणी वाचविणाऱ्या उद्योगांच्या सत्कारानें संस्मरणीय ठरला !
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पाचव्या दिवशीही पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला .
जलोत्सवाचे संयोजक सतीश खाडे यांनी प्रास्ताविक केले . यावेळी दाटवायलर फार्मा पॅकेजिंग,एस . बी . पठारे ( महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन इ . टी . पी .) ,अविनाश आर्वेकर(एन्ड्युरन्स ) ,राहुल खळदकर (विपणन एनालिटिकल टेक्नॉलॉजीज ), रावसाहेब बडे ,तसेच केहिन फाय प्रा . ली , यांचा उद्योगातील पाणी बचतीबद्दल ‘रोटरी वॉटर अवॉर्ड ‘ हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला . मीना बोराटे ,सुनील जोशी ,मकरंद टिल्लू ,प्रदीप लोखंडे उपस्थित होते . ज्येष्ठ रोटेरियन मारुतराव जाधव ,सतीश खाडे यांनी सर्वांचा सत्कार केला .
लुपिन फाउंडेशन ,सिंजेंटा फाउंडेशन ,सिंडिकेट बँक फाउंडेशन ,महाराष्ट्र बँक फाउंडेशन यांचा ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला
रोटरी क्लब च्या अध्यक्ष शुभांगी कोठारी ,विभा झुत्सी यांनी स्वागत केले . महेश रासने यांनी सूत्रसंचालन केले .
नॅचरल शुगर ‘ साखर कारखान्याचे संस्थापक बी . बी .ठोंबरे म्हणाले ,’नॅचरल शुगर ‘ या १० हजार शेतकऱ्यांच्या मालकीच्या खासगी साखर कारखान्याने उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळावर मात करून आर्थिक क्रांतीचा यशस्वी प्रयत्न केला . ११ कोटी रुपयात उभ्या राहिलेल्या प्रकल्पाने १६ वर्षात २७५ कोटीची मालमत्ता केली आणि वार्षिक ४५० कोटी रुपयांची उलाढाल केली जात आहे . कार्यक्षेत्रात आता आत्महत्या होत नाहीत . दुग्धव्यवसाय ,भाजीपाला उत्पादन ,डाळ मिल ,असे अनेक उद्योग निर्माण झाले . या शिवाय उसातील पाण्यावरच साखर कारखाना चालविण्याचे तंत्र यशस्वी केले . हे तंत्र राज्यात वापरले जात आहे . वैफल्यग्रस्त तरुणाईला रोजगारातून सावरण्याचे काम या प्रकल्पातून झाले .
महाड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या १ कोटी लिटर दूषित पाण्यातून परिसराला ,नद्यांना ,समुद्राला वाचविणाऱ्या प्रकल्पाची निर्मिती कशी केली याची यशकथा ‘महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन इ . टी . पी . ‘ या औद्योगिक शिखर संस्थेचे अध्यक्ष एस बी पठारे यांनी सांगितली . अविनाश आर्वीकर यांनी एन्ड्युरन्स कंपनीने रोज प्रत्येकी १२ हजार रुपये किमतीचे पाणी भारतातील
१८ प्रकल्पात वाचविल्याची यशकथा सांगितली .
राहुल खळदकर (विपणन एनॅलिटीकल कन्सल्टन्सी ) यांनीही यश्वस्वी प्रकल्पाची माहिती दिली
रोटरी जलोत्सवात २२ मार्च रोजी ‘पाणी आणि विकास ‘ विषयावर चर्चासत्र होईल . त्यात प्रदीप आपटे आणि डॉ दि मा मोरे सहभागी होतील पोपटराव पवार यांचे अनुभव कथन २३ मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे .