पुणे- गांधी हत्येसमयी .. त्यांचे विचार आणि त्यांच्याच हाथी बंदूक होती आता विचार त्यांचेच आहेत आणि ते अमलात आणण्यासाठी बंदूक मात्र बहुजनांच्या दिली जाते आहे . हि धोक्याची मोठ्ठी घंटा असा इशारा देत .. पुण्यातून ‘मी नथुराम गोडसे’ नाटका द्वारे महात्मा गांधींचा अवमान आणि नथूरामचे उदात्तीकरण सुरूच असल्याने ..आणि त्यावर कायदेशीर कारवाई होताना दिसत नसल्याचे सांगून ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत रजिया पटेल यांनी आश्चर्य व्यक्त केले.
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त ‘विचारवंतांच्या हत्येचा प्रतिबंध कसा करता येईल’या विषयावर आयोजित केलेल्या महाचर्चा कार्यक्रमातील प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या .पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी या महाचर्चेचे उद्घाटन केले.
सुभाष वारे , अन्वर राजन , नचिकेत कुलकर्णी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी यात सहभाग घेतला . झोपडपट्टी सुरक्षा दल ,दलित विकास आघाडी, कामगार सुरक्षा दल आणि शिवशान्ताई प्रतिष्ठान यांच्या वतीने मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्स येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . आयोजक भगवान वैराट यांनी प्रास्तविक आणि पाहुण्यांचे स्वागत केले.