कलम ३७० रद्द; मुंबई भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष साजरा

Date:

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या लोकांनी जम्मू-काश्मीर मधून अनुच्छेद ३७० व ३५-अ हटवल्याचे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखचे विभाजन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे जबरदस्त स्वागत केले आहे. भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या या निर्णयाचे लोकांमध्ये मिठाई वाटून स्वागत करत जल्लोष साजरा करण्यात आला. लोढा म्हणाले की, मोदीजी आणि अमित भाईंनी आपल्या दृढनिश्चय शक्तीचा परिचय देत एक अत्यंत साहसी निर्णय घेतला आहे.
मुंबईमधील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात ‘जहां हुए बलिदान मुखर्जी, वो कश्मीर हमारा है’ चा नारा देत शामा प्रसाद मुखर्जी यांना पुष्पहार अर्पण करून झाली. मुंबई अध्यक्ष लोढा यांच्यासह आमदार तमिल सेलवण, भाई गिरकर, आमदार राज पुरोहित, अतुल शहा, शायना एनसी यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना जम्मू-काश्मीर अनुच्छेद ३८० व ३५-अ हटवण्याचा निर्णय, तसेच जम्मू-काश्मीर व लडाख वेगळे करून केंद्रशासित प्रदेश करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासहित अनेक पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्याने आपसात मिठाई वाटून, एक दुसऱ्यांना शुभेच्छा देत नरेंद्र मोदी आणि अमित शहा जिंदाबादचे नारे लगावत जल्लोष साजरा केला. यावेळी राजनीतिक कार्यकर्त्यांसह विविध कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एमआयटी-एडीटी विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन क्रीडा हंगामाचा दिमाखदार समारोप

१८ क्रीडा प्रकार, १९०८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; स्कुल ऑफ कम्प्युटिंग अव्वल,...

“श्रमिक हो… घ्या इथे विश्रांती; हे केवळ सुभाषित नको, त्यानुसार उत्तम सुविधा द्या!”— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१ जूनपासून एसटीच्या सर्व उपहारगृहांत ४० रुपयांत चहा-नाश्ता वल्लभनगर बसस्थानकाची...

‘नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच मिळाले पाहिजे!’ — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

लोणावळा बसस्थानकाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पाहणी पुणे, दि....

पाषाण तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवा – महापौर नागपुरे यांचे निर्देश

पुणे: पुणे शहरातील महत्त्वपूर्ण जलस्रोत असलेल्या पाषाण तलावातील वाढत्या...