पुणे :एकाहून एक सरस सुफी रचना सादर करून पवन श्रीकांत नाईक यांच्या ग्रुपने ‘ सुफी दरबार ‘ कार्यक्रम गांधी भवन येथे गाजवला !
सुफी वेशातील प्रामुख्याने हिंदू युवकांनी या रचना सादर करून सर्वांना गानसमाधीची अनुभूती दिली.
हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी गांधीभवन येथे झाला. त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
अल्लाह अल्लाह,मरहबा या मुस्तफा या ‘ जिक्र’ प्रकारातील रचनांनी त्यांनी प्रारंभ केला. ‘ये नाझ, ये अंदाज ‘ , ‘ बेखुद किये देते है ‘, झुले झुलेलाल, किन्ना सोणा अशा एकाहून एक बहारदार सुफी रचनांनी हा सुफी दरबार सजला.
संवादिनीवर कल्याण मुरकुटे, नरसिंग देसाई, पंकज नाईक, स्मिता राणा ( सतार ), कुलदीप चव्हाण ( बेन्जो ), हर्षद भावे ( तबला ) यांनी साथसंगत केली.
पवन नाईक यांना गायकीत डॉ. रिझवान शेख, नवरतन वर्मा, संकेत गांधी, मुलांशू परदेशी, उध्दव म्हस्के, अविनाश तिजोरे, पवन तळेकर, हरीश कुटे, श्रयस शिंत्रे, उज्ज्वला कुलकर्णी, राधिका परदेशी, यांनी साथ दिली.
वीणा दिघे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
‘ सुफी विचार ईश्वर आणि माणूस यातील अंतर कमी करते, आणि प्रेमभाव निर्माण करतो. हा संप्रदाय लोकांना जोडतो ‘ असे अन्वर राजन यांनी प्रास्ताविकात सांगीतले.यावेळी डॉ.कुमार सप्तर्षी ,अन्वर राजन, संदीप बर्वे, डॉ. उर्मिला सप्तर्षी, आदी मान्यवर उपस्थित होते.