पुणे-वाघोलीतील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
(पीएमआरडीए)च्या वतीने पुणे-नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ फ या वाघेश्वर, आव्हाळवाडी, केसनंद या तीन
संगम स्थानाची सुधारणा करणेकामी (१३/८०० ते १५/१०० (१३०० मीटर) रस्त्याचा भूमिपूजन समारंभ सोमवारी
दि.१० संप्टेंबरला दुपारी २.०० वाजता पार पडला.
सदर कार्यक्रमाला अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य तथा पालकमंत्री गिरीष बापट, भाजपाचे माजी आमदार
बबनराव पाचपुते, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते, भाजप तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे, युवा मोर्चा
जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, वाघोलीचे सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच संदीप
सातव, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तसेच नगररोड वाहतूक कृती
समिती सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, “ वाघोलीच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध टप्याटप्याने उपब्ध करून
प्राधान्याने विकासकामे केली जातील. वाघोलीतील महत्वाचा प्रश्न म्हणजे वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी या
भागातील रस्ते चांगले करणे गरजेचे आहे. मात्र याकरिता नागरिकांनी वाहतूक शिस्त पाळायला हवी. तसेच
ग्रामपंचायतीने सहकार्य करणे आवश्यक आहे. पीएमआरडीएच्यवतीने अद्यापपर्यंत वाघोलीच्या विकासासाठी
पाणीपुरवठा योजना, कचरा व्य्वास्थापण, अग्निशमन सेवा आदी प्रकल्प सुरु केले आहेत. सर्व गावांचा विकास करणे
आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे. वाघोलीतील रस्ते रुंद करण्यासाठी अतिक्रमण मोहीम लवकरच राबविली जाईल.”
वाघोली संगमस्थानाच्या रस्त्यासाठी पीएमआरडीएकडून ११ कोटी विकासनिधी
मा. आयुक्त किरण गित्ते म्हणाले की, “वाघोलीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. पुण्याचे प्रवेशद्वार म्हणून
वाघोलीची ओळख आहे. वाघोलीतील महत्वाच्या चौकांचा अभ्यास करून आम्ही रस्त्याचे कामकाज हाती घेतलेले आहे.
रस्त्याचे रुंदीकरण करून स्मार्ट सिग्नल यंत्रणा या भागात राबविली जाणार आहे. वाघोलीच्या या हाती घेतलेल्या
रस्त्याचे काम तीन ते चार महिन्यात पूर्ण केले जाईल. वाघोली बायपास रस्त्याचा सध्या सर्व्हे सुरु आहे. वाघोलीतील
ओढे नाले व रस्त्यातील अतिक्रमणे लवकरच काढून टाकली जातील. वाघोलीतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाणी
पुरवठा स्कीमचे नियोजन केले आहे. वाघोलीतील विकासकामे मार्गी लागण्यासाठी या ठिकाणी पीएमआरडीएच्या वतीने
लवकरच कार्यालय सुरु केले होईल.”
आमदार बाबुराव पाचर्णे यांनी वाघोलीतील वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात सुटका झाली याचे समाधान व्यक्त केले.
तसेच वाघोलीच्या बाह्यवळण रस्त्यांसाठी यापुढे भूसंपादनासाठी ग्रामस्थांनी मदत करून पीएमआरडीएला सहकार्य
करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाघोली रस्त्याचे विस्तारीकरण सुरु
Date: