रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. यावरून आता भाजपाने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या कारवाईवरून महाविकासआघाडी सरकारवर टीका केली जात आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
”कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल.” असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना सांगितलं आहे. शिवाय, त्यांनी तसं ट्विट देखील केलेलं आहे.

