दिल्लीत आंदोलक तरुणांवर पेलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला? मोदी-शाह संसदेत बोलण्यास का घाबरतात?

Date:

मुंबई, दि. ६ ऑगस्ट २६.

पेपरफुटी व शिक्षण व्यवस्थेत बदल करावा या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरसह देशभर लाखो तरुणांनी आंदोलन केले, त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला पण आंदोलन करणाऱ्यांवर भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारने अमानुष वागणूक देत लाठीहल्ला केला, पेलेट गन चालवल्या, मुलींशी असभ्य वर्तन केले. आंदोलक तरुणांना देशद्रोही, पाकिस्तानधार्जीणे म्हणून बदनाम केले आणि आता त्याच तरुणाईशी RSS चे सरसंघचालक मोहन भागवत संवाद साधतात, यालाच ‘सौ चुहे खाके बिल्ली हज चली’, असे म्हणतात. पण त्यांच्या या ढोंगीपणावर तरुणाई विश्वास ठेवणार नाही. आधी तरुणाईची माफी मागा व मोदी शाह यांनाही माफी मागण्यास सांगा, असे काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, आंदोलन करणाऱ्यांना अत्यंत वाईट पद्धतीने वागणूक देण्यात आली. हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने सर्व प्रयत्न केले, साध्या वेशातील पोलीस, RAF जवानांकडून लाठीहल्ला करण्यात आला, दगडांनी भरलेला ट्रक आणून आंदोलकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. या तरुणांवर पेलेट गन चालवण्यात आल्या, तो आदेश कोणी दिला होता? पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह संसदेत निवेदन का करत नाहीत व देशाची माफी का मागत नाहीत? कारण या सर्व प्रकाराला ते जबाबदार आहेत म्हणून ते संसदेत जाण्यास घाबरत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी शाह यांना माफी मागण्यास सांगितले पाहिजे. अन्यथा त्यांच्या तरुणाईशी संवाद साधण्यास काहीच अर्थ उरत नाही, तरुणाई त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

३६ देशांतून २७४ फरार आरोपी भारतात; १८ हजार ७६२ कोटी रुपये परत मिळवल्याचा केंद्राचा दावा

२०१९ ते जुलै २०२६ दरम्यान प्रत्यार्पण आणि अन्य प्रक्रियेतून...

शहरातील डोंगरउतार, माथे आणि टेकड्या निवासी कशा दाखवल्या? मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार—श्रीनाथ भिमाले

टेकडीफोड प्रकरणांची चौकशी करा,शहरातील सर्व टेकड्यांसाठी संरक्षण आराखडा तयार...