पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी एच जनतेच्या हलाखीच्या परिस्थितीला जबाबदार आहेत , जनतेला महागाईच्या खाईत लोटून ते परदेश दौऱ्यांचा मस्त आनंद लुटत आहेत असा आरोप करत केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ रद्द करावी यासाठी आंदोलन करण्यात आले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैलगाडा व टांगागाडी यावर बसून आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, ‘‘पश्चिम आशिया युध्दामुळे जागतिक बाजारातील कच्च्या इंधनाचे दर दररोज वाढत आहेत. त्यामुळे सार्वजनिक इंधन कंपन्यांनी इंधनाचे दर वाढविले. जागतिक बाजारात इंधनाचे दर कमी असताना पेट्रोल आणि डिझेलवर दररोज १ हजार कोटी रूपयांचा केंद्रीय कर लादूनही भाजप सरकारचे पोट भरलेले नाही. इंधनाचे दर कमी असताना भाजप सरकारने त्याचा लाभ जनतेला मिळवून दिला नाही. जेव्हा पेच प्रसंग उद्भवला तेव्हा भाजपचे नेतृत्व निवडणुकांमध्ये व्यस्त झाले. निवडणुका संपल्यानंतर ते त्यागाचा उपदेश देऊ लागले. त्यानंतर सातत्याने इंधन दरवाढ होत आहे. आज चौथ्यांदा इंधन दरवाढ करण्यात आली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतातील दर कमी असल्याचे सरकार खोटे सांगत आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहे. त्यामुळे सामान्य जनता हवालदिल झाली आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंधनचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी अडथळा येत आहे. निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने खर्चात कुठलीही काटकसर केली नाही आणि त्याचा र्भुदंड सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे. UPA सरकारच्या काळात कच्च्या इंधन तेलाचे भाव वाढलेले असताना सुध्दा जनतेचे हित लक्षात घेवून इंधन दरवाढ कमी प्रमाणात करण्यात आली. मोदी सरकारच्या काळात कच्च्या तेलाच्या निष्क्रीय आयात धोरणामुळे देशाला आर्थिक संकटातून जावे लागणार आहे. या कठिण परिस्थितीत सुध्दा केंद्र सरकारने तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षिय बैठक बोलविली नाही, ही देशासाठी फार मोठी चिंतेची बाब आहे. काँग्रेस पक्ष सदैव जनतेच्या हितासाठी लढत आहे.’’
यानंतर पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दिप्तीताई चवधरी म्हणाल्या की, ‘‘पेट्रोल, डिझेल बरोबरच घरगुती गॅसची दरवाढ व नागरिकांना घरगुती गॅसचा पुरवठा कमी केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून मोदी सरकारने महिलांच्या हितासाठी मते मागीतली परंतु महिलांवरील अत्याचार थांबले नाहीत त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडर च्या कमतरतेमुळे घरगुती-
आर्थिक गणित कोलमडे असून याला जबाबदार केवळ आणि केवळ केंद्रातील मोदी सरकार आहे. महागाईमुळे जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या असून सर्वसामान्य नागरिकांना घर चालविणे देखील कठिण झाले आहे. उत्पन्न वाढत नाही परंतु महागाई झपाट्याने वाढत आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे.ज्यावेळेला जागतिक पातळीवर क्रुड ऑईलचे दर अत्यंत कमी होते त्यावेळी ७७ हजार कोटींचा नफा केंद्र सरकारने ऑईल कंपनीला मिळवून दिला मग आत्ता केंद्र सरकारने सबसिडी देवून सामान्य जनतेला दिलासा द्यावा.’’
यानंतर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील व माजी आमदार मोहन जोशी यांनी केंद्रसरकारवर पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात टिका केली.
यावेळी महानगर पालिकेतील गटनेते चंदूशेठ कदम, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, शानी नौशाद, नगरसेवक दिपाली डोख, अश्विन लांडगे, सुनिल शिंदे, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, सेवादलाचे लतेंद्र भिंगारे, इंटक अध्यक्ष चेतन आगरवाल, ज्येष्ठ नागरिक संघाचे द. स. पोळेकर, राजेंद्र भुतडा, रमेश अय्यर, सचिन आडेकर, रमेश सोनकांबळे, रवींद्र माझीरे, बाळासाहेब अमराळे, सुरेश कांबळे, पप्पु घोलप, राहुल जगताप, केविन मॅन्युल, गौरव बाळिंदे, हर्षद हांडे, सेल्वराज ॲथोनी, नितीन परतानी, आयुव पठाण, नरसिंह अंदोली, वैभव डांगमाळी, रवि आरडे, संदिप मोकाटे, राहुल वंजारी, ॲड. संतोष जाधव, मजहर मणियार, सागर धावडे, कान्हुभाऊ साळूंके, पांडुरंग गायकवाड, शिवाजी सोनार, सोमनाथ पवार, सुरेश तनपुरे, सचिन गोरड, अक्षय मराठे, सागर घारे, नवनाथ जोरी, निलेश खैरे, बाळा धायगुडे, सतिश मंगडे, प्राजक्ता जाधव, ज्योती अडागळे, अंजली सोलापूरे, कल्पना शिंदे, प्रवीणा तांबोळी आदीसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

