पुणे-रांगोळी व फुलांचा गालिचा , साईनामाचा गजर ,शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर या जयघोषात हजारो साईबाबांच्या उपस्थितीत साईबाबांच्या पालखीचे प्रस्थान श्री कसबा गणपती येथून श्री क्षेत्र शिर्डीकडे गुरु पौर्णिमेनिमित्त ठेवले . सकाळपासूनच साई भक्तानी कसबा गणपतीपासूनच पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती .
शिवाजीनगर येथील रासने चाळीतील साईमंदिरात सकाळी साईबाबाच्या पादुकांना मंगल स्नान , अभिषेक इशा अग्रवाल व केशव कैलास अग्रवाल यांच्याहस्ते करण्यात आले .
नाशिक येथील श्री त्र्यंबकेश्वर येथील श्री पीर बालयोगी श्री गणेशनाथजी महाराज यांच्याहस्ते पालखीचे प्रस्थान झाले . यावेळी श्री साईबाबा संस्थांनचे विश्वस्त उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम , विश्वस्त बिपिनदादा कोल्हे,शिर्डीचे साई कथाकार ह. भ. प. विकास महाराज गायकवाड , महापालिका गटनेते श्रीनाथ भिमाले , माजी आमदार प्रकाश देवळे , नगरसेवक रविंद्र धंगेकर , माजी नगरसेविका सुशीला नेटके , सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख , चेन्नई येथील श्री शिर्डी साईबाबा ट्रस्टचे के. व्ही रमणी , कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय अधिकारी बी जे देशमुख , गणेश घुले आदी मान्यवर उपस्थित होते .
यंदाच्या वर्षीचे पालखीचे ३० वे वर्ष होते . तर साईबाबा महासमाधी शताब्दी वर्ष सुरु आहे हे या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे वैशिष्ट आहे . यावेळी श्रीनाथ भिमाले यांनी समितीला पन्नास हजार रुपयाचा देणगीचा धनादेश दिला . भाऊसाहेब पगडे परिवारातर्फे साईबाबांना चांदीच्या अब्दागिऱ्या व छत्री अर्पण करण्यात आल्या .
या कार्यक्रमात श्री पीर बालयोगी श्री गणेशनाथजी महाराज यांच्याहस्ते समितीचे ” गुरुपाठाचे अभंग ” श्री गोकुळ राहुरकर व सदाशिव नलावडे यांनी गायलेले आहेत , त्या ध्वनी चित्रफितीचे प्रकाशन करण्यात आले . व ” श्री साई सत्यनारायण ” या ग्रंथाचे प्रकाशन देखील त्यांच्याहस्ते करण्यात आले .
हि पालखी कसबा गणपती , फडके हौद , दारूवाला पूल , रास्ते वाडा , नरपतगीर चौक , पुणे स्टेशन , अलंकार टॉकीज, नगर रोड मार्गे श्री क्षेत्र शिर्डी येथे २५ जुलै रोजी पोहोचेल दरम्यान पालखी मार्गावर समितीतर्फे वृक्षारोपण करण्यात येणार आहे . बंडगार्डन बागेत मध्यान्ह आरती चंद्रसेन निंबाळकर परिवार व माजी नगरसेवक बाबू वागस्कर व वनिता वागस्कर यांच्याहस्ते करण्यात आली .
या प्रसंगी श्री साईबाबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष शाम वीर , कार्याध्यक्ष गुरुप्रसाद पगडे , सचिव महावीर क्षीरसागर ,खजिनदार विजय मेथे , सहसचिव संजय खरोटे , सहखजिनदार गोकुळ राहुरकर , विश्वस्त मंदार शहाणे , किरण कदम , रमेश भोसले , देविदास फडतरे आदींनी पालखी सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मेथे , प्रास्तविक मंदार शहाणे यांनी केले तर आभार शाम वीर यांनी मानले ..