Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

खर्‍या शांतीसाठी न्यायाची अधिक आवश्यकता – जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारोह प्रसंगी मौलाना रिझवी यांचे विचार

Date:

पुणे: “सर्वांना शांती हवी असेल तर त्यासाठी न्यायाची अधिक अवश्यकता आहे. आपण असे म्हणू शकतो, की शांती ही खरी व खोटीसुद्धा असू शकते. कारण ज्या ठिकाणी जे लोक हवे, ते नसल्यामुळे या देशात अशांतीचे वातावरण पसरलेले आहे”असे विचार समाजसुधारक मौलाना सय्यद कल्बी रशीद रिझवी यांनी काढले.
‘डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ (एमआयटी डब्ल्यूपीयू) पुणेतर्फे .‘विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्‍वशांती’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारोहामध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल वि.कराड, कायदे पंडीत व विचारवंत शिराज कुरेशी, भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष वाय. सुदर्शन राव, डॉ.जेनिफर रिटर, थर्ड आसाइटचे संस्थापक व प्रमुख देवांशू दत्ता, आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन आणि अग्नेय आशियाच्या आंतरराष्ट्रीय विकास प्रमुख डॉ.भूमिका गुप्ता, भारतीय तत्त्वज्ञान संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ.एस.आर.भट्ट, औद्योगिक प्रशिक्षक संतोष जोशी व भारतातील अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या महासंचालिका रंजना खन्ना सन्माननीय अतिथी म्हणून होत्या व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. डी.पी आपटे हेही उपस्थित होते.
मौलाना सय्यद कल्बे रशीद रिझवी म्हणाले,“भारत ही आमची माता आहे. या देशात शांतीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी आम्हाला बलिदान देण्याची वेळ आली, तरी ती आनंदाने स्विकारू. देशावर होणार्‍या हल्यांना आम्ही चोख उत्तर देवू. या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माच्या प्रमुख जागी जे नको आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात हीच स्थिती निर्माण झाल्यामुळे देेशात अराजकता पसरत आहे. अशावेळेस देशात शांती निर्माण करण्यासाठी युवकांना पुढाकार घ्यावा लागेल. अशा महान कार्यासाठी या विद्यापीठाची महत्वपूर्ण भूमिका असवाी, अशी अपेक्षा आहे.”
शिराज कुरेशी म्हणाले,“हिंदूस्तान, इन्सान आणि इन्सानियत या गोष्टींच्या विषयी सम्मानाबरोबर ते जीवनात प्रत्यक्ष उतरविल्यावर खर्‍या शांतीचा अनुभव येवू शकतो. जोपर्यंत मणुष्याला शिक्षणाची आवड आहे, तो पर्यंत त्यात अध्यात्म जीवंत असतेे. क्षणा क्षणाला शिकण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असावी. जीवनासाठी शिक्षण आणि माणुसकी आवश्यक आहे. संस्कृती आणि परंपरेचा सुगंध भारतातील प्रत्येक क्षेत्रातून दरवळतो.”
रंजना खन्ना म्हणाल्या, “अर्जुनांला ज्या प्रमाणे फक्त पोपटाचा डोळा दिसत होता, त्याप्रमाणे
प्रत्येकाने शांतीचे उद्दिष्ट निर्धारित केल्यावर ही सृष्टी शांतीपूर्ण होईल. येथे प्रत्येकांने मणुष्याला जोडण्याचे कार्य करावे.”
डॉ.भूमिका गुप्ता म्हणाल्या,“शिक्षण हे जीवनात परिवर्तन घडविणारे साधन आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विश्‍वशांतिला अनुकूल अशी विद्यार्थ्याची मानसिकता तयार करता येवू शकते.”
सुदर्शन राव म्हणाले,“ज्ञान आणि विज्ञान यूांच्या संगमातून सरस्वती प्रकट होते. यामध्ये भारताची व येथील शिक्षणपद्धतीची भूमिका सृजनात्मक आहे.”
यानंतर डॉ.एस.आर.भट्ट, देवांशू दत्त आणि संतोष जोशी यांनी विश्‍वशांती स्थापनेसाठी सर्वाचे योगदान किती महत्वपूर्ण आहे यावर विचार प्रकट केले.
प्रा.राहुल वि.कराड यांनी प्रस्तावनेत नव्या विद्यापीठाची संपूर्ण माहिती दिली. एमआयटी डब्ल्यूपीयूचा दृष्टिकोन सर्व जगात शांतीचा प्रसार व्हावा असा आहे. आजची परिषद हीसुद्धा या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाच एक भाग आहे.
वेस्ट मिन्स्टरचे विद्यार्थी वेरा लवलेस, लिह हॉपके व एमआयटीची नलिनी देवी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रेयांश खंडेलवाल, अंकित बन्सल, अक्षय ठाकूर आणि अंकित पाटील या विद्यार्थ्यांना एमआयटी डब्ल्यूपीयू मधील शांती दलाचे सैनिक म्हणून घोषित करण्यात आले.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी.पी आपटे यांनी आभर व्यक्त केले.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...