पुणे, दि. १५ : कृषी व शेतकरी कल्याण विभाग, भारत सरकार व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक शेतीबाबत विज्ञान आणि नैसर्गिक शेती या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे यशदा येथे १६ मे रोजी सकाळी ९.३० ते संध्या. ६ या वेळेत आयोजन करण्यात आल्याची माहिती कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे यांनी दिली आहे.
कार्यशाळेला भारत सरकारच्या कृषी विभागातील सह सचिव (आयएनएम), देशाच्या पश्चिम भागातील राज्यांचे कृषी सचिव, आयुक्त, संचालक, आयसीएआरचे शास्त्रज्ञ, चार कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, केंद्रिय कृषी मंत्रालयातील अधिकारी, निवडक शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत नैसर्गिक शेतीबाबतचे धोरण आणि त्याअनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत चर्चा होणार असून यात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ, गोवा, दादरा आणि नगर हवेली आणि दमण व दिव आणि लक्षद्वीप या ८ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील २५० शास्त्रज्ञ, अधिकारी व शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.
0000