नाशिक-नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काँग्रेसमध्ये विलीनीकरण हे नक्की आहे. मात्र ज्या दिवशी नकली शिवसेनेचे विलीनीकरण हे काँग्रेसमध्ये होईल, त्या दिवशी मला सर्वात जास्त बाळासाहेब ठाकरे आठवण येईल. ज्या दिवशी काँग्रेसमध्ये शिवसेना विलीन होईल, त्या दिवशी मी माझ्या दुकानाचे शटर खाली घेईल, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. अशी आठवण देखील नरेंद्र मोदी यांनी करुन दिली. अयोध्या मध्ये प्रभू रामचंद्रांचे मंदिर करणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. जम्मू-काश्मीर मधून कलम 370 काढून टाकावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाले. मात्र, त्यामुळे सगळ्यात जास्त राग नकली शिवसेनेला येत असल्याचा आरोप नरेंद मोदी यांनी केला आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदार संघातील उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.जय शिवाजी असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. सप्तश्रृंगी मातेला आणि नाशिकच्या प्रभू रामचंद्राला आपण नमन करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काल वाराणसी आणि आज त्र्यंबकेश्वरच्या धरतीमधून मी सर्वांना प्रणाम करत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
वीर सावरकरांना दिवसरात्र शिव्या देणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना नकली शिवसेना डोक्यावर घेऊन फिरत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हे सर्व पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनामधील राग हा सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. मात्र आपल्या अहंकारात नकली शिवसेनेचे नेते त्यांना महाराष्ट्रातील जनतेच्या लोकांचा राग दिसत नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता नकली शिवसेनेला शिक्षा करण्याचे महाराष्ट्रातील जनतेने ठरवले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यात निवडणुकीत यांना धोबीपछाड देण्याचे काम मतदारांनी केले असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आमचा दहा वर्षातील कार्यकाळ पाहिला आहे. तसेच या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सरकारचा कार्यकाळ देखील शेतकऱ्यांनी पाहिला आहे. त्या काळात तर महाराष्ट्रातील एक नेताच देशाचे कृषी मंत्री होते. मात्र, त्या कार्यकाळात सरकारने शेतकऱ्यांची अजिबात चिंता केली नव्हती. असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आज पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून दरवर्षी 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. म्हणजेच येणाऱ्या पाच वर्षात कमीत कमी साठ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी खोटे पॅकेज जाहीर होत होते. या पॅकेजमधून शेतकऱ्यांना एक रुपया देखील मिळत नव्हता. नासिक आणि हा परिसर कांदा आणि द्राक्ष शेतीसाठी प्रसिद्ध आहे. देशामध्ये पहिल्यांदाच कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्याची व्यवस्था आमच्या सरकारने सुरू केली, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या आधी देखात अशी कोणतीच व्यव्यस्था नव्हती. गेल्यावर्षी शेतकऱ्यांकडून सात लाख टन कांदा खरेदी केला असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आता पुन्हा पाच लाख टन कांदा ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षात कांदा निर्यातीमध्ये 35 टक्के वाढ झाली असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले बंदी आता उठवण्यात आली आहे. तसेच कांदा निर्यातीवर देखील सरकार सबसिडी देत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने प्राणप्रतिष्ठाच्या निमंत्रणाला ठोकारले. तर नकली शिवसेनेने देखील तोच मार्ग अवलंबला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे नेते राम मंदिराबद्दल उलटसुलट बोलत आहे मात्र, नकली शिवसेना यावर काहीही बोलत नसल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गेल्या दहा वर्षात तुम्ही माझे काम पाहिले आहे. आता मी तुमच्याकडे तिसऱ्या कार्यकाळासाठी आणि विकसित भारतासाठी आर्शीवाद मागण्यासाठी आलो असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तुमची सेवा हेच माझे सर्वात मोठे लक्ष असल्याचेही मोदी यांनी या वेळी म्हटले आहे.