यासाठीच् महाराष्ट्रात प्रथमच ५ टप्प्यात मतदान..–काँग्रेस राज्य प्रवक्ते
पुणे –
आजपर्यंत एवढ्या जास्त टप्प्यात कधीही न झालेले मतदानाचे टप्पे महाराष्ट्रात ४८ जागांसाठी ५ टप्प्यात मतदान(?)” या निवडणुक आयोगाच्या निर्णयाचे गौडबंगाल, “पंतप्रधानांच्या प्रचार सभांच्या नियोजनावरून” स्पष्ट होत असल्साचा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला. ते म्हणाले,’‘महाराष्ट्रातील विरोधक’ संपुष्टात आणण्याच्या लोकशाही विरोधी कुहेतूने, कट-कारस्थानाने केलेल्या सरकार पाडापाडीच्या राजकारणामुळे,राज्यात मोदी सरकारच्या पाया खालची वाळू सरकू लागली आहे.त्याची प्रचिती वारंवार येत असून, वणवण फीरत भाषणजीवी मोदींना महाराष्ट्रात १३ वी जाहीर सभा घेण्याची वेळ येणे, हे पराभवाचे द्योतक आहे.
काही कि. मी. वरील पुणे जिल्ह्यातील (बारामती) मतदार संघातमतदान होत असतांनाच.. शेजारील नगर जिल्ह्यात मात्र पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होणे हे मतदानावर व मतदारांवर प्रभाव पाडणार कृत्य होत नाही काय (?) हे निवडणुक आयोगास नसमजणे एवढे निवडणुक आयोग अनभिक्षीक्त वा दुधखुळे आहे काय(?) असा संतप्त सवाल देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.
त्यांनी पुढे सांगितले की, संविधानिक लोकशाही मार्गाने निवडणुका निकोप वातावरणात घेणे हे स्वायत्त असलेल्या निवडणुक आयोगावर बंधनकारक आहे तसेच ‘लोकशाहीची बूज राखणे’ हे देखील लोकशाहीचा १ ला स्तंभ असलेल्या व जनतेच्या कररुपी पैशातून उच्च स्तरीय पगार व सोई सुविधा घेणाऱ्या (IAS & IPS) या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर तेवढेच अवलंबून आहे..! मात्र अनेक प्रशासकीय अघिकारी वर्ग सत्ताघिशांच्या कुटील कारस्थानांना बळी पडून, त्यांचे ईशाऱ्यावर नाचत असल्याचे व संविधानिक निती नियम पायदळी तुडवत असल्याचे दिसून येत आहे…!
काँग्रेस सत्तेत आल्यावर अशा संविधानीक नियम – संकेत डावलून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची निश्चित कायदेशीर नोंद घेईल असा ईशारा देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी निवेदनात दिला.