पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मदुराईमध्ये रु. 4,400 कोटींहून अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण तसेच भूमिपूजन

Date:

मदुराई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील मदुराई येथे रु. 4,400 कोटींहून अधिक खर्चाच्या  विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. पवित्र मदुराई नगरीत उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आजचा दिवस तामिळनाडूच्या विकास प्रवासातील अभिमानास्पद अध्याय आहे. हे प्रकल्प संपर्क व्यवस्थेचा आमूलाग्र बदल, अर्थव्यवस्थेला चालना आणि युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्यासोबतच राज्यातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवतील.
उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणे म्हणजे मूलतः लोकांना सक्षम बनवणे होय, असे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले. “या विकासकामांमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत पोहोचण्यासाठी उत्तम रस्ते उपलब्ध होतील, यात्रेकरू व पर्यटकांना सुलभ प्रवास करता येईल आणि उद्योग-व्यवसायांसाठी जलद वाहतूक शक्य होईल,” असे मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधान म्हणाले, “मागील 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारने तामिळनाडूच्या महामार्ग जाळ्यात लक्षणीय गुंतवणूक केली असून, 2014 पासून 4 हजार किलोमीटरहून अधिक महामार्गांची उभारणी करण्यात आली आहे.”

अरुलमिगु सुब्रमण्यस्वामी मंदिर, तिरुपरंकुंड्रम, मदुराई येथे पंतप्रधानांनी प्रार्थना केली. शांती, समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी आशीर्वाद मागितले. भगवान मुरुगन आपल्याला नेहमीच शक्ती, धैर्य आणि बुद्धीने मार्गदर्शन करोत.असे ते म्हणाले.

मरक्कनम-पुद्दुचेरी मार्गाच्या चौपदरीकरणासह दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा त्यांनी उल्लेख केला. सुमारे 2,100 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या या प्रकल्पामुळे किनारी पर्यटन आणि व्यापाराला बळकटी मिळणार आहे. तसेच, परमकुडी–रामनाथपुरम मार्गाच्या चौपदरीकरणाचाही यात समावेश असून, सुमारे 1,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या या प्रकल्पामुळे रामेश्वरम आणि धनुष्कोडी यांसारख्या ठिकाणांपर्यंत प्रवास अधिक सुलभ होणार आहे. यामुळे भाविकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होईल तसेच कृषी आणि सागरी उत्पादनांच्या वाहतुकीलाही गती मिळेल.

गेल्या दशकात भारतीय रेल्वेमध्ये ऐतिहासिक परिवर्तन घडून आले असून ती आधुनिक, कार्यक्षम आणि लोककेंद्रित वाहतूक व्यवस्था म्हणून विकसित झाली आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. हे परिवर्तन विशेषतः तामिळनाडूमध्ये प्रकर्षाने दिसून येते. सध्याच्या सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीत जवळपास नऊपट वाढ केली आहे, असे  मोदी यांनी सांगितले. 2009 ते 2014 या कालावधीत दरवर्षी सरासरी 880 कोटी रुपयांची तरतूद केली जात होती; ती वाढून 2026–27 या वर्षासाठी 7,600 कोटी रुपये इतकी झाली आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. राज्यात 1,300 किलोमीटरहून अधिक नवीन रेल्वेमार्गांची उभारणी करण्यात आली असून 97 टक्के रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.  तसेच, शेकडो उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांच्या बांधकामामुळे सुरक्षितता आणि कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. महत्त्वाच्या टप्प्याचे स्मरण करत पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या वर्षी नवीन पंबन पुलाचे उद्घाटन करण्याचा सन्मान त्यांना लाभला. भारतातील पहिला उभा उचलता येणारा पूल म्हणून त्यांनी या पुलाचा विशेष उल्लेख केला.
सध्या तामिळनाडूतील जनतेच्या सेवेसाठी 9 वंदे भारत गाड्या आणि 9 अमृत भारत गाड्या कार्यरत असून, त्यांच्या डब्यांचे उत्पादन चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात येत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.  ‘मेक इन इंडिया’ या दृष्टीकोनाबद्दल अभिमान व्यक्त करत त्यांनी नमूद केले की,  या उपक्रमामुळे आत्मनिर्भरतेला चालना मिळत असून युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत राज्यातील 77 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत असून, प्रवाशांच्या सोयी-सुविधा, सुलभता आणि स्थानिक ओळख यांचा समन्वय साधण्यावर भर दिला जात आहे. यापैकी पुनर्विकसित करण्यात आलेल्या 8 स्थानकांचे उद्घाटन आज करण्यात येत असल्याची माहिती मोदी यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, चेन्नई बीच -चेन्नई एग्मोर या चौथ्या मार्गिकेचे लोकार्पण केल्यानंतर हजारो प्रवाशांना दररोज  ये-जा करण्यासाठी त्याचा लाभ होईल. पंतप्रधानांनी कुंभकोणम, येरकॉड आणि वेल्लोर येथे आकाशवाणीच्या नवीन एफएम रिले ट्रान्समीटरचे उद्घाटन केले आणि या रेडिओ स्थानकांचेही जनसेवेसाठी लोकार्पण केले.
तामिळनाडूच्या पायाभूत सुविधांसाठी देण्यात येणारा निधी गेल्या दशकाच्या तुलनेत तिप्पटीने वाढला आहे, 2026 च्या केंद्रीय अर्थसंकल्पातही याच राज्यावर अधिक लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रादेशिक अर्थव्यवस्थेत क्रांती घडवून आणणाऱ्या बेंगळुरू-चेन्नई आणि चेन्नई-हैदराबाद बुलेट ट्रेन  मार्गासाठी मागवलेल्या प्रस्तावांची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.याशिवाय  “प्रगत उत्पादन, संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात तामिळनाडूला रेअर अर्थ कॉरिडॉरमध्ये स्थान देण्यात आले आहे, असेही पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले.
तामिळनाडूला समृद्ध इतिहास आणि वारसा असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आणि आदिचनल्लूरसारख्या ऐतिहासिक स्थळांचे जागतिक वारसा स्थळांमध्ये रुपांतर  केले जाईल अशी घोषणा त्यांनी केली. पुलिकत तलाव आणि पोधिगाई मलाई भोवतालच्या पर्यावरणीय पर्यटन उपक्रमांमुळे नैसर्गिक परिसंस्थांचे जतन होऊन नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असेही  मोदींनी नमूद केले. उत्पादन वाढविण्यासाठी देशभरात सुमारे दोनशे औद्योगिक केंद्रे तयार करण्यात येतील आणि त्यांना पाठिंबा दिला जाईल,असेही  त्यांनी सांगितले. तामिळनाडू अनेक उद्योगांचे माहेरघर आहे यावर भर देऊन पंतप्रधानांनी म्हणाले की या योजनांचा स्थानिक तरुणांना मोठा लाभ होईल.
भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येक भारतीय प्रेरित झाला आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला आणि देशाचे भवितव्य घडवण्यात तामिळनाडू निर्णायक भूमिका बजावेल असे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले.सर्वसमावेशक विकास आणि राज्याच्या  प्रगतीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, असे सांगत “विकसित भारतासाठी विकसित तमिळनाडू हे आमचे सामूहिक ध्येय आहे” असे अधोरेखित करत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घोष पथकाच्या वादनातून झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना मानवंदना

पुणे, दि. 18 जून : स्वातंत्र्यलढ्यातील अद्वितीय शौर्य आणि...

पाणी साठवा, पण झाकून ठेवा; डेंग्यू-मलेरिया रोखण्यासाठी महापालिकेचे आवाहन

पुणे, दि. १८ : उन्हाळ्यात आणि ‘एक दिवसाआड पाणीपुरवठा’...

जगभरातील सैन्य दलांसाठी वैशिष्ट्यपूर्ण माउंटेड आर्टिलरी गन प्रणाली उपलब्ध करण्याचा करार

पॅरिस, फ्रान्स, १८ जून २०२६ : भारत फोर्ज लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची संरक्षण क्षेत्रातील उपकंपनी असलेल्या ‘कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड’ने (केएसएसएल) लष्करी वाहनाधारित संरक्षण प्रणाली विकसित करणारी आघाडीची कंपनी एएम जनरल हिच्यासोबत युरोसॅटरी संरक्षण प्रदर्शनात आज धोरणात्मक भागीदारी करार केला. बदलत्या युद्धपरिस्थितीत जगभरातील आधुनिक सैन्य दलांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने केएसएसएल आणि एएम जनरल यांच्यात ही धोरणात्मक भागीदारी करण्यात आली आहे. या भागीदारीद्वारे सैन्य दलांना आकाराने कॉम्पॅक्ट, हलक्या वजनाचा, टिकाऊ, कठीण परिस्थितीतही प्रभावीपणे कार्य करणारा तसेच सर्व हवामानात आणि सर्व प्रकारच्या भूभागांवर सहज वापरता येणारा अत्याधुनिक ‘माउंटेड आर्टिलरी गन प्लॅटफॉर्म’ उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे सैन्य दलांना विशेष स्पर्धात्मक लाभ मिळू शकतो. या क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. त्या दृष्टीने ही भागीदारी मित्रदेशांमधील व्यापक वितरणाला चालना देण्यासाठी करण्यात आली आहे. आधुनिक, गतिमान आणि युद्धपरिस्थितीत टिकून राहू शकणाऱ्या १५५ मिमी तोफखान्याची क्षमता विकसित करू इच्छिणाऱ्या भागीदार देशांसाठी हे व्यासपीठ विस्तारक्षम आणि निर्यातीसाठी योग्य उपाय म्हणून सादर केले जाणार आहे. या धोरणात्मक भागीदारीचा लाभ घेत ‘एएम जनरल’ने अमेरिकी लष्कराच्या ‘मोबाईल टॅक्टिकल कॅनन’ (एमटीसी) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीही प्रस्ताव सादर केला आहे. अमेरिकी सरकारला सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावामध्ये केएसएसएलच्या माउंटेड आर्टिलरी गन प्लॅटफॉर्मच्या युद्धपरिस्थितीत उपयुक्त ठरलेल्या आणि सिद्ध झालेल्या रचनेवर आधारित १५५ मिमी एमटीसी प्रणाली विकसित करून पुरविण्याचा समावेश आहे. या प्रस्तावाची निवड झाल्यास, या प्रणालीचे वितरण २०२७मध्ये करण्याचे नियोजन आहे. विशेष विकसित करण्यात आलेल्या पॉवरपॅक आणि सस्पेन्शन प्रणालीसह कमी वजनाच्या या वाहनामुळे एमएआरजी प्रणाली लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी तसेच रणांगणावरील जलद हालचालींसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या प्रणालीमध्ये ५२ कॅलिबर १५५ मिमी तोफ, पेटंटप्राप्त सॉफ्ट रीकॉइल टेक्नॉलॉजी (एसआरटी) आधारित रीकॉइल नियंत्रण प्रणाली, स्वयंचलित लोड-सहाय्य यंत्रणा आणि सर्व हवामानात कार्य करणारी प्रगत फायर कंट्रोल प्रणाली देण्यात आली आहे. त्यामुळे त्यातून अप्रत्यक्ष तसेच प्रत्यक्ष मारा करणे शक्य होते. ही प्रणाली प्रमाणित उच्च-स्फोटक प्रक्षेपास्त्र ४० किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत डागू शकते. तसेच या वाहनामध्ये २० हून अधिक प्रक्षेपास्त्रे आणि प्रोपेलंट चार्जेस साठवता येतात. पारंपरिक तोफखाना प्रणालींच्या तुलनेत ‘एमएआरजी’मधील एसआरटी प्रणाली ही रीकॉइलमधून निर्माण होणारा अधिकचा जोर शोषून घेते. त्यामुळे वाहन आणि टॉवरचे वजन कमी ठेवणे शक्य होते. तसेच संपूर्ण शस्त्र प्रणालीवर तिच्या वापराच्या कालावधीत कमी ताण येतो. ‘केएसएसएल’ची मूळ कंपनी असलेल्या ‘भारत फोर्ज लिमिटेड’चे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी म्हणाले, "आमच्या प्रगत तोफखान्याच्या क्षमतांवर एएम जनरलने विश्वास दाखवला आहे. आधुनिक युद्धाच्या गरजा पूर्ण करणारी अत्याधुनिक आणि युद्धपरिस्थितीत सिद्ध झालेली उत्पादने देण्याच्या आमच्या कटिबद्धतेतून ही भागीदारी साकार झाली आहे." ‘एएम जनरल’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन चॅडबोर्न म्हणाले, "केएसएसएल’सोबतची ही भागीदारी आमच्या मित्रदेशांना आणि रणांगणावरील सैनिकांना सहाय्य करण्याच्या आमच्या सामायिक बांधिलकीचे प्रतीक आहे. त्यांच्या अत्याधुनिक आणि सिद्ध झालेल्या प्लॅटफॉर्ममध्ये पेटंटप्राप्त ‘सॉफ्ट रीकॉइल टेक्नॉलॉजी’चा समावेश करून आम्ही खऱ्या अर्थाने नवी क्षमता उपलब्ध करून देत आहोत. रणांगणावरील बदलत्या परिस्थितीत यामुळे लष्करी दलांना महत्त्वाचा फायदा मिळू शकतो." केएसएसएल भारतात विकसित करण्यात आलेल्या आणि जागतिक दर्जाच्या निकषांशी सुसंगत संरक्षण प्रणाली तयार करते. भारतासह जगभरातील देशांना प्रगत संरक्षण क्षमता उपलब्ध करून देणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

पंकज त्रिपाठी आणि आशी यांच्यासह डी बिअर्स ग्रुपकडून वडील आणि मुलीच्या स्वाभाविक नात्याचा उत्सव

- यंदाच्या फादर्स डे निमित्त 50 स्टोअर्समध्ये ग्राहकांसाठी एक अनोखा उपक्रम – पुणे-18 जून 2026: डी बिअर्स ग्रुप यंदाचा फादर्स डे आपल्या ‘लव्ह, फ्रॉम डॅड’ या मोहिमेत एक अत्यंत भावनिक आणि वैयक्तिक भर घालून साजरा करत आहे. या मोहिमेअंतर्गत ख्यातनाम अभिनेते पंकज त्रिपाठी आणि त्यांची कन्या आशी यांच्यासोबत तयार करण्यात आलेल्या एका विशेष फिल्मद्वारे वडील आणि मुलगी यांच्यातील काळानुरूप विकसित होत जाणारे नाते अधोरेखित करण्यात आले आहे. विश्वास, प्रोत्साहन आणि निःस्वार्थ, निरपेक्ष पाठिंबा या मूल्यांवर उभ्या असलेल्या या नात्याचा हृदयस्पर्शी प्रवास या फिल्ममध्ये मांडण्यात आला आहे. स्वतःची अभिव्यक्ती आणि वाढत्या स्वातंत्र्याचे अर्थपूर्ण प्रतीक ठरलेल्या दुसऱ्यांदा कान टोचून घेण्याच्या निर्णयाभोवती केंद्रित असलेली ही फिल्म वडील-मुलीच्या नात्यातील सर्वात प्रामाणिक आणि भावनिक क्षणांना जिवंत करते. समुद्रकिनाऱ्याच्या निवांत आणि निसर्गरम्य पार्श्वभूमीवर उलगडणाऱ्या या कथेत वाळूत उमटलेली पावले काळाच्या प्रवाहाचे आणि अधिक दृढ होत गेलेल्या नात्याचे प्रतीक बनतात. ही चित्रफीत प्रत्येक वडिलांना जवळची वाटणारी एक जाणीव टिपते. एकेकाळी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी मुलगी आता आत्मविश्वासाने स्वतःचा मार्ग निवडत पुढे जात आहे. अभिमानाने भरलेल्या या शांत क्षणी नैसर्गिक हिरा हा केवळ एक भेटवस्तू राहत नाही; तो वडिलांकडून मुलीला दिलेला “मी तुला बघत आहे, समजून घेत आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तू जशी घडत आहेस त्याचा मला अभिमान आहे,”  असा एक संदेश ठरतो. ही कथा भारतभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डी बिअर्स ग्रुपने देशभरातील 50 निवडक रिटेल स्टोअर्समध्ये व्यापक उपक्रम सुरू केला आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, पुणे, लखनऊ आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये वडील आणि मुलींना एका अनोख्या, आठवणींना उजाळा देणाऱ्या रिटेल अनुभवात सहभागी होता येणार आहे. या उपक्रमाद्वारे प्रत्येक ग्राहक आपल्या नात्याची एक गोड आणि कायमस्वरूपी आठवण सोबत घेऊन जाईल. फादर्स डे सप्ताहाच्या अखेरीस (20 - 21 जून, 2026) या निवडक स्टोअर्समध्ये नामांकित छायाचित्रकारांकडून वडील आणि मुली विशेष छायाचित्रे काढून हा क्षण संस्मरणीय बनवू शकतील. पहिल्यांदा कान टोचण्याचा कार्यक्रम हा परंपरेनुसार होत असतो. पण दुसऱ्यांदा कान टोचणे हा एका तरुणीचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय असतो. तो तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा, स्वातंत्र्याचा आणि स्वतःची अभिव्यक्ती व्यक्त करण्याच्या क्षमतेचा महत्त्वपूर्ण टप्पा दर्शवतो. ‘लव्ह, फ्रॉम डॅड’ या मोहिमेद्वारे डी बिअर्स नैसर्गिक हिऱ्याला या विशेष क्षणाचा गौरव करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग म्हणून सादर करत आहे. नैसर्गिक हिऱ्याची दुर्मिळता, टिकाऊपणा आणि चिरस्थायित्व हे गुण वडील मुलीच्या नात्याच्या अढळ आणि दृढ बंधाशी जोडले गेले आहेत. डी बिअर्स इंडियाच्या कॅटेगरी मार्केटिंगच्या कंट्री हेड तोरांज मेहता म्हणाल्या, “नैसर्गिक हिरे हे नेहमीच आयुष्यातील अत्यंत दुर्मिळ आणि विशेष क्षणांचे साक्षीदार राहिले आहेत. यंदाच्या फादर्स डे निमित्त आम्ही दुसऱ्यांदा कान टोचण्याचा निर्णय घेणे या गोष्टीचा मुलीच्या स्वातंत्र्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड म्हणून गौरव करत आहोत. पंकज त्रिपाठी आणि आशी यांच्यासोबत सहयोग करताना आम्ही प्रामाणिकपणा आणि दुर्मिळतेवर आधारित एका सुंदर नात्याचा उत्सव साजरा करत आहोत. भारतभरातील 50 हून अधिक स्टोअर्समध्ये परस्परसंवादी उपक्रमांद्वारे ही कथा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास आम्ही उत्सुक आहोत. यामुळे कुटुंबांना मोहिमेशी जवळून जोडले जाण्याची, नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची आणि स्वतःसाठी एक अविस्मरणीय आठवण जपण्याची संधी मिळेल.” पंकज त्रिपाठी यांच्यासाठीही हा सहयोग अत्यंत वैयक्तिक स्वरूपाचा होता. आपल्या साधेपणासाठी ओळखले जाणारे पंकज त्रिपाठी म्हणाले, “वडील म्हणून काही क्षण अत्यंत भावनिक असतात. त्यापैकी एक म्हणजे आपले मूल स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे आणि स्वतःचे निर्णय घेत आहे याची जाणीव होण्याचा क्षण. दुसऱ्यांदा कान टोचणे हा अशाच आत्मविश्वासाच्या क्षणाचे प्रतीक आहे. या कथेत मला सर्वाधिक भावलेली गोष्ट म्हणजे एक साधी, छोटी कृती  आयुष्यभर जपली जाणारी आठवण बनू शकते. माझी मुलगी आशीसोबत हा अनुभव शेअर करणे माझ्यासाठी खूपच विशेष ठरले. नैसर्गिक हिरा हा वडिलांच्या प्रेमाप्रमाणेच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तितकाच अढळ आणि कायमस्वरूपी सोबत राहतो.” फादर्स डे निमित्त तयार करण्यात आलेली ही व्हिडिओ मालिका डी बिअर्स ग्रुपच्या डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रसारित केली जाणार असून भारतभरातील कुटुंबांना क्षणिक ट्रेंड्सच्या पलीकडे टिकून राहणाऱ्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्प्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी आमंत्रित करत आहे. या सहयोगाद्वारे डी बिअर्स जीवनातील सर्वात अर्थपूर्ण नातेसंबंधांच्या केंद्रस्थानी नैसर्गिक हिऱ्यांना स्थान देण्याची आपली परंपरा पुढे नेत आहे. रील पाहण्यासाठी @heerahaisadakeliye ला भेट द्या आणि नैसर्गिक हिऱ्यांविषयी अधिक माहितीसाठी www.adiamondisforever.com ला भेट द्या. यंदाच्या फादर्स डे निमित्त आपल्या खास छायाचित्रांद्वारे एक सुंदर आठवण जपण्यासाठी https://withlovefromdad.netlify.app/  ला भेट द्या.