राणी मुखर्जीचा भारतीय पोलिस दलाला सलाम — “त्यांच धैर्य, त्याग आणि निस्वार्थ सेवा भाव आपल्यासाठी प्रेरणादायी आहे”

Date:

यशराज फिल्म्सच्या मर्दानी ३ मधून राणी मुखर्जी पुन्हा एकदा पोलिस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत झळकणार आहेत. या ब्लॉकबस्टर फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात राणी पुन्हा गुन्हेगारी जगताशी सामना करताना दिसणार आहे. भारतीय पोलिस दिन २०२५ च्या निमित्ताने अभिनेत्रीने देशभरातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सलाम करत त्यांच्या अदम्य धैर्याला, समर्पणाला आणि निस्वार्थ सेवाभावाला अभिवादन केले आहे.

राणी मुखर्जी म्हणाल्या,“माझ्यासाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे की मर्दानी या चित्रपटा द्वारे मी भारतीय पोलिस दलाला सलाम करू शकते. देशभरात पोलिस दल जे कठोर परिश्रम आणि समर्पणाने काम करते, त्यांचा सन्मान करण्याची प्रत्येक संधी मी घेत असते. आपल्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोलिस अधिकारी लोकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस तत्पर असतात — स्वतःचा जीव धोक्यात घालून, आपल्या कुटुंबापासून दूर राहून. त्यांच्या या कार्याचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे.”

त्या पुढे म्हणाल्या,“भारतीय पोलिस दिनानिमित्त मी भारतीय पोलिस दलाच्या शौर्य, निष्ठा आणि निस्वार्थ सेवा भावाला मनःपूर्वक सलाम करते. ते प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी अहोरात्र झटत असतात. आपण हे विसरू नये की त्या वर्दीच्या मागे एक माणूस असतो — ज्याने चांगुलपणाचा मार्ग निवडला आहे, सेवा हीच आपली जबाबदारी मानली आहे आणि देशाला प्रथम स्थान दिले आहे. तेही कोणाचे तरी लेकरू, पती, पत्नी, वडील, आई आहेत. मला या दलाबद्दल मनापासून आदर आहे आणि प्रत्येक भारतीयापर्यंत ही भावना पोहोचवणे हे माझे कर्तव्य आहे.”

राणी मुखर्जी यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या साहसाचे कौतुक करत सांगितले,“पोलिस अधिकारी जे करतात ते खरंच अद्वितीय आहे. ते घरातून निघतात, पण परत येतील याची खात्री नसते. ते धोकादायक गुन्हेगारांना सामोरे जातात, निर्भयपणे उभे राहतात. त्यांचे धैर्य आणि चिकाटी पाहून मी नेहमी प्रभावित झाले आहे. त्यांच्या आयुष्याने मला निर्भय राहण्याची शिकवण दिली आहे. त्यांच्या त्यागाची दखल आपण नेहमी घेतली पाहिजे — कारण ते देशासाठी आपल्या आयुष्यातील अमूल्य क्षण गमावतात. यापेक्षा मोठा निस्वार्थ भाव दुसरा कोणता असू शकत नाही, आणि मला अभिमान आहे की मर्दानीच्या माध्यमातून मी त्यांना सलाम करू शकते.”

त्या म्हणाल्या,“भारतीय पोलिस दल हे आपल्याला खऱ्या शौर्याचा, समर्पणाचा आणि देशभक्तीचा अर्थ दाखवते. आपण सगळ्यांनी त्यांच्याकडून शिकायला हवे की आपल्या परीने देशासाठी उभे राहणे म्हणजे काय.”

आदित्य चोप्रा निर्मित आणि अभिराज मिनावाला दिग्दर्शित मर्दानी ३ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भाजपा दुसऱ्यांचे पक्ष गिळणारी चेटकीण.

..राज्यात आंधळं बहिरं व मुकं सरकार..खरिप हंगामासाठी महायुती सरकारची...

आता कंबोडियामध्येही भारतीय पर्यटकांना यूपीआय (UPI) पेमेंटची सोय

मुंबई: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची आंतरराष्ट्रीय शाखा असलेल्या NPCI इंटरनॅशनल...

पुण्यातील एयूएम तीन वर्षांत दुप्पट; महाराष्ट्राच्या म्युच्युअल फंड वाढीच्या प्रवासात पुणे ठरले महत्त्वाचे केंद्र:ए. बालसुब्रमण्यन

पुणे- आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्‍टर आणि सीईओ ए. बालसुब्रमण्यन पुणे दौऱ्यादरम्यान म्‍हणाले की, पुणे देशातील सर्वात वेगाने वाढणारी म्युच्युअल फंड बाजारपेठ म्हणून समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत या शहरातील एकूण एयूएम (व्यवस्थापनाखालील मालमत्ता) दुप्पट झाले आहे. बालसुब्रमण्यन यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक क्षेत्रात पुण्याची वाढती भूमिका आणि म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून दीर्घकालीन संपत्ती निर्मितीमध्ये गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग निदर्शनास आणले. पुण्यात नेहमी एक मजबूत इक्विटी संस्कृती राहिली आहे, जिथे गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणूक, संपत्ती निर्मिती आणि चक्रवाढ व्याजाची ताकद या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत आहेत. "ऐतिहासिकदृष्ट्या पुणे नेहमी उच्च वाढ देणारी बाजारपेठ राहिली आहे. याउलट, मी म्हणेन की, पुण्यातील इक्विटी संस्कृती इतर बाजारपेठांपेक्षा खूप जास्त आहे, कारण येथील व्‍यक्तींना दीर्घकालीन बचतीचे महत्त्व आणि चक्रवाढ व्याजाची ताकद चांगली समजते. पुणे सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ राहिली आहे आणि माझ्या मते, भविष्यातही अशीच वेगाने वाढणारी बाजारपेठ राहील," असे बालसुब्रमण्यन म्हणाले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडसाठी महाराष्ट्र नेहमी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे. उर्वरित महाराष्ट्र आणि गोवा (आरओएमजी) मधील म्युच्युअल फंडाची मालमत्ता आज जवळपास ५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनी सध्या देशभरात अंदाजे ४.७४ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करत आहे, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील जवळपास १.२ कोटी ग्राहकांच्या पोर्टफोलिओला सेवा प्रदान करत आहे. बालसुब्रमण्यन यांच्या मते, हा विकासाचा प्रवास आता राज्यातील केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित न राहता त्यापलीकडे वेगाने विस्तारत आहे. वाढती आर्थिक घोडदौड, पायाभूत सुविधांचा विकास, एसएमईचा वाढता विस्तार आणि कौटुंबिक उत्पन्नातील वाढ यामुळे इतर उदयोन्मुख केंद्रांमध्येही गुंतवणूकदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गुंतवणूकदारांच्या वर्तनाबाबत मत व्‍यक्त करत या म्युच्युअल फंड क्षेत्रातील अनुभवी तज्ञ म्‍हणाले की, म्युच्युअल फंड व एसआयपीबद्दल वाढणारी जागरूकता पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. भारत आता जवळपास ४ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडून १० ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना ते म्‍हणाले की, योग्य आर्थिक नियोजन आणि बाजारपेठेशी जोडलेल्या गुंतवणुकीतील सातत्यपूर्ण सहभाग हाच दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी मुख्य आधार ठरेल.