Home Blog Page 766

कॉंग्रेसचे माजी महापौर उल्हास ढोले-पाटील यांचे निधन

पुणे-कॉंग्रेसने घडविलेले एक मोठे प्रस्थ ,माजी महापौर उल्हास ढोले-पाटील वय 81 यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.त्यांच्या पश्चात पत्नी माजी आमदार कमल ढोले-पाटील, राहुल आणि सागर ही मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ढोले पाटील यांनी दुग्धव्यवसायात जम बसवला होता. सन १९७४ मध्ये त्यांनी प्रथम महापालिकेची निवडणूक लढवली. कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सलग सहा वेळा ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले.त्यांच्या पत्नीही कमल ढोले पाटील याही कॉंग्रेसच्या नगरसेविका होत्या.त्या नंतर आमदारही झाल्या.

ढोले पाटील सन १९७६ मध्ये ते महापौर झाले. “दूधवाला महापौर’ असेही त्यांना संबोधत असत. ३८ वर्षे ते महापालिकेचे नगरसेवक होते. तत्कालिन पुणे आणि पिंपरी चिंचवड परिवहन महामंडळाचे ते अध्यक्ष होते. कॉंग्रेस पक्षाने घडविलेल्या मोठ्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर घेतले जाते .1985 साली त्यांनी शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले त्यानंतर अखेरपर्यंत ते शरद पवार यांच्या सोबतच राहिले .

उद्योजकतेला नवकल्पनांची जोड असावी

प्रा.डाॅ.सुनिता कराड; ‘एमआयटी एडीटी’चा ४८+ कंपन्यांशी सामंजस्य करार
पुणेः  सध्याच्या शिक्षण पद्धतीत आपण मागणीपेक्षा पुरवठा जास्त करत आहोत. त्यामुळेच बाजारात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. परंतू आता नवीन शिक्षणपद्धती स्विकारून संशोधन, नवकल्पनांची जोड असणाऱ्या उद्योजकतेचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव तर मिळेलच सोबतच त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळून बेरोजगारीचा प्रश्नही सुटेल व देशाच्या प्रगतीला हातभार लागेल, असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता कराड यांनी व्यक्त केले.
त्या एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ४८ हून अधिक नामवंत कंपन्यासोबत सामंजस्य करार (एमओयू) कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी कंपन्यांच्या प्रतिनिधींसह  प्र.कुलगुरू डाॅ. मोहित दुबे, डाॅ. विरेंद्र शेटे, डाॅ.स्वाती मोरे, डाॅ.अतुल पाटील, डाॅ.सपना देव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा.डाॅ.कराड पुढे म्हणाल्या की, नवीन शैक्षणिक धोरणात(एनईपी) विद्यार्थ्यांमधील संशोधन व उद्योजकतेवर प्रामुख्याने भर देण्यात आलेला आहे. एनईपीची देशभरात घोषणा होण्यापूर्वीच एमआयटी एडीटी विद्यापीठाने संशोधन व उद्योजकतेवर भर देणाऱ्या अभ्यासक्रमांची अंमलबजावनी केलेली आहे. एआय सारख्या नवतंत्रज्ञान वर आधारीत कौर्सेसची माहिती देखील विद्यार्थ्यांना सातत्याने देण्यात येत असते. विद्यापीठाने यापूर्वीच टाटा मोटर्स, अँपल सारख्या कंपन्यांसोबत करार केलेले आहेत. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून यावर्षी ४८ हून कंपन्यांशी सामंजस्य करार करत आहोत. ज्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
यावेळी, प्रा.डाॅ. दुबे म्हणाले, सध्या देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना सोबतच सुशिक्षित बरोजगारांच्या संख्येतही भरमसाठ वाढ होत आहे. त्यामुळे, पारंपारिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. त्याच्याच एक प्रयत्न म्हणून आम्ही देशभरातील नामवंत कंपन्यांना सामंज्यस्यासाठी साद घातली, ज्याला ४८ हून अधिक कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे, विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाने यापूर्वीही अनेक उद्योजक घडविले असून आज केलेल्या करारामुळे त्यामध्ये निश्चितच मोठी भर पडेल.
दीपप्रज्वलन व विश्वशांती प्रार्थनेने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.दुबे यांनी तर आभार डाॅ.छबी चव्हाण यांनी मानले.

देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना:अमित शहा यांच्यासोबत रात्री बैठक

मुंबई–महाराष्ट्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू आहेत. भाजपला बहुमत असल्याने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. आता देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्ली येथे एका खासगी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे. रात्री साडे 10 वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत काही निर्णय होण्याची शक्यता आहे.

सरकार स्थापनेसाठी महायुतीकडून हालचाली करण्यात येत आहेत. दिल्लीत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होणार आहे. देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी दिल्ली रवाना झाले असून रात्री साडे 10 वाजता त्यांची अमित शहांसोबत बैठक होणार असल्याचे माहिती आहे. फडणवीसांपाठोपाठ अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या बैठकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

पुणेकर ग्राहकांची पारंपरिक तसेच आधुनिक मूल्यवर्धित दुग्धजन्य उत्पादनांना पसंती –

 गोदरेज जर्सीच्या मिल्क रिपोर्टमधील माहिती

·  उत्पादनांच्या यादीत 81% गायीचे तूप आणि 80% लोणी हे पदार्थ अव्वल

पुणे, 25 नोव्हेंबर, 2024: नॅशनल मिल्क डे च्या निमित्ताने सादर झालेल्या गोदरेज जर्सीच्या समग्र मिल्क रिपोर्टमधून पुणेकरांची पारंपरिक तसेच आधुनिक मूल्यवर्धित दुग्धजन्य उत्पादनांविषयीची मजबूत आवड समोर आली आहे.

पारंपरिक दुग्धजन्य उत्पादने पुण्याच्या बाजारपेठेत वर्चस्व गाजवत असून, 81% पसंतीसह तूप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे, तर त्यापाठोपाठ 80% पसंती लोणी या दुग्धजन्य पदार्थाला आहे. अहवालातील आकडेवारीनुसार, पुणेकरांची पारंपरिक दुग्धजन्य उत्पादनांशी असलेली घट्ट नाळ कायम असून, पनीर आणि दही यांना 77% ग्राहक पसंती मिळाली आहे. आधुनिक दुग्धजन्य उत्पादनेही स्वीकारली जात आहेत. 52% ग्राहक आपल्या आहारात योगर्टचा समावेश करतात, तर 46% ग्राहकांना फ्लेवर्ड दूध आवडते.

‘बॉटम्स अप… इंडिया सेज चिअर्स टू मिल्क!’ या नावाने प्रकाशित झालेल्या या सविस्तर अहवालात दिल्ली, लखनौ, मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता येथील ग्राहकांच्या प्रतिक्रियांवर आधारित माहिती दिली आहे. ग्राहकांच्या दुग्धजन्य उत्पादनांबाबतच्या आवडींसह, शेतातून थेट घरापर्यंत पोहोचणाऱ्या प्रीमियम दुधासाठीची गुणवत्तेची आवड आणि त्यासाठी खर्च करण्याची तयारी यांचाही अभ्यास या सर्वेक्षणातून करण्यात आला.

दुग्धजन्य उत्पादनांविषयीच्या या अनोख्या आवडीवर भाष्य करताना गोदरेज जर्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र सूरी म्हणाले, “भारतीय ग्राहक पारंपरिक आवडींशी नाळ जोडून ठेवत आधुनिक दुग्धजन्य उत्पादनांबद्दलही खुलेपणाने विचार करतात. दही, पनीर आणि तूप यांसारख्या पारंपरिक आवडत्या उत्पादनांपासून योगर्ट आणि फ्लेवर्ड दूध यांसारख्या नव्या पर्यायांपर्यंत, आजचे दुग्धजन्य पदार्थांचे ग्राहक गुणवत्तेच्या आणि पोषणमूल्यांच्या बाबतीत जागरूक  आहेत. भारताचे दुग्धजन्य पदार्थांचे उद्योगक्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत असताना, ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि पसंती समजून घेऊन त्यांना योग्य उत्पादने देण्यास गोदरेज जर्सी कटिबद्ध आहे.”

भारतीय दुग्धजन्य उत्पादनांचे व्यापक चित्र पाहता गुणवत्तेवर स्पष्ट भर दिला जात असल्याचे दिसते. अहवालानुसार, अर्ध्याहून जास्त म्हणजे 54% भारतीय ग्राहक दुग्धजन्य उत्पादने खरेदी करताना गुणवत्तेला प्राधान्य देतात, तर पुण्यातील 64% ग्राहकांसाठी ही गुणवत्ता उच्च प्राधान्यक्रमावर आहे. दुग्धजन्य उत्पादनांत भेसळ नसावी याविषयीची जागरूकता वाढल्याने ग्राहक सुरक्षित आणि उच्च दर्जाच्या उत्पादनांसाठी जास्त किंमत देण्यास तयार असल्याचे दिसून येते.

या सर्वेक्षणाचे युगॉव्हने (YouGov) डिझाइन केले असून त्यांनीच ते राबविले आहे. गोदरेज जर्सी ब्रँडअंतर्गत उत्पादन विक्री करणाऱ्या गोदरेज ग्रुपच्या वैविध्यपूर्ण अन्न व कृषी व्यवसाय गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडची (GAVL) क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेड ही उपकंपनी आहे.

गुणवत्ता आणि पारदर्शकतेला प्रोत्साहन देत गोदरेज जर्सी भारताच्या दुग्धजन्य पदार्थांच्या उद्योगाच्या विकासात योगदान देत आहे. कंपनीच्या एकात्मिक पशुपालन आणि शाश्वत शेतीविषयक उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातील सर्वोत्तम पद्धतीचा अंगीकार करून उत्पन्न वाढवता येत आहे.

बांगर यांना आणण्यासाठी ‎मुख्यमंत्र्यांनी पाठवले विमान‎:हैदराबादहून मुंबईला रवाना

0

हैदराबाद-कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना‎ तातडीने मुंबईला येण्याचे आदेश मिळाले. ‎‎त्यांना घेऊन जाण्यासाठी ‎‎‎मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‎‎ यांनी हैदराबाद येथे खासगी ‎‎‎विमान पाठवले आहे.‎‎रविवारी सायंकाळी ते‎‎मुंबईकडे रवाना झाले‎‎ आहेत.‎मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‎‎यांचे विश्‍वासू आमदार‎म्हणून आमदार संतोष बांगर यांची ओळख‎आहे. विधानसभा ‎निवडणुकीत आमदार बांगर यांनी एकहाती‎ विजय मिळवला. हिंगोली येथे शनिवारी‎ मारहाणीमध्ये आमदार बांगर यांचे पुतणे गौरव‎ बांगर यांना पोटात गोळी लागली. गौरव‎ यांच्यावर हैदराबाद येथे रुग्णालयात उपचार‎सुरु आहेत. त्यांच्या देखभालीसाठी आमदार ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎बांगर यांच्यासह त्यांचे कुटुंबिय हैदराबाद येथे‎थांबले आहेत.

दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री‎एकनाथ शिंदे यांनी तातडीने त्यांना मुंबईत ‎पोहोचण्याचे आदेश दिले. त्यांना हैदराबाद‎येथून मुंबईला येण्यासाठी खासगी विमानही‎पाठविले. त्यामुळे दुपारी खासगी विमान‎हैदराबाद विमानतळावर पोहोचले. त्यानंतर‎सायंकाळीच आमदार बांगर मुंबईला रवाना‎झाले. त्यांना तातडीने मुंबईला येण्याचा आदेश‎मिळाल्यामुळे आमदार बांगर यांची‎ मंत्रीमंडळात वर्णी लागेल, अशी चर्चा सुरु‎ झाली आहे. मतमोजणीपुर्वीच आमदार बांगर‎यांचे भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले होते.‎

महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आता‎आमदारांना तातडीने मुंबईला बोलावले जात‎आहे. त्याच पार्श्वभूमीवर बांगर यांनाही मुंबईला ‎बोलावल्याने पुढील निर्णयाकडे हिंगोली‎ जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.‎

अमित शाह यांनी जाणून घेतली भाजप नेत्यांची मते: CM साठी एकनाथ शिंदेंचे सदस्य आग्रही

शपथविधीसाठी कुठल्याही मुदतीचे बंधन नाही

नवी दिल्ली- अमित शाह, जे.पी. नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री भाजपच्या कोअर कमिटीची बैठक दिल्लीत झाली. प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांनी निकालाची माहिती दिली. मुख्यमंत्रिपदावर कुणाची वर्णी लावायची याबाबत शाह यांनी मते जाणून घेतली. फडणवीसांशिवाय अन्य पर्याय कोण? यावरही विचारणा झाली. दोन्ही प्रभारींनी मात्र फडणवीसांसाठी आमदार आग्रही असल्याचे सांगितले. पण शिंदे व अजित पवारांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या, अशा सूचना शाह यांनी दिल्या. आता शिंदे, पवार व फडणवीस यांंच्यासह तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक होईल. त्यातील निर्णय दिल्लीला कळवला जाईल. सर्वसंमतीने नाव ठरत असेल तर अमित शाह लगेच मंजुरी देतील. पण मुख्यमंत्री भाजपचाच करण्यावर दिल्लीतील नेतेही आग्रही आहेत. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादीने अजित पवार यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्याची औपचारिकता रविवारी पूर्ण केली. मात्र भाजपचा नेता अजून ठरलेला नाही. तसेच मुख्यमंत्री कुणाचा? यावर अजूनही खल सुरूच आहे. प्रदेश भाजपमधून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आग्रह सुरू असून राष्ट्रवादीमधूनही त्यांच्या नावाला पसंती दिली जात आहे. मात्र शिवसेना अजूनही एकनाथ शिंदेंच्या नावावर अडून बसल्याचे समजते.

महायुतीतील एका बड्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, नवीन मुख्यमंत्री कोण याचा निर्णय दिल्लीत होईल. त्यातही भाजपचे सर्वाधिक आमदार असल्याने त्यांच्याच पक्षाकडे नेतृत्व जाण्याची जास्त शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शवल्याची माहिती आहे. पण एकनाथ शिंदे यांनी अजून आपली ‘ना हरकत’ कळवलेली नाही. किमान पुढील वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत तरी शिंदे यांनाच अजून काही दिवस तरी मुख्यमंत्रिपदी ठेवावे यासाठी शिवसेना आग्रही आहे. सायंकाळी झालेल्या नूतन आमदारांच्या बैठकीत बहुतांश नेत्यांनी शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी आग्रहपूर्वक मागणी केली.

विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपत आहे. तोपर्यंत शपथविधी झाला नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी चर्चा होत आहे. मात्र तसे काही होणार नसल्याचे विधिमंडळातील वरिष्ठ अधिकारी व नेत्यांचे म्हणणे आहे. २६ नोव्हेंबरपूर्वी फक्त १५ व्या विधानसभेची अधिसूचना निघणे आवश्यक असते. केंद्रीय निवडणूक अधिकारी व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे निकालाची अधिसूचना, नूतन आमदारांची यादी व राजपत्राची प्रत सादर केली आहे. राज्यपाल सोमवारपर्यंत त्याला मंजुरी देऊ शकतात. तेव्हापासून नवीन विधानसभा अस्तित्वात येईल. त्यानंतर पुढे शपथविधीसाठी कुठल्याही मुदतीचे बंधन नाही. परिणामी राष्ट्रपती राजवट लागणार नसल्याचे सांगण्यात आले.

विधान परिषदेच्या आणखी सहा जागा रिक्त:पुण्यातील कोणाकोणाची होणार नियुक्ती

या सहा जागा होणार रिक्त

कामठी- चंद्रशेखर बावनकुळे भाजप
जत – गोपीचंद पडळकर भाजप
लातूर ग्रामीण – रमेश कराड भाजप
नागपूर मध्य – प्रवीण दटके भाजप
अक्कलकुवा – आमश्या पाडवी शिवसेना
पाथरी – राजेश विटेकर राकाँपा

पुणे- महायुतीकडून ऑक्टोबर महिन्यात १२ पैकी ७ जणांची राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि पोहरादेवी येथील धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली. त्याचबरोबर शिंदे गटाच्या कोट्यातून माजी खासदार हेमंत पाटील आणि प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे तर अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवडी यांची वर्णी लावण्यात आली आहे.तेव्हा ५ जागा भरण्यात आल्या नाहीत त्या अजूनही रिक्तच आहेत . त्यानंतर आता पुन्हा आणखी सहा जागा रिक्त होत आहेत . या जागांवर सहा जणांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार आहे.यामध्ये आता एकूण रिक्त जागांमध्ये पुण्यातील कोणाकोणाची नियुक्ती होणार आहे याकडे लक्ष लागले असून दीपक मानकर, श्रीनाथ भिमाले यांच्यासह ,माजी खासदार संजय काकडे यांच्या सहमतीने एखाद्याला आमदारकी देण्याची अपेक्षा पुण्यातून केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांना सर्वाधिक मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिळवून दिली त्यानंतर आता कसब्याचा बालेकिल्ला देखील पुन्हा हस्तगत करून देण्यात मानकर यांचा सिंहाचा वाटा मानला जातो. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संजय काकडे यांच्या निवास स्थानी जाऊन भेट देऊन चर्चा केली होती . तर वडगाव शेरीचे माजी आमदार मुळीक यांनाही आश्वासन दिले होते .

विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. या निकालानंतर विधान परिषदेवर असलेल्या सहा आमदारांचाही विजय झाला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त झाल्या आहेत. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या सहा जागांवर नाराजांना संधी मिळणार आहे. त्यामुळे आता महायुतीतील सहा जणांना विधान परिषदेची लॉटरी लागणार असून, सत्ता स्थापनेनंतर विधान परिषदेवर वर्णी लागण्यासाठी नेत्यांमध्ये लॉबिंग होण्याची शक्यता आहे.

भाजपने चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रवीण दटके या विधान परिषदेतील ४ आमदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. हे चारही आमदार विधानसभेवर निवडून आले आहेत. भाजपच्या कोट्यातील चार जागा रिक्त झाल्या आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेकडून आमश्या पाडवी यांची ही विधानसभेवर वर्णी लागली आहे. त्यामुळे शिवसेनेची विधान परिषदेतील एक जागा रिक्त झाली आहे. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकर हे देखील विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाची जागा रिक्त झाली आहे.

विधानसभेत लाडक्या बहिणींची संख्या घटली, गेल्यावेळी होत्या २७ आता असतील २१ – विरोधी पक्षात तर एकच महिला आमदार

0


मुंबई-एकीकडे लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भावांना भरभरून मतदान केले असले तरी त्या स्वतः मात्र सत्तेपासून अलिप्त राहिल्याचे चित्र दिसून आले आहे महायुतीच्या विजयामध्ये लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे विधानसभेतील महिला आमदारांचे प्रमाण घटले आहे. यंदाच्या निवडणुकीत २१ महिला निवडून आल्या आहेत. यामध्ये १० विद्यमान महिला आमदारांचा समावेश आहे. २८८ सदस्यांच्या मागील विधानसभेत २७ महिला आमदार म्हणजेच फक्त ९.५ टक्के महिला आमदार होत्या. या वेळी २१ महिला उमेदवार जिंकल्याने ही टक्केवारी ७.५ टक्क्यांवर आली आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील काँग्रेसच्या ज्योती गायकवाड या एकमेव महिला आमदार आहेत.यंदा विधानसभेच्या निवडणुकीत ४ हजार १३६ उमेदवार रिंगणात होते. त्यात पुरुष उमेदवारांची संख्या ३७७१, तर महिला उमेदवारांची संख्या ३६३ होती. निवडणुकीत तब्बल ३ कोटी ३ लाख महिलांनी मतदानात सहभाग घेतला. निवडणुकीच्या निकालानंतर २२ महिला आमदार विजयी झाल्या आहेत. त्यामध्ये निवडणुकीत १२ विद्यमान महिला आमदांरापैकी १० महिला पुन्हा निवडून आल्या आहेत, तर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि गीता जैन या दोन महिला आमदारांचा पराभव झाला आहे. नव्या पंधराव्या विधानसभेत १२ नवीन महिला असणार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरे गटातून एकही महिला आमदार विजयी झालेल्या नाहीत.

यंदाच्या निवडणुकीत भाजपने १८, शिंदे शिवसेनेकडून ८, अजित पवारच्या राष्ट्रवादीने ४ अशा ३१ महिलांना उमेदवारी दिली होती. त्यामध्ये १२ विद्यमान आमदारांचा समावेश होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ११, काँग्रेसने ९, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १० अशा महाविकास आघाडीने ३० महिलांना संधी दिली होती. त्यामध्ये २ विद्यमान आमदार होत्या. म्हणजेच महायुती व मविआच्या ६० आमदारांमध्ये १२ विद्यमान आमदारांचा समावेश होता. तसेच इतर अपक्ष महिला उमेदवार रिंगणात उतरल्या होत्या. २०१९ मध्ये भाजपने १२ महिला उमेदवारांना संधी दिली होती.

या आहेत राज्यातील नवीन २१ महिला आमदार

भाजप

श्वेता महाले (चिखली)
मेघना बोर्डीकार (जिंतूर)
देवयानी फरांदे (नाशिक मध्य)
सीमा हिरे (नाशिक पश्चिम)
मंदा म्हात्रे (बेलापूर)
मनीषा चौधरी (दहिसर)
विद्या ठाकूर (गोरेगाव)
माधुरी मिसाळ (पर्वती)
मोनिका राजळे (शेवगाव)
नमिता मुंदडा (केज)
श्रीजया चव्हाण (भोकर)
सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व)
स्नेहा पंडित (वसई)
अनुराधा चव्हाण (फुलंब्री)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार

सुलभा खोडके (अमरावती)
सरोज अहिरे (देवळाली)
अदिती तटकरे (श्रीवर्धन)
ज्योती गायकवाड (धारावी)
सना मलिक (अनुशक्तीनगर)
शिवसेना शिंदे गट

मंजुळा गावित (साक्री)
संजना जाधव (कन्नड)
भाजपच्या ४ नवीन महिला आमदार
श्रीजया चव्हाण (भोकर), सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व), स्नेहा पंडित (वसई), अनुराधा चव्हाण (फुलंब्री) भाजप, शिवसेनेच्या मंजुळा गावित (साक्री )आणि संजना जाधव (कन्नड) या दोन महिला विजयी झाल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सुलभा खोडके (अमरावती), सरोज अहिरे (देवळाली), सना मलिक (अनुशक्तीनगर) आणि अदिती तटकरे (श्रीवर्धन) या महिला विजयी झाल्या आहेत.


व्यावसायिक संधींचा शोधक नजरेने वेध घ्यावा : डॉ. संजय रुणवाल

जितो, पुणे चॅप्टरच्या वतीने बी टू बी उपक्रमाअंतर्गत संवादात्मक व्याख्यानाचे आयोजन
पुणे : व्यवसायाची धोरणे आखताना अंधानुकरण टाळावे, सुयोग्य प्रणालीचा वापर करावा, बदल स्वीकारण्याची तयारी ठेवावी, नवनवीन व्यावसायिक संधींचा शोधक नजरेने वेध घ्यावा, दूरदृष्टी असावी, व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करावे, ध्येय निश्चित करावे, नितीमूल्ये सांभाळावीत, अशा मौलिक सूचना व्यवसाय रणनीतिकार, मानवशास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक, वक्ता आणि लेखक डॉ. संजय रुणवाल यांनी केल्या. अनुकरण, नाविन्य या व्यतिरिक्त युवा पिढीने व्यवसाय वृद्धीसाठी नाविन्यपूर्ण अनुकरणाची कास धरावी अशी अभ्यासपूर्ण मांडणीही त्यांनी उलगडून दाखविली.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) पुणे विभागाच्या वतीने बी टू बी या उपक्रमाअंतर्गत डॉ. संजय रुणवाल यांचे ‌‘व्यवसाय सुरळीतपणे कसा चालवावा‌’ या विषयावर महावीर प्रतिष्ठान, सॅलिसबरी पार्क येथे संवादात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. चेअरमन इंद्रकुमार छाजेड, चिफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, जयेश फुलपगर, अमोल कुचेरिया, आनंद चोरडिया, संजय राठोड, वनिता मेहता, राहुल मुथा, सुमित जैन आदींच्या उपस्थितीत डॉ. रुणवाल यांचा जितो पुणे चॅप्टरच्या वतीने सुरुवातीस सन्मान करण्यात आला.
पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या छोट्या व्यावसायिकांची परिस्थिती आज काय आहे या विषयी भाष्य करताना डॉ. रुणवाल म्हणाले, शहरांचे विस्तारिकरण होत असतानाच लघु व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याच बरोबरीने ऑनलाईन व्यवसायाने आपले जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. अशा परिस्थितीत व्यवसायातील नफ्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. काळाची पावले ओळखून परंपरागत व्यवसाय पुढे नेत असताना युवा पिढीच्या कल्पनांना वाव देत, त्यांच्यावर विश्वास ठेवत जुन्या पिढीतील व्यावसायिकांनी बदल घडविण्याची मानसिकता स्वीकारली पाहिजे. व्यवसायात सतत बदल न करता आपण करत असलेला व्यवसाय कुठल्या उंचीपर्यंत नेऊ शकतो याची दूरदृष्टी विकसित करणे त्याच्या जोडीला धोरणात्मक व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.
धोरणात्मक विचार, धोरणात्मक नेतृत्व, स्पर्धात्मक धोरण, धोरणात्मक अंमलबजावणी आणि धोरणात्मक व्यावसायिक जोखीम घेण्याची तयारी, या मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर मांडणी केली. व्यवसायात यश प्राप्त करण्यासाठी आपल्यातील क्षमता ओळखा, नवनवीन संधींचा अभ्यास करा, त्याच प्रमाणे आपल्यातील कमतरता आणि व्यवसायातील जोखीम याचा विचार होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात चेअरमन इंद्रकुमार छाजेड म्हणाले, देशाच्या प्रगतीत व्यावसासियांचा मोठा वाटा आहे. बदलत्या काळानुसार व्यावसायिकांनाही आपल्या धोरणांमध्ये योग्य ते बदल करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने डॉ. संजय रुणवाल यांचे संवादात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. रुणवाल यांचा परिचय जयेश फुलपगर यांनी करून दिला तर सूत्रसंचालन अमोल कुचेरिया यांनी केले. दिनेश ओसवाल यांनी जितो चॅप्टरच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती सांगितली.

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने (NCH) ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी 1000 हून अधिक कंपन्यांसोबत केली भागीदारी

0

हेल्पलाइनमध्ये परिवर्तनशील बदल आणि तांत्रिक श्रेणीत सुधारणा यामुळे कॉल हँडलिंग सुविधेत होत आहे उल्लेखनीय वाढ

मुंबई-

एका महत्त्वपूर्ण घडामोडीनुसार, राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) ने तक्रारींचे जलद गतीने निराकरण करण्यासाठी आपल्या अभिसरण कार्यक्रमांतर्गत 1000 हून अधिक कंपन्यांशी भागीदारी केली आहे. या कंपन्या ई-कॉमर्स, प्रवास आणि पर्यटन, खाजगी शिक्षण, FMCG, ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, किरकोळ वस्तू विक्री दुकाने, वाहन उद्योग, डी टी एच आणि केबल सेवा तसेच बँकिंग यासह प्रमुख क्षेत्रांच्या माध्यमातून हे उद्योग कार्यरत आहेत. या अभिसरण कंपन्यांशी संबंधित तक्रारी ऑनलाइन निराकरणासाठी थेट त्यांच्याकडे हस्तांतरित केल्या जातात.

अभिसरण भागीदारांच्या संख्येत 2017 मधील 263 कंपन्यांवरून आतापर्यंत 1009 कंपन्यांपर्यंत वाढ झाली आहे. हेल्पलाइनची कार्यक्षमता वाढवण्यात, तक्रारींचे जलद आणि प्रभावी निवारण आणि पारदर्शकता तसेच जबाबदारीला प्रोत्साहन देण्यासाठी या भागीदारांची भूमिका या वाढीच्या माध्यमातून स्पष्ट होते. ग्राहकांचा अधिक विश्वास वाढीला लागण्याच्या उद्देशाने ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण  दावा दाखल होण्याच्या आधीच्या टप्प्यातच केले केले जाईल हे भागीदार सुनिश्चित करतात. मात्र, एखाद्या तक्रारीचे निराकरण न झाल्यास, ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत ग्राहकांना योग्य ग्राहक आयोगाकडे जाण्यास प्रोत्साहित केले जाते.

भारत सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग (DoCA), तक्रार निवारण प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी प्राप्त झालेल्या तक्रारींच्या संकलित माहितीचे नियमितपणे निरीक्षण करतो. चालू आर्थिक वर्षात (2024-25) सर्वाधिक तक्रारी प्राप्त केलेल्या सर्वोच्च दहा अभिसरण मुक्त कंपन्यांबाबत माहिती नुकतीच विभागाने जाणून घेतली आहे. या कंपन्यांमध्ये डेल्हीवरी लिमिटेड, इलेक्ट्रोनिक्स कॉम्प डॉट कॉम, डॉमिनोज पिझ्झा, हेयर अप्लायन्सेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, फर्स्टक्राय डॉट कॉम, थॉमसन इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा रॅपिडो ओरिएंट इलेक्ट्रिक लिमिटेड आणि सिंफनी लिमिटेड या कंपन्यांसोबत चर्चा करण्यासाठी आणि चालू असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच अभिसरण भागीदार म्हणून त्यांना सामोर आणण्यासाठी.येत्या आठवड्यात  एक बैठक नियोजित आहे.

NCH च्या तांत्रिक परिवर्तनामुळे त्याच्या कॉल-हँडलिंग क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. NCH द्वारे प्राप्त झालेल्या कॉल्सची संख्या जानेवारी 2015 मधील 14,795 कॉल्सवरून जानेवारी 2024 मध्ये 1,41,817 कॉल्सवर म्हणजे जवळपास दहापट वाढली आहे. ही उल्लेखनीय वाढ ग्राहकांचा त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी हेल्पलाइन वापरण्याबाबत वाढत असलेला आत्मविश्वास प्रतिबिंबित करते. दरमहा नोंदवलेल्या तक्रारींची सरासरी संख्या 2017 मधील 37,062 वरून 2024 मध्ये 1,12,468 वर पोहोचली आहे. ग्राहक तक्रार निवारण प्रणाली अधिक विकसित करण्यासाठी `एनसीएच` आपल्या `एनसीएच 2.0` उपक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता – एआय-आधारित भाषण ओळख प्रणाली, भाषांतर प्रणाली, आणि बहुभाषिक `चॅटबॉट` सादर करण्याच्या प्रक्रियेत आहे. या तांत्रिक सुधारणा तक्रार नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, कार्यक्षम, आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या उद्देशाने केल्या जात आहेत.

एआय-सक्षम भाषण ओळख आणि भाषांतर प्रणाली ग्राहकांना त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये आवाजाद्वारे तक्रारी नोंदवण्याची सुविधा देईल. याद्वारे यातील हस्तक्षेप कमी होईल. बहुभाषिक `चॅटबॉट` तक्रार निवारण प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित करेल, प्रत्यक्ष वेळेत सहाय्य पुरवेल,  माहिती नोंदणीतील त्रुटी कमी करेल, आणि ग्राहकांच्या एकूण अनुभवात सुधारणा करेल.

या सुधारणा सर्व भाषिक पार्श्वभूमी असलेल्या ग्राहकांना तक्रार निवारण प्रणालीत समान प्रवेश सुनिश्चित करतील. ग्राहक व्यवहार विभाग तक्रार निवारण प्रक्रियेला त्रासमुक्त, जलद, आणि कमी खर्चिक बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. एनसीएच 2.0 अंतर्गत निर्मितीक्षम एआय, भाषण ओळख, भाषांतर, आणि `चॅटबॉट` तंत्रज्ञानाचा समावेश, न्यायालयात तक्रार दाखल करण्यापूर्वीच्या टप्प्यात ग्राहक संरक्षण सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल.

ग्राहक तक्रारींसाठी राष्ट्रीय ग्राहक मदत वाहिनीची (एनसीएच) पुनर्रचना करण्यात आली आहे. यामुळे देशभरातील ग्राहकांसाठी न्यायालयात तक्रार दाखल करण्यापूर्वीच्या टप्प्यात तक्रार निवारणासाठी एक मुख्य प्रवेशबिंदू उपलब्ध झाला आहे. ही मदत वाहिनी 17 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये मराठीसह हिंदी, इंग्रजी, काश्मीरी, पंजाबी, नेपाळी, गुजराती, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम, मैथिली, संथाली, बंगाली, ओडिया, आसामी आणि मणिपुरी या भाषांचा समावेश आहे. ग्राहक 1915  या खुल्या क्रमांकावर तक्रारी नोंदवू शकतात.

तक्रारींना एकात्मिक तक्रार निवारण प्रणाली(आयएनजीआरएएम) पोर्टलद्वारेही नोंदवता येते. यात व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएस, ईमेल, एनसीएच अ‍ॅप, वेब पोर्टल आणि उमंग अ‍ॅप यांसारख्या विविध चॅनेलद्वारे तक्रारी नोंदवण्याची सुविधा आहे.

तक्रारी प्राप्त झाल्यावर `एनसीएच` निवारणासाठी त्यांना संबंधित कंपनी, नियामक संस्था, किंवा शासकीय विभागांकडे पाठवते.

***

लष्कर दिन संचलन 2025 ची एक झलक: 55 व्या इफ्फीमध्ये प्रोमोचे अनावरण


पुणे शहराकडे प्रथमच प्रतिष्ठित लष्कर दिन संचलनाचे यजमानपद

#IFFIWood, 24 नोव्‍हेंबर 2024

पुणे, आपल्या समृद्ध लष्करी वारशासाठी प्रसिद्ध असलेले शहर, 15 जानेवारी 2025 रोजी प्रथमच प्रतिष्ठित लष्कर दिन संचलनाचे यजमानपद सांभाळण्यास सज्ज झाले आहे. पुण्याच्या लष्करी इतिहासातील हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. 

भारतीय लष्कराने सध्या सुरू असलेल्या गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) दरम्यान या आगामी संचलनासाठी प्रमोशनल व्हिडिओचे अनावरण आज केले.  याला सिनेफिल्स, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि उद्योग जगतातील नेत्यांकडून उत्साही प्रतिसाद मिळाला.

भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांची 1949 मध्ये झालेली नियुक्ती, जे भारताच्या स्वातंत्र्योत्तर लष्करी नेतृत्वाचे प्रतीक आहे, याच्या स्मरणार्थ हे लष्कर दिन संचलन आयोजित केले जाते. पारंपरिकरीत्या दिल्लीमध्ये होणारे हे संचलन 2023 पासून वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरण्यास आरंभ झाला , सुरुवात बेंगळुरूपासून झाली, त्यानंतर 2024 मध्ये लखनौमध्ये आयोजन झाले. 2025 च्या संचलनासाठी झालेली पुण्याची निवड. या शहराचे सशस्त्र दलांशी असलेले ऐतिहासिक संबंध आणि भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे मुख्यालय म्हणून असलेली भूमिका अधोरेखित करते.  

या वर्षीचे संचलन बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप आणि सेंटर येथे होणार आहे, ज्यामध्ये मार्चिंग दल, यांत्रिक स्तंभ आणि तांत्रिक प्रदर्शने असतील. ड्रोन आणि रोबोटिक्स सारख्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांसह, लढाऊ प्रात्यक्षिके आणि मार्शल आर्ट्स डिस्प्ले यासारख्या आकर्षक कामगिरीचा समावेश यावर यात भर असेल. 

संचलनाच्या आधी, जानेवारीच्या सुरुवातीला पुणे येथे आयोजित “तुमच्या सैन्याला जाणून घ्या” या प्रदर्शनासारख्या कार्यक्रमांमुळे नागरिकांना प्रगत शस्त्रास्त्रांचे अवलोकन करता येईल आणि देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांशी संवाद साधता येईल. असे उपक्रम सर्वसमावेशकता आणि एकतेवर भर देतात, ज्यामुळे लष्कर दिन संचलन हा केवळ एक औपचारिक प्रसंग न राहता धैर्य, समर्पण आणि तांत्रिक प्रगतीचा राष्ट्रीय उत्सव बनतो.

विविध शहरांमध्ये लष्कर दिन संचलन फिरल्याने भारतीय सैन्याचे देशभरातील नागरिकांशी असलेले संबंध अधिक दृढ होतात. हा उपक्रम उत्सवाचे विकेंद्रीकरण करतो, स्थानिक समुदायांना थेट सशस्त्र दलांशी संलग्न होण्याची संधी प्रदान करतो.

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावे – दीपक केसरकर:म्हणाले- ही निवडणूक शिंदेंच्याच नेतृत्वात पार पडली, कौलही चांगला मिळाला

मुंबई–महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेचे जनमत दिले आहे. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्याकडूनही अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी मागणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अशातच आता यावर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनीही यावर आता दुसऱ्यांदा भाष्य केले आहे.केसरकर म्हणाले की, ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवली गेली आहे. या निवडणुकीत जनतेनेही चांगला कौल दिलेला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आम्ही नेहमीच विचार करतो की, एकनाथ शिंदे यांना प्रथम प्राधान्य द्यायला हवे. तसेच, आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर जेवढे प्रेम करतो, तेवढेच प्रेम आणि विश्वास आमचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांची जोडी आहे. हे बघा, या जोडीने काय चमत्कार करून दाखवला. अजितदादा हे नंतर सहभागी झाले. त्यामुळे अजितदादांनाही याचे क्रेडिट आहे. पण हे दोघे पहिल्यापासूनच सोबत चालत आहेत. ही जोडी कायम राहील आणि त्यांना देवाचाही आशीर्वाद आहे.

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार:1 CM, 2 DCM फॉर्म्युला; उद्या शपथविधी शक्य

पुणे-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात युतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला ठरला आहे. त्याचवेळी महायुतीच्या पक्षांमध्ये प्रत्येक 6-7 आमदारांमागे एक मंत्रीपदाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. त्यानुसार भाजपचे 22-24, शिंदे गटाचे 10-12 आणि अजित गटाचे 8-10 आमदार मंत्री होऊ शकतात.महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही.विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे, त्यामुळे त्यापूर्वी सरकार स्थापन करावे लागेल. तसे न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर उद्या मुंबईतील राजभवनात शपथविधी सोहळा होऊ शकतो. सीएम शिंदे यांनी विजयानंतर सांगितले होते की, ज्याच्या जास्त जागा असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे निवडणुकीपूर्वी ठरले नव्हते.देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार रविवारी रात्री सरकारचा चेहरा अर्थात मुख्यमंत्र्यांचे नाव ठरवण्यासाठी दिल्लीला रवाना होतील. भाजप हायकमांडसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

या निवडणुकीत सहा मोठ्या पक्षांच्या दोन आघाड्यांमध्ये लढत होती. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांचा समावेश आहे, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांचा समावेश आहे.149 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या आहेत. युतीने 288 पैकी विक्रमी 230 जागा जिंकल्या. भाजपचा स्ट्राइक रेट 88% होता. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला (MVA) 46 जागा मिळाल्या.

अनिकेत पटवर्धन यांनी विजयाचे शिल्पकार, समर्थ नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

फडणवीस यांनीही महायुती समन्वयक म्हणून अनिकेतचेही केले अभिनंदन

मुख्यमंत्री पदासाठी दिल्या शुभेच्छा

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आणि कोकणातील महायुतीचे समन्वयक अनिकेत पटवर्धन यांनी भाजप नेते देवेंद्रजी फडणवीस यांची सागर बंगला येथे भेट घेतली. महायुतीच्या विजयाबद्दल आभार मानले आणि अभिनंदन करून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्रजीना शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरीतील युवा नेते तसेच मंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक असलेले अनिकेत पटवर्धन यांनी आज श्री. फडणवीस यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने 233 जागा जिंकून प्रचंड यश मिळवले. या यशाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे आज त्यांची भेट घेतली.

अनिकेत पटवर्धन यांनी पडद्याआड राहून सूत्रे हलवली. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, भिवंडी जिल्ह्याचे महायुतीचे समन्वयक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. कोकणामध्ये महायुती टिकवण्यासाठी महायुतीचा समन्वयक म्हणून कामगिरी केली. रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि चिपळूण या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होण्यामागे समन्वयक अनिकेत पटवर्धन यांचा सिंहाचा आणि मोलाचा वाटा होता, हे नाकारून चालणार नाही.

युती अभेद्य ठेवणे व पार्टीच्या कार्यकर्त्यांना एकसंध ठेवणे, रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाचा आणि पार्टीच्या विचारधारेबरोबर सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवणे, महायुती म्हणून मतदान करण्याच्या दृष्टीने संपूर्ण ताकद आणि व्यूहरचना आखली. तसेच या लोकसभा आणि आता विधानसभा विजयामध्ये चांगल्या पद्धतीने अनिकेत पटवर्धन यांनी संयमी व उत्तमरित्या जी भूमिका बजावली, त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

पडद्यामागे राहून भारतीय जनता पार्टी एकसंधपणे टिकण्यासाठी व सगळ्या नेत्यांना एकत्रित ठेवणे व कार्यकर्त्यांना रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर फोनवर संपर्क साधून देणे व त्या त्या ठिकाणी भेटीगाठी करून देणे ही फार उत्तमपणे जबाबदारी पार पाडली. याबद्दल अनिकेत पटवर्धन यांच्यावर सर्व महायुतीच्या नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी पुढील २५ वर्ष अनिकेत पटवर्धन काम करेल. रवींद्र चव्हाण यांच्यासारखी भारतीय जनता पार्टी पुढे चालवतील, अशी आशा कार्यकर्त्यांच्या मनात निश्चितच आता तयार होईल. अनिकेत पटवर्धन यांचे केंद्रीय नेतृत्वाशी असलेले संबंध, राज्यातील असलेले संबंध व रत्नागिरी व इतर अनेक जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये कार्यकर्ता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणून देवेंद्रजी व रवींद्र चव्हाण यांनी अनिकेत पटवर्धन यांचे कौतुक केले.

कोकणातलं भविष्यातलं एक चांगलं नेतृत्व म्हणून रवींद्र चव्हाण व देवेंद्रजींनी एक चांगला हिरा शोधलाय, असं म्हणायला हरकत नाही. तसेच चाणक्य नीति काय असू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण, कोणत्याही फोटोची अपेक्षा नाही, कोणतताही बडेजाव न करता पडद्याच्या मागे राहून शांतपणे संयमीपणे सगळं काम कशा पद्धतीने करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून अनिकेत पटवर्धन यांच्याकडे पाहिलं जातंय. देवेंद्रजींनी तसेच रवींद्र चव्हाण यांनी दाखवलेल्या विश्वासास अनिकेत पटवर्धन पात्र ठरतील, असं रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते म्हणत आहेत.

कुठे गेला धंगेकर ..इथे फक्त मानकर .. कसब्याचा बालेकिल्ला पुन्हा मिळवून देण्यात मानकरांचे मोठे योगदान

पुणे : दोन वर्षापूर्वी भाजपकडून कसब्याचा बालेकिल्ला कॉंग्रेसने काढून घेऊन हस्तगत केला होता . तेव्हा धंगेकर यांच्या रूपाने कसब्यावर कॉंग्रेसचा झेंडा फडकला . त्यामागे अनेकांचे मोठे योगदान होते त्या नावात आघाडीवर असणारे नाव होते दीपक मानकर यांचे .. त्यानंतर रमेश बागवे , बाळासाहेब दाभेकर अशी अनेक नावे होती जी तेव्हा धंगेकर यांच्या पाठीशी होती आणि या ताकदीमुळे भाजपने वर्षानुवर्षे कसब्याचा बालेकिल्ला ढासळला तेव्हा हेमंत रासने यांचा पराभव झाला आणि कॉंग्रेसचे धंगेकर विजयी झाले.राजकीय इतिहासात हा बालेकिल्ला कॉंग्रेसने मिळविल्याची हि नोंद राहील. पण दरम्यानच्या काळात परिस्थिती बदलली अजित पवार हे शरद पवारांपासून अलिप्त झाले आणि अजित पवारांच्या समवेत दीपक मानकर राहिले .आणि त्यांच्या समवेत ते भाजपा सेनेच्या महायुतीत सहभागी झाले. कसब्याचा बालेकिल्ला पुन्हा भाजपला तात्काळ त्याच पराभूत उमेदवाराच्या चेहऱ्याने मिळवून देण्यात अजित पवार गटाची अर्थात या गटाचे शहर अध्यक्ष असलेले दीपक मानकर यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. विधान परिषदेच्या नेमणुकांच्या वरून मानकर नाराज होते पण अजित दादांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि पुढच्या खेपेला नाकी तुमच्या कामाचे योगदानाचे चीज करण्याचा सर्वप्रथम प्रयत्न करेल असे आश्वासन दिले .यंदाच्या विधानसभेला काही प्रमाणात धंगेकर पुन्हा एकदा निवडून येतील असं म्हटलं जाऊ लागले होतं, पण त्याची परवा न करता मानकर यांनी कसब्या बरोबर सर्वच मतदार संघातून महायुतीला ताकद द्यायचे काम सुरु ठेवले. मिटिंग , सभा , बैठका, प्रचार फेऱ्या यांच्या आयोजनाबरोबर जिथे आपण कमी आहोत तिथे जास्त लक्ष देण्यासाठी विशेष श्रम घेतले आणि व्हायचे ते झाले कसबा विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना रविंद्र धंगेकरांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि त्यांच्या कुटुंबावर वैयक्तिक टीकाटिप्पणी केली, इथेच धंगेकर जाळ्यात फसले, आणि निवडणुकीची दिशा स्पष्ट झाली .पक्ष पातळीवर असणारी निवडणूक वैयक्तिक पातळीवर गेल्याने कसब्यात मोठ्या संख्येने असणाऱ्या मानकर समर्थकांनी त्यास उत्तर म्हणून हेमंत रासने यांच्या समर्थनार्थ मोहीम सुरू केली .भाजपचे शहर सरचिटणीस राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी रवींद्र धंगेकर यांचे नाव टाळून सोशल मीडियावरून दिलेल्या इशाऱ्याने मानकर समर्थकांत हवा तो संदेश गेला आणि आधीच महायुती म्हणून एकत्र असलेला मानकर गट अधिक कार्यरत झाला.शेवटच्या टप्प्यात बाप्पू मानकरांनी आपली वेगळी यंत्रणा कार्यरत करत गेल्या वेळी अपेक्षित मताधिक्य न मिळालेल्या सदाशिव पेठ, नारायण पेठ परिसर येथे ताकद लावली आणि हेमंत रासने यांच्या विजयात मोठा वाटा उचलला. दीपक मानकर यांचा कसब्यात असलेला समर्थक आणि बाप्पू मानकर यांची प्रचार यंत्रणा यामुळे हेमंत रासनेंच लीड अधिकच वाढले असल्याचे मतदानाच्या आकडेवारीत दिसून आले

विधानसभा निवडणुकीमध्ये त्सुमानी आल्याचं पाहायला मिळाला. महायुतीने २०० पेक्षा जास्त जिंकत निर्विवाद बहुमत मिळविले . तर पुण्यामध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील सर्वांचं लक्ष लागून असलेल्या कसबा पेठ मतदारसंघातही काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. रवींद्र धंगेकरांचा पराभव करून भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी १९ हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळवला.. कसबामध्ये मानकर समर्थकांनी केलेल्या प्रचाराची जोरदार चर्चा रंगली आहे. धंगेकर यांना निवडणुकीआधी धंगेकर यांनी मानकर यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याचा मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे.