Home Blog Page 643

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. १५: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ प्रक्रिया पारदर्शक, निर्भय वातावरणात आणि सुलभ, सहजतेने पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज असून राजकीय पक्षांनीही निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे, असे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध होणार असून त्या दिवसापासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात होणार आहे. नामनिर्देशन दाखल करण्याचा अखेरचा दिवस २९ ऑक्टोबर असून ३० ऑक्टोबर रोजी छाननी होणार आहे. ४ नोव्हेंबर हा उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक असून त्या दिवशी निवडणूक लढविणारे उमेदवार निश्चित होतील. मतदान २० नोव्हेंबर तर मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

ते पुढे म्हणाले, मतदारांना मतदान करण्याचा अनुभव आनंददायी सुखदायी सुलभ व्हावा यावर भारत निवडणूक आयोगाने भर दिलेला असून त्यानुसार जिल्हा निवडणूक प्रशासन काटेकोर काम करेल. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, रॅम्प, ज्येष्ठ मतदार, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर आदी किमान सुविधा करण्यात येणार असून ५ किंवा त्यापेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी रांगांचे व्यवस्थापन, सावलीसाठी मंडप, महिला मतदार, अंध आणि ज्येष्ठ मतदारांसाठी स्वतंत्र रांगा, बालकांसाठी पाळणाघर, वैद्यकीय सुविधा आदी अधिकच्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

मतदार नोंदणीसाठी १९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची संधी
जिल्ह्यात २१ मतदार संघात एकूण ८७ लाख ५७ हजार ४२६ मतदार असून अजूनही नामनिर्देशन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापूर्वी १० दिवसांपर्यंत म्हणजेच १९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज क्रमांक ६ भरून मतदार नोंदणीची संधी आहे. त्यामुळे उर्वरित पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी, त्यासाठी राजकीय पक्षांनीही आवाहन करावे. जिल्ह्यात ८ हजार ४१७ मतदार केंद्रे असून त्यात ५० ते ६० सहाय्यकारी मतदान केंद्रांची वाढ होऊ शकते, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी आदर्श आचारसंहिता, फिरती सर्वेक्षण पथके (एफएसटी) आणि स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी), निवडणुकीतील पैशाचा वापर, अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू यांची जप्ती यासाठीची यंत्रणा, निवडणूक प्रचारासाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणीकरण, निवडणुकीसाठी केलेल्या व्हीएचए, सी- व्हिजिल, केवायसी, सुविधा पोर्टल आदी संगणकीय व्यवस्था, उपयोजके (एप्लिकेशन्स), महिला, दिव्यांग, युवा संचलित, संकल्पना आधारित विशेष मतदान केंद्रे, आदर्श मतदान केंद्रे आदीबाबत माहिती दिली.

पीएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना मिळणार सानुग्रह अनुदान

पुणे / पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत कायम आस्थापनेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर निर्णय झाला असून संबंधित कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न यातून होणार आहे.

पीएमआरडीएच्या कायम आस्थापनेवरील सन २०२३-२०२४ या वित्तीय वर्षात कार्यरत असणाऱ्या गट क आणि ड मधील कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याच्या अनुषंगाने २४ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या प्राधिकरण सभेत मान्यता घेण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त प्रती कर्मचारी २८ हजार ८७५ रुपये सानुग्रह अनुदान म्हणून अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मान्यतेने प्रशासन विभागाचे सह-आयुक्त सुनील पांढरे यांनी यासंबंधी 14 ऑक्टोबर २०२४ रोजी आदेश काढत लेखा वित्त विभागाला कळवले आहेत.

दीपक मानकर समर्थकांचे राजीनामे-अजितदादा गटात असंतोष

पुणे, – राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली नाही. त्यावर पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सामूहिक राजीनामा दिला आहे.
त्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हे सर्व राजीनामे पाठविण्यात आले आहेत.
राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे केली होती.
मानकर यांच्यामुळे शहरात पक्ष मजबूत झाला. तरीही त्यांना विधान परिषदेवर संधी न देता अन्याय करण्यात आला आहे.
त्यामुळे पक्षाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अजित पवार यांचा ठोस शब्द मिळत नाही, तोपर्यंत आम्ही महायुतीचे काम करणार नसल्याचा पवित्रा घेत शहर, विधानसभा, विविध सेलचे पदाधिकारी यांनी राजीनामा दिला.
त्यामध्ये शहर उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, संतोष नांगरे, महिला अध्यक्ष तेजल दुधाणे, शशिकला गायकवाड, अभिषेक बोके,
कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर, उपाध्यक्ष सीमा साळवे, कार्याध्यक्ष राहुल तांबे, युवक सेल अध्यक्ष समीर चांदेरे यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.

मुंबईहून निघालेल्या कारमधील पाच कोटी लुटले…

सातारा-मुंबईहून हवाला मार्गे दक्षिण भारतात कारमधून नेली जाणारी पाच कोटी रुपये लुटण्यात आले. पुणे-बंगळूर महामार्गावर कऱ्हाडनजीक ढेबेवाडीफाटा येथे कारला वाहन आडवे लावून पिस्तुल व धारदार शस्त्राचा धाक दाखवित पाचजणांनी ही लुट केली.मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, मुख्य सुत्रधाराचा शोध सुरू केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत हवाल्याने पैसे पोहोचविणारी एक कंपनी आहे. या कंपनीचे मोठे कार्यक्षेत्र दक्षिण भारतातील मोठ्या शहरांमध्ये आहे. सोमवारी रात्री मुंबईतील कार्यालयातून या कंपनीचे पाच कोटी रुपये एका शहरात पोहोचविले जाणार होते.ही रोकड एका कारमधून नेली जाणार होती. सोमवारी रात्री मुंबईहून संबंधित कार दक्षिण भारताकडे जाण्यासाठी निघाली. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कार कऱ्हाडमध्ये आली असता ढेबेवाडी फाट्यानजीक अचानक एक चारचाकी वाहन कारच्या आडवे आले.त्यामुळे चालकाने कार थांबवली. कार थांबताच संबंधित वाहनातून चार-पाचजण खाली उतरले. त्यांच्या हातात पिस्तुल तसेच धारदार शस्त्रे होती. त्यांनी कारमधील लोकांना शस्त्रांचा तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून पाच कोटी रुपये लंपास केले. त्यानंतर लुटमार करणारे साताऱ्याच्या दिशेने पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. पहाटेपासून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. त्यातून महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून चार संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, मुख्य सुत्रधार अद्याप हाती लागला नसल्याचे पोलिसांनी सांगीतले. गुरूवारपर्यंत लुटलेली रोकड व मुख्य सुत्रधार अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन निवडणूक यशस्वीपणे पार पाडावी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कामे करुन निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वय अधिकारी यांच्या कामकाजाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिचंवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पिंपरी चिंचवड पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेची सर्व प्रशासकीय यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. मतदान केंद्रावर आवश्यक शौचालय, पाणी, व्हीलचेअर, रॅम्प, पाळणाघर, औषधोपचार, बसण्याकरीता बाकडे, आदी सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्राला भेटी देऊन उपलब्ध असलेल्या सोई-सुविधांची पडताळणी करावी. शहर हद्दीत महानगर पालिकांनी तर ग्रामीण हद्दीत जिल्हा परिषदेने या व्यवस्था कराव्यात असे आयोगाने निर्देश दिले आहेत.

मतदानाचा टक्का वाढविण्याकरीता मतदार नोंदणी, मतदार जनजागृतीविषयक शिबीरे आयोजित करावीत. बदलेल्या मतदान केंद्राविषयी मतदारांनी माहिती देण्यात यावी. एफएसटी पथके कार्यान्वित करण्यात यावीत. मतदान केंद्रात मोबाईल वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला असून याबाबत याबाबत यंत्रणेसह मतदारामध्ये जनजागृती करावी. आवश्यकतेप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावेत. जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पारदर्शक, निर्भय वातावरणात आणि सुलभ, सहजतेने पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे. निवडणूक प्रक्रियेत आपल्या दिलेल्या जबाबदारीप्रमाणे चोखपणे कर्तव्य पार पाडावे, असे डॉ. दिवसे म्हणाले.

ग्रामीण भागात अनधिकृत होर्डिंग्जवर निवडणूक प्रचाराबाबत होत असल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात यावी. आवश्यक तेथे गुन्हे दाखल करण्यात यावेत, असेही डॉ. दिवसे म्हणाले.

डॉ. भोसले म्हणाले, मतदान केंद्रावर उभारण्यात येणाऱ्या शौचालयाची स्वच्छता करावी. रॅम्प सुस्थितीत असल्याची खात्री करुन घ्यावी. मतदारांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. महानगरपालिका क्षेत्रात मतदार जनजागृतीवर भर देण्यात यावे. याकरीता समाजमाध्यमे, वाणिज्यिक आस्थापना, पीएमपीएल बसेस, महानगरपालिकांचे इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले फलक, लघुसंदेश आदी सुविधांचा वापर करावा. तसेच बचतगट गणेश, नवरात्र आणि दहीहंडी मंडळासोबत बैठक त्यांचा सहभाग वाढवावा, शहरी भागातील मतदानाचा टक्का वाढविण्याकरीता महानगरपालिकेच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल.

शासकीय मालमत्तांचे विद्रुपीकरण कायद्याचे काटेकोर पालन व्हावे. शासकीय मालमत्तांवरील आचारसंहिता भंग होईल अशा राजकीय पक्षांच्या, राजकीय व्यक्तींच्या जाहिराती तत्काळ काढण्यात याव्यात. २४ तासाच्या आत जाहिराती, मजकूर काढण्यात यावा. खासगी इमारतीवरील, जागेतील मजकूर संबंधिताच्या परवानगीशिवाय लावलेला नसल्यास त्याबाबतही कठोर कारवाई करावी. विद्रुपीकरणबाबत केल्यास गुन्हे दाखल करावेत, असेही डॉ. भोसले म्हणाले.

पोलीस अधीक्षक श्री. देशमुख म्हणाले, संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे स्ट्राँगची पाहणी करुन आढावा घ्यावा. प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) नुसार हेलिपॅड व विमानाच्या धावपट्टीवरून उड्डाण परवानगीबाबत कार्यवाही व्हावी तसेच तेथील व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे, असेही श्री. देशमुख म्हणाले.

‘मोरे नैनवा तरस गयेरी निठुर पियाकी बाट तकत में‌’‌‘कैसे गुन गाऊँ तोरे गुनिजनको गुनीजाने, हूँ तो एक दास तुम्हरे‌’

गुणीजान बंदिश स्पर्धेच्या उपांत्य फेरीला सुरुवात

पुणे : वाग्ग्येयकार पंडित सी. आर. व्यास यांनी आपल्या कला जीवनातील अनुभवांवर रचलेल्या ‌‘सुमिर नित रे तू, जासों ताल सुरन रस ग्यान पायो है‌’, ‌‘पपीहा पुकारे पी पिया मनमे आनंद भर आयो घडी मिलनकी निकट आईरी‌’, ‌‘मोरे नैनवा तरस गयेरी, निठुर पियाकी बाट तकत में‌’, ‌‘देख चंदा नभ निकस आयो‌’, ‌‘कैसे गुन गाऊँ तोरे गुनिजनको गुनीजाने, हूँ तो एक दास तुम्हरे‌’ या आणि इतर बंदिशी गायिकांनी तयारीने सादर केल्या.

निमित्त होते गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे (ग्रेस) प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या 100व्या जयंतीनिमित्त देशपातळीवर आयोजित गुणीजान बंदिश स्पर्धेचे.

प्रत्येक कलाकार आपली बुद्धिमत्ता व कल्पनाशक्तीच्या आधारे सतत नवनिर्मितीसाठी प्रयत्नशील असतो, कारण कोणत्याही कलेचा विकास नवनिर्मितीशिवाय शक्य नाही. या विचारातून पंडित सी. आर. व्यास यांनी अनेक बंदिशी रचल्या. या बंदिशींवर आधारित गुणीजान स्पर्धेच्या उपांत्य फेरीला आज (दि. 15) सुरुवात झाली. दि. 15 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत डॉ. श्रीराम लागू रंगावकाश, हिराबाग, पुणे (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार) येथे ही स्पर्धा होत आहे.

16 ते 30 वयोगटातील गायकांसाठी आयोजित या स्पर्धेत देशभरातून 125 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. उपांत्य फेरीची सुरुवात आज (दि. 15) स्त्री गायक स्पर्धकांच्या सादरीकरणाने झाली. बुधवारी (दि. 16) पुरुष स्पर्धकांची उपांत्य फेरी होणार आहे.

उपांत्य ते अंतिम फेरी स्त्री आणि पुरुष अशा स्वतंत्र गटात होत आहे. पहिल्या फेरीतून दहा, दुसऱ्या फेरीतून सहा तर तिसऱ्या फेरीतून प्रत्येकी तीन स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे.

आज सुरू झालेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे (स्त्री विभाग) परीक्षण ज्येष्ठ गायिका अभिनेत्री निर्मला गोगटे, पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पंडित सुहास व्यास, विदुषी देवकी पंडित यांनी केले.

ठाणे, पुणे, अहमदनगर, संभाजीनगर, हुगळी, वाराणसी, बंगळुरू, हैद्राबाद, दुर्ग, रायपूर, वलसाड, धारवाड, उत्तर कन्नडा आदी भागातून स्त्री स्पर्धक आल्या आहेत.

‌‘चरन तुम्हरे अब मैं सुमिर कर गाऊँ, रिझाऊँ, राखो मोरी लाज‌’, ‌‘ले जारे पथिकवा इतनो संदेसा, पियाको सुख चैन मोहे कछुक नहिं भावे‌’, ‌‘मालनियाँ लावो री आज हरबरन फूलन की माला, गुनिदास के गरवा मैं डारुँ‌’, ‌‘ए आलिरी कैसे कहूँ तोहें‌’, ‌‘हो पतिया आज पायी उनकी‌’, ‌‘आयी रे मिलन तोहे पिया कटत नाही तुम बिन रतियाँ कारी‌’, ‌‘ए मन मेरो मोह लेत मंद मुसकान मुखपर तेरो सजनी‌’, ‌‘साँवरिया घर नाही आये, रतिया बिताई तरपत सारी उनबिन रोवत रोवत‌’ आदी बंदिशी सादर करण्यात आल्या.

स्पर्धकांनी सादर केलेल्या बंदिशी पूरिया कल्याण, भटियार, बिहाग, मारुबिहाग, शुद्ध सारंग, धनकोनी कल्याण, बैरागी भैरव, मुलतानी, यमन आदी रागातील होत्या.

स्पर्धकांना लीलाधर चक्रदेव, माधव लिमये, निलय साळवी (संवादिनी), कार्तिकस्वामी, ऋषिकेश जगताप, कौशिक केळकर (तबला) यांनी समर्पक साथसंगत केली.

उपांत्य फेरीतून निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी दि. 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेपासून सुरू होणार आहे. तर पारितोषिक वितरण समारंभ दि. 20 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

धार्मिक स्थळांवरील कारवाई विरुध्द शुक्रवारी पिंपरीत मुस्लिम समाजाचे मूक धरणे आंदोलन

पिंपरी, पुणे (दि. १५ ऑक्टोबर २०२४) मुस्लिम समाजाच्या मज्जिद, दर्गा व मदरसे यांच्यावर धार्मिक भेदभावावर आधारित कारवाई करण्यात येत असल्याने अशा प्रकारची कोणतीही कारवाई कोणत्याच धार्मिक स्थळांवर करू नये या प्रमुख मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मुस्लिम जमात च्या वतीने शुक्रवारी (दि.१८) दुपारी २ः३० वाजता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन समोर मूक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती आंदोलनाचे समन्वयक हाजी याकूब शेख यांनी दिली.
मंगळवारी (दि.१५) चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत समन्वयक राहुल डंबाळे, हाजी युसुफ कुरेशी, हाजी सय्यद गुलाम रसूल, शहाबुद्दीन शेख, मौलाना एहसान खान फैजी, ख्वाजा भाई शेख, हाफिज अझहर ईशाती, फैयाज सनदी, युनूस शेख, सालर शेख, समीर खान, युनूस बेग आदी उपस्थित होते.
या मूक धरणे आंदोलनामध्ये पन्नास हजार मुस्लिम समाज बांधव सहभागी होतील अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
राहुल डंबाळे यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांमध्ये पिंपरी, चिंचवड तसेच शहरातील अन्य भागांमध्ये मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली धार्मिक आधारावर कारवाई सुरू आहे. शहरातील अन्य धर्मीयांची धार्मिक स्थळे तसेच व्यावसायिक तसेच अन्य अनधिकृत बांधकामे यांच्यावर कारवाई न करता, हेतूता मुस्लिम समाजावरच कारवाई करणे अन्यायकारक आहे, असे वाटत असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील विविध पक्ष संघटना व सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मुस्लिम जमात च्या वतीने मूक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या अनुषंगाने आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी ३० पेक्षा अधिक बैठका झाल्या आहेत तर आणखी २० बैठका होणार आहेत. शहरातून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे.
पिंपरी चिंचवड शहरांमध्ये अनाधिकृत बांधकामांची संख्या ही मोठी असून एकूण ही अनियमित व अतिक्रमित असताना तसेच अन्य धार्मिक स्थळे देखील बेकायदेशीर व अनधिकृत असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता केवळ विशिष्ट समुदायावरच कारवाई करणे अन्यायकारक आहे. हे कायद्यातील समानतेच्या धोरणाचे उल्लंघन आहे. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही भेदभावपुर्वक कारवाई करू नये अशी विनंती मनपा आयुक्त यांना करण्यात येणार आहे. या पआंदोलनाला विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिला असून ते सकारात्मक वृत्तीने या मोर्चात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोर्चा आयोजकांची दोनदा भेट घेतली असून, सदर भेटीमध्ये त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना अशा प्रकारची भेदभावपूर्वक कारवाई करू नये अशा प्रकारचे भावना जर मुस्लिम समाजामध्ये झाली असेल तर त्याची गंभीर दखल घेऊन त्यांचे समाधान करावे अशी सूचना केली आहे. त्यानंतर मोर्चाच्या अनुषंगाने आज मंगळवारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे व मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली होती. यात आंदोलनाचे आयोजक सुसुफ शेख, याकुब शेख, शहाबुद्दीन शेख, हाजी गुलाम रसुल व राहुल डंबाळे हे सहभागी होते. सुमारे एक तास चाललेल्या बैठकीमध्ये मनपा आयुक्त यांच्याकडे धार्मिक स्थळांच्या बांधकामांच्या सोबतच मुस्लिम समाजाच्या अन्य प्रलंबित मागण्यासंदर्भामध्ये सुद्धा चर्चा करण्यात आली असून यासंदर्भामध्ये लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान १८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मूक धरणे आंदोलनाला पिंपरी चिंचवड शहरातील विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असणाऱ्या मुस्लिम समाज बांधवां समवेतच पुणे शहर, पुणे जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील धार्मिक संघटनांकडून व सामाजिक संघटनांकडून पाठिंबा मिळालेला आहे. आंदोलन हे पूर्णतः मूक धरणे आंदोलन असल्यामुळे या आंदोलनात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत तसेच या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात भाषणे केली जाणार नाहीत. केवळ प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये महानगरपालिका आयुक्तांना मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार असून त्याच्या पाठपुराव्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती.तीन माजी मुख्यमंत्री व तीन माजी उपमुख्यमंत्र्यांवर जबाबदारी

अशोक गेहलोत, भूपेश बघेल, चरणजितसिंह चन्नी, सचिन पायलट यांच्याकडे विभागनिहाय जबाबदारी

मुंबई, दि. १५ ऑक्टोबर
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासाठी विभागनिहाय वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
मुंबई व कोकण विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व डॉ. जी. परमेश्वर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भासाठी छत्तिसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी, उमंग सिंघर यांची नियुक्ती केली आहे. मराठवाड्यासाठी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट व तेलंगाणाचे मंत्री उत्तमकुमार रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी टी. एस. सिंगदेव व एम. बी. पाटील तर उत्तर महाराष्ट्रासाठी डॉ. सय्यद नासीर हुसेन व डी. अनसुया सिथक्का यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकूल वासनिक व अविनाश पांडे हे या निवडणुकीसाठी वरिष्ठ समन्वयक असतील असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जाहीर केले आहे.

मराठ्यांनो 100 टक्के मतदान करून फडणविसांना त्यांची जागा दाखवा:मनोज जरांगे पाटील

जालना-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. या प्रकरणी त्यांनी फडणवीसांवर मराठा समाजाच्या तरुणांचे आयुष्य बेचिराख करण्याचा आरोप केला आहे.

मनोज जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे आयुष्य बेचिराख केले आहे. मराठा समाजाने या लोकांना सत्तेत बसवले. पण त्यांनीच मराठा समाजाच्या मुलांचे आयुष्य उद्धवस्त करण्याचे काम केले. त्यामुळे समाजाने या निवडणुकीत 100 टक्के मतदान करून या सरकारला त्याची जागा दाखवली पाहिजे. आपल्या समाजाची प्रतिष्ठा जपावी. या सरकारला त्याची जागा दाखवून द्यावी.

फडणवीस यांनी मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण न देता अक्षरशः भिकारी ठेवण्याचे काम केले.

मनोज जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला बेदखल करण्याचे काम केले. कष्टकरी, कामगार, शेतकरी यांची आशा आकांक्षा संपवली. त्यांनी मराठा समाजा तरुणांचे आयुष्य बेचिराख करण्याचे काम केले. त्यांनी सत्तेचा वापर मराठ्यांविरोधात केला. त्यांनी सुरुवातीपासूनच मराठा समाजाला आरक्षण न देण्याची भूमिका घेतली. त्यांच्या या खेळीमुळे मराठा समाजाची मुले आरक्षण, शिक्षण व नोकरीपासून वंचित राहिले. सामाजिक चळवळीत वैचारिक मतभेद असू शकतात, पण फडणवीस यांनी मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण न देता अक्षरशः भिकारी ठेवण्याचे काम केले. ते आमच्यासोबत द्वेषाने वागले. त्यांनी मराठ्यांच्या शेपटीवर पाय ठेवण्याचे काम केले.

अशी लाट पुन्हा येणार नाही. हा समाजाच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. आज समाजावर सर्वात मोठे संकट आले आहे. हे संकट परतावून लावण्याची हीच योग्य वेळ आहे. यावेळी तुम्ही मतदानरुपी ताकद दाखवली नाही, तर तुमच्या लेकरांना या जगात कुणीही वाली असणार नाही. या महासंकटातून तुमची जात व तुमचे लेकरं बाहेर काढायचे असतील, तर तुम्हाला तुमचे मनात व मतात दोन्हीत परिवर्तन करावे लागेल.

या निवडणुकीत तुम्ही परिवर्तन केले नाही, तुम्ही वेळ विसरली, योग्यवेळी मुलांच्या व जातीच्या बाजूने उभे न राहता आपल्या पक्षाच्या व नेत्याच्या बाजूने राहिलात तर रडण्यासाठीही माणूस शिल्लक राहणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, आज मराठा समाजाची मुले-मुली नरकयातना भोगत आहे. सत्ताधारी मराठा समाजाला बाजूला ठेवून सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या 17 पिढ्या आल्या तरी त्यांना महाराष्ट्रात मराठा समाजाला बाजूला ठेवून सत्तेत येता येणार नाही. कारण, इथे प्रश्न केवळ मराठ्यांचा नाही. इथे गोरगरीब दलित, मुस्लिम व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. मराठ्यांनी आपल्या समाजाला बळ व शक्ती देण्याचे काम करा. तुम्ही आतापर्यंत एकजूट दाखवली. ही एकजूट निवडणुकीतही दाखवा. 100 टक्के मतदान करा.

या निवडणुकीत मराठा समाजाच्या माय-माऊल्यांसह विद्यार्थी, विद्यार्थिनी, वयोवृद्ध मतदार कुणीही घरात राहता कामा नये. सर्वांनी झाडून मतदान केले पाहिजे. एकही मतदान यावेळी वाया जावू देऊ नका. ही आपल्या समाजासह आपल्या मुलांच्या अस्तित्वाची लढाई आहे. हा समाज कधीच हरू देऊ नका. आता धुरा तुमच्या खांद्यावर आहे. आतापर्यंत सरकाच्या खांद्यावर धुरा होती. पण त्यांनी जातीवाद व भेदाभेद करून आपली जबाबदारी टाकून दिली. पण आता ही धुरा आपल्या खांद्यावर आहेत. कारण, मतदान आपल्याकडे आहे, त्यांच्याकडे नाही. या मतांचा योग्य तो वापर करा.

सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजाची लेकरे भिकारी करण्याचा डाव रचला आहे. त्यामुळे आपणही त्यांची जिरवायचा निश्चय करायचा आहे. लोकसभा निवडणुकीत जशी सर्वांनी आपली ताकद दाखवली, तशीच ताकद आता पुन्हा आपल्याला विधानसभा निवडणुकीत दाखवायची आहे. हा आपल्या समाजाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. त्यांना कोणत्याही स्थितीत आपल्याला संपवायचे आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवणे आपले काम आहे, असेही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.

मुंबईतील टोल माफ मग महाराष्ट्रातील टोलमाफी का नाही? ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ आश्वासनाचे काय झाले?

मुंबई, दि. १५ ऑक्टोबर २०२४
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व मविआ सज्ज आहे. भाजपा युती सकारने अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे, तिजोरीत पैसा नाही, निधीची तरतूद नाही असे असतानाही दोन महिन्यात युती सरकारने केवळ जनतेची दिशाभूल करणाऱ्या घोषणा केल्या आहेत. विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून केवळ घोषणाबाजी केली असून ते सर्व चुनावी जुमले आहेत. जनतेने या जुमलेबाजीला फसू नये, महाराष्ट्राच्या विकासासाठी मविआलाच विजयी करा, असे आवाहन प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले आहे.

नाशिक येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील पाच टोल नाक्यावरील टोल माफ करण्याचा निर्णय घेतला, त्याचे स्वागतच आहे पण महाराष्ट्रातील टोल का माफ केले नाहीत? मुंबई व महाराष्ट्राची जनता वेगळी आहे का? फडणवीस व गडकरी यांनीच ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ करणार अशी घोषणा केली होती, त्याचे काय झाले? १० वर्षापासून भाजपा महाराष्ट्राला लुटत आहे. भाजपा युतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करणारे आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे पण फडणवीस सक्षम गृहमंत्री अशी जाहिरात बाजी केली जात आहे परंतु फडणवीस हे सर्वात निक्रीय गृहमंत्री आहेत.
महाविकास आघाडी निवडणुकीसाठी सज्ज असून मविआ २८८ जागांवर लढणार आहे, आघाडीत छोटा भाऊ मोठा भाऊ असा वाद नाही. महाराष्ट्राला वाचवणे हे आमचे लक्ष्य असून ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्यांना राज्यात कुठलेही स्थान मिळता कामा नये याची खबरदारी घेऊ. महाराष्ट्रात मोदी शाह यांचा विचार कदापी रुजू देणार नाही. महाराष्ट्रातील चित्र बदलणार असून मविआचे बहुतमाचे सरकार येईल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.
राज्यपालांनी आज घाईघाईत ७ जणांना राज्यपाल नियुक्त आमदारपदाची शपथ दिली. महाविकास आघाडीचे सरकार असताना १२ जणांची नावे राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी राजभवला दिली होती पण त्यावेळचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावर सही केली नाही. हे प्रकरण न्यायालयात असून त्याचा निकाल अजून लागलेला नसताना राज्यापालांनी ७ जणांची नियुक्ती केली आहे, याप्रकरणी कोर्टात दाद मागू असे पटोले यांनी सांगितले.
हिरामण खोसरकारांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, इगतपूरी हा काँग्रेस विचाराचा मतदारसंघ असून ज्यांनी काँग्रेसची साथ सोडली त्यांना जनतेने धडा शिकवला आहे. आमदार हिरामण खोसकर यांनी विधान परिषद निवडणुकीत क्रॉस होटिंग केली होती, लोकसभा निवडणुक व त्यानंतरही त्यांनी सतत पक्षविरोधी कारयावा केल्यामुळे त्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे. इगतपुरीत काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांची संख्या भरपूर आहे, स्थानिक उमेदवारालाच संधी दिली जाईल असेही नाना पटोले यांनी सांगितले.

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान:23 नोव्हेंबरला निकाल; निवडणूक आयोगाची घोषणा

निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

अशी असेल महाराष्ट्रातील निवडणुकीची प्रक्रिया-23 ते 29 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
30 ऑक्टोबर उमेदवार अर्जाची छाननी
4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेता येणार
20 नोव्हेंबरला राज्यात मतदान
23 नोव्हेंबरला मतमोजणी

नवी दिल्ली- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार, राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक होईल. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी राज्यातील 1 लाख 186 मतदान केंद्रांवर 9 कोटी 59 लाख मतदार आपला मताधिकार बजावतील. यात 19.48 लाख फर्स्ट टाईम मतदार आहेत.

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. यापैकी 25 मतदारसंघ अनुसूचित जमाती (एसटी), तर 29 मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहेत. महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येईल. त्यानुसार तत्पूर्वी महाराष्ट्रात नवे सरकार अस्तित्वात येईल.

लोकसभा निवडणुकीत मुंबईसह अनेक शहरांतील मतदान केंद्रांवर मतदारांना तासंतास ताटकळत उभे राहावे लागले होते. त्यावेळी अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत गर्दीच्या मतदान केंद्रांवर खुर्च्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे राजकीय पक्षांनीही निवडणूक आयोगाकडे यासंबंधीचा आग्रह धरला होता.

राज्यात 19.48 लाख फर्स्ट टाईम मतदार

राज्यात एकूण 9.59 कोटी मतदार आहेत. त्यात 4.59 कोटी पुरुष, तर 4.64 कोटी महिला मतदार आहेत. थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून दिव्यांग मतदारही 6.32 लाख एवढे आहेत. महाराष्ट्रात थर्डजेंडर व पीडब्ल्यूडी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. हे सदृढ सामाज व कुटुंब व्यवस्थेचे लक्षण आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची म्हणजे 18 ते 19 वर्ष वयोगटातील संख्या 19.48 लाख आहे. या निवडणुकीत आमचे या तरुण मतदारांवर खास लक्ष असेल. कारण हेच तरुण मतदार भविष्यात लोकशाहीला पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

निवडणुकीतील महत्त्वाची आकडेवारी

राज्यात एकूण 9 कोटी 59 लाख मतदार आहेत.
4 कोटी 95 लाख पुरुष, तर 4 कोटी 64 लाख महिला मतदार.
महिला मतदारांच्या संख्येत 22% ची वाढ.
19.48 लाख मतदार प्रथमच मतदान करणार.
6.32 लाख दिव्यांग मतदार बजावणार हक्क.
85 किंवा त्याहून अधिक वय असणारे 12.48 लाख मतदार.
100 किंवा त्याहून अधिक वयाचे 49034 मतदार.
राज्यात 1 लाख 186 मतदान केंद्र.
शहरात 42, 585, तर ग्रामीण भागात 57, 601 मतदान केंद्र.
राज्यात 1.86 लाख मतदान केंद्र आहेत. त्यापैकी 52585 केंद्र शहरी भागात, तर 57,601 केंद्र ग्रामीण भागात आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 950 मतदार असतील. विशेषतः 350 मतदान केंद्रांचे व्यवस्थापन तरुणांकडे असेल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक काळात पैशाचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे एटीएमसाठी पैसे घेऊन जाणाऱ्या वाहनांवर रात्री 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पैशांची वाहतूक करता येणार नाही. या काळात रुग्णवाहिका, बँक व पतसंस्थांवर विशेष लक्ष ठेवले जाईल.

निवडणुकीच्या काळातील गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने एक खास अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपवर मतदारांना आपल्या तक्रारी करता येईल. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशिरापर्यंत मतदान सुरु असेल, तर केवळ फोटो काढून या अ‍ॅपवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथे पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना आपल्यावरील दाखल गुन्ह्यांची स्थानिक वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांत तीनदा जाहिरात द्यावी लागणार आहे. त्या जाहिरातीत त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत? ते सांगावे लागणार आहे. राजकीय पक्षांनाही हा नियम लागू असेल. त्यांनाही गुन्हे दाखल असलेल्या उमेदवाराला उमेदवारी का दिली? हे नमूद करावे लागेल.

नौदलाच्या नागरी कर्मचाऱ्यांसाठी विमा सादर करण्याकरता भारतीय नौदलाने केला बजाज अलायन्झ लाइफ इनश्युरन्स सोबत सामंजस्य करार

पुणे: भारतीय नौदलाने भारतीय नौदलाच्या नागरी कर्मचाऱ्यांसाठी आज भारतातील अग्रगण्य खाजगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक बजाज अलायन्झ लाइफ कंपनीसोबत सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी  केली आहे. या सहयोगाचा भाग म्हणून बजाज अलायन्झ लाइफ किफायतशीर दरात सर्वसमावेशक संरक्षण सुनिश्चित करत विविध प्रकारची जीवन विमा उत्पादने सादर करेल.

‘नौदल नागरी वर्षा’ साठीच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून असलेले महत्व नमूद करताना व्हाईस अॅडमिरल संजय भल्ला, चीफ ऑफ पर्सोनेल यांनी बजाज अलायन्झ लाइफने विशेषकरून भारतीय नौदल नागरी कर्मचाऱ्यांच्या गरजांना लक्षात घेऊन रचना करण्यात आलेल्या जीवन विमा उपाय सुविधांची प्रशंसा केली.

बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तरुण चुघ म्हणाले, “भारतीय नौदल कर्मचाऱ्यांना जीवन विमा सेवा प्रदान करण्याची संधी मिळाल्याबद्दल बजाज अलायन्झ लाइफमधील आम्हा सर्वांसाठी हे खरोखरच अभिमानाचे क्षण आहेत. भारतीय नौदलाच्या 2024 ‘नौदल नागरी वर्षा’ च्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, आम्ही नौदल नागरी कर्मचाऱ्यांसाठी आमच्या सेवा सुरू करणार आहोत. मला विश्वास आहे की हे  अनेक भारतीयांसाठी जीवन विम्याचे फायदे मिळवण्याच्या दिशेने मोठे पाऊल असेल. आम्ही आपल्या देशातील विमा सुविधा घेण्यामध्ये असलेली दरी भरून काढण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत आहोत. आम्ही भारतीय नौदलासाठी सर्वोत्तम आणि अत्यंत सुलभ विनाअडथळा उपाय सुविधा देण्याचे सुनिश्चित करू.”

या भागीदारी अंतर्गत बजाज अलायन्झ लाइफ भारतीय नौदलाच्या नागरी कर्मचाऱ्यांच्या विविध जीवन उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी विविध जीवन विमा उत्पादनांची श्रेणी सादर करणार आहे. भारतीय नौदलाच्या नागरी कर्मचाऱ्यांना टर्म इनश्युरन्स आणि आपली जीवन उद्दिष्टे सुरक्षित करण्यासाठी पुरेसे जीवन विमा संरक्षण यांचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी शैक्षणिक सेमिनार आणि सत्रांचे आयोजन केले जाईल. कंपनी नौदल नागरी कर्मचाऱ्यांच्या विशेष गरजांना अनुसरून  विशिष्ट प्रक्रिया देखील सुरू करेल.

नौदलाच्या नागरी कर्मचाऱ्यांना विमा पुरविण्यासाठी भारतीय नौदलाने व्हाईस अॅडमिरल संजय भल्ला, चीफ ऑफ पर्सोनेल आणि भारतीय नौदलाचे इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीसोबत सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी  केली आहे. यावेळी बजाज अलायन्झ लाइफचे प्रॉप्रायटरी सेल्स फोर्सचे मुख्य वितरण अधिकारी श्री. अमित जयस्वाल आणि टीम मधील इतर सदस्य उपस्थित होते.

राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी संपन्न :चित्रा वाघ, पंकज भुजबळ, हेमंत पाटील यांच्यासह 7 जणांनी घेतली शपथ

मुंबई–विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. त्यानुसार राज्यपालांनी या नावांना मंजूरी दिली होती. या आमदारांचा आज शपथविधी झाला.

विधान भवन, मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात दुपारी १२ वाजता हा शपथविधी सोहळा संपन्न झाला.

भाजपकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार म्हणून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह विक्रांत पाटील आणि बाबू सिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि सांगली-मिरज-कुपवाडचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना संधी मिळाली आहे. तर शिवसेनेने हेमंत पाटील आणि मनिषा कायंदे यांची वर्णी लागली आहे.

महाविकास आघाडीने जून 2020 मध्ये 12 आमदारांच्या नियुक्तीची शिफारस केली होती. मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही नियुक्त्या दिल्या नाही. कोश्यारी मुद्दामहून अडवणूक करत आहेत, असा आरोप करत कोल्हापूर येथील सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. राज्यात जुलै 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर सत्ता परिवर्तन झाले. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार आले. त्यामुळे आधीच्या आमदारांची यादी बारगळली. आता विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा मुद्दा धसास लावण्याचा प्रयत्न करण्यात येत असून महायुतीच्या वतीने 7 जणांच्या नावाची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे.

कोण राहणार ?कोण उरणार ? नवे चेहरे कोणते येणार ? पहा या २८८ आमदारांचे आता काय होणार ?

पुणे- एकेकाळी राजकारणाला एवढे महत्व नव्हते. बॉलीवूड सर्वात strong होते. पण आताच्या राजकारणाने बॉलीवूड संपविले.सिनेमे आता रसिकांच्या साठी निघत नाहीत तर राजकारणासाठी निघतात.अशा दशकाच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचा च नाही तर समाजकारणाचा,प्रशासनाचा,गुन्हेगारीचा,संस्कृतीचा साराच चेहरा मोहरा बदलून,ढवळून निघतो आहे.आता या बदलत्या जमान्यात आजपासून महाराष्ट्राच्या या २८८ विद्यमान आमदारांची आणि राजकीय पक्षांची परीक्षा सुरु होते आहे

पाहू यात यातले कोण रिंगणात राहणार,कोण उरणार ? आणि कोणते नवे चेहरे येणार ?

नंदुरबार जिल्ह्यातील आमदार : 04

1) अक्कलकुवा विधानसभा – अॅड. के. सी पाडवी (काँग्रेस)
2) शहादा विधानसभा- राजेश पाडवी (भाजप)
3) नंदुरबार विधानसभा – विजयकुमार गावित (भाजप)
4) नवापूर विधानसभा – शिरीष नाईक (काँग्रेस)

धुळे जिल्ह्यातील आमदार : 05

5) साक्री विधानसभा- मंजुषा गावित (अपक्ष)
6) धुळे ग्रामीण विधानसभा – कुणाल पाटील (काँग्रेस)
7) धुळे शहर विधानसभा – फारुक शाह (MIM)
8) सिंदखेडा विधानसभा – जयकुमार रावल (भाजप)
9 ) शिरपूर विधानसभा – काशिराम पावरा (भाजप)

जळगाव जिल्ह्यातील आमदार : 11

10) चोपडा विधानसभा- लता सोनवणे (शिवसेना – शिंदे गट)
11) रावेर विधानसभा – शिरीष चौधरी (काँग्रेस)
12) भुसावळ विधानसभा- संजय सावकारे (भाजप)
13) जळगाव शहर विधानसभा – सुरेश भोळे (भाजप)
14) जळगाव ग्रामीण विधानसभा- गुलाबराव पाटील (शिवसेना – शिंदे गट)
15) अमळनेर विधानसभा – अनिल पाटील (राष्ट्रवादी – अजित पवार)
16) एरंडोल विधानसभा – चिमणराव पाटील (शिवसेना- शिंदे गट)
17) चाळीसगाव विधानसभा – मंगेश चव्हाण (भाजप)
18) पाचोरा विधानसभा – किशोर पाटील (शिवसेना)
19) जामनेर विधानसभा – गिरीष महाजन (भाजप)
20) मुक्ताईनगर विधानसभा – चंद्रकांत पाटील (अपक्ष)

बुलढाणा जिल्ह्यातील आमदार : 07

21) मलकापूर विधानसभा – राजेश एकाडे (काँग्रेस)
22) बुलढाणा विधानसभा – संजय गायकवाड (शिवसेना – शिंदे)
23) चिखली विधानसभा – श्वेता महाले (भाजप)
24) सिंदखेड राजा विधानसभा – राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
25) मेहकर विधानसभा – संजय रायमूलकर (शिवसेना शिंदे)
26) खामगाव विधानसभा – आकाश फुंडकर (भाजप)
27) जळगाव जामोद विधानसभा – संजय कुटे (भाजप)

अकोला जिल्ह्यातील आमदार : 05

28) अकोट विधानसभा – प्रकाश भारसाकळे (भाजप)
29) बाळापूर विधानसभा – नितीन देशमुख (शिवसेना – उद्धव ठाकरे)
30) अकोला पश्चिम विधानसभा – गोवर्धन शर्मा (भाजप) (निधन)
31) अकोला पूर्व विधानसभा – रणधीर सावरकर (भाजप)
32) मूर्तिजापूर विधानसभा – हरीश पिंपळे (भाजप)

वाशिम जिल्ह्यातील आमदार : 03

33) रिसोड विधानसभा – अमित झनक (काँग्रेस)
34) वाशिम विधानसभा – लखन मलिक (भाजप)
35) कारंजा विधानसभा – राजेंद्र पाटनी (भाजप)

अमरावती जिल्ह्यातील आमदार : 08

36) धामणगाव रेल्वे विधानसभा – प्रताप अरुण अडसड (भाजप)
37) बडनेरा विधानसभा – रवी राणा (अपक्ष)
38) अमरावती विधानसभा – सुलभा खोडके (काँग्रेस)
39) तिवसा विधानसभा – यशोमती ठाकूर (काँग्रेस)
40) दर्यापूर विधानसभा- बळवंत वानखेडे (काँग्रेस) (लोकसभेवर निवड)
41) मेळघाट विधानसभा – राजकुमार पटेल (प्रहार जनशक्ती)
42) अचलपूर विधानसभा – बच्चू कडू (प्रहार जनशक्ती)
43) मोर्शी विधानसभा – देवेंद्र भुयार (स्वाभिमानी) – सध्या अजित पवारांसोबत

वर्धा जिल्ह्यातील आमदार : 04

44) आर्वी विधानसभा – दादाराव केचे (भाजप)
45) देवळी विधानसभा – रणजित कांबळे (काँग्रेस)
46) हिंगणघाट विधानसभा – समीर कुणावार (भाजप)
47) वर्धा विधानसभा – पंकज भोयर (भाजप)

नागपूर जिल्ह्यातील आमदार : 12

48) काटोल विधानसभा – अनिल देशमुख (राष्ट्रवादी- शरद पवार)
49) सावनेर विधानसभा – सुनील केदार (काँग्रेस)
50) हिंगणा विधानसभा – समीर मेघे (भाजप)
51) उमरेड विधानसभा – राजू पारवे (काँग्रेस) – सध्या शिवसेना एकनाथ शिंदे
52) नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा- देवेंद्र फडणवीस (भाजप)
53) नागपूर दक्षिण विधानसभा – मोहन माटे (भाजप)
54) नागपूर पूर्व विधानसभा – कृष्णा खोपडे (भाजप)
55) नागपूर मध्य विधानसभा – विकास कुंभारे (भाजप)
56) नागपूर पश्चिम विधानसभा – विकास ठाकरे (काँग्रेस)
57) नागपूर उत्तर विधानसभा – नितीन राऊत (काँग्रेस)
58) कामठी विधानसभा – टेकचंद सावरकर (भाजप)
59) रामटेक विधानसभा – आशिष जयस्वाल (अपक्ष)

भंडारा जिल्ह्यातील आमदार : 03

60) तुमसर विधानसभा – राजेंद्र कारेमोरे (राष्ट्रवादी – अजित पवार )
61) भंडारा विधानसभा – नरेंद्र भोंडेकर (अपक्ष) सध्या एकनाथ शिंदे यांना पाठिंबा
62) साकोली विधानसभा – नाना पटोले (काँग्रेस)

गोंदिया जिल्ह्यातील आमदार : 04

63) अर्जुनी मोरगाव विधानसभा – मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी – अजित पवार)
64) तिरोरा विधानसभा – विजय रहांगदळे (भाजप)
65) गोंदिया विधानसभा – विनोद अग्रवाल (अपक्ष)
66) आमगाव विधानसभा – मारुती कारोटे (काँग्रेस)

गडचिरोली जिल्ह्यातील आमदार : 03

67) आरमोरी विधानसभा – कृष्णा गजबे (भाजप)
68) गडचिरोली विधानसभा – डॉ. देवराव होळी (भाजप)
69) अहेरी विधानसभा – धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी- अजित पवार)

चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार : 06

70) राजुरा विधानसभा – सुभाष धोटे (काँग्रेस)
71) चंद्रपूर विधानसभा – किशोर जोर्गेवार (अपक्ष)
72) बल्लारपूर विधानसभा – सुधीर मुनगंटीवार (भाजप)
73) ब्रह्मपुरी विधानसभा – विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
74) चिमुर विधानसभा – कीर्तीकुमार भांगडिया (भाजप)
75) वरोरा विधानसभा – प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) (सध्या लोकसभेवर)

यवतमाळ जिल्ह्यातील आमदार : 07

76) वणी विधानसभा – संजीव रेड्डी बोदकुलवार (भाजप)
77) राळेगांव विधानसभा – अशोक उईके (भाजप)
78) यवतमाळ विधानसभा – मदन येरावार (भाजप)
79) दिग्रस विधानसभा – संजय राठोड (शिवसेना- एकनाथ शिंदे)
80) आर्णी विधानसभा – संदीप धुर्वे (भाजप)
81) पुसद विधानसभा – इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी – अजित पवार)
82) उमरखेड विधानसभा – नामदेव ससाणे (भाजप)

नांदेड जिल्ह्यातील आमदार: 09

83) किनवट विधानसभा – भीमराव केराम (भाजप)
84) हदगाव विधानसभा – माधवराव पाटील जवळगावकर (काँग्रेस)
85) भोकर विधानसभा – अशोक चव्हाण (भाजप) – सध्या राज्यसभा खासदार
86) नांदेड विधानसभा – उत्तर बालाजी कल्याणकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
87) नांदेड विधानसभा – दक्षिण मोहन हंबर्डे (काँग्रेस)
88) लोहा विधानसभा – श्यामसुंदर शिंदे (अपक्ष)
89) नायगाव विधानसभा – राजेश पवार (भाजप)
90) देगलूर विधानसभा – जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
91) मुखेड विधानसभा – तुषार राठोड (भाजप)

हिंगोली जिल्ह्यातील आमदार : 03

92) वसमत विधानसभा – चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी – अजित पवार)
93) कळमनुरी विधानसभा – संतोष बांगर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
94) हिंगोली विधानसभा – तानाजी मुटकुळे (भाजप)

परभणी जिल्ह्यातील आमदार : 04

95) जिंतूर विधानसभा – मेघना बोर्डीकर (भाजप)
96) परभणी विधानसभा – राहुल पाटील (शिवसेना – उद्धव ठाकरे)
97) गंगाखेड विधानसभा – रत्नाकर गुट्टे (रासप)
98) पाथरी विधानसभा – सुरेश वरपूडकर (काँग्रेस)

जालना जिल्ह्यातील आमदार : 05

99) परतूर विधानसभा – बबन लोणीकर (भाजप)
100) घनसावंगी विधानसभा – राजेश टोपे (राष्ट्रवादी – शरद पवार)
101) जालना विधानसभा – कैलास गोरंटियाल (काँग्रेस)
102) बदनापूर विधानसभा – नारायण कुचे (भाजप)
103) भोकरदन विधानसभा – संतोष दानवे (भाजप)

औरंगाबाद/ छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आमदार : 09

104) सिल्लोड विधानसभा – अब्दुल सत्तार (शिवसेना – एकनाथ शिंदे)
105) कन्नड विधानसभा – उदयसिंग राजपूत (शिवसेना- उद्धव ठाकरे)
106) फुलंब्री विधानसभा – हरिभाऊ बागडे (भाजप)
107) औरंगाबाद मध्य विधानसभा – प्रदीप जयस्वाल (शिवसेना – एकनाथ शिंदे)
108) औरंगाबाद पश्चिम विधानसभा – संजय शिरसाट (शिवसेना – एकनाथ शिंदे)
109) औरंगाबाद पूर्व विधानसभा – अतुल सावे (भाजप)
110) पैठण विधानसभा – संदीपान भुमरे (शिवसेना – एकनाथ शिंदे) – सध्या खासदार
111) गंगापूर विधानसभा – प्रशांत बंब (भाजप)
112) वैजापूर विधानसभा – रमेश बोरनारे (शिवसेना – एकनाथ शिंदे)

नाशिक जिल्ह्यातील आमदार : 15

113) नांदगाव विधानसभा – सुहास कांदे (शिवसेना – एकनाथ शिंदे)
114) मालेगाव मध्य विधानसभा – मोहम्मद इस्माईल (MIM)
115) मालेगाव बाह्य विधानसभा – दादा भुसे (शिवसेना – एकनाथ शिंदे)
116) बागलान विधानसभा – दिलीप बोरसे (भाजप)
117) कळवण विधानसभा – नितीन पवार (राष्ट्रवादी – अजित पवार)
118) चांदवड विधानसभा – राहुल आहेर (भाजप)
119) येवला विधानसभा – छगन भुजबळ (राष्ट्रवादी – अजित पवार)
120) सिन्नर विधानसभा – माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी – अजित पवार)
121) निफाड विधानसभा – दिलीप बनकर (राष्ट्रवादी – अजित पवार)
122) दिंडोरी विधानसभा – नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी- अजित पवार)
123) नाशिक पूर्व विधानसभा – राहुल ढिकळे (भाजप)
124) नाशिक मध्य विधानसभा – देवयानी फरांदे (भाजप)
125) नाशिक पश्चिम विधानसभा – सीमा हिरे (भाजप)
126) देवळाली विधानसभा – सरोज अहिरे (राष्ट्रवादी)
127) इगतपुरी विधानसभा – हिरामण खोसकर (काँग्रेस)

पालघर जिल्ह्यातील आमदार: 06

128) डहाणू विधानसभा – विनोद निकोले (माकप)
129) विक्रमगड विधानसभा – सुनिल भुसारा (राष्ट्रवादी – शरद पवार)
130) पालघर विधानसभा – श्रीनिवास वनगा (शिवसेना)
131) बोईसर विधानसभा – राजेश पाटील (बविआ)
132) नालासोपारा विधानसभा – क्षितिज ठाकूर (बविआ)
133) वसई विधानसभा – हितेंद्र ठाकूर (बविआ)

ठाणे जिल्ह्यातील आमदार : 18

134) भिवंडी ग्रामीण विधानसभा – शांताराम मोरे (शिवसेना – एकनाथ शिंदे)
135) शहापूर विधानसभा – दौलत दरोडा (राष्ट्रवादी – अजित पवार)
136) भिवंडी पश्चिम विधानसभा – महेश प्रभाकर चौगुले (भाजप)
137) भिवंडी पूर्व विधानसभा – रईस शेख (समाजवादी पक्ष)
138) कल्याण पश्चिम विधानसभा – विश्वनाथ भोईर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
139) मुरबाड विधानसभा – किसन कथोरे (भाजप)
140) अंबरनाथ विधानसभा – बालाजी किणीकर (शिवसेना- एकनाथ शिंदे)
141) उल्हासनगर विधानसभा – कुमार आयलानी (भाजप)
142) कल्याण पूर्व विधानसभा – गणपत गायकवाड (भाजप)
143) डोंबिवली विधानसभा – रवींद्र चव्हाण (भाजप)
144) कल्याण ग्रामीण विधानसभा – प्रमोद पाटील (मनसे)
145) मीरा-भाईंदर विधानसभा – गीता जैन (अपक्ष)
146) ओवळा-माजीवडाविधानसभा – प्रताप सरनाईक (शिवसेना – एकनाथ शिंदे)
147) कोपरी-पाचपाखाडी विधानसभा – एकनाथ शिंदे (शिवसेना)
148) ठाणे विधानसभा – संजय केळकर (भाजप)
149) मुंब्रा-कळवा विधानसभा – जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी- शरद पवार)
150) ऐरोली विधानसभा – गणेश नाईक (भाजप)
151) बेलापूर विधानसभा – मंदा म्हात्रे (भाजप)

मुंबईतील आमदारांची संख्या : 36

152) बोरीवली विधानसभा – सुनिल राणे (भाजप)
153) दहिसर विधानसभा – मनिषा चौधरी (भाजप)
154) मागाठणे विधानसभा – प्रकाश सुर्वे (शिवसेना – एकनाथ शिंदे)
155) मुलुंड विधानसभा – मिहीर कोटेचा (भाजप)
156) विक्रोळी विधानसभा – सुनील राऊत (शिवसेना – उद्धव ठाकरे)
157) भांडुप पश्चिम विधानसभा – सुरेश कोपरकर (काँग्रेस)
158) जोगेश्वरी पूर्व विधानसभा – रविंद्र वायकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
159) दिंडोशी विधानसभा – सुनील प्रभू (शिवसेना – उद्धव ठाकरे)
160) कांदिवली पूर्व विधानसभा – अतुल भातखळकर (भाजप)
161) चारकोप विधानसभा – योगेश सागर (भाजप)
162) मालाड पश्चिम विधानसभा – अस्लम शेख (काँग्रेस)
163) गोरेगाव विधानसभा – विद्या ठाकूर (भाजप)
164) वर्सोवा विधानसभा – भारती लवेकर (भाजप)
165) अंधेरी पश्चिम विधानसभा – अमित साटम (भाजप)
166) अंधेरी पूर्व विधानसभा – ऋतुजा लटके (शिवसेना – उद्धव ठाकरे)
167) विलेपार्ले विधानसभा – पराग अळवणी (भाजप)
168) चांदिवली विधानसभा – दिलीप लांडे (शिवसेना – एकनाथ शिंदे)
169) घाटकोपर पश्चिम विधानसभा – राम कदम (भाजप)
170) घाटकोपर पूर्व विधानसभा – पराग शाह (भाजप)
171) मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा – अबू आझमी (समाजवादी पक्ष)
172) अणूशक्तिनगर विधानसभा – नवाब मलिक (राष्ट्रवादी)
173) चेंबुर विधानसभा – प्रकाश फातर्पेकर (शिवसेना – उद्धव ठाकरे)
174) कुर्ला विधानसभा – मंगेश कुडाळकर (शिवसेना- एकनाथ शिंदे)
175) कलिना विधानसभा – संजय पोतनीस (शिवसेना – उद्धव ठाकरे)
176) वांद्रे पूर्व विधानसभा – झिशान सिद्दीकी (काँग्रेस)
177) वांद्रे पश्चिम विधानसभा – आशिष शेलार (भाजप)
178) धारावी विधानसभा – वर्षा गायकवाड (काँग्रेस) – सध्या लोकसभेवर निवड
179) सायन कोळीवाडा विधानसभा – कॅप्टन तमिळ सेलवन (भाजप)
180) वडाळा विधानसभा – कालिदास कोळंबकर (भाजप)
181) माहिम विधानसभा – सदा सरवणकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
182) वरळी विधानसभा – आदित्य ठाकरे (शिवसेना – उद्धव ठाकरे)
183) शिवडी विधानसभा – अजय चौधरी (शिवसेना – उद्धव ठाकरे)
184) भायखळा विधानसभा – यामिनी जाधव (शिवसेना – एकनाथ शिंदे)
185) मलबार हिल विधानसभा – मंगल प्रभात लोढा (भाजप)
186) मुंबादेवी विधानसभा – अमीन पटेल (काँग्रेस)
187) कुलाबा विधानसभा – राहुल नार्वेकर (भाजप)

रायगड जिल्ह्यातील आमदार : 07

188) पनवेल विधानसभा – प्रशांत ठाकूर (भाजप)
189) कर्जत विधानसभा – महेंद्र थोरवे (शिवसेना – एकनाथ शिंदे)
190) उरण विधानसभा – महेश बालदी (अपक्ष)
191) पेण विधानसभा – रवीशेठ पाटील (भाजप)
192) अलिबाग विधानसभा – महेंद्र दळवी (शिवसेना – एकनाथ शिंदे)
193) श्रीवर्धन विधानसभा – अदिती तटकरे (राष्ट्रवादी – अजित पवार)
194) महाड विधानसभा – भरत गोगावले (शिवसेना – एकनाथ शिंदे)

पुणे जिल्ह्यातील आमदार : 21

195) जुन्नर विधानसभा – अतुल बेणके (राष्ट्रवादी – अजित पवार)
196) आंबेगाव विधानसभा – दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी – अजित पवार)
197) खेड आळंदी विधानसभा – दिलीप मोहिते (राष्ट्रवादी – अजित पवार)
198) शिरुर विधानसभा – अशोक पवार (राष्ट्रवादी – अजित पवार)
199) दौंड विधानसभा – राहुल कुल (भाजप)
200) इंदापूर विधानसभा – दत्ता भरणे (राष्ट्रवादी – अजित पवार)
201) बारामती विधानसभा – अजित पवार (राष्ट्रवादी)
202) पुरंदर विधानसभा – संजय जगताप (काँग्रेस)
203) भोर विधानसभा – संग्राम थोपटे (काँग्रेस)
204) मावळ विधानसभा – सुनील शेळके (राष्ट्रवादी – अजित पवार)
205) चिंचवड विधानसभा – अश्विनी जगताप (भाजप)
206) पिंपरी विधानसभा – अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी – अजित पवार)
207) भोसरी विधानसभा – महेश लांडगे (भाजप)
208) वडगावशेरी विधानसभा – सुनिल टिंगरे (राष्ट्रवादी – अजित पवार)
209) शिवाजीनगर विधानसभा – सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
210) कोथरुड विधानसभा – चंद्रकांत पाटील (भाजप)
211) खडकवासला विधानसभा – भीमराव तपकीर (भाजप)
212) पर्वती विधानसभा – माधुरी मिसाळ (भाजप)
213) हडपसर विधानसभा – चेतन तुपे (राष्ट्रवादी – अजित पवार)
214) पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा – सुनिल कांबळे (भाजप)
215) कसबा पेठ विधानसभा – रवींद्र धंगेकर (काँग्रेस)

अहमदनगर जिल्ह्यातील आमदार: 12

216) अकोले विधानसभा – किरण लहामटे (राष्ट्रवादी – शरद पवार)
217) संगमनेर विधानसभा – बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
218) शिर्डी विधानसभा – राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
219) कोपरगाव विधानसभा – आशुतोष काळे (राष्ट्रवादी – अजित पवार)
220) श्रीरामपूर विधानसभा – लहू कानडे (काँग्रेस)
221) नेवासा विधानसभा – शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष)
222) शेवगाव पाथर्डी विधानसभा – मोनिका राजळे (भाजप)
223) राहुरी विधानसभा – प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी – शरद पवार)
224) पारनेर विधानसभा – निलेश लंके (राष्ट्रवादी) – सध्या लोकसभेवर निवड
225) अहमदनगर शहर विधानसभा – संग्राम जगताप (राष्ट्रवादी – अजित पवार)
226) श्रीगोंदा विधानसभा – बबनराव पाचपुते (भाजप)
227) कर्जत जामखेड विधानसभा – रोहित पवार (राष्ट्रवादी – शरद पवार)
बीड जिल्ह्यातील आमदार : 06

228) गेवराई विधानसभा – लक्ष्मण पवार (भाजप)
229) माजलगाव विधानसभा – प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी – अजित पवार)
230) बीड विधानसभा – संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी – शरद पवार)
231) आष्टी विधानसभा – बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी – अजित पवार)
232) केज विधानसभा – नमिता मुंदडा (भाजप)
233) परळी विधानसभा – धनंजय मुंडे (राष्ट्रवादी – अजित पवार)

लातूर जिल्ह्यातील आमदार : 06

234) लातूर ग्रामीण विधानसभा – धीरज देशमुख (काँग्रेस)
235) लातूर शहर विधानसभा – अमित देशमुख (काँग्रेस)
236) अहमदपूर विधानसभा – बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी – अजित पवार)
237) उदगीर विधानसभा – संजय बनसोडे (राष्ट्रवादी – अजित पवार)
238) निलंगा विधानसभा – संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
239) औसा विधानसभा – अभिमन्यू पवार (भाजप)

उस्मानाबाद / धाराशिव जिल्ह्यातील आमदार : 04

240) उमरगा विधानसभा – ज्ञानराज चौगुले (शिवसेना – एकनाथ शिंदे)
241) तुळजापूर विधानसभा – राणा जगजितसिंह पाटील (भाजप)
242) उस्मानाबाद विधानसभा – कैलास पाटील (शिवसेना- उद्धव ठाकरे)
243) परांडा विधानसभा – तानाजी सावंत (शिवसेना – एकनाथ शिंदे)

सोलापूर जिल्ह्यातील आमदार : 11

244) करमाळा विधानसभा – संजय शिंदे (अपक्ष) – अजित पवारांना पाठिंबा
245) माढा विधानसभा – बबन शिंदे (राष्ट्रवादी – अजित पवार)
246) बार्शी विधानसभा – राजेंद्र राऊत (अपक्ष) – भाजपला पाठिंबा
247) मोहोळ विधानसभा – यशवंत माने (राष्ट्रवादी – अजित पवार)
248) सोलापूर शहर उत्तर विधानसभा – विजयकुमार देशमुख (भाजप)
249) सोलापूर शहर मध्य विधानसभा – प्रणिती शिंदे (काँग्रेस) – सध्या लोकसभेवर खासदार
250) अक्कलकोट विधानसभा – सचिन शेट्टी (भाजप)
251) सोलापूर दक्षिण विधानसभा – सुभाष देशमुख (भाजप)
252) पंढरपूर विधानसभा – समाधान अवताडे (भाजप)
253) सांगोला विधानसभा – शहाजी बापू पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)
254) माळशिरस विधानसभा – राम सातपुते (भाजप)

सातारा जिल्ह्यातील आमदार : 08

255) फलटण विधानसभा – दीपक चव्हाण (राष्ट्रवादी – अजित पवार)
256) वाई विधानसभा – मकरंद पाटील (राष्ट्रवादी – अजित पवार)
257) कोरेगाव विधानसभा – महेश शिंदे (शिवसेना- एकनाथ शिंदे)
258) माण विधानसभा – जयकुमार गोरे (भाजप)
259) कराड उत्तर विधानसभा – बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी – शरद पवार)
260) कराड दक्षिण विधानसभा – पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
261) पाटण विधानसभा – शंभूराज देसाई (शिवसेना – एकनाथ शिंदे)
262) सातारा विधानसभा – शिवेंद्रराजे भोसले (भाजप)

रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार : 05

263) दापोली विधानसभा – योगेश कदम (शिवसेना – एकनाथ शिंदे)
264) गुहागर विधानसभा – भास्कर जाधव (शिवसेना- उद्धव ठाकरे)
265) चिपळूण विधानसभा – शेखर निकम (राष्ट्रवादी – अजित पवार)
266) रत्नागिरी विधानसभा – उदय सामंत (शिवसेना – एकनाथ शिंदे)
267) राजापूर विधानसभा – राजन साळवी (शिवसेना – उद्धव ठाकरे)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार : 03

268) कणकवली विधानसभा – नितेश राणे (भाजप)
269) कुडाळ विधानसभा – वैभव नाईक (शिवसेना – उद्धव ठाकरे)
270) सावंतवाडी विधानसभा – दीपक केसरकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)

कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार : 10

271) चंदगड विधानसभा – राजेश नरसिंग पाटील (राष्ट्रवादी – अजित पवार)
272) राधानगरी विधानसभा – प्रकाश आबिटकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
273) कागल विधानसभा – हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी – अजित पवार)
274) कोल्हापूर दक्षिण विधानसभा – ऋतुराज पाटील (काँग्रेस)
275) करवीर विधानसभा – पी एन पाटील सडोलीकर(काँग्रेस) – निधन
276) कोल्हापूर उत्तर विधानसभा – जयश्री जाधव (काँग्रेस)
277) शाहूवाडी विधानसभा – विनय कोरे (जनसुराज्य)
278) हातकणंगले विधानसभा – राजू आवळे (काँग्रेस)
279) इचलकरंजी विधानसभा – प्रकाश आवाडे (अपक्ष)
280) शिरोळ विधानसभा – उल्हास पाटील (शिवसेना – उद्धव ठाकरे)

सांगली जिल्ह्यातील आमदार : 08

281) मिरज विधानसभा – सुरेश खाडे (भाजप)
282) सांगली विधानसभा – सुधीर गाडगीळ (भाजप)
283) इस्लामपूर विधानसभा – जयंत पाटील (राष्ट्रवादी – शरद पवार)
284) शिराळा विधानसभा – मानसिंग नाईक (राष्ट्रवादी – शरद पवार)
285) पलूस कडेगाव विधानसभा – डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)
286) खानापूर विधानसभा – अनिल बाबर (शिवसेना) – निधन
287) तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा – सुमनताई पाटील (राष्ट्रवादी – शरद पवार)
288) जत विधानसभा – विक्रम सावंत (काँग्रेस)

पुणे कॅन्टोमेंन्ट मतदार संघातून भाजपच्या उमेदवारीसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षाच

पुणे- १५ वर्षे पत्नीला नगरसेवक म्हणून निवडून आणणाऱ्या डॉ. भरत भानुदास वैरागे यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत खुद भाजपच्या महारष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांनी आश्वासने देऊन उमेदारी अर्ज मागे घ्यायला लावला,५ वर्षात आश्वासने तर पाळली गेली नाहीतच पण २००९ पासून निव्वळ उमेदवारीच्या रांगेत उभे असणारे वैरागे आताही उमेदवारीची प्रतीक्षाच करत असल्याचे दिसून आले आहे.अवघ्या थोडक्या मतांनी विजयी झालेल्या भाजपच्या विद्यमान आमदारांना आणि त्यांच्या माजी मंत्री राहिलेल्या बंधूंची समजूत घालून भाजपा वैरागे यांना विधानसभेची संधी देणार आहे की नाही ? या प्रश्नाचे उत्तर आता लवकरच मिळू शकणार आहे.बायोडाटा भक्कम असूनही असंख्य वर्षे प्रतीक्षेत असलेले उमेदवार भाजपच्या वर्तुळात भरपूर आहेत पण अशांच्या नशिबी काही जणांवर सातत्यने नेतृत्वाने चालविलेली अपार कृपा आडवी येते असल्याचे दिसून आले आहे.

कोण आहेत हे डॉ. भरत भानुदास वैरागे हे पाहू या …
व्यवसाय : १९९३ ते १९९७ जनता वसाहत येथे वैद्यकिय व्यवसायास सुरूवात

अण्णा जोशी,प्रदीप रावत,गिरीश बापट,अनिल शिरोळे आणि आता मुरलीधर मोहोळ या सर्वांना आपल्या प्रभागातून लोकसभेला मताधिक्य मिळवून दिले.

  • १९८९ सालापासून डायस प्लॉट गुलटेकडी पुणे वस्ती क्षेत्रात संघाच्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार गोपाळराव बुधकर यांच्या मार्गदर्शनाखाली ५ वी ते १० वी गरजू व गरीब शालेय विद्यार्थ्यांना मोफत क्लासेस कार्यास सुरूवात.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद संघात कार्यरत.
  • अयोध्या आंदोलनामध्ये कार सेवक म्हणुन सक्रिय सहभाग.
  • दादा वेदक यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व हिंदू परिषदेचा १० दिवसाचा १९९० साली ठाणे जिल्हा येथील टिटवाळा येथे निवासी वर्ग पुर्ण केला.
  • १९९२ साली भा.ज.पा. युवा मोर्चा वॉर्ड अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय सहभाग.
  • १९९५ साली भा.ज.पा. वॉर्ड अध्यक्ष.
  • १९९८.चिटणीस : भा.ज.पा. युवा मोर्चा पुणे शहर
  • अध्यक्ष : बेरोजगार आघाडी, पर्वती.
  • गिरीश बापट अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकरणीत उपाध्यक्ष भा.ज.पा. पुणे शहर.
  • अनिल शिरोळे अध्यक्ष असताना पुणे शहर उपाध्यक्ष म्हणुन काम केले.
  • योगेश गोगावले अध्यक्ष यांच्या कार्यकरणीत अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भा.ज.पा. पुणे शहर म्हणुन कार्यरत.
  • २००२ साली पुणे शहरातील सॅलिसबरी पार्क या प्रभागातून प्रचंड मताधिक्याने पुणे महानगरपालिकेत
    नगरसेवक म्हणुन निवड.
  • २००४ साली चिटणीस भा.ज.पा अनुसूचित जाती, महाराष्ट्र प्रदेश
  • २००२ ते २००७ पुणे महापालिकेमध्ये स्थायी समिती सदस्य म्हणुन २ वर्षे पदावर समर्थपणे काम केले.
  • २००४ साली बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून काम केले.
  • २००७ साली सदर वॉर्ड हा महिला झाल्यामुळे त्यांच्या पत्नी सौ. कविता भरत वैरागे या पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणुन निवडून आल्या.
  • २००९ साली पुणे कॅन्टोमेंन्ट मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह भूमिका पक्षाकडे मांडली.
  • सन २०१२ मध्ये धनदांडग्या प्रतिस्पर्धेच्या विरोधात ६०% झोपडपट्टी असताना प्रतिस्पर्धेचे डिपॉझिट जप्त करून पत्नी कविता भरत वैरागे या सॅलिसबरी पार्क या प्रभागातून निवडुन आल्या. प्रभाग हा अक्षरशः बालेकिल्ला केला.
  • २०१४ मध्ये कॅन्टोमेंट मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी पुन्हा एकदा पक्षाकडे आग्रह भुमिका त्यावेळेस स्थानिक योग्य उमेदवार असताना उमेदवारी मिळू शकली नाही.
  • सन २०१४ मध्ये पक्षाने दिलेला उमेदवारास प्रचंड मताने विजयी करण्यात हाथभार .
  • कॅन्टोमेंट मतदार संघात डायस प्लॉट झोपडपट्टी, ढोले मळा वसाहत, खिलारे वस्ती, प्रकाश कॉलनी, पोस्ट व टेलिफोम कॉलनी, कोयना सोसायटी इत्यादी भागाचा सामावेश असून आनंद मीरा परिसरामध्ये ३५ सोसायट्या आहेत. एकून या भागाच मतदान १५,००० (पंधरा हजार) आहेत.
  • २०१७ साली सदर प्रभाग हा महिला राखीव झाल्यामुळे पत्नी सौ. कविता भरत वैरागे या पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणुन पुन्हा तिसऱ्यांदा २०,००० मताधिक्याने निवडून आल्या.