Home Blog Page 568

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षिस वितरण

  • ८५ स्पर्धकांनी घेतला सहभाग

पुणे :
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धा 2024 चा बक्षिस वितरण रविवारी पार पडला. या स्पर्धेत तब्बल ८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत स्वराज्य दौलत दुर्गानाथ प्रतिष्ठान साकारलेल्या पुरंदर घेरा हा देखावा सर्वोत्कृष्ट ठरला.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्यावतीने राज्य स्तरीय ऑनलाईन किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवारी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात पार पडला. ज्येष्ठ इतिहास संशोधक व दुर्ग अभ्यासक पांडूरंग बलकवडे आणि एच व्ही देसाई कॉलेजचे विभाग प्रमुख गणेश राऊत हे प्रमुख म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी पहिल्या क्रमांकाला ९ हजार, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजारांचे बक्षिस ठेवण्यात आले होते. त्यात मुंबई विभागात आयुष पाटील हे प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले. यांनी त्यांनी सुवर्णदुर्ग साकारला होता. तर द्वितीय क्रमांक ओमकार मित्र मंडळ – सरस भेड दुर्ग देखाव्याला मिळाले. तर तृतीय क्रमांक घरकूल मित्र मंडळ यांनी साकारलेल्या प्रतापगड दुर्गाला मिळाले.
कोकण विभागात आदर्श मित्र मंडळाने साकारलेल्या वेल्बोर – साजरा – भोजर यांना प्रथम क्रमांक, तर द्वितीय क्रमांक किल्ले रायगड साकारलेल्या अष्टप्रधान मंडळाला मिळाले.
पश्चिम महाराष्ट्र विभागातून प्रथम क्रमांक सांगलीच्या स्वराज्य दौलत दुर्गनाथ प्रतिष्ठानने साकारलेल्या पुरंदर वज्रगड पुरंदर घेरा पुरंदरच्या देख्याव्याला तर सिंहगड हलता देखावा करणाऱ्या पुण्याच्या मिरजकर परिवाराला द्वितीय आणि किल्ले अहिवंतगड आणि किल्ले मार्कड्याचा देखावा करणाऱ्या सांगलीच्या विजेता तरुण मंडळाला तृतीय क्रमांक मिळाला.

  • पुरंदर घेरा ठरला सर्वोत्कृष्ट किल्ला
    स्वराज्य दौलत दुर्गानाथ प्रतिष्ठान साकारलेल्या पुरंदर घेरा यांनी 11 किल्ले एकत्र एकूण जो देखावा सादर केलेला देखावा सर्वोत्कृष्ट ठरला. त्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस होते. तर वेद इनामदार या लहान मुलाने साकारलेल्या मल्हारगडला आणि महिलांनी साकारलेल्या स्वयंभू गर्जनाच्या- रायगडच्या देखाव्याला उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे उत्तेजनार्थ बक्षिसाचे स्वरूप होते.

मुंबईला लुटणाऱ्या उद्योगपती गौतम अदानीला हिशोब चुकता करावा लागेल!

मुंबई, दि. २१ नोव्हेंबर २०२४
उद्योगपती गौतम अदानी यांनी कंत्राटे मिळवण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. ही केंद्रातील सरकारसाठी लाजिरवाणी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने गौतम अदानींनी देश विदेशात मोठ्या प्रमाणात कंत्राटे मिळवून देशाला लुटले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करून कोणतीही चौकशी न करता मोदी सरकारने मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकले पण अमेरिकेच्या तपास यंत्रणाच्या तपासात अदानीने मोठ्या प्रमाणात लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही भ्रष्ट अदानीला अटक का केली जात नाही? भारत सरकारने चौकशी करून गौतम अदानीला जेलमध्ये टाकावे ही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी रास्तच आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने व सरकारी यंत्रणांच्या मदतीने अदानी देशाला लुटत आहे. विमानतळ, बंदरे, उर्जानिर्मितीसह सर्वच क्षेत्रात अदानीची मक्तेदारी सुरु असून त्याला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत. अदानीला देश विदेशातील कंत्राटे देण्यासाठी पंतप्रधान मोदीच मदत करत आहेत हे उघड आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिकांना बेघर करण्याचा डाव आखून लाखो कोटी रुपयांची मुंबईतील जमीन अदानीच्या घशात घातलेली आहे. मुंबईचे विमानतळही अदानीच दिले आहे. यापाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्कम पाठिंबा आहे. विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधी यांनी अदानीवर कारवाई करण्याची केलेली मागणी रास्तच असून अमेरिका जर गौतम अदानीच्या भ्रष्टाचाराबद्दल अटक वॉरंट काढू शकते तर भारत सरकार का कारवाई करु शकत नाही. भारत सरकारने कारवाई करून देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.

गॅदरींगचा वाद अन नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच त्याच्या मित्राने चिरला काचेने गळा-हडपसरची घटना

पुणे- मांजरी परिसरातील एका शाळेत वार्षिक समारंभाचे आयाेजन करण्यात आले हाेते. मात्र, वार्षिक समारंभाच्या वादातून नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने मित्राने गळा चिरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत 15 वर्षीय मुलगा जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एका 14 वर्षीय दाेषी मुलाविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जखमी मुलाने हडपसर पोलिस ठाण्यात आराेपी मुला विराेधात तक्रार दिली आहे. मांजरीतील खासगी शाळेत नववी तक्रारदार मुलगा शिकण्यास आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला मुलगा त्याच्याच वर्गात आहे. शाळेत वार्षिक समारंभाचे आयोजन करण्यात येणार असून वार्षिक समारंभाच्या आयोजनावरुन दोघांमध्ये जाेरदार वाद झाला होता. 19 नोव्हेंबर राेजी दुपारी अडीच वाजण्च्या सुमारास तक्रारदार मुलगा वर्गात बसला होता. त्यावेळी वर्गातील मुलगा त्याच्या पाठीमागून आला आणि त्याने थेट धारदार काचेच्या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाल्याने खळबळ उडाली व मुलांची धावपळ झाली.या घटनेनंतर गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाने त्याला धमकावत त्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या मुलाला शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुलाला पोलिसांनी चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे.हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून सहायक निरीक्षक दादासाहेब रोकडे पुढील तपास करत आहेत.

रशियाने युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागले

0

रशियाने पहिल्यांदाच युक्रेनवर आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाइलचा (ICBM) हल्ला केला आहे. ICBM 5,500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर हल्ला करू शकते. हे विशेषतः अण्वस्त्रे प्रक्षेपित करण्यासाठी वापरले जाते.
युक्रेनच्या हवाई दलाने गुरुवारी या हल्ल्याला दुजोरा दिला. युक्रेनने रशियावर ब्रिटिश आणि अमेरिकन क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्यानंतर हा हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी युक्रेनने ब्रिटीश क्षेपणास्त्र स्टॉर्म शॅडो क्रूझने रशियावर हल्ला केला. एका रशियन सैनिकाने ऑनलाइन दावा केला की कुर्स्क भागात किमान 12 क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
याआधी मंगळवारी युक्रेनने अमेरिकेच्या लांब पल्ल्याच्या एटीएसीएमएस बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने रशियावर हल्ला केला. तेव्हापासून युक्रेन ब्रिटीश क्षेपणास्त्रांचा वापर करू शकेल, अशी अटकळ बांधली जात होती.
रशियाने गेल्या महिन्यात म्हटले होते की, जर नाटो देशांची शस्त्रे आपल्या भूमीवर वापरली गेली तर ती तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात मानली जाईल.

रशियाने मंगळवारी दावा केला की युक्रेनने पहिल्यांदाच अमेरिकेकडून मिळालेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आपल्या हद्दीत डागली. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, युक्रेनने मंगळवारी सकाळी ब्रायन्स्क परिसरात सहा लांब पल्ल्याची आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टम (ATACMS) क्षेपणास्त्रे डागली.

रशियाने 5 क्षेपणास्त्रे पाडल्याचे सांगितले. अहवालानुसार, युक्रेनियन आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनीही रशियावर एटीएसीएमएसचा वापर केल्याची पुष्टी केली आहे. यानंतर बुधवारी कीवमधील अमेरिकन दूतावास बंद करण्यात आला. नंतर अमेरिकन गुरुवारी ते उघडण्याबद्दल बोलले.

दिल्ली पोलिसांनी फटाक्यांच्या विक्रीवर,वापरावर घातली बंदी-12वीपर्यंतचे सर्व वर्ग ऑनलाइन, 50% कर्मचाऱ्यांना घरून काम

0

नवी दिल्ली -दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती गंभीर आहे. पाच दिवसांनंतर, गुरुवारी दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स 379 नोंदवले गेले. 300-500 मधील AQI गंभीर मानला जातो.त्याच वेळी, दिल्ली पोलिसांनी ई-कॉमर्स कंपन्यांना राजधानीत ऑनलाइन फटाक्यांची विक्री त्वरित थांबवण्यास सांगितले आहे. दिल्ली पोलिसांनी बुधवारी (20 नोव्हेंबर) ई-कॉमर्स कंपन्यांना ई-मेल केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या 11 नोव्हेंबरच्या आदेशामुळे दिल्ली पोलिसांनी हा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एमसी मेहता विरुद्ध भारत सरकार या खटल्यात प्रदूषणाचा सामना करण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालावी, असे निर्देश दिले होते.राष्ट्रीय राजधानीत श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजना-4 (GRAP-4) लागू आहे. बारावीपर्यंतचे सर्व वर्ग ऑनलाइन करण्यात आले आहेत.

दिल्ली सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये घरून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचे 50 टक्के कर्मचारी घरून काम करतील, अशी माहिती पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिली. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांना डिजिटल सुनावणीचा पर्याय दिला आहे.

भारताचे सरन्यायाधीश (CJI) संजीव खन्ना म्हणाले की, जेथे शक्य असेल तेथे न्यायालयांनी डिजिटल पद्धतीने सुनावणी घ्यावी. वकील आभासी वकिली करू शकतात. खरे तर कपिल सिब्बल यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील अनेक वकिलांनी ही मागणी केली होती. न्यायालयाने आपल्या कर्मचाऱ्यांना मास्क घालणेही बंधनकारक केले आहे.18 नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान आप सरकारच्या वकील ज्योती मेहंदीरत्ता यांनी सांगितले होते की, 10वी आणि 12वी वगळता इतर सर्व वर्ग ऑनलाइन आहेत. पाचवीपर्यंतचे शिक्षण बंद आहे. यावर न्यायमूर्ती ओका यांनी नाराजी व्यक्त केली आणि म्हणाले – हा काय विनोद आहे? 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांची फुफ्फुसे इतरांपेक्षा वेगळी असू शकत नाहीत. त्यांचे वर्गदेखील थांबवा आणि ते ऑनलाइन सुरू करा.

अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने GRAP-3 आणि GRAP-4 लागू करण्यात झालेल्या दिरंगाईबद्दल आयोग आणि सरकारला फटकारले होते. पुढील आदेश येईपर्यंत संपूर्ण एनसीआरमधील शाळा बंद ठेवाव्यात, असेही सांगण्यात आले. सुप्रीम कोर्टाने सीएक्यूएमला कठोर होण्याचे निर्देश दिले होते आणि सांगितले होते की बंदी लागू करण्याचे काम स्थानिक अधिकाऱ्यांवर सोडले जाणार नाही.हवेची प्रदूषण पातळी तपासण्यासाठी त्याची 4 प्रकारांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक स्तरासाठी स्केल आणि उपाय निश्चित केले आहेत. याला ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) म्हणतात. त्याच्या 4 श्रेणींमध्ये, सरकार निर्बंध लादते आणि प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय जारी करते.

सर्व आरोप अदानी उद्योग समूहाने फेटाळले-कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार

0

मुंबई : अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर अमेरिकेत लाच दिल्याचा तसेच फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपांनंतर भारतीय शेअर बाजारात लोकांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेत झालेल्या या आरोपांनंतर आदानी उद्योग समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत. यातील चार कंपन्यांना तर थेट लोअर सर्किट लागले आहे. दरम्यान, अमेरिकेने केलेल्या या आरोपांवर अदानी उद्योग समूहाकडून स्पष्टीकरण आले आहे. अमेरिकेत करण्यात आलेले सर्व आरोप अदानी उद्योग समूहाने फेटाळले आहेत.

अदानी समूहाने अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने केलेले आरोप फेटाळले आहेत. अदानी ग्रीनच्या संचालकांवर केलेले आरोप निराधार असल्याचं अदानी उद्योग समूहाने म्हटलंय. अभियोगातील आरोप हे आरोप आहेत आणि प्रतिवादी दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष मानले जातात, असं अदानी समूहाने म्हटले आहे. आम्ही सर्व ते शक्य कायदेशीर मार्ग शोधू असं अदानी उद्योग समूहाने प्रसिद्ध केलेल्या आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

भारतातील सर्वांत मोठा सौरउर्जी निर्मिती प्रकल्पाचे कंत्राट मिळावे यासाठी गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे 250 दशलक्ष डॉलर्स देण्याचे मान्य केले होते. या प्रकल्पातून पुढच्या 20 वर्षांत साधारण 2 अब्ज डॉलर्सचा नफा मिळणार होता. तसेच कर्जदार आणि गुंतवणूकदार यांच्यापासून हा भ्रष्टाचार लपवून गौतम अदानी आणि अदानी ग्रीन एनर्जीचे सीईओ विनीत जैन यांनी 3 अब्ज डॉलर्स किमतिचे बॉण्ड्स आणि रोखे जमा केले होते, असाही आरोप करण्यात आला आहे.

गौतम अदानी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप

0

सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 मिलियन डॉलर्स देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा

नवी दिल्ली-न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात झालेल्या सुनावणीत गौतम अदानीसह 8 जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. युनायटेड स्टेट्स ॲटर्नी ऑफिसचे म्हणणे आहे की अदानी यांनी भारतातील सौर ऊर्जेशी संबंधित कंत्राटे मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 मिलियन डॉलर्स (सुमारे 2110 कोटी) लाच देण्याचे आश्वासन दिले होते.

अदानींव्यतिरिक्त, सागर अदानी, विनीत एस. जैन, रणजित गुप्ता, सिरिल कॅबेनिस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा ​​आणि रूपेश अग्रवाल यांचा इतर सात लोकांमध्ये समावेश आहे. हा लाचेचा पैसा गोळा करण्यासाठी अदानी अमेरिकन, परदेशी गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटे बोलत असल्याचा आरोप आहे.सागर आणि विनीत हे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे ​​अधिकारी आहेत. सागर हा गौतम अदानी यांचा पुतण्या आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गौतम अदानी आणि सागर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.अमेरिकन गुंतवणूकदारांचा पैसा या प्रकल्पात गुंतवला गेल्याने अमेरिकेत गुन्हा दाखल झाला आणि अमेरिकन कायद्यानुसार तो पैसा लाच म्हणून देणे गुन्हा आहे.बुधवारीच, अदानी यांनी 20 वर्षांच्या ग्रीन बाँडच्या विक्रीतून 600 मिलियन डॉलर्स जमा करण्याची घोषणा केली होती. काही तासांनंतर, त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप झाला.

अमेरिकन ॲटर्नी कार्यालयाने अदानींवर लावलेले आरोप…

2020 ते 2024 दरम्यान, अदानींसह सर्व आरोपींनी भारत सरकारकडून सौर ऊर्जा करार मिळविण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 मिलियन डॉलर्स लाच देण्याचे मान्य केले. या प्रकल्पातून 20 वर्षांत 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नफा मिळण्याची अपेक्षा होती.
ही योजना पुढे नेण्यासाठी अदानी यांनी भारत सरकारच्या अधिकाऱ्याची भेट घेतली. सागर आणि विनीत या योजनेवर काम करण्यासाठी अनेक बैठका घेतात.
कोर्टाने म्हटले आहे की, सिरिल कॅबनिस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा ​​आणि रूपेश अग्रवाल यांनी लाचखोरी योजनेच्या ग्रँड ज्युरी, एफबीआय आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (एसईसी) च्या तपासात अडथळा आणण्याचा कट रचला. या चौघांनीही योजनेशी संबंधित ईमेल, संदेश आणि विश्लेषणे डिलीट केली.
अदानी ग्रीन एनर्जीने करारासाठी निधी देण्यासाठी यूएस गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय कर्जदारांकडून एकूण 3 अब्ज डॉलर्स जमा केले.

राहुल म्हणाले- 2000 कोटींचा घोटाळा करूनही अदानी तुरुंगाबाहेर,PM मोदी अदानींना वाचवत आहेत

0

नवी दिल्ली-अमेरिकेतील उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले- अदानीजी 2 हजार कोटींचा घोटाळा करत आहेत आणि बाहेर फिरत आहेत, कारण पंतप्रधान मोदी त्यांना संरक्षण देत आहेत. गौतम अदानी यांनी अमेरिकेत गुन्हे केले आहेत, मात्र भारतात त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही. अदानीच्या संरक्षक सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.

न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात झालेल्या सुनावणीत गौतम अदानींसह 8 जणांवर अब्जावधी रुपयांची फसवणूक आणि लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.युनायटेड स्टेट्स ॲटर्नी कार्यालयाचे म्हणणे आहे की भारतात सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना 265 मिलियन डॉलर्स (सुमारे 2200 कोटी) लाच दिली किंवा देण्याची योजना आखली.

राहुल यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

राहुल म्हणाले- विरोधी पक्षनेता म्हणून मी हा मुद्दा मांडत आहे. अदानी भाजपला पूर्ण पाठिंबा देतात. आमची मागणी JPC स्थापन करण्याची आहे. भारताचे पंतप्रधान अदानीजींच्या मागे उभे आहेत. एखादी व्यक्ती छोटासा गुन्हा करूनही तुरुंगात जातो. अदानींना मात्र काही होत नाही.
अदानी तुरुंगाबाहेर का आहेत हा प्रश्न आहे. अदानी यांनी गुन्हा केल्याचे अमेरिकन एजन्सीने सांगितले आहे. पण पंतप्रधान काहीच करत नाहीत. ते काहीही करू शकत नाहीत कारण पंतप्रधान मोदी त्यांच्या दबावाखाली आहेत.
अदानींना काही होणार नाही, त्यांना अटक होणार नाही, कारण मोदी त्यांच्यासोबत आहेत. या प्रकरणाशी संबंधितांवर कारवाई करावी.
अमेरिकेच्या एफबीआयने तपास केला आहे. अदानी भ्रष्टाचार करत असल्याचे मी आधीच सांगत आहे. चौकशी झाली पाहिजे, असे मी यापूर्वी दोन-तीन वेळा पत्रकार परिषदेत सांगितले होते. अदानीला अटक झाल्याशिवाय गोष्टी सुटणार नाहीत. अदानीजी भाजपला निधी देतात.
नरेंद्र मोदी अदानींना अटक करू शकत नाहीत. मोदींनी असे केले तर ते (मोदी)ही जातील. अदानींनी देश हायजॅक केला आहे.

आम्ही ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढली. त्यामुळे शिंदेच हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतीलविधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे. निवडणूक निकालानंतर महायुतीचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री कोण हे ठरवतील. 75 टक्के सर्व्हे आमच्या बाजूने आहेत. आम्ही ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढली. त्यामुळे शिंदेच हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील असा आम्हाला विश्वास आहे. यासंबंधी नितीश कुमार यांचे उदाहरण पाहता येईल. वरिष्ठ नेते यासंबंधी योग्य तो निर्णय घेतील. पण एकनाथ शिंदे ज्या भावनेने काम करतात ते जनतेला आवडले अशी सर्वसामान्यांची भावना आहे.एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक निर्णयाला आम्ही त्याला बांधिल आहोत. ते जिकडे जातील तिकडे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. आम्ही त्यांच्यासोबत अत्यंत मजबुतीने राहू, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे .

संजय शिरसाट यांनी मंगळवारी सकाळी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात पत्रकाराने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेनेच्या संभाव्य युतीविषयी प्रश्न केला. त्याला उत्तर देताना संजय शिरसाट यांनी यासंबंधीचा कोणताही निर्णय एकनाथ शिंदे हेच घेतील असे स्पष्ट केले. शरद पवार यांच्यासोबत जायचे की नाही? याचा निर्णय एकनाथ शिंदेच घेतली. आम्हाला त्यावर भाष्य करता येणार नाही.

विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मतदान यंत्रामध्ये बंद झाल्यानंतर आता राज्यात कुणाची सत्ता येणार? याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य युतीचे संकेत दिलेत. यामुळे निवडणूक निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.संजय शिरसाट यांनी तत्पूर्वी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना कथित व्होट जिहादवर भाष्य केले. विरोधी पक्षांचा व्होट जिहाद सुरू होता. याऊलट आम्ही धर्मयुद्ध लढत होतो. आमचे धर्मयुद्ध सक्सेस झाले. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है आदी घोषणा प्रचंड यशस्वी झाल्या. हिंदू बांधवांसह सर्वच जातीधर्माच्या लोकांनी महायुतीला पसंती दर्शवली. त्यामुळे या निवडणुकीत आमचाच विजय होईल हे निश्चित आहे. सरकारच्या योजना व त्यांची प्रभावी अंमलबजावणी या सर्व बाबी आमच्या पथ्यावर पडणार आहेत. त्यामुळे मतांची वाढलेल्या टक्क्याचा कौल महायुतीच्याच बाजूने असेल आमचा दावा आहे, असे ते म्हणाले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सौरभ धानोरकर

पुणे – फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. सौरभ धानोरकर यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती मान्य केल्याची घोषणा केली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली असून ती २१ नोव्हेंबरपासून अमलात येणार आहे.

श्री. धानोरकर १९८३ पासून विविध भूमिकांद्वारे कंपनीशी संबंधित असून २०१२ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते. ते चार्टर्ड अकाउंटंट असून त्यांनी २ कोटी रुपयांच्या पाइप उत्पादन कंपनीचे विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या मोठ्या पेट्रोकेमिकल्स व प्लॅस्टिक प्रोसेसिंग कंपनीत विस्तार करण्यासाठी भरीव योगदान दिले आहे. २०१६ मध्ये ते व्यवस्थापकीय संचालक पदावरून निवृत्त झाले आणि गेल्या आठ वर्षांपासून नॉन- एक्झक्युटिव्ह पदावर कार्यरत आहेत.

कार्यकारी अध्यक्ष श्री. प्रकाश छाब्रिया यांनी नेतृत्वबदलाचे महत्त्व अधोरेखित करत अकाउंटिंग, वित्त, व्यावसायिक, धोरण, विपणन आणि व्यवस्थापन विभागातील श्री. धानोरकर यांच्या कौशल्याची प्रशंसा केली. त्यांनी श्री. धानोरकर यांच्या फिनोलेक्सला विकास व नफ्याच्या नव्या पातळीवर नेण्याच्या क्षमतेविषयी विश्वास व्यक्त केला. त्यांचा ग्राहककेंद्री दृष्टीकोन, विकासावर भर देण्याचे धोरण आणि कंपनीच्या मूल्यांप्रती असलेली बांधिलकी यांमुळे त्यांचे नेतृत्व नवे मापदंड प्रस्थापित करताना पाहाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

२४ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नॉमिनेशन आणि रेम्युनरेशन समितीने केलेल्या शिफारसीचा विचार करून श्री. सौरभ धानोरकर यांच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरील नियुक्तीला मान्यता देण्यात आली. ही नियुक्ती २१ नोव्हेंबर २०२४ पासून अमलात येणार असून त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता स्टॉक एक्सचेंजसह करण्यात आली आहे. श्री. अजित वेंकटरामन २० नोव्हेंबर २०२४ अखेरीस व्यवस्थापकीय संचालक पदावरून पायउतार होणार आहेत.

महाराष्ट्राच्या 288 जागांसाठी 58% मतदान: 23 तारखेला नव्या राजकीय समीकरणांचा होणार उदय ….

पुणे-आज 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील सर्व 288 जागांवर मतदान झाले. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांनाही बहुमतासाठी आवश्यक 145 जागा मिळवणे आवश्यक आहे.मात्र त्या दोघानाही कठीण असल्याचे अनेकांचे मत आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिंदे सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. यामध्ये महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. सरकार स्थापन झाल्यानंतर ती वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.लाडकी बहिण योजना मतांमध्ये कशा पद्धतीने परावर्तीत होईल ते पाहणे रंजक ठरणार आहे.

मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली. याच योजनेच्या जोरावर तिथे विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला होता. दुसरीकडे महाविकास आघाडीने आपले सरकार आल्यास महिलांना दरमहा 3 हजार रुपये मिळतील, असे आश्वासन दिले आहे.

भाजपला जास्तीत जास्त 80-90 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तविला जातो आहे . 2019 मध्ये भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या.म्हणजे १० ते १५ जागांवर भाजप मायनस होणार आहे. तर काँग्रेस 58-60 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहू शकते असे अनेकांना वाटते आहे . गेल्या निवडणुकीत त्यांना 44 जागा मिळाल्या होत्या.म्हणजे १० ते १२ जागा कॉंग्रेस प्लस मध्ये जाणार आहे . निवडणुकीत शरद पवारांची जादू काम करत असल्याचे दिसते. त्यांचा पक्ष NCP (SP), ज्याने 86 उमेदवार उभे केले आहेत, ते 50-55 जागा जिंकू शकतात असाही अंदाज वर्तविला जातो आहे.

या निवडणुकीत राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मते कापतील. त्यांचा भाजपला पूर्ण पाठिंबा आहे. ते केवळ मते कापण्याचे काम करतात आणि त्यांना मोठ्या मुश्किलीने 4 जागा मिळू शकतील.’अजित पवार महायुतीचा भाग असला तरी अनेकवेळा त्यांनी जुन्या मित्रपक्षांचे गुणगान किंवा सहकारी पक्षांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावत असल्याने त्यांचे किती उमेदवार विजयी होतील हा प्रश्न आहे. अजित पवारांचे 10-15 पेक्षा जास्त उमेदवार विजयी होणार नाही असे दिसते. अजित पवार आज नाही तर उद्या शरद पवारांकडे परत जातील असाही अनेकांचा कयास आहे.

शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव गट) 30-35 जागा जिंकून बरोबरीत राहू शकतात असे अनेकांचे मत आहे . अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीसाठी कमकुवत दुवा ठरत आहे. ते केवळ 15-20 जागा जिंकण्याची शक्यता आहे. लहान पक्ष आणि अपक्षांना 20 ते 25 जागा मिळू शकतात. अशा परिस्थितीत अपक्ष किंगमेकर बनू शकतात असे काहीजण सांगत आहेत. महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव) यांच्या आघाडीला महायुतीपेक्षा 10 जागा जास्त मिळू शकतात. या आघाडीला बहुमत मिळण्याचीही शक्यता आहे.’दोन्ही आघाड्या बहुमतात कमी पडल्या, तर मात्र अपक्ष आमदार, मनसेचे असले २/३ तर ते प्रकाश आंबेडकरांचा एखादा आमदार असे सरकार स्थापन करण्यास मदत करतील. 1995 मध्ये प्रथमच 45 अपक्ष उमेदवार महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते आणि ते सर्व सरकारमध्ये सामील झाले. तीच गोष्ट पुन्हा दिसू शकेल फक्त आकड्यांचा खेळ बदललेला दिसेल असा हि अंदाज आहे.

राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान

0

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :अहमदनगर – ६१.९५टक्के,अकोला – ५६.१६ टक्के,अमरावती -५८.४८ टक्के, औरंगाबाद- ६०.८३ टक्के, बीड – ६०.६२ टक्के, भंडारा- ६५.८८ टक्के, बुलढाणा-६२.८४ टक्के, चंद्रपूर- ६४.४८ टक्के,धुळे – ५९.७५ टक्के, गडचिरोली-६९.६३ टक्के, गोंदिया -६५.०९ टक्के, हिंगोली – ६१.१८ टक्के, जळगाव – ५४.६९ टक्के, जालना- ६४.१७ टक्के, कोल्हापूर- ६७.९७ टक्के,लातूर _ ६१.४३ टक्के, मुंबई शहर- ४९.०७ टक्के, मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,नागपूर – ५६.०६ टक्के,नांदेड – ५५.८८ टक्के, नंदुरबार- ६३.७२ टक्के,नाशिक -५९.८५ टक्के, उस्मानाबाद- ५८.५९ टक्के, पालघर- ५९.३१ टक्के, परभणी- ६२.७३ टक्के,पुणे – ५४.०९ टक्के,रायगड – ६१.०१ टक्के, रत्नागिरी- ६०.३५ टक्के,सांगली – ६३.२८ टक्के,सातारा – ६४.१६ टक्के, सिंधुदुर्ग – ६२.०६ टक्के,सोलापूर -५७.०९ टक्के,ठाणे – ४९.७६ टक्के, वर्धा – ६३.५० टक्के,वाशिम -५७.४२ टक्के,यवतमाळ – ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.

मतदान करणं हे आपले राष्ट्रीय कर्तव्य;जनतेने सुट्टीचा गैरफायदा घेऊ नये – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

पुणे दि.२०: विधानसभा निवडणूक २०२४च्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवाजीनगर पुणे येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या भगिनी आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानासाठी दिलेल्या सुट्टीची लोकांनी जाण ठेवावी आणि आपला अधिकार बजवावा. लोकशाहीत सरकारकडून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मतदान करावं, असं आवाहन शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. तसेच यावेळी मतदान करण्यासाठी मतदारांची लोकसभेपेक्षा अधिक गर्दी दिसत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी, शिवसेनेचे धनंजय जाधव, राजू विटकर, युवराज शिंगाडे, संजय तुरेकर, सागर कांबळे, भाजपचे संदीप काळे, मंदार देवभानकर, दिलीप शेळके, भाऊराज शेळके, शिवसेना महिला आघाडीच्या अक्षता धुमाळ, सुदर्शना त्रिगुणाईत, सुरेखा पाटील,सुवर्णा शिंदे, संजीवनी विजापूरे उपस्थित होते.

पुण्यात 3वाजेपर्यंत झाले एवढे मतदान -आणि जिल्हाधिकारी यांनी केले आवाहन

पुणे-

मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत Maharashtra 45.53 %

पुणे 41.70 %

-पर्वती 37.66%,

कोथरूड 37.80%,

खडकवासला 40.40 %,

कसबा 43.03%,

हडपसर 33.78%,

पुणे कॅन्टोन्मेंट 35.84%,

शिवाजी नगर 33.86%,

वडगाव शेरी 38.83 %

राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३  टक्के मतदान

विधानसभा निवडणुकीत आज दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले.

खाली पाहा जिल्हानिहाय टक्केवारी

अहमदनगर – ४७.८५ टक्के, अकोला – ४४.४५ टक्के, अमरावती -४५.१३ टक्के, औरंगाबाद- ४७.०५टक्के, बीड – ४६.१५ टक्के, भंडारा- ५१.३२ टक्के, बुलढाणा-४७.४८ टक्के, चंद्रपूर- ४९.८७ टक्के, धुळे – ४७.६२ टक्के, गडचिरोली-६२.९९ टक्के, गोंदिया -५३.८८ टक्के, हिंगोली – ४९.६४टक्के, जळगाव – ४०.६२ टक्के, जालना- ५०.१४ टक्के, कोल्हापूर- ५४.०६ टक्के, लातूर _ ४८.३४ टक्के, मुंबई शहर- ३९.३४ टक्के, मुंबई उपनगर-४०.८९ टक्के, नागपूर – ४४.४५ टक्के, नांदेड – ४२.८७ टक्के, नंदुरबार- ५१.१६ टक्के, नाशिक -४६.८६ टक्के, उस्मानाबाद- ४५.८१ टक्के, पालघर- ४६.८२ टक्के, परभणी- ४८.८४ टक्के, पुणे – ४१.७० टक्के, रायगड – ४८.१३ टक्के, रत्नागिरी- ५०.०४टक्के, सांगली – ४८.३९ टक्के, सातारा – ४९.८२टक्के, सिंधुदुर्ग – ५१.०५ टक्के, सोलापूर -४३.४९ टक्के, ठाणे – ३८.९४ टक्के, वर्धा – ४९.६८ टक्के, वाशिम -४३.६७ टक्के, यवतमाळ – ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात वेबकास्टिंग कक्षाची यशस्वी कामगिरी

पुणे: येथील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत वेबकास्टिंग कक्षाने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. निवडणुकीची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी या कक्षाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. या कक्षाचे यशस्वी नेतृत्व नोडल अधिकारी वासुदेव कुटबेट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कुटबेट यांना मंडळ अधिकारी संदीप शिंदे यांनी सहकार्य केले, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक सुसंगत आणि प्रभावी ठरली.
निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्राचे थेट प्रक्षेपण (लाइव्ह वेबकास्टिंग) सुनिश्चित करण्यात आले. मतदान केंद्रांवर होणाऱ्या सर्व गतिविधींचे अचूक आणि पारदर्शक निरीक्षण करण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या गोंधळाची किंवा अनियमिततेची तात्काळ दखल घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. मतदान प्रक्रियेतील प्रत्येक छोट्या मोठ्या घटनांचे रिअल-टाइम ट्रॅकिंग हे वेबकास्टिंग कक्षाच्या कार्यक्षमतेमुळे शक्य झाले.
या कक्षाने चुकता येणार नाहीत असे अचूक नियोजन केले होते. मतदान प्रक्रियेतील एकही घटक दुर्लक्षित न होईल याची काळजी घेतली गेली. स्थानिक प्रशासन व निवडणूक अधिकारी यांनी वेबकास्टिंग कक्षाच्या कार्याची विशेष प्रशंसा केली.
वेबकास्टिंग कक्षाच्या यशस्वी कामगिरीमुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह झाली, ज्यामुळे नागरिकांमध्ये निवडणुकीसाठी विश्वास निर्माण झाला.