Home Blog Page 567

पुणे शहरातील ४.५७ लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित,महापारेषणच्या वीजवाहिनीत बिघाड

कोथरूड, पद्मावती, हडपसर, वडगाव धायरी भागात परिणाम

पुणे, दि. २३ एप्रिल २०२५: महापारेषणच्या ४०० केव्ही जेजूरी टॉवर लाइनमध्ये बिघाड झाल्यामुळे बुधवारी (दि. २३) रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास पुणे शहरातील अतिउच्चदाब व उच्चदाबाच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी कोथरूड, हडपसर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, वडगाव धायरी, सिंहगड रस्ता, नऱ्हे, येवलेवाडी, एनआयबीएम रस्ता, पर्वती, पेशवेपार्क, मंडई, फुरसुंगी आदी भागातील सुमारे ४ लाख ५७ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला.

दरम्यान महापारेषणकडून भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या सर्व भागात रात्री ११.३० ते ११.४५ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरू होईल अशी शक्यता आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णतेची प्रचंड लाट आली आहे. पर्यायाने विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महापारेषणच्या काही अतिउच्चदाबाचे उपकेंद्र व वीजवाहिन्यांवर ताण येत आहे. त्यातच महापारेषणच्या जेजुरी ४०० केव्ही जेजूरी टॉवर लाइनमध्ये आज रात्री ९.४५ वाजता बिघाड झाला. तसेच पारेषण वाहिन्यांमध्ये विजेची मोठी तूट निर्माण झाली. त्यामुळे पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके व बिघाड टाळण्यासाठी स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ‘एलटीएस’ (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. परिणामी फुरसुंगी, कोथरूड, नांदेड सिटी, पर्वती येथील महापारेषणचे अतिउच्चदाबाचे उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे कोथरूड, हडपसर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, वडगाव धायरी, सिंहगड रस्ता, नऱ्हे, येवलेवाडी, एनआयबीएम रस्ता, पर्वती, पेशवे पार्क, मंडई, फुरसुंगी परिसरातील सुमारे ४ लाख ५७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. दरम्यान महापारेषणकडून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहेत.

महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्यासाठी दोन विशेष विमानांची व्यवस्था

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

१८३ प्रवाशांची मोफत आणण्याची व्यवस्था

पुणे (प्रतिनिधी)

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये ठिकठिकाणी महाराष्ट्रातील पर्यटक अडकले असून त्यांना पुन्हा आणण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दोन विशेष विमानांची व्यवस्था केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या खर्चातून ही व्यवस्था मोहोळ यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोहोळ यांच्यात पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्यानंतर मोहोळ यांनी विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. इंडिगो आणि एअर इंडिया या दोन कंपन्यांच्या विमानांमधून १८३ महाराष्ट्रातील पर्यटकांना श्रीनगर मुंबई येथे आणण्यात येणार आहे

गुरुवारी दोन विशेष विमाने आल्यानंतर आणखी काही पर्यटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असून जितके महाराष्ट्रातील नागरिक असतील, त्या सर्वांना महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था केली जात आहे. विशेष म्हणजे या पर्यटकांना मोफत आणले जात असून याचा खर्च राज्य सरकार करत आहे.

याबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘मंगळवारी संध्याकाळपासून माझ्या कार्यालयासह वैयक्तिकरित्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून संपर्क होत असून महाराष्ट्रातील पर्यटक घडलेल्या घटनेमुळे भीतीच्या वातावरणात होते. मात्र सर्वांशी संवाद साधल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला असून प्रत्येकाला आणण्याची व्यवस्था केली जात आहे. गुरुवारी दोन विशेष विमाने पोहोचल्यानंतर उरलेल्या पर्यटकांना देखील आणण्याची जबाबदारी आमची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही व्यवस्था आम्ही उपलब्ध करून देत आहोत. महाराष्ट्रातील शेवटचा नागरिक महाराष्ट्रात येईपर्यंत आमचे प्रयत्न सुरू राहणार आहेत.

मोहोळ यांच्याकडून २४ तास वॉररूम कार्यान्वित…

महाराष्ट्रातील काश्मीरमध्ये अडकलेल्या प्रवाशांची संख्या मोठी असण्याची शक्यता असून घटनेच्या 24 तासानंतरही विविध ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांचे फोन मोहोळ यांच्या कार्यालयात धडकत आहेत. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी गेल्या 24 तासापासून वॉर रूम कार्यान्वित केली असून या माध्यमातून अडकलेल्या प्रवाशांची माहिती एकत्रित करणे, विमानांची सोय झाल्यानंतर प्रवाशांना सुचित करणे आणि गरजूंना आवश्यक ती मदत पुरवणे याबाबत वॉर रूममधून काम सुरु झाले आहे. मोहोळ यांनी स्वतः वॉररूममध्ये थांबून अडकलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश…

भारताने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली :पंतप्रधान मोदींनी बुधवारी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची ची सुमारे २ तास बैठक घेतली आणि पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने कठोर पाऊल उचलत पाच मोठे निर्णय घेतले आहेत.
या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना पुढील ४८ तासांत भारत सोडावा लागणार आहे. याचबरोबर कोणत्याही पाकिस्तानी नागरिका भारतात प्रवेश मिळणार नाही. याचबरोबर केंद्र सरकारने १९६० चा सिंधू पाणी करारही स्थगित करण्यात आला आहे. पाकिस्तानने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करणार नाही तोपर्यंत या करारावरील स्थगिती कामय राहणार आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, “या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य ओळखून, सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने खालील निर्णय घेतले आहेत.

१९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येत आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत राहील तोपर्यंत हा करार स्थगित राहील.
संयुक्त चेकपोस्ट अटारी तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येत आहे. ज्यांनी वैध मार्गाने अटारी सीमा ओलांडली आहे, ते १ मे २०२५ पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात.
पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले व्हिसा रद्द मानले जातील. एसपीईएस व्हिसाद्वारे सध्या भारतात असलेल्या सर्व नागरिकांनी तत्काळ भारत सोडावा. यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत आहे.
नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावा.
भारत संरक्षण, नौदल आणि इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील हवाई सल्लागार. संबंधित उच्चायुक्तालयातील ही पदे रद्द मानली जातात.

जगदाळे,गणबोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

पुणे:येथील कोंढव्यातील कौस्तुभ गणबोटे आणि कर्वे न गरचे संतोष जगदाळे यांच्या पहलगाम येथील आतंकी हल्ल्यातील हत्येने या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कर्वेनगर येथील गल्ली क्रमांक 02 मधील ज्ञानदीप सोसायटीत राहणारे जगदाळे कुटुंब. एकाच इमारतीत तिघे भाऊ आनंदात राहत होते. यामधील सर्वात लहान असणारा संतोष जगदाळे हे आपली पत्नी व मुलगी व त्यांचा मित्र कौस्तुभ गणबोटे व त्यांची पत्नी असे एकूण पाच जण जम्मू-काश्मीरला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तीनच दिवसापूर्वी गेले होते.मात्र कालच्या अतिरेकी हल्ल्याने त्यांच्या आनंदावर विरजन पडले.

संतोष जगदाळे यांना गोळ्या लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. तेथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांची पत्नी प्रगती संतोष जगदाळे, मुलगी आसावरी संतोष जगदाळे या सुखरूप आहेत.

जगदाळे कुटुंबीय तीन दिवसांपूर्वी एका खासगी कंपनीशी संबंधित गटासोबत काश्मीरला गेले होते. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, संतोष जगदाळे हे एक सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीत काम करतात. हे कुटुंब त्यांच्या बंगल्याच्या तळमजल्या राहतात. तर पहिल्या मजल्यावर संतोष यांचा भाऊ अविनाश व आई राहतात. त्यांचा दुसरा भाऊ अजय याच इमारतीत राहतात.

संतोष गेल्याने या जगदाळे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हसता खेळणारा माणूस तसेच कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने घरावर शोककळा पसरली आहे. संतोष यांना बाहेर फिरण्याची मोठ्या प्रमाणात आवड होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अरुणाचल प्रदेशाचा दौराही केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार संतोष जगदाळे यांना बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजता पुणे विमानतळावरती आणण्यात येणार आहे. तेथून रात्रभर रुग्णालयातील शीतगृहात ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी सात ते साडे सातच्या दरम्यान कर्वेनगर येथील त्यांच्या घरी दर्शनासाठी नेण्यात येणार आहे.

गुरुवारी नऊ वाजता राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती संदीप खर्डेकर यांनी त्यांच्या नातेवाईकांना विचारून दिली आहे.

कोंढव्यातील साईनगर भागातील व्यावसायिक कौस्तुभ गणबोटे हे शनिवारी (ता. १९) पुण्यातून विमानाने जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मित्र संतोष जगदाळे हे देखील होते.
काश्मीर खोऱ्यातील पहेलगामच्या बैसरण घाटी भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अकाली जाण्याने नातेवाईकांत आणि मित्र परिवारात मनमिळावू व्यक्ती गेल्याची भावना निर्माण झाली आहे.

कौस्तुभ यांचा मागील तीस वर्षांपासून गणबोटे फरसाण हाऊस या नावाने व्यवसाय आहे. अगदी छोट्याशा व्यवसायातून त्यांनी गणबोटे फरसाण हाऊस हा व्यवसाय नावारूपाला आणला होता. कौस्तुभ यांना एक मुलगा असून त्याचा विवाह दोन वर्षांपूर्वीच झाला होता. अतिशय प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख होती.

त्यांच्या अशा अकाली जाण्याने मित्रपरिवार व कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांचा मृतदेह आज विमानाने रात्री बाराच्या सुमारास पुण्यात आणण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळाली आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गोळीबार सुरु होता तेव्हा संतोष आणि कौस्तुभ व इतर पर्यटक हॉटेलबाहेर बसले होते. गोळीबाराचा आवाज झाल्याने आरडाओरड सुरु झाली. पर्यटक धावपळ करू लागले, त्यामुळे दहशतवाद्यांनी लांबूनच पर्यटकांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात संतोष यांच्या खांद्याजवळ तर कौस्तुभ यांच्या कमरेच्या खाली गोळी लागुन गेली.

गोळीबारानंतर सुरुवातीला धावपळ सुरू होती. कौस्तुभ यांचा त्यांच्या पत्नीने शोध घेतल्यानंतर ते जखमी अवस्थेत मिळून आले. त्यांचा मुलगा कुणाल हा कौस्तुभ यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच पुण्यातून त्यांच्याकडे विमानाने रवाना झाला आहे.

कौस्तुभ यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. शुगरचा त्रास असल्याने रक्त थांबत नव्हते. तर, जवळच असणारे संतोष यांनाही मोठ्या प्रमाणात जखम झाल्याने कौस्तुभ घाबरून गेले. गोळी लागल्यानंतर जवळपास अर्धा तास त्यांना मदत मिळाली नाही.

निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा: हर्षवर्धन सपकाळ

पहलगाम हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा दादरमध्ये निषेध मोर्चा.

मुंबई, दि. २३ एप्रिल २०२५
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत काँग्रेस पक्षाने दादरमध्ये मोर्चा काढला. हा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ला असून हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई करत दहशतवादाचा कायमचा बिमोड करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पहलगाम हल्ल्यातील मृतांना दोन मिनिटे मौन राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यानंतर मोर्चा काढण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय अशा घोषणा देत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पहलगाम हल्ल्याप्रकरणी सरकारने सर्व पक्षीय बैठक घेऊन एकमुखी निर्णय घ्यावा, अशा प्रकारचा कोणताही दहशतवादी हल्ला खपवून घेतला जाणार नाही हा संदेश यातून गेला पहिजे. या कठीण प्रसंगी आपण सर्व भारतीयांनी एकत्र येऊन या हल्ल्याचा निषेध केला पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. एवढा मोठा हल्ला होत असताना गुप्तचर विभागाला याची माहिती मिळाली नाही का? हे सुरक्षा यंत्रणेचे अपयश आहे. पर्यटकांच्या आजूबाजूला कोणतीच सुरक्षा यंत्रणा नव्हती, सरकार काय करत होते, याचे उत्तर दिले पाहिजे आणि अतिरेक्यांचा बिमोड केला पाहिजे असे वडेट्टीवार म्हणाले.

या मोर्चात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार हुसेन दलवाई, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, श्रीरंग बरगे, प्रदेश सचिव झिशान अहमद, आनंद सिंह, धनराज राठोड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सक्षमीकरणासाठी निर्णायक पावले; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक

रुग्णालयातील नवजात अर्भक अपहरण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे – डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. २३ एप्रिल २०२५ : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण विषयांवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि अधिकारांसंदर्भातील प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांनी या बैठकीस उपस्थित राहून आपल्या सूचना आणि अनुभव मांडले.

नवजात अर्भक चोरी आणि मातेच्या मृत्यूप्रकरणी गंभीर चिंता

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन रुग्णालयांमध्ये होत नसल्याबाबत चिंता व्यक्त केली. शासकीय व खासगी रुग्णालयांतील बेफिकीरपणामुळे प्रसूतीनंतर मातेच्या मृत्यूच्या वाढत्या घटनांकडेही त्यांनी लक्ष वेधले. रुग्णालयांमध्ये नवजात अर्भकांचे अपहरण रोखण्यासाठी व नवजात अर्भकांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे, जेणेकरून नवजात अर्भक अपहरण व पळवून नेण्याच्या घटनांना आळा बसेल, असे प्रतिपादन डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

ऊसतोड कामगार महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स वाटप — गरज आणि जबाबदारी

ऊसतोड कामगार महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सची आवश्यकता आणि त्याचे पर्यावरणपूरक पर्याय शोधण्यावर भर देत त्यांनी सांगितले की, डिस्पोजल व्यवस्थेचा विचार करणे तितकाच महत्त्वाचा आहे. या प्रश्नासाठी महिला अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती स्थापण्याची सूचना त्यांनी केली.

त्याचबरोबर, १६ ते १९ वयोगटातील मुलींमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरविरोधात प्रतिबंधात्मक इंजेक्शन देण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण असून, यासंदर्भात जनजागृती वाढवण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

महिलांच्या आरोग्यविषयक योजनांचा अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्यासाठी आरोग्य व महिला बालकल्याण विभागांमध्ये समन्वय, तसेच तीन टक्के निधीचा समर्पक वापर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी बैठकीला छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, वाशिम, लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी व प्रतिनिधी, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महा मंडळाचे कार्यकारी संचालक ऑनलाइन उपस्थित होते.

भाजपा शहर अध्यक्षांनी जाळला पाकचा झेंडा

पुणे-पहल गाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज लोकमान्य टिळक चौकात (अलका टॉकीज) येथे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह दहशतवाद्यांना चोख उत्तर देतील, देशातील जनतेने एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे मत भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केले.

माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेशाच्या चिटणीस वर्षा डहाळे पहालगाम येथे मृत्यू मुखी पडलेल्या कै.कौस्तुभ गनबोटे यांच्या भगिनी श्रीमती अर्चना देवधर यांची प्रमुख उपस्थिती होती.जावडेकर म्हणाले, काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर, तेथील पर्यटनाला मोठी चालना मिळाली होती. त्यामुळे तेथील अर्थव्यवस्था सुधारत होती. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला आणि विकासाला खिळ बसावी या उद्देशाने हा भ्याड हल्ला केला. त्याला चोख उत्तर दिले जाईल.यावेळी पुणे शहरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काश्मीर पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली तसेच या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध – शहराध्यक्ष दीपक मानकर

पुणे-जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याने माणुसकीला काळिमा फासली आहे, संपूर्ण देशाचे मन या घटनेने व्याकूळ झाले असून या भ्याड हल्ल्यात पुणे शहरातील संतोष जगदाळे व कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्देवी मृत्यू झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी संतोष जगदाळे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या वडिलांसह कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना आधार दिला.
पहलगाम येथील भ्याड हल्ल्यात निष्पाप जीवांचा बळी गेल्याने माझे अंत:करण हेलावले आहे.
या हृदयद्रावक घटनेत आपला प्राण गमावलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. तसेच यामध्ये जखमींच्या प्रकृतीत त्वरित सुधारणा व्हावी, हीच सदिच्छा व्यक्त करतो. जम्मू काश्मीर येथे महाराष्ट्रातील अडकलेले पर्यटकांना त्यांच्या घरी आणण्यासाठी विविध पातळीवर सर्वजण सर्वोत्परी प्रयत्न करीत असून लवकरच सर्व पर्यटकांना त्यांच्या घरी सुखरूप आणले जाईल.
भारत देश आज सक्षमपणे दहशतवादाविरोधात उभा असून, या हल्ल्यात आपल्या जवळच्यांना गमावलेल्या कुटुंबांच्या दुःखात सर्व देशवासीय सहभागी आहेत.

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची श्रद्धांजली

खा.सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली सभा

पुणे-
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जवळपास २८ नागरिक मृत्युमुखी पडले. यात महाराष्ट्रातील ६ तर पुण्यातील २ नागरिकांचा समावेश आहे. या सर्व मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खासदार सौ. सुप्रिया सुळे व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत कात्रज येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह व दुर्दैवी आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व पर्यटकांच्या कुटुंबांच्या दुःखात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सहभागी आहे. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा आहे. पण, यासोबतच देशात धार्मिक सलोखा कायम राखण्यासाठीही प्रयत्न करावेत असे आवाहन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.

यावेळी युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे,विशाल तांबे , स्वाती पोकले, काका चव्हाण, स्मिता कोंढरे, यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अन भारताच्या पाठीशी उभे राहिले अवघे विश्व ..पहा कोण काय म्हणाले…

अमेरिकेपासून रशियापर्यंत सर्व देश भारताच्या पाठिशी:
पहलगाम येथे काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, जगातील बहुतेक देशांनी भारताला पाठिंबा आणि पीडितांप्रती शोक व्यक्त केला आहे. यामध्ये अमेरिका आणि रशिया या महासत्तांचा तसेच भारताचे शेजारी पाकिस्तान आणि चीन यांचा समावेश आहे.प्राथमिक तपासात या हल्ल्यात ५ दहशतवादी सहभागी असल्याचे समोर आले आहे. यापैकी दोन स्थानिक आणि तीन पाकिस्तानी दहशतवादी होते. पोलिसांनी चौकशीसाठी अनेक लोकांना ताब्यात घेतले आहे. लष्कर-ए-तैयबाची प्रॉक्सी शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे..

पाकिस्तान- परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात पर्यटकांच्या मृत्यूबद्दल आम्हाला चिंता आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतो.

चीन: परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन म्हणाले की, आम्ही पीडितांबद्दल शोक व्यक्त करतो. चीन या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो.

सौदी अरेबिया- काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याबद्दल क्राउन प्रिन्स सलमान यांनीही दुःख व्यक्त केले आणि सांगितले की सौदी अरेबिया भारतासोबत उभा आहे आणि या दुःखाच्या वेळी सर्वतोपरी मदत करेल.

इस्रायल- इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी X वर लिहिले – माझे मित्र नरेंद्र मोदी, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे, ज्यामध्ये डझनभर निष्पाप लोक मारले गेले आणि जखमी झाले. आमच्या संवेदना आणि प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्रायल भारतासोबत उभा आहे.

रशिया- राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांना संदेश पाठवला आहे. पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल, असे त्यात म्हटले आहे. आम्ही भारतासोबत आहोत. आमच्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. सर्व जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो.
अमेरिका- राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले की काश्मीरमधून खूप त्रासदायक बातमी आली आहे. दहशतवादाविरुद्ध अमेरिका भारतासोबत खंबीरपणे उभी आहे. मृतांच्या आत्म्यास शांती मिळो आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो.
युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनीही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे आणि म्हटले आहे की – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आज शोक करणाऱ्या प्रत्येक भारतीयाप्रती माझी मनापासून संवेदना. तरीही मला माहित आहे की भारताचा आत्मा अतूट आहे. या कठीण काळात तुम्ही खंबीरपणे उभे राहाल आणि युरोप तुमच्या पाठीशी उभा राहील.

ब्रिटन- पंतप्रधान कीर स्टार्मर म्हणाले की काश्मीरमधील दहशतवादी हल्ला भयानक होता. माझ्या संवेदना पीडितांसोबत, त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि भारतातील लोकांसोबत आहेत.

इटली – पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी म्हटले, भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे खूप दुःख झाले आहे, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. इटली पीडितांच्या कुटुंबियांना, जखमींना, सरकारला आणि सर्व भारतीय जनतेला शोक व्यक्त करते.
फ्रान्स – राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही हल्ल्याचा निषेध केला आणि पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले – भारतात एक भयानक हल्ला झाला आहे, ज्यामध्ये डझनभर लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. आम्हाला पीडित कुटुंबांचे दुःख समजते आणि त्यांच्याप्रती आमच्या संवेदना व्यक्त करतो.

सशस्त्र दलात 121 नवे वैद्यकीय अधिकारी दाखल: 97 लष्कर, 16 नौदल आणि 8 हवाई दलात रुजू

पुण्यातील एएफएमसीमध्ये दीक्षांत समारंभ

पुणे-सीमा भागातील लष्करी वैद्यकीय रुग्णालय अद्ययावत करण्यात येत आहेत. तसच श्रीनगर मधील लष्करी रुग्णालय उत्कृष्ट सेवा देत आहे, अशी माहिती लष्करी वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालक व्हाइस ऍडमिरल आरती सरीन यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५९ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. या संचलन सोहळ्यात १२१ वैद्यकीय सेवेचे छात्र सहभागी झाले होते. यामधील ९७ लष्करात, १६ नौदलात आणि ८ हवाई दलात दाखल होणार झाले.

या संचलनाच नेतृत्व सौरभ सिंग यादव याने केलं. सुरुवातीला छात्र कदमताल करत कॅप्टन देवाशीष शर्मा मैदानात दाखल झाले. संचलनाच्या प्रमुख पाहुण्या व्हाइस ऍडमिरल आरती सरीन यांचं मैदानात आगमन झालं आणि त्यांनी संकलनाची पाहणी केली. छात्रांच्या दिमाखदार संचलना नंतर छत्रांना सैन्यदलात अधिकारी म्हणून दाखल करून घेण्याचा सोहळा पार पडला आणि त्यांना लष्करी वैद्यकीय सेवेची शपथ देण्यात आली.

संचलन सोहळ्याला संबोधित करताना सरीन म्हणाल्या की, वैद्यकीय सेवेतील छात्र आज लष्करी सेवेत दाखल झाले असून तुम्ही आता फक्त डॉक्टर नाही तर गणवेशातील अधिकारी तसच समाजाचे मार्गदर्शक आहात. देशाला सर्वोच्च प्राधान्य देऊन जबाबदारी आणि निष्ठेने काम करावं अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्ही आता भारतीय सैन्य दलातील एक अधिकारी आहात ही एक मोठी जवाबदारी आहे. तुम्ही कसे वागता आणि काय निर्णय घेता यावरून तुमची सैन्य दलातील भुमिका स्पष्ट होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवली आहे. मात्र वैद्यकीय सेवेतील मानवी सहभाग वगळता येणार नाही. यावेळी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि डेप्युटी कमांडंट मेजर जनरल गुरुराज सिंग, महाविद्यालयाचे संचालक आणि कमांडंट लेफ्टनंट जनरल पंकज पुरुषोत्तम राव उपस्थित होते.

या संचलन सोहळ्यात फ्लाइंग ऑफिसर पोईला घोष सहभागी झाली होती. लष्करती दाखल होणारी घोष परिवारातील ती तिसरी पिढी आहे. तिचे वडील निवृत्त कर्नल अजितकुमार घोष आणि कर्नल प्रतिभा मिश्रा हे पण लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. पोईला वैद्यकीय सेवेत दाखल झाली याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.

पहलगाम येथे पर्यटकांवर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन व श्रद्धांजली सभा.

  पुणे-   जम्मू काश्मिर येथील पहलगाम मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची निर्घण हत्या केली आणि अनेक पर्यटक जखमी केले. नागरिकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण देश हदरला. अनेक पर्यटकांनी आपले नातेवाईक गमावले. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज झाशीची राणी पुतळा, बालगंधर्व चौक येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.      यानंतर उपस्थितांनी मेणबत्त्या पेटवून मृतांना श्रद्धांजली वाहिली.  

यावेळी माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे,प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड,कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष  अरविंद शिंदे ,युवक अध्यक्ष सौरभ अमराळे,माजी स्थायी समिती अध्यक्षा नीता परदेशी,माजी नगरसेवक रफिक शेख, अजित दरेकर, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, मेहबुब नदाफ, नितीन परतानी, प्राची दुधाने, ॲड. राजश्री अडसूळ, स्वाती शिंदे, उषा राजगुरू, प्रियंका मधाळे, अनिता धिमधिमे, सुंदर ओव्‍हाळ, कांचन बालनायक, सोशल मिडीया अध्यक्ष गुलामहुसेन खान, इंटक अध्यक्ष चेतन आगरवाल, रवि पाटोळे, ब्लॉक अध्यक्ष राजू ठोंबरे, संतोष पाटोळे, अजित जाधव, रमेश सोनकांबळे, विशाल जाधव, रविंद्र माझीरे, हेमंत राजभोज, अक्षय माने, रमेश सकट, द. स. पोळेकर, गणेश गुगळे, राज जाधव, राजेंद्र भुतडा, सतिश पवार, ॲड. फैय्याज शेख, अविनाश अडसूळ, यासीन शेख, सचिन सावंत, अभिजीत महामुनी, सद्दाम शेख, हर्षद हांडे, वैभव डांगमाळी, लतेंद्र भिंगारे, मनोहर गाडेकर, कृष्णा सोनकांबळे, मंदा जाधव, कल्पना शंभरकर आदी उपस्थित होते.  

     यावेळी बोलताना कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘अतिशय नियोजनबध्द अतिरेक्यांतर्फे हा हल्ला करण्यात आलेला आहे. काश्मिर खोऱ्यामध्ये पुन्हा अतिरेक्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. ज्या ठिकाणी पर्यटक गेले होते तेथे सुरक्षा व्‍यवस्था नव्‍हती, याचाच फायदा अतिरेक्यांनी घेतला. पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यानी या हल्ल्यामागच्य सूत्रधारांवर कठोर कारवाई केली पाहिजे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहरातील जे पर्यटक व इतर पर्यटक या अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.’’

पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा तीव्र निषेध, दहशतवाद्यांना स्वारगेट चौकात प्रतीकात्मक फाशी

पुणे, दि. २३ एप्रिल २०२५ –जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात पाकिस्तान धार्जिण्या अतिरेक्यांनी पर्यटकांवर धर्म विचारून केलेल्या भ्याड हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ पुणे शहर शिवसेनेच्यावतीने आज स्वारगेट चौकात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.या निषेध आंदोलनात पाकिस्तानच्या दहशतवादी प्रवृत्तीचा निषेध करत त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली. ‘दहशतवाद असाच संपविला जातो!’ असा ठाम संदेश शिवसेनेच्यावतीने जनतेसमोर मांडण्यात आला.

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “हा हल्ला फक्त भारतातील काही पर्यटकांवर नव्हे, तर भारतीय माणुसकीवर झालेला घात आहे. आम्ही आज शांत बसणार नाही. पाकिस्तान आणि त्यांच्या सहकार्‍यांना, जे धर्माच्या नावावर निर्दोष लोकांवर हल्ले करतात, त्यांना कडक उत्तर दिलं जाईल. या भ्याड कृत्याचा बदला पाकिस्तानच्या हद्दीतच घेतला जाईल!”

शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी व इतर अंगिकृत संघटनांचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. स्वारगेट चौकात आंदोलनावेळी घोषणाबाजी, देशभक्तीपर नारे, आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता.

शिवसेनेने केंद्र सरकारकडे अशी मागणी केली की, “या हल्ल्याचा योग्य आणि ठोस बदला घेतला जावा, आणि भविष्यात अशा दहशतवादी हल्ल्यांना आळा बसावा यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली जावी.”

या आंदोलनाच्या निमित्ताने पुणेकरांनी शिवसेनेच्या या देशभक्तीपर पवित्र्याला जोरदार प्रतिसाद दिला आणि दहशतवादाच्या विरोधात एकजूट दर्शविली. यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, उपजिल्हाप्रमुख अमर घुले,अमर घुले,पंकज कोद्रे,सुदर्शना त्रिगुणाईत,आनंद गोयल, लक्ष्मण आरडे,सुनील जाधव, सुधीर कुरुमकर,विकी माने,गौरव साईनकर,विकास भांबुरे,दत्ता खवळे,नवनाथ निवंगुणे,अभिजीत बोराटे, गणेश काची,शंकर संगम,संदीप शिंदे,दीपक कुलाळ,आकाश रेणुसे, सुरेखा पाटील,महेंद्र जोशी,निलेश जगताप,तुषार मरळ,अक्षय तारु,उद्धव कांबळे, संदेश पावसकर,गडकरी सर,प्रशांत डाबी,नागेश अडसूळ,अकबर शेख, विशाल सरवदे, प्रणव थोरात, व असंख्य शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील मृतकांचे पार्थिव मुंबई विमानतळावर दाखल:कुटुंबीयांना अश्रू अनावर

मुंबई- पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आता त्यांचे मृतदेह आणण्यात येत आहेत. यातील मृतक दिलीप देसले यांचे मृतदेह पनवेल येथे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. याचसोबत डोंबिवली येथील संजय लेले यांचे पार्थिव देखील महाराष्ट्रात आणण्यात आले आहे. यावेळी मंत्री आशिष शेलार तसेच भाजपचे नेते रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

मुंबईच्या विमानतळावर मृतदेह आणण्यात येत आहेत. डोंबिवली येथील संजय लेले आणि पनवेल येथील दिलीप देसले यांचे पार्थिव मुंबई विमानतळावर आणण्यात आले. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या नातेवाईकांची विमानतळावर भेट घेऊन सांत्वन केले. तसेच दिलीप देसले आणि संजय लेले यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.

पनवेल येथील मृतक दिलीप देसले यांच्या निवासस्थानी मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. तसेच या ठिकाणी आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे दिलीप देसले यांच्या अंत्यविधीसाठी दाखल झाले होते. दरम्यान, डोंबिवली येथील मृतक संजय लेले, अतुल मोने व हेमंत जोशी यांचे पार्थिव डोंबिवलीत दाखल करण्यात येणार आहे. हे तिघेही मित्र होते. डोंबिवलीकरांना त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता यावे, यासाठी त्यांचे पार्थिव सायंकाळी 7 वाजता भागशाळा मैदान येथे आणण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.

पुण्यातले तब्बल ५२० पर्यटक काश्मीरात ,यादी आली समोर

पुणे- सकाळी २६४ लोकांची यादी समोर आली होती ज्यात पुण्यातील प्रय्त्क जे काश्मिरात अडकलेत त्यांची नावे होती . पण आता संध्याकाळी मात्र तब्बल ५२० पर्यटकांची नावे आली आहेत . हे ५२० पुणेकर काश्मिरात सुट्टी एन्जोय करायला गेले होते . आणि पहलगाम च्या आतंकी हल्ल्यामुळे परत निघालेत पण त्यांची येण्याची व्यवस्था होऊ न शकल्याने त्यांनी सह्स्नाकडे संपर्क साधला आहे .. पहा हि यादी